• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

महात्मा गांधी आणि ‘छत्तीसगढ़चे गांधी’

गांधींची ‘अहिंसा’ नियोगींनी आंदोलनात प्रत्यक्ष मास लेवलवर उतरवली. एवढे मोठे जन संघटन असून कोणतीही हिंसात्मक कृती झाली नाही. उलट पोलिसांना हा विश्वास होता की, छत्तीसगढ़ मुक्ति मोर्च्यामध्ये कितीही मोठा जनसागर आला तर हिंसा होणार नाही. भारतात ‘निर्माण व संघर्ष’चे राजकारण देणारा नियोगी हा एकमेव कम्युनिस्ट नेता होऊन गेला, जो इतर प्रस्थापित कम्युनिस्ट नेत्यांपेक्षा कितीतरी वेगळा होता!...

  • डॉ. प्रताप विमल केशव
  • Wed , 09 October 2019
  • 1 Comments
  • 3 Like

‘गांधी’ : गांधीजींवरचा सर्वश्रेष्ठ आणि जगात सर्वांत जास्त बघितला गेलेला एक चित्रपट

आज माझा वर्तमान पुन्हा गांधी संदर्भ घेऊन उभा आहे. भारतीय स्वातंत्रलढ्याचे भाग म्हणून जनमानसातील गांधींची प्रतिमा पुसून टाकण्यासाठी आजच्या काळात खूप जोरकस राजकीय प्रोपगंडा राबवला जात आहे. आज माझा मुलगा अडीच वर्षांचा आहे. त्याला मी अजून २० वर्षांनी त्याच्या जाणत्या वयात विचारेल की, गांधीजी कोण होते? तर माझ्या मुलाला गांधीजी कसे माहिती असतील हाच मोठा प्रश्न आहे. त्याला दाखवायला माझ्याकडे अ‍ॅटनबरोचे ‘गांधी’ आहेत...

  • संदीप गिऱ्हे
  • Wed , 02 October 2019
  • 0 Comments
  • 5 Like

गांधींनी सत्याची व्याख्या केलेली नाही, पण सत्याचा शोध मात्र घेतला आहे!

गांधी आणि कबीर, असे वाटते की, ते एकमेकांना पूरक आहेत. जेव्हा कबीर जातो, तेव्हा गांधी येतात, तर जेव्हा गांधी जातात, तेव्हा कबीर येतो. दोघेही सत्याचे शोधक आहेत. कबीराने त्याचा शोध घेतला व ते व्यक्तीवर सोडून दिले. त्याने कोणत्याही संघटित धर्माचा आधार घेतला नाही. खरे तर त्याने इस्लाम आणि हिंदू धर्मातल्या अनेक गोष्टींवर कडक ताशेरे झोडले आहेत. तर गांधी तसे नव्हते...

  • गुलाम महंमद शेख
  • Wed , 02 October 2019
  • 0 Comments
  • 3 Like

गांधी शक्य आहेत, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, त्यांना शक्य करायला पाहिजे!

खरे सांगायचे तर गांधींइतका निर्भय माणूस गेल्या २०० वर्षांत जन्मला नाही. त्या गांधींना स्मरताना आपण भयभीत होत आहोत, खरे म्हणजे जर गांधी कुठल्या तरी रूपात आज आपल्या समोर आले असते, तर देव जाणे त्याने काय केले असते, आपली काय हालत केली असती. गांधी आपल्याला अस्थिर करतो, अनिश्चित करतो, विचलित करतो. म्हणून आपल्याला असत्य पचवायला सोपे वाटते आणि सत्य शोधायचा आपण प्रयत्न करत नाही...

  • अशोक वाजपेयी
  • Wed , 02 October 2019
  • 1 Comments
  • 3 Like

गांधी समजून घेताना.... डाव्या विचाराच्या चौकटी बाहेरून

कॉ. नियोगी डाव्या चळवळीतले असे एक नेतृत्व होते की, जे गांधी जयंती मोठ्या उत्सवाप्रमाणे साजरी करत. २ ऑक्टोबर १९९१ला रायपूर येथे गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण छत्तीसगढमधून लोक जमणार होते. नियोगी गांधी जयंतीच्या तयारीसाठी भिलाईला आले होते. तिथेच त्यांची हत्या झाली. दुसरा असा कम्युनिस्ट नेता गांधीजींच्या इतक्या विचारांजवळ गेलेला पाहिला नाही...

  • डॉ. प्रताप विमल केशव
  • Wed , 02 October 2019
  • 0 Comments
  • 5 Like

‘गांधीवादी राज्यघटना’ कशी असली असती? औंध संस्थानाचा प्रयोग काय सांगतो?

२३ नोव्हेंबर १९३८ रोजी राजा भवानराव पंतांनी आपलं सिंहासन सोडलं आणि घोषित केलं – ‘माझी प्रजा’ आता स्वतःचं कार्य सांभाळण्यास सक्षम झाली आहे. मी आता फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं व मार्गदर्शनाचं काम करेन.’ आता एकच समस्या होती. औंध प्रशासन स्वतःचा कारभार स्वतः कसा करेल? यावेळी औंधमधील नेत्यांनी सर्वसंमतीनं एका व्यक्तीच्या मदतीची अपेक्षा केली, ती म्हणजे महात्मा गांधी...

  • सिदिन वडुकुट
  • Wed , 02 October 2019
  • 1 Comments
  • 6 Like

म. गांधी आजही मानवी मूल्यं आणि प्रेरणांसाठी किती उदात्त ठरतात, याचा ‘जाहीरनामा’ या पुस्तकात वाचायला मिळतो!

