ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

जर खोलीत शिरलेल्या हत्तीची तुम्हाला भीती वाटत नसेल, तर तुम्ही त्याला भिडण्याची क्षमता राखता आणि जर ‘लाफ्टर थेरपी’वर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही ‘सखाराम बाईंडर’चा हा प्रयोग नक्की बघाल

माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू आहे हे कधीही न मानणारे तेंडुलकर आपल्या नाटकाच्या केंद्रस्थानी मात्र नेहमी माणूसच ठेवत आले. आणि हाच माणूस, ते मानत असलेल्या दैवापुढे कसा आणि किती हतबल असतो, हेच ते आपल्या नाटकात सतत दाखवताना दिसतात. तेंडुलकर थेट विषयाला भिडतात आणि त्या विषयावर बसलेली सगळी पुटं निर्ममतेने काढून तो विषय उघडानागडा तुमच्यासमोर पेश करतात. त्यामुळे आलेला प्रेक्षक बिचकतो.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......

सत्य, अहिंसा आणि प्रेम ही एक त्रिसूत्री आहे, आणि त्याच्या उलट असत्य, हिंसा आणि द्वेष अशीही एक त्रिसूत्री आहे, हे म.गांधी अधोरेखित करतात!

म.गांधीजींच्या अनेक संकल्पना लोक समजून घेऊ शकतात, परंतु ‘अहिंसा’ या तत्त्वामुळे गांधीजींबद्दल अनेक गैरसमज पसरले असल्याचे आपण पाहतो. असे गैरसमज पसरण्याचे कारण गांधीजींनीच लेखात दिले आहे. ते लिहितात – “पाशवी शक्तीच्या या युगामध्ये ‘बळी तो कान पिळी’ हा या जगातील अंतिम कायदा आहे, ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात दृढ झालेली असते. त्यामुळे हा कायदा कुणा अहिंसक माणसाला नाकारता येईल, यावर कुणाचा विश्वास बसत नाही.”.......

‘अंबा’ : युद्ध थांबल्याशिवाय पुरुषांना शरीरसुख न देण्याची शपथ घेणाऱ्या बायका आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या पुरुषांची कथा

जगाला शांततेची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा स्थितीत सद्यस्थितीकडे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे. अशा वातावरणात हे नाटक मंचित होणं फार महत्त्वाचं आहे. मूळ ग्रीक नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व म्हणजे काळाच्या दृष्टीनं पक्का आहे. मात्र आजच्या जगात कोठे ना कोठे युद्धं सुरू असतं, हिंसेचं थैमान सुरू असतं. अशा स्थितीत एखादा देश किंवा एखादा काळ न दाखवता या भीषण समस्येचं वैश्विक रूप समोर आणणं महत्त्वाचं ठरतं.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

आपण जर गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचे अर्थ समजून घेत राहिलो, तर ते आपला ‘आतला आवाज’ बनतील आणि आजच्या या विद्वेषाने ओतप्रोत भरलेल्या काळातसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करत राहतील

गांधीजी जन्मभर सांगत राहिले, मानवाच्या आयुष्यातील प्रेम, नीती, नैतिकता, निर्भयता, विवेक, विचार अशा सुंदर गोष्टीसुद्धा परमेश्वराएवढ्याच सत्य आहेत. याच अर्थाने ‘God Is Truth’ या विचाराकडून ते ‘Truth Is God’ या विचाराकडे येतात. या मार्गाने निरीश्वरवाद्यांना आणि अज्ञेयवाद्यांना गांधीजी आपल्यामध्ये सामावून घेताना दिसतात. तुम्ही ईश्वरवादी असा, निरीश्वरवादी असा वा अज्ञेयवादी असा, तुमच्या विचारांचा पाया एकच आहे, असे ते सांगतात.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

गुरुदत्तने वयाच्या ३२व्या वर्षी ‘प्यासा’, ३४व्या वर्षी ‘कागज के फूल’, ३६व्या वर्षी ‘साहिब बीबी और गुलाम’ केला आणि वयाच्या ३९व्या वर्षी हे जग सोडले!

