रॉय किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही!

किणीकर चार ओळी लिहितात आणि आपल्याला केवढा प्रवास घडतो! कला आणि निसर्ग हा संवेदनशील लोकांचा विसावा असतो. हे रुबाई लिहिणारे लोक मूळचे आध्यात्मिक. किणीकर आध्यात्मिक होते ह्या विषयी कुणाच्या मनात काही शंका असायचे कारण नाही. आता पर्यंत ते अनेक रुबायांमध्ये दिसलेलेच आहे. पुढेही ते दिसत राहीलच. स्वतः उमर खय्याम सूफी होता. पण ह्या लोकांना अध्यात्माच्या अलीकडे जे आहे ते जगून घ्यायचे आहे.......

जागतिकीकरणाच्या परिणामांच्या परिप्रेक्ष्यात १९९०नंतरचा महाराष्ट्र, जनजीवन आणि जनआंदोलने, हे या पुस्तकाचे मध्यवर्ती सूत्र आहे...

नव्वदच्या दशकात जागतिकीकरण आणि आर्थिक नवउदारमतवादी धोरणे राबवण्याच्या प्रक्रियेतून जगभर प्रचंड बदल झाले. महाराष्ट्रातल्या बदलांचा मागोवा या घेतला असून तो वाचकांना एक व्यापक दृष्टी देऊ शकतो. यात महाराष्ट्रातले विविध प्रश्न समजून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी वैचारिक भूमिका स्पष्ट करणारे महत्त्वाचे लेख आहेत. सर्व प्रत्यक्ष चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनात वैचारिक स्पष्टता दिसते.......

प्रशान्त, तुझ्या लेखनातले धागेदोरे ‘सिम्फनी’मय असतात. त्यात ‘डिस्टॉर्शन’चं सौंदर्य आहे. या लेखनात ‘सुरूप-कुरूप’च्या पलीकडचं काही असतं. ‘चक्रमपणा’ही असतो…

तुझ्या लेखनात चक्रमपणा आहे, परंतु तो निव्वळ चक्रमपणा म्हणून येत नाही. म्हणजे पर्वती पायांवर चालून चढता येते, तर मी ती हातांवर चालून चढून दाखवतो, अशा तर्‍हेचा तो चक्रमपणा नाही. त्या चक्रमपणाला स्वतःची चक्रम शिस्त आहे. मला असं वाटतं की, त्याचं मूळ तुझ्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात आहे. तू जे तत्त्वज्ञान वाचलं आहेस, ते तुला पचलेलं आहे. तू अर्धा-कच्चा नाही आहेस. तुझ्या ‘डिस्टॉर्शन्स’मधून ‘ब्युटी’ दिसत राहते.......

लेखिकेने स्त्री-पुरुष समता, समानता, स्त्रियांचे स्वातंत्र्य, विवाह, संततीनियमन, सामाजिक काम, ब्रह्मचर्य यांवरच्या लिखाणातून ‘रॅडिकल गांधी’ उभा केला आहे. यातच या पुस्तकाचे योगदान सामावले आहे

वास्तविक म.गांधींच्या कार्याचा ऐतिहासिक दृष्टीने विचार करून आजच्या काळाला उचित असा विचार त्यातून शोधला पाहिजे. या ऐवजी ऐतिहासिक व समग्रदृष्टीचा त्याग करून अस्मितांचे जतन सुरू आहे. अर्थातच यात गांधींच्या अनुयायांचाही दोष आहेच. या पार्श्वभूमीवर परिवर्तनवादी लेखिका व झुंजार कार्यकर्त्या निशा शिवूरकर यांनी या पुस्तकात ‘गांधीजी आणि स्त्री-पुरुष समते’च्या विविध पैलूंचा चिकित्सक विचार केला आहे.......

नव्वदोत्तर कवितेला देशीवादी, सौंदर्यवादी किंवा महानगरी अशा कोणत्याही चौकटीत बसवणे तिच्यावर अन्यायकारकच ठरेल, कारण ही कविता सर्व प्रकारच्या चौकटींचा निषेध करते

मराठी कवितेत उत्तर-आधुनिक विचार पूर्णांशाने प्रकट झाला आहे, असे जरी ठामपणे म्हणता येत नसले, तरी प्रस्तुत ग्रंथात निवडलेल्या आठ कवींच्या कवितांमधून ‘उत्तर-आधुनिक संवेदन’ प्रभावीपणे व्यक्त झाले आहे, असे म्हणता येते. नव्वदोत्तर कालखंडातील उत्तर-आधुनिक जाणिवा व्यक्त करणाऱ्या या आठ कवींनी आपापल्या अनुभवक्षेत्राशी संबंधित प्रश्न प्रामाणिकपणे आजच्या वर्तमानाच्या भाषेत जोरकसपणे उपस्थित केले आहेत.......