हे पुस्तक फॅसिनेटिंग आहे. कुलकर्णी यांनी ते काहीसं भारावून जाऊन लिहिलं आहे. गांधींचा विचार कालातीत आणि सर्वव्यापी असल्यानं तो आज-उद्याच्या जगाशी सुसंगत ठरतोच. त्याचं कारण त्यामागे असलेलं त्यांचं द्रष्टेपण. गांधींचा तत्त्वविचार हा आजच्या काळाचा कसा ‘जाहीरनामा’ आहे, हे जाणून घेण्यासाठी या पुस्तकाचं वाचन अनिवार्य आहे, एवढं नक्की...

  • टीम अक्षरनामा
  • Wed , 02 October 2019
  • 1 Comments
  • 3 Like

म. गांधींचं १५०व्या जयंतीनिमित्त स्मरण करताना डॉ. आंबेडकरांचंही स्मरण करायला हवं!

गांधींना ग्रामस्वराज हवं होतं. खेड्यातच दलितांवर अधिक अत्याचार होतात आणि त्यांना उदरनिर्वाहासाठी संसाधनंच मिळत नाहीत, असं डॉ आंबेडकरांचं प्रतिपादन होतं. म्हणूनच ‘खेड्याकडे चला’ या घोषणेविरोधातील ‘खेडी सोडा’ हा विचार डॉक्टरांनी दिला होता. ‘व्यक्ती हेच राज्यकारभाराचे एकक- युनिट असावं’ असा डॉ. आंबेडकरांचा विचार होता. या विचारांचं मूळ पाश्चात्य उदारमतवादी लोकशाही संकल्पनांमध्ये सापडतं...

  • अलका गाडगीळ
  • Wed , 02 October 2019
  • 0 Comments
  • 5 Like

महात्मा गांधी यांच्याविषयीची पाच उत्तम पुस्तकं!

म. गांधी फक्त एक राजकीय नेते नव्हते. ते एक नैतिक तत्त्वज्ञ होते, ज्यांनी जगाला अन्याय, अर्थात हिंसेविरोधात लढा देण्याचं विशिष्ट तंत्र दिलं. या तंत्राला त्यांनी ‘सत्याग्रह’ म्हटलं आणि अमेरिकेसह जगातील बऱ्याच देशांमध्ये त्याचं पालन केलं गेलं. गांधी धर्माच्या बाबतीतही एक अतिशय विशेष असे विचारवंत होते. हिंदू-मुस्लीम या दोन प्रमुख धार्मिक समुदायांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी ते जगले ...

  • रामचंद्र गुहा
  • Wed , 02 October 2019
  • 0 Comments
  • 5 Like

गांधींनी सर्वसंगपरित्याग केला तो दुसऱ्याची सेवा करण्यासाठी, दुसऱ्यांच्या आनंदासाठी!

संपत्ती, दागदागिने, राजवाड्यांचे वैभव असलेल्या लोकांबरोबर भारतीय लोक आज्ञाधारकपणे वागतात; आणि स्वार्थत्याग व सर्वसंगपरित्याग करणारी माणसे भारतीयांची हृदये जिंकतात. मॅथ्यू अर्नाल्डने लिहून ठेवले आहे, ‘पौर्वात्य माणसे स्फोटापुढे वाकतात आणि त्याकडे सहनशीलतेने आणि खोल तुच्छतेने पाहातात. पण ज्या पौर्वात्य माणसांनी संपत्ती आणि सत्ता कमावली आहे, त्यांच्यापुढेही वाकून ते खोल तुच्छतेने पाहतात.’...

  • लुई फिशर
  • Mon , 02 September 2019
  • 0 Comments
  • 4 Like

म. गांधींनी हिंदू धर्माच्या रणभूमीमध्ये राहून प्रगल्भतेकडे हिंदू धर्माची परिणती केली! (पूर्वार्ध)

कोणताही नवा पंथ न काढता, कोणताही नवा धर्म न सांगता, कुठल्याही नव्या संप्रदायाला जन्म न देता गांधींनी हिंदू धर्माच्या रणभूमीमध्ये राहून हक्काने हा माझा धर्म आहे, त्याच्यावर माझा अधिकार आहे आणि तो अधिकार मी सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे, माझा धर्म मी प्रगल्भ करणार आहे, या प्रगल्भतेकडे हिंदू धर्माची परिणती केली...

  • किशोर बेडकीहाळ
  • Wed , 03 April 2019
  • 1 Comments
  • 2 Like

म. गांधींनी हिंदू धर्माच्या रणभूमीमध्ये राहून प्रगल्भतेकडे हिंदू धर्माची परिणती केली! (उत्तरार्ध)

कोणताही नवा पंथ न काढता, कोणताही नवा धर्म न सांगता, कुठल्याही नव्या संप्रदायाला जन्म न देता गांधींनी हिंदू धर्माच्या रणभूमीमध्ये राहून हक्काने हा माझा धर्म आहे, त्याच्यावर माझा अधिकार आहे आणि तो अधिकार मी सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे, माझा धर्म मी प्रगल्भ करणार आहे, या प्रगल्भतेकडे हिंदू धर्माची परिणती केली...

  • किशोर बेडकीहाळ
  • Wed , 03 April 2019
  • 1 Comments
  • 2 Like

भारताची फाळणी खरंच का महात्मा गांधींमुळे झाली?

महात्मा गांधींनी मुस्लिम अनुनयाचे राजकारण केले आणि गांधीच फाळणीला जबाबदार होते, असा कुप्रचार हिंदुत्ववादी लोकांकडून नेहमीच केला जातो. आणि सामान्य माणूस या प्रचाराला बळी पडतो. इतिहास याच्या नेमका उलट आहे. फाळणी टाळण्यासाठी गांधीजींनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. या प्रस्तावावरून हे दिसून येते की, फाळणी टाळण्यासाठी गांधीजी कोणत्या टोकाला जायला तयार होते...