चंदेरी दुनियेचे रिवाज आणि बेमुर्वतपणा गुरुदत्तना माहिती होता, पण तरीही त्यांनी कलात्मक चित्रपट काढले. ‘Cash and classics’ या लेखात (‘सेल्युलॉइड’ या मासिकातील लेख) गुरुदत्त म्हणतात, “कलात्मक मूल्ये आणि यश यांचे गणित जपण्याचा प्रयत्न करायला हवा. जगातील अनेक कलासक्त माणसांनी सातत्याने हे अपयश आणि अवहेलना पचवली आहे... बुचकळ्यात टाकणाऱ्या या अनिश्चिततेमुळे खरे तर, निर्मितीच्या उत्कट आनंदाची ‘नशा’ अनुभवता येते.”.......

प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांच्या ‘माफुआ’ आणि ‘सौत्रान्तिक मार्क्सवादा’चा त्यांच्या वारसदाराकडून विकास झाला नाही, तर शरद् पाटील हेच शेवटचे ‘माफुआवादी’ आणि ‘सौत्रान्तिक मार्क्सवादी’ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील, प्रा. दि. य. देशपांडे आणि डॉ. रावसाहेब कसबे हे भारतीय वैचारिक व तत्त्वज्ञानात्मक परंपरेला आव्हान देणारे, त्या परंपरेस स्वतःविषयी पुनर्विचार करण्यास भाग पाडणारे ‘क्रांतिकारी विचारवंत’ म्हणून परिचित आहेत. शरद् पाटील यांचे वर्णन ‘महाराष्ट्रातीलच नव्हे, तर विख्यात जागतिक प्राच्यविद्यापंडित आणि सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत’ असे केले जाते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

मूळ दुखण्यापेक्षा इतरत्र मलमपट्टी करण्यात रस असलेल्या राज्यकर्त्यांना आपला हा ‘ट्रॅक’ बदलायचा आहे की, या विषयावर सातत्याने राजकारणच करायचे आहे?

भारतीय शेतकऱ्याला अर्थकारण शिकवणाऱ्या संघटनेला राजकारण जमले नाही. बाकी सगळ्यांनी या प्रश्नाच्या राजकीय तव्यावर आपापल्या पोळ्या शेकल्या आहेत. तुम्ही वस्तुस्थितीला धरून काही मागू नका, केवळ ‘लाभार्थी’ बना. लाभार्थी म्हणून तुमच्यावर सवलतींचा मारा करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र हक्काचे बोलाल, तर्कसाध्य बोलाल, अर्थपूर्ण बोलाल, तर मात्र तुमच्या पदरात काहीच पडणार नाही, असेच राज्यकर्त्यांना सांगायचे असावे!.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

‘महामुद्रा : दिल्लीतील मराठी कर्तृत्व (भाग १)’ : संसदीय लोकशाहीच्या प्रवासातील आणि दिल्लीतील महाराष्ट्रीयन मंत्र्यांचा ‘जयजयकार’ करणारा दस्तऐवज!

उत्कंठावर्धक पद्धतीनं गोष्ट सांगण्याची हातोटी लेखक धनंजय बिजले यांच्याकडे आहे. मात्र त्यांनी या पुस्तकाला वर्तमान घडामोडींपासून अलिप्त ठेवलं आहे! त्याचबरोबर महाराष्ट्राच्या केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीमध्ये काय काय चुका केल्या, त्याची तार्किक समीक्षाही यात सापडणार नाही. गेल्या सात दशकांतील विविध राजकीय पक्षांच्या व्यक्तींच्या उत्कर्षाचं आणि उत्तुंग यशाचं कौतुक तेवढं या पुस्तकात आहे.......

हळूहळू मनोज जरांगे आणि त्यांचा समर्थक असलेला मराठा समाज आपल्या आंदोलनाच्या तथाकथित यशाच्या धुंदीतून बाहेर येईल, तेव्हा त्याला आपली ‘फसवणूक’ झाल्याचे निश्चितपणे लक्षात येईल!

‘हैदराबाद गॅझेटीयर’ हे फक्त मराठवाड्यातील जिल्ह्यांपुरते मर्यादित आहे. त्यातही या गॅझेटीयरमध्ये मराठवाड्यातील सर्वच गावांचा तपशील असेल, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे या गॅझेटीयरमध्ये मराठवाड्यातील ज्या गावांचा उल्लेख नाही, त्या गावांतील मराठ्यांचा तसेच मराठवाड्याबाहेरील भागातील मराठ्यांचा प्रश्न कसा सोडवणार आहे, हे कळण्याचा मार्ग आज तरी दिसत नाही.......

