• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींना जेवढे गांभीर्याने घेतील, तेवढे नुकसान होईल! 

काँग्रेसमुक्त भारता’ची भाषा केली. ती भाजप आता ‘काँग्रेसमुक्त भारता’चा नवा अर्थ सांगत आहे. काँग्रेसने मात्र ‘भाजपमुक्त’ असा शब्द केव्हाही वापरला नाही. उलटपक्षी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची गरज कायमच अधोरेखित केली. सत्ताधारी भाजपची भाषा आणि व्यवहार संसदीय परंपरेला छेद देणारा होता. काँग्रेसनेही संसदीय परंपरा फार तंतोतंत पाळलेल्या आहेत, असा दावा करता येणार नाही. त्याचीच फळे ते आता भोगत आहेत...

  • किशोर रक्ताटे
  • Mon , 14 January 2019
  • 1 Comments
  • 2 Like

नितीन गडकरींनी केला इशारा जाता जाता...

गडकरी हे एकूणच वागण्या–बोलण्यात एकवाक्यता असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक. कितीही कटू असलं, तरी स्पष्ट बोलण्याला ते प्राधान्य देतात. पण काहीही बोलणं, हा त्यांचा स्वभाव नाही. मात्र, वास्तव बोलत असताना, ते परिणामांची तमा बाळगत नाहीत, हेही तितकंच सत्य आहे. त्यामुळेच, ते सध्या जे काही बोलत आहेत, त्यात त्यांच्या स्वाभाविक स्पष्टवक्तेपणाची झालर आहे...

  • किशोर रक्ताटे
  • Mon , 31 December 2018
  • 2 Comments
  • 2 Like

भाजपला का हरवायचं? भाजपला हरवल्यानं काय साध्य होईल?

आत्ताच्या भाजप विरोधी आघाडीत बरीच गुंतागुंत आहे. भाजपला का हरवायचं, भाजपला हरवल्यानं काय साध्य होईल, हे सामाजिक सहमतीच्या स्तरावर एकत्र येणार्‍यांना नीटपणे पटवता आलं तर भाजप विरोधात यश मिळू शकतं. अन्यथा भाजप वाढत जाईल आणि भाजप लोकप्रिय पक्ष आहे, हे वास्तवाच्या पलिकडे सिद्ध होत जाईल...

  • किशोर रक्ताटे
  • Mon , 09 July 2018
  • 3 Comments
  • 4 Like

अमित शहांच्या ‘मातोश्री’ भेटीनं सगळं काही आलबेल होईल, असं गृहित धरणं चुकीचं अन घाईचं ठरेल

अमित शहांच्या ‘मातोश्री’ भेटीनं सगळं काही आलबेल होईल, असं गृहित धरणं चुकीचं अन घाईचं ठरेल. त्यातच उद्धव ठाकरे भूमिका घेताना प्रचंड चाचपडत असतात. त्याचबरोबर सेनेचा एकूण स्वभाव मुंबईसाठी सत्ताधार्‍यांच्या विरोधात बोलण्याचा आहे. त्याचाही काहीसा परिणाम होतो असं दिसतंय. त्याशिवाय आत्ता अमित शहांना मोदींना पुन्हा केंद्रात सत्तेत बसवायचं आहे. त्यासाठी ते तडजोडीवर आले आहेत...

  • किशोर रक्ताटे
  • Thu , 07 June 2018
  • 0 Comments
  • 3 Like

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरजी, तुम्ही नेमके कोणाच्या अन् कोणत्या हितासाठी लढत आहात?

तुम्ही अधिक मोठे नेते होऊ शकता. तुमच्याकडे नव्या प्रवाहांना सामावून घेण्याची क्षमता आहे. पण तुम्ही आपल्या हक्काच्या अन मुख्य जबाबदारीच्या समूहांना सोबत ठेवून त्यांचं हित साधलं जाईल, अशी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. तुम्ही नेमके कोणाच्या अन कोणत्या हितासाठी लढत आहात, हे सांगण्याची अन् ठरवण्याची ही सर्वाधिक योग्य वेळ आहे...