  • अजित धनवडे
  • Wed , 06 February 2019
  • 1 Comments
  • 8 Like

बापू, तुमची हत्या केली तरी तुम्ही संपायला तयार नाही. का?

‘भारत म्हणजे गांधींचा देश’ असं का म्हणतात हो? बापू, तुमची हत्या केली तरी तुम्ही संपायला तयार नाही! का? सगळं जग तुमच्यासमोर नतमस्तक कसं होतं हो? बापू, तुमचा विचार मान्य नसलेली माणसंदेखील ‘साबरमती के संत’ म्हणत तुमच्यासमोर कसं झुकतात हो? जगाला तुमचाच विचार वाचवेल असं सतत का वाटतं हो बापू?...

  • विशाल बाळू डोळे
  • Thu , 31 January 2019
  • 8 Comments
  • 8 Like

गांधींकडून… आंबेडकरांकडे!

त्या काळात विठ्ठलाच्या मंदिराचा झालेला बुद्धविहार आज गावातील मुलांचं अभ्यासकेंद्र बनला आहे. तो दगड, ज्यावर बाबासाहेब बसले होते, तो आजही तिथंच आहे. जणू काही आता त्याचं सिंहासन झालं आहे. गावकऱ्यांनी त्याला प्रेमाचं कुंपण घातलंय. तो दगड आजही गावाला जगण्याची प्रेरणा व सामर्थ्य देत असतो आणि आजही आजोबा त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगतात...

  • वनश्री वनकर
  • Wed , 02 January 2019
  • 6 Comments
  • 5 Like

गांधीविचार आणि मराठी साहित्य

माझ्या मते प्रेमचंद, रेणू किंवा विनोद कुमार शुक्ल ह्यांच्यासारख्या हिंदी साहित्यिकांचे आपल्या मातीशी जे दृढ नाते आहे, ते मराठी साहित्यिकांनी केव्हाच गमावले आहे. हिंदीभाषी प्रदेशांच्या तुलनेत महाराष्ट्र आधुनिक असल्याचा दावा आपण नेहमी करतो. त्याच वेळी आपण हे विसरतो की वासाहतिक प्रभावामुळे महाराष्ट्रात परंपरा व आधुनिकता ह्यांचा नीट समन्वय साधला गेला नाही...

  • रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
  • Mon , 03 December 2018
  • 1 Comments
  • 3 Like

गांधींवर आरोप करून तथाकथित विचारवंतांना राष्ट्रभक्तीचे आणि बदनामीचे झेंडे मिरवण्यात आनंद वाटतो!

२ ऑक्टोबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०१९ यादरम्यान गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. गांधी कसे आमचेच आहेत, ते आम्हाला कसे ‘प्रात:स्मरणीय’ आहेत, असे प्रत्येक राजकीय पक्ष ‘दम’ देऊन सांगत फिरेल, तेव्हा लोकशाहीतले सजग नागरिक म्हणून आपण गांधींचे विचार समजून घेणं, त्याचा प्रसार करणं, हे आपलं आद्यकर्तव्य आहे...

  • धनंजय श्रीराम सानप
  • Mon , 08 October 2018
  • 2 Comments
  • 7 Like

प्रत्येकाला आकळणारा वेगळा गांधी!

अहिंसेच्या मार्गानंच संघर्ष केला पाहिजे, याचा आग्रह धरणार्‍याच नव्हे तर, हा आग्रह आयुष्यभर श्रद्धेनं व्रत म्हणून सांभाळणार्‍या महात्मा गांधींबद्दल आजच्या युरोपियनांना एवढी उत्सुकता का आहे, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पस् बघितल्यावर कुठं जाण्याची गरजच उरत नाही. महात्मा गांधींच्या देशात आपण राहतो, याचा मग सार्थ अभिमान मला वाटू लागला आणि त्या महात्म्याला मनोमन पुन्हा एकदा वंदन केलं...

  • प्रवीण बर्दापूरकर
  • Tue , 02 October 2018
  • 1 Comments
  • 3 Like

इस्लाम आणि महात्मा गांधी

मुस्लिम धर्ममार्तंडांवरदेखील गांधीजींनी कडक शब्दात टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हिंदू धर्मात मूर्तिपूजा जेव्हा एखाद्या दिव्य ध्येयाचे साधन बनते, तेव्हा ती इष्ट मानली जाते. जेव्हा मूर्तीच खुद्द दिव्य ध्येयस्वरूप बनते, तेव्हा ती जडपूजा होते, ती पापमय आहे. मी मूर्तीपूजेचा समर्थकही आहे आणि विरोधकही आहे. मूर्तीपूजेमुळे जे भ्रम निर्माण होतात, त्यांचे खंडन किंवा त्यांना विरोध करणे आवश्यक आहे...

  • प्रा. फकरुद्दीन बेन्नूर
  • Tue , 02 October 2018
  • 0 Comments
  • 1 Like

डॉ. आंबेडकर आणि म. गांधीजी

गांधी म्हणजे भारतीय राजकारणाचे अध्वर्यू, हुकूमशहा, भारतीय लोकांचे अनभिषिक्त सम्राट. असा माणूस आज एकदम बिथरला गेला होता. त्यांच्यातून विजेची एक लहर झपाटून गेली. पुन्हा गांधींशी संवाद करणे म्हणजे कायमची कटुता व न संपणारे दु:ख निर्माण करण्यासारखे होते. एका हिंदू पुढाऱ्याची ही हिंमत गांधीजींना आश्चर्यात टाकणारी होती. परंतु विरोधाची धार तीव्र होती. हीच मुलाखत गांधी-आंबेडकरवादाची नांदी ठरली...