नाळ तोडायच्या आधीपासून चितेपर्यंत, बाळहंबरापासून हंबरड्यापर्यंत ज्या स्त्रियांचा जीवनप्रवास प्रचंड वेदनादायी अन् संघर्षमय झाला, अशा जगातल्या सगळ्याच जातिधर्मांच्या असंख्य अनामिक स्त्रियांना अन् माझ्या प्रिय आईला ही कादंबरी समर्पित

जुनाट बुरसटलेल्या पायवाटा सोडून अशी बंडखोर अशिक्षित स्त्री ही स्त्री-मुक्तीच्या नव्या वाटा कशा शोधत असेल? स्वतःच्याच घरात निर्वासितांसारखं जीवन जगूनही अन् आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सतत उपेक्षेची जन्मठेप भोगूनसुद्धा शापितासारखं जीवन व्यतीत करणारी स्त्री खंबीरपणे कशी लढली असेल? तिच्या याच बंडाची अन् संघर्षाची गोष्ट कादंबरीत मांडण्याचा मी पोटतिडकीनं प्रयत्न केलाय.......

श्रीभाऊंसारखा दर्दी, नव्या विचारांचं स्वागत करणारा, आपल्या तरुण संपादकाच्या मागे भक्कमपणे उभा राहणारा आणि चांगल्या लेखनाला दाद देणारा संपादक यापुढे होणे नाही!

श्रीभाऊंसारख्या नामवंत संपादकाच्या मार्गदर्शनाखाली मला संपादनाचे धडे गिरवता आले. मी चार वर्षे त्रैमासिक स्वरूपातल्या ‘माणूस’चं संपादन केलं. श्रीभाऊंचे माझ्यावर खोल संस्कार आहेत. त्यामुळे आजही दिवाळी अंक चाळले आणि ढिसाळ संपादन दिसलं की, डोक्यात राग शिरतो. श्रीभाऊ ‘माणूस’च्या अंकांच्या अनुक्रमणिकासुद्धा किती काळजीपूर्वक तयार करत! त्यांच्या मते अनुक्रमणिका म्हणजे अंकात शिरण्याचा दरवाजा.......

‘आम्हीही भारताचे लोक’ : तृतीयपंथीयांबद्दलच्या पूर्वग्रहांनी सामाजिक मानसिकतेला प्रचंड विळखा घातला आहे. त्यातून सुटायचे असेल, तर आपल्या पूर्वग्रहांचे ‘डी-कंडिशनिंग’ करावे लागेल!

तृतीयपंथीयांच्या अनेक समस्या या पुस्तकात मांडल्या आहेत. त्या काय आहेत ते समाजापर्यंत पोहोचणे व त्यांच्याबद्दल जागृती होणे अपेक्षित आहे. परंतु फक्त समस्या मांडून हे पुस्तक थांबत नाही, तर या समस्यांच्या निवारणासाठी काय करता येईल, याचा ऊहापोहही राजकीय पक्ष, शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक संस्था, शासकीय विभाग अशा वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून त्यात केला आहे. त्यामुळे हे पुस्तक कृतिशीलतेला चालना देणारे आहे.......

‘पत्र आणि मैत्र’ : मराठी साहित्यव्यवहाराचे आणि विशेषत: मुद्रण\प्रकाशन-संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या ग्रंथातून लेखक, वाचक आणि समीक्षक ही त्रिपुटी नेमकी कशी आहे, हेही उमगते

दिलीपरावांविषयीचे लेख आणि त्यांच्या मुलाखती यांशिवाय या ग्रंथामधील अत्यंत महत्त्वाचा भाग त्यांनी लिहिलेली पत्रे. यातील सर्वाधिक पत्रे दिलीपरावांनी आपल्या लेखकांना लिहिली आहेत. आणि बहुतेक वेळा ही पत्रे संबंधित लेखकाच्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्याशी साधलेला एक प्रकारचा मुक्तसंवाद आहे. दिलीपरावांनी जिथून आपली कारकीर्द सुरू केली, त्या नियतकालिकाचे नावच ‘माणूस’ होते.......

दिलीप माजगावकर मराठी प्रकाशनक्षेत्रात ‘मशागतीच्या माळीकामा’त रमले. त्यांनी वाचकांच्या मनात चांगल्या साहित्याची जाण पेरली

दिलीपरावांचे लेखन, भाषणे, मुलाखती यांच्यातील महत्त्वाचे गुण म्हणजे त्यांची निरीक्षणशक्ती व चिंतनशीलता. यातील सातत्य विस्मयचकित करणारे आहे. ही निरीक्षणशक्ती व चिंतनशीलता व्यक्तीबद्दल, व्यवसायाबद्दल, साहित्याबद्दल आणि त्यापलीकडे अवघ्या समाजाबद्दल दिसते. दिलीपराव ही व्यक्ती त्यांच्या भिडस्त स्वभावामुळे स्वतःला लेखक मानत नसली, तरी त्यांच्या लेखनातून हे चिंतन अल्पाक्षरात आणि म्हणूनच रेखीवपणे प्रकट होत असते.......