  • किशोर रक्ताटे
  • Thu , 24 May 2018
  • 4 Comments
  • 3 Like

कर्नाटक निवडणुकीचं यश मोदी-शहांचं आणि अपयश राहुल गांधींचं एकट्याचं आहे का?

कर्नाटकात मिळालेलं यश मोदी-शहांचं आहे का? ते यशाचे शिलेदार आहेत असं भाजप म्हणेल. अन अपयश तर राहुल गांधींचं एकट्याचं आहे, असंही म्हटलं जाईल. पण वस्तुस्थिती तशी नाही. हे यश केवळ या जोडीचं नाही आणि हे अपयश एकट्या राहुल गांधींचं नाही. भाजपच्या यशात येडियुरप्पा हा मोठा  धागा आहे. यातील मुख्य खेळाडू तेच आहेत. ते गेले वेळ्यास भाजपच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले होते...

  • किशोर रक्ताटे
  • Wed , 16 May 2018
  • 0 Comments
  • 5 Like

“नगरचा ‘नरक’ झाला आहे”, याला पुष्टी देणाऱ्या घटना काही कमी नाहीत!

ज्या नगर जिल्ह्यानं देशाला शेतीच्या विकासाचा सहकार पॅटर्न दिला, तोच नगर जिल्हा क्रूरकर्माचे पॅटर्न जन्माला घालण्यात अग्रेसर कसा झाला? नगरची दिशा का आणि कशी भरकटली? वारंवार अशा वाईट घटना घडत असताना त्याचं सखोल विश्लेषण का होत नाही? ‘नगरी’ म्हणून अभिमानानं मिरवणाऱ्या जिल्ह्यात ‘नागरी समाज’ नावाचा समाज अस्तित्वात आहे की नाही?...

  • किशोर रक्ताटे
  • Tue , 17 April 2018
  • 1 Comments
  • 4 Like

भेट ‘पंतप्रधानपदाचे मटेरिअल’ असलेल्या पवारांची आणि ‘पंतप्रधानपदाचे मटेरिअल’ नसलेल्या गांधींची!

सध्या देशात काँग्रेसची जी अवस्था झाली आहे, त्याची निश्चितच सोनिया–राहुल यांना बऱ्यापैकी जाणीव झाली आहे. जेव्हा मोदींविरोधात कोण, असा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा त्याचे राहुल गांधी हे उत्तर तितके स्वीकारले जाणार नाही, हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला मोदींच्या विरोधात चालू शकेल असा एक सर्वमान्य चेहरा हवा आहे, तो चेहरा पवार होऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून या भेटीकडे पाहता येईल...

  • किशोर रक्ताटे
  • Thu , 22 March 2018
  • 2 Comments
  • 5 Like

भावी ‘मोदीं’च्या बालेकिल्ल्यातही भाजप हरू शकतो!

२०१४ ची लोकसभा आणि २०१७ ची विधानसभा ही सबकुछ मोदी अन् योगी अशीच होती. त्यामुळे, या पोटनिवडणुकीतील पराभव हा जसा योगींचा आहे, तसाच मोदींचाही आहे. कारण, मोदी स्वत: याच राज्यातून लोकसभेचे (वाराणसी) प्रतिनिधित्व करत आहेत. इतकी मुबलक परिस्थिती असतानाही भाजपचा पराभव कसा झाला? हा भाजपच्या चिंतनाचा विषय आहेच; मात्र तरीही पराभवाची कारणे समजून घेतली पाहिजेत...

  • किशोर रक्ताटे
  • Fri , 16 March 2018
  • 0 Comments
  • 4 Like

हा निकाल काँग्रेस, डावे आणि एकुणच भाजपविरोधकांसाठी चिंताजनक आहे!