  • अनुवाद – रॉय किणीकर
  • Tue , 02 October 2018
  • 3 Comments
  • 4 Like

गांधीजींच्या अखेरीची वाट पाहणाऱ्या विन्स्टन चर्चिलला ब्रिटिश साम्राज्याची अखेर पाहावी लागली

अखेर २१ वा दिवस उलटला. गांधीजी अत्यंत क्षीण झाले असले तरी अद्याप जिवंत आहेत आणि त्यांचे उपोषण समाप्त होत आहे, ही बातमी येताच आम्हा सर्वांच्या मनावरील ओझे उतरले. ३ मार्च १९४३ चा तो दिवस होता. आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. आनंदाने हर्षभरित झालो. चर्चिल आणि केंद्रातील गृहमंत्री रेजिनॉल्ड मॅक्स्वेल यांनी केलेली जय्यत तयारी फुकट केली...

  • ग. प्र. प्रधान
  • Tue , 02 October 2018
  • 0 Comments
  • 2 Like

गांधी आणि मार्क्स (पूर्वार्ध)

गांधी हे एक साम्राज्यवादविरोधी लढवय्ये होते, हे सर्वमान्य आहे. त्यांना कदाचित आजवरचे साम्राज्यवादविरुद्धचे सर्वश्रेष्ठ लढवय्ये म्हणता येईल. ते एक थोर साम्राज्यवादविरोधी विचारवंत होते, हे मात्र फारसे ध्यानात घेतले जात नाही. त्यांच्या मर्मग्राही मतांचे विस्तृत विश्लेषण स्वत: त्यांनी केले नाही, की मार्क्समध्ये आढळणाऱ्या वर्ग आणि वर्गसंघर्षाच्या संकल्पनांचे त्यांना आकर्षण वाटले नाही...

  • अकील बिलग्रामी
  • Tue , 02 October 2018
  • 0 Comments
  • 2 Like

गांधी आणि मार्क्स (उत्तरार्ध)

मला इतकेच म्हणायचे असते तर स्वातंत्र्य आणि समता यांच्यापेक्षा मूल्यांच्या सुप्रसिद्ध त्रिमूर्तीतील बंधुता हे मूल्य जास्त मूलभूत आहे, असे म्हणत मी या निबंधाची सुरुवात केली असती. करुणेची, सहानुभूतीची भावना हा बंधुत्वातील आत्मनिष्ठ घटक झाला. प्रबोधनाला तोच अर्थ अभिप्रेत होता आणि बंधुता कितीही आवश्यक असली तरी ती मार्क्स आणि गांधींच्या अपरात्म जीवनाच्या कल्पनेइतकी खोलवर जात नाही...

  • अकील बिलग्रामी
  • Tue , 02 October 2018
  • 0 Comments
  • 1 Like

कॅथरिन मेयो आणि महात्मा गांधी

भारतात या पुस्तकाचं स्वागत झालं नाहीच, उलट मेयोंच्या विधानांचं खंडन करणारी दोन-चार पुस्तकं प्रकाशित झाली. त्याच काळात भारतीय घटनेचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटनं सायमन कमिशन गठित केलं होतं. या समितीत एकही भारतीय नव्हता. या ‘सर्व गोऱ्या’ समिती विरोधात मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. गांधी अर्थातच या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते...

  • अलका गाडगीळ
  • Tue , 02 October 2018
  • 0 Comments
  • 2 Like

टॉलस्टॉय, नायपॉल आणि गांधी

गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील अखेरच्या टप्प्यावर टॉलस्टॉय यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. विरोध दर्शवण्यासाठी आपल्या हक्कांचा त्याग करणे ही कल्पना त्यांना या थोर लेखकाच्या चिंतनातून मिळाली. अहिंसा आणि सत्याग्रहाच्या संकल्पना टॉलस्टॉय यांच्या मांडणीतून विकसित झाल्या. गांधी वसाहतवादाविरोधात लढले. वसाहतवाद मूलत:च अनैतिक असतो असं टॉलस्टॉय यांचं म्हणणं होतं. नॉयपॉल साम्राज्यप्रणित विस्थापनामुळे होरपळले होते...

  • अलका गाडगीळ
  • Mon , 03 September 2018
  • 0 Comments
  • 2 Like

‘पूर्ण स्वराज्य’ या एकमेव आदर्शाचे सतत स्मरण करून देणारे प्रतीक म्हणून गांधींनी खादीची निवड केली!

लोकांना ध्येयपूर्तीसाठी वेळ पडल्यास बलिदान करण्यास लागणारे बळ आणि प्रोत्साहन देणे प्रतीकाची योजना असायला हवी. लोकांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित असले पाहिजे. हे प्रतीक, आपण स्वातंत्र्य मिळवण्यास पात्र आहोत या स्वत:वरील विश्वासाचा आधार असला पाहिजे. पूर्ण स्वराज्य या एकमेव आदर्शाच्या दिशेने घौडदौड करताना त्याचे सतत स्मरण करून देणारे असे प्रतीक गरजेचे होते. याचकरिता गांधींनी खादीची निवड केली...