ही गोष्ट आहे एका ध्येयवेड्या व्यक्तीची. आकाशाला गवसणी घालूनही मातीवरच पाय असणाऱ्या ‘जीनियस जेम’ची, अर्थातच डॉ. गंगाधर मोतीराम वारके उर्फ डॉ. जीएम यांची

जीएम यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्ती दीपस्तंभासारख्या असतात, कायम समाजाला दिशा देण्याचे, जागतं ठेवण्याचे काम त्या करत राहतात. देशासाठी करत असलेले काम हे त्यांच्यासाठी अतीव महत्त्वाचे असते. पुरस्कार, कौतुकाची थाप त्यांची उमेद अधिकाधिक वाढवत असली, तरीही त्याचा आनंद त्यांच्यासाठी तेवढ्यापुरताच असतो. आपल्या उद्दिष्टावर पुन्हा ते आपलं चित्त एकाग्र करतात. दीपस्तंभ उधाणलेल्या समुद्रात घट्ट पाय रोवून तो निश्चल.......

‘ब्ल्यू जीन्स’ची जाहिरात ‘युजेनिक्स’च्या अवशेषांचं चिरंतन उदाहरण आहे. त्यामुळे ही जाहिरात पाहताना ‘युजेनिक्स’च्या अतिभयानक धोक्याची जाणीव लक्षात ठेवणं गरजेचं आहे!

‘गुड जीन्स’ या साध्याभोळ्या शब्दाआड इतिहासातील एक गुंतागुंतीचा, भयावह संदर्भ दडलेला आहे. तो म्हणजे ‘युजेनिक्स’. म्हणजेच ‘आवडत्या’ गुणांचं संवर्धन करण्यासाठी मानवाच्या प्रजननावर नियंत्रण ठेवण्याची संकल्पना— ‘निवडक प्रजनन’. ही कल्पना १९व्या शतकात उदयास आली आणि विसाव्या शतकात लोकप्रिय झाली. ‘मानवजात सुधारणा’ या नावाखाली ही कल्पना योग्य मानली गेली, पण प्रत्यक्षात ती वर्णद्वेष, भेदभाव व सक्तीशी जोडली गेली.......

स्वयंसेवकांना हवे तोवर मी पदावर राहणार, मोदींना सांगण्याचा प्रश्नच नाही, असे म्हणून सरसंघचालक भागवतांनी तूर्तास निवृत्तीचा विषय दोन्ही बाजूनी संपवला आहे, पण…

भागवत आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांना मोदी का डोईजड झाले आहेत, याची बरीच कारणे आहेत. पण त्याचा सारांश असा आहे की, ते भयंकर उपयुक्त वगैरे असले तरी संघाच्या अंकुशाच्या बाहेर गेले आहेत. खालच्या स्तरावर संघाच्या स्वयंसेवकांना एकीकडे मोदीच नेते हवे असले, तरी दुसरीकडे ते खरंच निवृत्त झाले तर महान योगी, त्यागी, तत्त्वनिष्ठ अशी त्यांची पूजा करायलाही तितकेच आवडेल. संघातील ही भावना मोदींपर्यंत नक्कीच पोचली असली पाहिजे.......

केंद्रीय निवडणूक आयुक्तांची सर्वाधिक सदोष नियुक्ती प्रक्रिया सर्वाधिक निर्दोष करणे आणि या यंत्रणेला सर्वाधिक बलवान करणे, हाच या देशातील जनतेसमोरचा एक कलमी कार्यक्रम असला पाहिजे!

राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार व अन्य दोन निवडणूक आयुक्त यांच्या पक्षपाती वर्तनाबद्दल जोरदार टीका केली आहे, ते या टोकाला गेले याचे कारण, कर्नाटक राज्यातील एका विधानसभा मतदारसंघात एक लाखापेक्षा अधिक उमेदवार बोगस असल्याचे पुराव्यांसह दाखवून दिल्यानंतरही, निवडणूक आयुक्तांनी दाखवलेली बेफिकिरी हेच आहे. अशा निवडणूक आयोगाकडून पुढील काळात कशा आणि किती अपेक्षा बाळगणार?.......