भाजपच्या सत्तेच्या विस्तारीकरणात राज्यांची संख्या पूर्व भारतात वाढवणारा हा निकाल आहे. त्रिपुरात डावे हरलेत. नागालँडमध्ये भाजपनं नव्या मित्रपक्षांसोबत मिळवलेलं यश मोठंच आहे. काँग्रेस अन डाव्यांसाठी हा निकाल चिंताजनक आहेच. तो एकुणच भाजपविरोधकांसाठी चिंताजनक आहे. या निकालाच्या निमित्तानं भाजपचा कर्नाटकसाठी आत्मविश्वास बळावणं स्वाभाविक आहे...

  • किशोर रक्ताटे
  • Mon , 05 March 2018
  • 3 Comments
  • 5 Like

राज ठाकरे शरद पवारांसोबत : मुलाखतीला की, निवडणुकीला?

पवारांच्मुया लाखतीनं महाराष्ट्राचं समाजमन ढवळून निघालं आहे. ही मुलाखत ऐकून काही लोक प्रचंड खुश झाले, तर काही लोक जास्तीच्या अपेक्षा ठेवल्यानं कमालीचे नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अर्थात अशी दुहेरी भावना पुढे आल्यानं ही मुलाखत यशस्वी झाली असं मानावं लागेल. या मुलाखतीतून राजकारणाचं वळण अधिक गुंतागुंतीच्या फेर्‍यात अडकताना दिसत आहे. अर्थात हे मुलाखत घेणार्‍या व देणार्‍याचं यश आहे हे मान्य करावं लागेल...

  • किशोर रक्ताटे
  • Mon , 26 February 2018
  • 0 Comments
  • 1 Like

लोक सत्ताधार्‍यांना कंटाळतात, तेव्हा पर्याय शोधतात. तो कसा आहे हे नंतर अनुभवतात.

लोक सत्ताधार्‍यांना कंटाळतात तेव्हा पर्याय शोधत असतात. तो कसा आहे हे नंतर अनुभवतात. मोदींनी पकोडे हा रोजगाराचा मार्ग दाखवल्यापासून नाराजीचा सूर त्यांच्या भक्तगण ते सामाजिक संघटनांच्या गोटांतूनही आलेला आहे. भाजपला सर्वसमावेशक भासेल असा नाही तर तसा किमान संसदेत बोलेल, सार्वजनिक जीवनात सर्वसमावेशक वाटेल अन खरंच तसा असेल असा चेहरा तयार करावा लागेल...

  • किशोर रक्ताटे
  • Mon , 12 February 2018
  • 3 Comments
  • 2 Like

शिवसेना स्वतंत्र लढणार आहे हो... ढंग ढंग…

शिवसेनेच्या स्वतंत्र लढण्याचा कुणा एकाला फायदा होईल, असा अर्थ काढणं अवघड आहे. गेली निवडणूक सगळेच स्वतंत्र लढण्यानं वेगळा राजकीय क्लास महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. तो वर्ग आगामी निवडणुकीत सर्वांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या स्वतंत्र लढण्यानं भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं, हेच ध्येय असेल तर कदाचित साध्य होईल. किंवा अगदीच शिवसेना कमी जागा मिळवून किंग मेकरच्या भूमिकेत जाऊ शकते...

  • किशोर रक्ताटे
  • Mon , 05 February 2018
  • 0 Comments
  • 2 Like

लोकशाहीचे भवितव्य धोक्यात आहे? काय सांगता?

जेव्हा जेव्हा लोकशाही अडचणीत आहे अशी चर्चा रंगते, तेव्हा तेव्हा त्याला काळाच्या मर्यादेने घेरले जाते. त्यामुळेच अशा चर्चांमधून ठोस, भरीव अन परिणामकारक गोष्टी पुढे येत नाहीत, हे मर्यादित अर्थाने का होईना आपल्या देशाचे सार्वजनिक दारिद्र्य आहे. सध्या लोकशाही समोरच्या आव्हानाला आपल्या देशात जसे बोलले जाते, तसे ते इतरत्रही बोलले जात आहे. लोकशाहीचे अधःपतन केवळ आपल्याकडे सुरू आहे असे नाही, ते सर्वत्रच सुरू आहे...