  • पीटर गोन्साल्विस
  • Thu , 02 August 2018
  • 0 Comments
  • 2 Like

गांधी : २१ व्या शतकाच्या संदर्भात

महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानात हिंसेला पर्याय आहे का? तत्त्वतः त्यांचा हिंसेला पूर्ण विरोध होता. पण प्रत्यक्षात त्यांनी वेळोवेळी हिंसक कृतींकडे डोळेझाक केली होती. त्यांच्या मते माणसं जेव्हा अगतिक होतात, पराकाष्ठेच्या दबावाखाली असतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया हिंसक बनते हे आपण समजू शकतो; परंतु ती स्वाभाविक असली तरी समर्थनीय नसते. आपण अन्यायाविरुद्ध संघर्ष केलाच पाहिजे- तिथे मात्र कुठलीही तडजोड नसावी...

  • भिकू पारेख
  • Mon , 02 July 2018
  • 0 Comments
  • 4 Like

गांधीवाद : एक चिरंतन सत्य

मोहनदास करमचंद गांधी यांंना रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्यातून बाहेर फेकले गेले. कारण ते गोरे नव्हते. गांधींच्या आयुष्यातला तो आत्मसाक्षात्काराचा दिवस होता. त्यातून गांधींना आत्मबळ आले, त्यांची आत्मशक्ती जागृत झाली. त्या दिवशी त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला सत्याग्रह केला. तो दिवस होता ७ जून १८९३. म. गांधींचा दक्षिण आफ्रिकेत तो पहिला सत्याग्रह. त्याला आज १२५ वर्षँ पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं...

  • दादा धर्माधिकारी
  • Thu , 07 June 2018
  • 0 Comments
  • 1 Like

नि:शस्त्र जनतेला एक नवा मार्ग गांधीजींनी दाखवला, त्यामुळे लोकशाहीला पोषक भूमी तयार झाली

जो असंतोष लोकमान्यांनी १९१६ पर्यंत भारतात निर्माण केला, त्याला वाट सापडण्याची आवश्यकता होती. धोपट मार्ग दोन होते. एक असंतोषाची धग कमी होता होता अ‍ॅनी बेझंट यांच्या किंवा गोखल्यांच्या मार्गावर येणे किंवा शस्त्राचारी  क्रांतीची वाट धरणे. यांपैकी कोणत्याही मार्गाने राष्ट्रीय चळवळ पुढे गेली असती तर गांधीजींच्या नेतृत्वामुळे ज्या व्यापक प्रमाणावर जनता तिच्यात गोवली गेली ते झाले नसते...

  • ना. ग. गोरे
  • Sat , 02 June 2018
  • 1 Comments
  • 4 Like

गांधींनी भारतासाठी द्विपक्षीय प्रणालीचे समर्थन केले तेव्हा...

मुस्लिम लीगला धार्मिक राजकारणाच्या गुंत्यामधून बाहेर काढण्याचा व काँग्रेसविरोधी एक असांप्रदायिक आघाडी करण्याचा आग्रह गांधींनी जीनांना केला. पण ते अयशस्वी ठरले, जे भारतासाठीदेखील नुकसानकारक ठरले. जर जीनांनी गांधींचा सल्ला मानला असता, तर कदाचित भारताची फाळणीदेखील टाळता आली असती; इतकेच नव्हे, तर स्वतंत्र भारताला द्विपक्षीय प्रणालीचे फायदेदेखील लाभले असते...

  • रामचंद्र गुहा
  • Sat , 02 June 2018
  • 0 Comments
  • 7 Like

गांधीमताचा मार्क्सवादी अन्वयार्थ

गांधीवाद ही काही अमूर्त, निष्क्रिय, इतिहासात गोठून गेलेले अशी विचारप्रणाली नाही. गांधीवाद आहे अनेक प्रवृत्तींचा पुंज. त्यातील काही प्रवृत्ती पुराणमतवादी तर काही पुरोगामी व अन्य काही या दोन्हींचे विरोधविकासात्मक मिश्रण आहेत. आपण गांधीजी कसे वाचतो, त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो यावर आपले गांधीजींचे आकलन अवलंबून आहे...

  • भिकू पारेख
  • Mon , 02 April 2018
  • 0 Comments
  • 3 Like

गांधींनी भगतसिंगला वाचवण्यासाठी काय केले? भगतसिंगला वाचवणे हेच गांधींच्या जास्त हिताचे होते...

महात्मा गांधींनी भगतसिंगला वाचवायला पुरेसे प्रयत्न केले नाहीत किंवा त्यांना भगतसिंगला वाचविण्यात फारसे स्वारस्य नव्हते अशी टीका अनेकदा केली जाते. ह्या लेखातून असे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे की गांधींचा सशस्त्र क्रांतीला जरी विरोध असला तरी त्यांनी भगतसिंगला वाचवायचा अखेरपर्यंत प्रयत्न केला होता. त्याविषयीचा हा लेख...

  • चंदरपाल सिंग
  • Tue , 06 March 2018
  • 3 Comments
  • 3 Like

जिथे गांधीप्रेम व द्वेष फक्त राजकारणासाठी केला जातो, तिथे ‘गांधी नावाची प्रेरणा’ जिवंत ठेवणे, हे आपले कर्तव्य होते!

३० जानेवारी १९४८ रोजी म. गांधी यांची हत्या झाली. त्याला कालच्या ३० जानेवारीला ७० वर्षे पूर्ण झाली. आपल्या देशात गांधीप्रेम आणि गांधीद्वेष हे दोन्ही फक्त राजकारणासाठी वापरले जातात, त्यामुळे ‘गांधी नावाची प्रेरणा’ जिवंत ठेवणे, हे आपल्यासारख्या सामान्य नागरिकांचे कर्तव्य होऊन जाते. त्या संदर्भातला एका तरुणाचा हा उदबोधक लेख...