‘गुरू : एका योगियाचे तुरीयातीत स्वप्न’ या कादंबरीत छोट्या आणि थोट्या लोकांचे सगळे छोटे आणि बाकीच्यांना थोटं बनवणारे खोटे कारनामे वाचताना आपल्यासह भोवतालच्या समाजाचा आरसा दिसत राहतो

एखाद्या कादंबरीच्या रचनेचा मूळ गाभा वा पाया आध्यात्मिक असेल, त्यातून समाजातल्या उतरंडीबाबत (सामाजिक उतरंडीचे मूळ आर्थिक हितसंबंधांत दडलेले असते) ती काही भाष्य करत असेल, ते करताना सूक्ष्म उपरोधाचे कोरडे ओढत असेल आणि या साऱ्या वास्तवाबाबत एक ‘राजकीय विधान’ही करत असेल, तर अशा कादंबरीचं वर्णन कसं करावं? ‘गुरू : एका योगियाचे तुरीयातीत स्वप्न’ या कादंबरीबाबत मला हा प्रश्न पडलेला आहे.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

लिऑर झ्मिग्रॉडचे ‘आयडिऑलॉजीकल ब्रेन’ हे पुस्तक आजच्या हैराण जगात एक आशा जागवत आहे. वैराण दुष्काळानंतर आकाशात पावसाचा एखादा ढग यावा तसे...

आपण कट्टर झालेलो आहोत का, हे स्वतःपुरते जाणण्याची एक ‘टेस्ट’ झ्मिग्रॉड सुचवते. आपली आयडिऑलॉजी न मानणाऱ्या लोकांबद्दल हिंसेचे विचार आपल्या मनात येत आहेत का, हे ज्याने त्याने आपल्या स्वतःशी ताडून पाहावे. असे विचार तुमच्या मनात येत असतील, तर तुम्ही आपल्या आयडिऑलॉजीच्या आहारी गेला आहात आणि कट्टरतेचा रस्ता चालू लागला आहात! थोडक्यात, कोणत्याही आयडिऑलॉजीतून येणारी कट्टरता तुमचे वैचारिक स्वातंत्र्य हिरावून घेते.......

ट्रश्की भारतीय संस्कृतीच्या दीर्घकालीन प्रवासाचा आलेख मांडतात, तर डॅलरिम्पल विसाव्या शतकातील भू-राजकीय विघटनाचा. दोघेही दुर्लक्षित सत्यांवर प्रकाश टाकतात आणि सोयीस्कर कथनांना आव्हान देतात

सध्याच्या काळात इतिहासाचा वापर वैचारिक लढाईसाठी केला जाताना आपण पाहतो आहोत. नेमक्या अशाच वेळी ट्रश्की आणि डॅलरिम्पल यांची पुस्तके केवळ विद्वत्तेपेक्षा अधिक काहीतरी देतात, ती सोयीस्कर कथनांना पुराव्यानिशी खोडून काढतात, आणि आपल्याला आठवण करून देतात की, भारताच्या भूतकाळाला एकाच कथेत बंदिस्त करता येत नाही. विवादास्पद आणि गैरसोयीचा वाटणारा इतिहास एका चैतन्यमय लोकशाहीसाठी आवश्यक असतो.......

कोत्या आयडिऑलॉजींमुळे नुसते विचारच नाही, तर विचार करायची पद्धतदेखील बिघडत जाते. साध्या भाषेत बोलायचे, तर कोत्या आयडिऑलॉजीमुळे आपल्या मेंदूचा ‘इलेक्ट्रिक लोच्या’ आणि ‘केमिकल लोच्या’ होतो!

“एखाद्या कोत्या आयडिऑलॉजीचे आपण जर अगदी उत्कट असे अनुयायी झालो, तर तो कोतेपणा आपल्या न्यूरॉन्समध्ये उतरतो. तिथून तो आपल्या शरीरात उतरतो. आयडिऑलॉजी म्हणजे आपल्या भोवतीचे कोष नसतात. त्या आपल्या कातडीच्या आत उतरून येतात, आपल्या कवट्यांच्या आत घुसतात, आपल्या न्यूरॉन्समध्येसुद्धा घुसतात… आणि आपला मेंदू इलेक्ट्रिकली आणि बायोकेमिकली ‘रीस्ट्रक्चर’ होतो.......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......