  • किशोर रक्ताटे
  • Mon , 29 January 2018
  • 1 Comments
  • 4 Like

अण्णा हजारेंचा अजेंडा आणि चळवळींचे यशापयश (उत्तरार्ध)

चळवळी-आंदोलनासाठी आयुष्य वेचणार्‍या व्यापक समाज हिताचे ध्येय बाळगणार्‍यांना आपली व्यवस्था खरेच कळणे गरजेचे आहे. ती गरज अण्णांच्या चळवळीत आलेले प्रामाणिक पण अभ्यासू लोक निभावू शकतात. ही बाब लक्षात घ्यायला हवी. अन्यथा डार्विन सिद्धान्त खोटा आहे असे म्हणणार्‍या सुमार दर्जाच्या व्यक्तीवर टीका करण्यातच आपली ऊर्जा खर्च होत राहिल...

  • किशोर रक्ताटे
  • Mon , 22 January 2018
  • 0 Comments
  • 1 Like

अण्णा हजारेंचा अजेंडा आणि चळवळींचे यशापयश (पूर्वार्ध)

चळवळीत काम करणारे सगळेच अभ्यासू नसतात. खरे तर कोणत्याही नेत्याचे समर्थक हे ‘हांजी’वाले असतात. अशा सामान्य समजेच्या माणसाला आपल्या नेत्याचे सगळे पटत असे. त्या पटण्यामध्ये गडबड वाढते. कारण आपला नेता म्हणतो ते बरोबर आहे, पण ही व्यवस्था ते करत नाही. यातून देखील व्यवस्थेबद्दालचा नकारात्मक दृष्टिकोन अधिक वाढीस लागतो...

  • किशोर रक्ताटे
  • Mon , 22 January 2018
  • 0 Comments
  • 1 Like

सत्तेचा गैरवापर फार काळ टिकत नाही...

आगामी राजकारण केवळ जातीचं असणार नाही. टिकायचं असेल तर धोरणं व्यापक लागतील. भूमिका सर्वसमावेशक लागेल. अन त्यासोबत सातत्य तितकंच महत्त्वाचं राहील, ही किमान प्रमुख प्रवाहांना शिकवण आहे. सत्तेचा गैरवापर फार काळ टिकत नाही, ही चार न्यायमूर्तींनी दिलेली शिकवण महत्त्वाची आहे. सत्ता मिळवताना काहीही बोललं तरी जमतं, पण ती टिकवताना सर्वसमावेशक होण्यातच अर्थ आहे...

  • किशोर रक्ताटे
  • Mon , 15 January 2018
  • 1 Comments
  • 1 Like

रजनीकांतच्या राजकीय प्रवेशानं नेमकं काय घडेल?

एका अभिनेत्याचा राजकीय प्रवेश ही बाब काय दर्शवते? आपल्या देशाला चांगल्या राजकीय नेतृत्वाची गरज आहे. सगळ्या क्षेत्रातील लोकांनी राजकारणात यायला हवं. पण त्यासाठी एक साधनशूचिता असायला हवी. ज्याला ज्या विषयातलं कळतं अशा लोकांनी त्या त्या क्षेत्राला योगदान द्यावं. रजनीकांतच्या राजकीय प्रवेशानं तमिळनाडूचं राजकारण किती बदलेल हे आत्ता सांगण कठिण आहे...

  • किशोर रक्ताटे
  • Mon , 08 January 2018
  • 0 Comments
  • 1 Like

मागच्या वर्षात काय कमावलं? काय गमावलं?

नव्या वर्षात पदार्पण करताना गेल्या वर्षीची पुंजी काय सांगते हे पाहणे महत्वाचे आहे. त्याशिवाय  नव्या वर्षांची नांदी काय असेल याचा अंदाज बांधता येणार नाही.  इंग्रजी वर्षं संपतांना त्याचा आढावा घेण्याची एक पद्धत आपल्या देशात रुजली आहे. तसं वर्ष संपल्यावर किंवा नवीन वर्ष सुरु होतांना लगेच काही नवीन घडत नाही. मात्र तरी काळाचा एक तुकडा करुन त्याकडे पाहणे महत्वाचे आहे...

  • किशोर रक्ताटे
  • Mon , 01 January 2018
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.