  • राकेश परब
  • Tue , 06 February 2018
  • 21 Comments
  • 5 Like

गोडसे @ गांधी डॉट कॉम : गांधी-गोडसे यांना समोरासमोर आणणारं नाटक

अनेक पात्रं, अनेक घटना, अनेक घटनास्थळं असूनही ‘गोडसे @ गांधी डॉट कॉम’ या थोड्या फॅन्सी शीर्षकाच्या नाटकातून असगर वज़ाहत यांनी सत्ताकारण, लोककल्याण, व्यक्तिगत निष्ठा आणि त्यांचं उदात्तीकरण यांच्यावर फार प्रभावी भाष्य केलं आहे. अतिशय संयतपणे एका ज्वलंत विषयाच्या तळाचं सत्य शोधण्याला युवा वर्गाला प्रवृत्त केलं आहे...

  • प्रा. कमलाकर सोनटक्के
  • Fri , 02 February 2018
  • 1 Comments
  • 4 Like

गांधी आणि आंबेडकर (पूर्वार्ध)

डॉ. बाबासाहेबांनी गांधींना कधी महात्मा म्हटले नाही. ते महात्मा होते असे त्यांचे मतही नव्हते. हे त्यांनी कधी लपवूनही ठेवले नाही. गांधींवर अत्यंत जहाल टीका वर्षानुवर्षे त्यांनी केली. हा वारसा आंबेडकरी राजकीय चळवळीला लाभलेला आहे. हा वारसा जोवर ही चळवळ बाबासाहेबांच्या नावे जतन करू इच्छिते, तिचा राजकीय वापर करू इच्छिते, तोवर समन्वय शक्य होणार नाही, हे आपण खेदपूर्वक, पण मोकळेपणाने स्वीकारायला हवे...

  • वसंत पळशीकर
  • Thu , 02 November 2017
  • 1 Comments
  • 8 Like

गांधी आणि आंबेडकर (उत्तरार्ध)

डॉ. बाबासाहेबांनी गांधींना कधी महात्मा म्हटले नाही. ते महात्मा होते असे त्यांचे मतही नव्हते. हे त्यांनी कधी लपवूनही ठेवले नाही. गांधींवर अत्यंत जहाल टीका वर्षानुवर्षे त्यांनी केली. हा वारसा आंबेडकरी राजकीय चळवळीला लाभलेला आहे. हा वारसा जोवर ही चळवळ बाबासाहेबांच्या नावे जतन करू इच्छिते, तिचा राजकीय वापर करू इच्छिते, तोवर समन्वय शक्य होणार नाही, हे आपण खेदपूर्वक, पण मोकळेपणाने स्वीकारायला हवे...

  • वसंत पळशीकर
  • Thu , 02 November 2017
  • 0 Comments
  • 5 Like

अस्पृश्यता  आणि गांधीजी

गांधीजींच्या मृत्यूनंतर मात्र अस्पृश्यतेच्या प्रश्नांकडे भारतीय नेत्यांनी दुर्लक्ष केले असे म्हणणे भाग पडते. म. गांधींनंतर या प्रश्नाकडे जिव्हाळ्याने कोणीच पाहिना म्हणून पुन्हा हा प्रश्न तसाच रेंगाळत मागे पडला आहे असे म्हणावे लागते. गांधीजींनी निर्माण केलेली या प्रश्नासंबंधीची परंपरा खंडित झालेली आहे, हीच या प्रश्नाची आज शोकांतिका आहे...

  • शंकरराव खरात
  • Mon , 02 October 2017
  • 0 Comments
  • 5 Like

भारतीय मुसलमान

काही लोक असे मानतात, की गांधीजींचा मार्ग चुकीचा होता. त्या मार्गाने जाऊन ही समस्या सुटण्याची शक्याता तेव्हाही नव्हती व आताही नाही. म्हणून त्या मार्गाच्या श्रेष्ठत्वाचा स्वीकार करता येत नाही आणि गांधीजींचे अपयश उज्ज्वलही ठरत नाही. सावरकर वगैरे मंडळी ज्या मार्गाचा पुरस्कार करीत होती, तोच मार्ग त्यावेळीही योग्य होता आणि यापुढेही त्याच मार्गाने हा प्रश्न सुटेल. माझे स्वत:चे मत या दोन मतांहून थोडे वेगळे आहे...

  • कृष्णचंद्र आझाद
  • Mon , 02 October 2017
  • 1 Comments
  • 2 Like

गांधीवाद इतिहासजमा झाला?

इतर देशांनादेखील गांधींपासून प्रेरणा आज मिळत आहे ही गोष्ट ध्यानात आणली पाहिजे. या गोष्टी ज्यांना मान्य आहेत असे लोकदेखील आता म्हणू लागले आहेत की, गांधीजींची लोकोत्तर कामगिरी मान्य, पण आता त्याचे महत्त्व किती? फार तर गांधीजींविषयी कृतज्ञता व्यक्त करू. पण गांधी आता इतिहासजमा झाले आहेत एवढे गांधीवाद्यांनी मान्य केले पाहिजे. कित्येक लोक गांधीजींचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्रांतिकार्य मान्य करतात...

  • आचार्य कालेलकर
  • Mon , 02 October 2017
  • 0 Comments
  • 2 Like

मैंने गांधी को नहीं मारा!

गांधीजींचा प्रभाव असलेले असंख्य; परंतु त्यांच्या विचारांचे अनुकरण करणारे मात्र नगण्य. हा अंतर्विरोध कायम आहे! आता तर देशातील वातावरण ‘मुंह में राम, बगल में नथुराम’ असे आहे. गांधीजींचे मारेकरी आपल्यातच आहेत-आजही! त्यांच्यात अलौकिक असे काय होते, की मृत्यूनंतर ६६ वर्षे झाली तरी त्यांच्या नावातील महिमा टिकून आहे?...

