आपण जर गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचे अर्थ समजून घेत राहिलो, तर ते आपला ‘आतला आवाज’ बनतील आणि आजच्या या विद्वेषाने ओतप्रोत भरलेल्या काळातसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करत राहतील
गांधीजी जन्मभर सांगत राहिले, मानवाच्या आयुष्यातील प्रेम, नीती, नैतिकता, निर्भयता, विवेक, विचार अशा सुंदर गोष्टीसुद्धा परमेश्वराएवढ्याच सत्य आहेत. याच अर्थाने ‘God Is Truth’ या विचाराकडून ते ‘Truth Is God’ या विचाराकडे येतात. या मार्गाने निरीश्वरवाद्यांना आणि अज्ञेयवाद्यांना गांधीजी आपल्यामध्ये सामावून घेताना दिसतात. तुम्ही ईश्वरवादी असा, निरीश्वरवादी असा वा अज्ञेयवादी असा, तुमच्या विचारांचा पाया एकच आहे, असे ते सांगतात.......