  • कुमार केतकर
  • Mon , 02 October 2017
  • 1 Comments
  • 3 Like

म. गांधी : शाश्वताचा यात्रिक

आपल्या अंतरंगाला कायम शाश्वताची ओढ असते. व्यक्तिमत्त्वाचे पोषण शाश्वत विचारांनीच होते. गांधी ती भूक भागवितात. कारण गांधीजींनी शाश्वताशी असलेले नाते कधीच तुटू दिले नाही. शाश्वताशी असलेले हे नाते गूढ नव्हते, तर प्रयोगशील आणि बुद्धिनिष्ठ होते. जीवनाच्या मूलभूत तत्त्वांवरची त्यांची श्रद्धा ही प्रयोगनिष्ठ होती. प्रयोगातून मिळणारा आत्मविश्वास त्यांच्या लहानसहान कृतीतून आणि वक्तव्यातून सहजी प्रकट होत असे...

  • उत्तम कांबळे
  • Mon , 02 October 2017
  • 0 Comments
  • 3 Like

मी आणि गांधीजी

गेले काही दिवस तरुण लेखक-पत्रकार उत्पल व.बा. ‘मी आणि गांधीजी’ ही संवादमालिका फेसबुकवर लिहीत आहे. आज गांधी असते तर आजच्या काळाच्या एखाद्या प्रतिनिधीशी समकालीन विषयांवर त्यांचा संवाद कसा झाला असता, त्यांनी काय भूमिका घेतली असती, हे थोडं हलक्याफुलक्या शैलीत उत्पलला शोधावंसं वाटलं आणि त्यातून या संवादमालिकेचा जन्म झाला. ही संपूर्ण संवादमालिका...

  • उत्पल व. बा.
  • Mon , 02 October 2017
  • 1 Comments
  • 3 Like

चले जाव : भारतीय स्वातंत्र्याचा अखेरचा लढा

भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेला अखेरचा लढा ‘चले जाव’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याला ९ ऑगस्ट २०१७ रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाली, त्याला त्याच आठवड्यात ७० वर्षे पूर्ण झाली. काही अंशी अमेरिका वगळता अन्य सर्व प्रमुख देशांना, भारताने तो लढा पुकारण्याची ती वेळ योग्य नाही असेच वाटत होते. हे सर्व लक्षात घेता ‘चले जाव’ हे जगाला आव्हान होते, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरत नाही...

  • विनोद शिरसाठ
  • Mon , 02 October 2017
  • 0 Comments
  • 2 Like

‘हिंद स्वराज’ची पारायणे केल्याशिवाय गत्यंतर नाही

गांधीविचारांचा अभ्यास करणाऱ्याला ‘हिंद स्वराज’ या पुस्तकाची पारायणे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तो काही धर्मग्रंथ नाही, पण एखादी उत्कृष्ट साहित्यकृती जशी दर वाचनात वेगळी भासते, त्याचप्रमाणे हे लहानसे चिंतनात्मक पुस्तक दर वाचनात नवीन विचारांना चालना देते. गांधींनी मुळात हे विचार इंग्रजीत न लिहिता गुजरातीत का लिहिले असा मुद्दा मांडला गेला आहे. हे विचार त्यांना शांत राहू देईनात, असे गांधींनी सांगितले आहे...

  • रामदास भटकळ
  • Mon , 02 October 2017
  • 0 Comments
  • 2 Like

गांधी : तिरस्काराकडून आदरभावनेकडे  

गांधीविचाराबाबत असहमती दर्शवूनही आपण त्याचा कालसुसंगत विचार करू शकतो. एखाद्या विचारधारेबाबत असहमती दर्शवणं अथवा समज-गैरसमजाचे थर साचत जाणं म्हणजे त्या विचारधारेला विरोध करणं नसतं, तर विचार तपासण्याची ती एक संधीही असते. यासाठीच सांगोवांगीच्या कथांवर विश्वास न ठेवता चिकित्सक वृत्तीनं गांधी शोधूया. गांधीविचारांना अभ्यासण्याची आणखी एक संधी स्वत:ला देऊया, स्वत:साठी...

  • तुषार म्हात्रे
  • Mon , 02 October 2017
  • 1 Comments
  • 2 Like

गांधींबद्दल गैरसमज आहेत, त्यामागे हितसंबंधांचा भाग आहे!

गांधींबद्दल गैरसमज आहेतच. त्यामागे हितसंबंधांचा भाग आहे. ते गैरसमज या प्रकारच्या भाषणातून किंवा वस्तुस्थिती सांगण्यातून दूर होण्याची शक्यता कमी आहे. कारण हा एका लढाईचा, वर्चस्वाचा भाग आहे. फक्त एवढंच आहे की, ही लढाई गांधींच्या पद्धतीनं करायची असेल तर त्यांचंही परिवर्तन करावं लागेल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण परिवर्तीत आहोत, आपल्याला कळलं आहे, पण त्यांनाही आपल्याबरोबर आणायचं आहे...

  • किशोर बेडकीहाळ
  • Mon , 02 October 2017
  • 0 Comments
  • 2 Like

गांधींकडे पुन:पुन्हा का जावं लागतं?

२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला एक लेख प्रकाशित केला जातो… हा आठवा लेख...

  • प्रा. सुहास पळशीकर
  • Sat , 02 September 2017
  • 0 Comments
  • 2 Like

गांधींविषयी गैरसमज निर्माण होण्याची काही कारणे…

इंग्रजांशी गांधींनी कधी शत्रूभाव ठेवला नाही. म्हणून येथील राष्ट्रवाद्यांना ते ‘परधार्जिणे’ वाटतात. आंतरराष्ट्रीयवादाची भलामण करतात, म्हणून ‘राष्ट्रवादविरोधी’, भांडवलदार, उद्योगपतींच्या विरोधी गरळ ओकत नाहीत म्हणून समाजवाद्यांना ‘भांडवलवाद्यांचे हस्तक’ वाटतात. गरिबांच्या बाजूने हस्तक्षेपाला प्रोत्साहन देतात म्हणून ‘धनिकहितविरोधी’ ठरतात. सवर्णांना शिव्या देत नाहीत म्हणून ‘सवर्णहितविरोधी’ मानले जातात...

  • प्रा. विठ्ठल दहिफळे
  • Wed , 02 August 2017
  • 0 Comments
  • 3 Like

गांधींनंतरचे गांधी!

मोहनदास करमचंद गांधी (१८६९-१९४८) यांच्या मृत्यूला साठ वर्षे उलटून गेल्यानंतर चार गांधी आजही जीवित आहेत. या चौघांची ओळख प्रस्थापित करणे आवश्यक ठरते. कारण मायबाप इंग्रज सरकारने त्यांच्या जमान्यात हे काम नक्कीच नेकीने केले असते. हे चारही गांधी त्रासदायक आहेत, पण त्यांचा त्रास वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या प्रकारे होत असतो...

  • आशीष नंदी
  • Wed , 02 August 2017
  • 0 Comments
  • 2 Like

गांधींविषयी इतके गैरसमज का आहेत?

गांधींनी केवळ वस्तुस्थिती आणि त्यावरची मतं सांगितली नाहीत; तर स्वत:च्या विरोधात दारूगोळाही पुरवला. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांना गांधी हे गोंधळून टाकणारे, मुद्दाम डिवचणारे असे वाटले असावेत. कृती पाहिजे असते, तेव्हा गांधी हुकूमशहाप्रमाणे भासतात. आपलं तर्कशास्त्र आणि जनतेचा भरघोस पाठिंबा यांच्या बळावर ते विरोधकांना नामोहरम करतात. पण त्यांच्या विचारांत मात्र हुकूमशहासारखं काही नसतं...

  • विनोद शिरसाठ
  • Mon , 03 July 2017
  • 1 Comments
  • 5 Like

अॅडव्होकेट गांधी ते गांधीजी... प्रिटोरिया ते चंपारन...

२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो....

  • अलका गाडगीळ
  • Fri , 02 June 2017
  • 0 Comments
  • 2 Like

गैरसमजांच्या भोवऱ्यात अडकलेला महात्मा

२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… हा चौथा लेख....

  • विनोद शिरसाठ
  • Tue , 02 May 2017
  • 0 Comments
  • 2 Like

भारतीय भोजनात रोज वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या मिठाचा इतिहास काळा आहे. मिठाच्या या काळ्याकुट्ट बाजूकडे गांधींचे लक्ष गेलं नसतं, तरच नवल!

५ मार्च १९३२ रोजी साबरमती आश्रमातील सकाळच्या प्रार्थनेनंतर गांधींनी मीठ सत्याग्रहाचे तपशील जाहीर केले. बारा मार्च रोजी दांडी इथं कूच करण्याचं ठरवण्यात आलं. स्त्रियांना मात्र यात्रेत सहभागी करून घेतलं गेलं नाही. कारण ‘ब्रिटिश स्त्रियांवर सहसा हल्ला करत नाहीत. त्यामुळे त्यांना सोबत नेणं भ्याडपणचे ठरेल’ असं गांधींना वाटत होतं. गांधींनी दीडशे वर्षांच्या मीठाच्या जुलमाला आव्हान दिलं होतं....

  • अलका गाडगीळ
  • Mon , 03 April 2017
  • 1 Comments
  • 6 Like

म. गांधी : अपप्रचार आणि गैरसमज

म. गांधींबद्दल भारतीय जनमानसात अनेक गैरसमज अद्यापही रूढ आहेत. त्यात काही प्रमाणात त्यांच्याविषयीच्या अपप्रचाराचा वाटा असला तरी ती पहिली पायरी झाली. अपप्रचारावर लोकांनी विश्वास ठेवला की, गैरसमज दृढ होतो. गांधींविषयीच्या अपप्रचारावर अनेक लोक विश्वास ठेवतात. गैरसमज नेहमीच अपुऱ्या, अर्धवट आणि एकेरी माहितीची शहानिशा न करता होतो. म. गांधींबद्दल नेमकं तेच होत आलेलं आहे. त्यांच्याविषयीच्या काही गैरसमजांचं निराकरण...

  • डॉ. कुमार सप्तर्षी
  • Thu , 02 March 2017
  • 3 Comments
  • 3 Like

गांधी : नाकारता येतो, धिक्कारताही येतो, पण तरीही आडवा येतोच!

गांधींना नाकारता येतं, धिक्कारताही येतं, पण तरीही सन्मार्गाचा, चांगुलपणाचा, माणुसकीचा, उदात्तेचा, नि:स्वार्थतेचा, स्वावलंबनाचा, शारीरिक कष्टांचा, शांतीचा, सुख-समृद्धीचा, ऐशोषारामाचा, भ्रष्टाचाराचा, अन्याय-अत्याचाराचा, नीतीमत्तेचा, लोकशाहीचा, स्वातंत्र्याचा, देशभक्तीचा, परमत सहिष्णुतेचा विषय आला की, गांधी आडवे येतात. मार्ग दाखवतात. भलेही मग आपण त्यांच्या सोबत असू नसू, त्यांचे समर्थक असू नसू. ...

  • राम जगताप
  • Wed , 22 February 2017
  • 3 Comments
  • 5 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.