‘तत्त्वभान’ हे आधी वाचनाचे ‘निमंत्रण’ आणि मग चर्चेचे ‘निमंत्रण’ आहे, ‘आमंत्रण’ नाही. सर्व प्रकारच्या वाचकांसाठी हे ‘निमंत्रण’ आहे

या ग्रंथाचे वाचन ही तत्त्वचिंतनाची पूर्वतयारी आहे. ती पूर्वतयारी करणे म्हणजे तत्त्वज्ञानाच्या चिंतन पद्धतीचा अवलंब करणे, वाचकाला मदतकारक ठरेल, अन्यथा त्याचे चिंतन केवळ ‘स्वैरकल्पनाधारीत तत्त्वचिंतन’ होण्याचा धोका नाकारता येत नाही. तत्त्वज्ञानाच्या चिंतनपद्धतीचा अंगीकार करणे याचाच अर्थ तत्त्वचिंतनाच्या परिभाषेत विचार करणे. या ग्रंथाचे वाचन, मनन व चिंतन आणि मग चर्चा हे ‘तात्त्विक चिंतनाचे प्रशिक्षण’ आहे.......

‘अखईं तें जालें : तुकाराम – हिंदुस्थानी परिवेशात’ या ग्रंथाचे दोन्ही खंड अनेक वर्षांच्या ‘तुकारामगाथे’च्या झाडाझडतीचे फलित आहे!

तुकाराम समजून घेण्यासाठी कोणत्या परंपरा समजून घ्यायला हव्यात, याचे उत्तर नेमाडे यांच्या ‘तुकाराम’ या पुस्तकात मिळाले. भक्तिआंदोलन आरंभी कदाचित प्रादेशिक स्वरूपाचे असावे, पण ते केवळ विशिष्ट प्रदेशापुरते सीमित न राहता, त्याचा प्रभाव कालांतराने संपूर्ण हिंदुस्तानामध्ये पाहायला मिळतो. त्यामध्ये वरकरणी भिन्न असलेल्या अनेक परंपरांचे योगदान होते. तेव्हा तुकाराम ‘हिंदुस्तानी परिवेशात’ समजून घ्यायला हवे.......

‘संविधानसभेचे सदस्य’ : देशाचे भवितव्य घडवणारा सामायिक सहमतीचा दस्तावेज तयार करणाऱ्या संविधानसभेच्या सदस्यांची माहिती, संविधान मंजुरीच्या पंचाहत्तरी निमित्ताने…

येत्या २६ नोव्हेंबरला संविधानाच्या मंजुरीची पंचाहत्तरी सुरू होते आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकाची कल्पना सुचली. संविधानसभेतल्या २९९ जणांची माहिती एका पुस्तकात मावणार नाही, हे उघड होते. म्हणून मग संविधानसभेतल्या या २९९ मधले जे अधिक सक्रिय होते, त्यांची अधिक माहिती, कमी सक्रिय असलेल्यांची थोडक्यात माहिती आणि उरलेल्यांची संक्षिप्त नोंद किंवा फक्त नावांची यादी, असे नक्की केले.......

वैयर्थतेने भरलेल्या, असहिष्णुतेने चिरफाळत चाललेल्या, भयाण हिंसेच्या, क्रौर्याच्या टकमक टोकावर उभ्या असलेल्या सद्यकालीन सभोवाराचा उभा-आडवा छेद आणि वेध घेणारं हे जळजळीत शोभनाट्य आहे

‘प्रतिक्षिप्त’ हे शीर्षक या स्तंभलेखनपर पुस्तकाला देताना पवारांना नेमकं काय अभिप्रेत आहे कल्पना नाही, परंतु मज्जारजू आणि मेंदूतही संदेशवहन पोहचवून भयंकराच्या दरवाजासमोर धडका मारायला लावणारं, कृतिशील हस्तक्षेपाकडे निर्देश करणारं, हे मौलिक पुस्तक आहे, असं आवर्जून अधोरेखित करावंसं वाटतं. ‘प्रतिक्षिप्त’ म्हणजे भाषेच्या चौफेर हुकमी फटकाऱ्यांचं तीव्र ज्वालाग्राही रसायन.......

ही कादंबरी पारलिंगी व्यक्तींच्या ‘सांस्कृतिक अदृश्यते’ला एक चांगले प्रत्युत्तर देते, त्यांच्या ‘सांस्कृतिक घुसमटी’ला वाचा फोडते आणि एलजीबीटी इत्यादी समुदायाच्या ‘विद्रोही संस्कृती’चा एक सुंदर नमुना पेश करते!

एका पारलिंगी स्त्रीला नायिका म्हणून दाखवून - तिच्या इच्छा, आकांक्षा, भावना, तिचे विचार, तिचा प्रेमासाठीचा शोध - ही कादंबरी तिला ‘वेगळी’, ‘विचित्र’ म्हणून नाही, तर तुमच्या-आमच्या सर्वांसारखीच एक ‘माणूस’ म्हणून समोर ठेवते. पारलिंगी व्यक्तींना ‘माणूस’ म्हणून अशी आदराची वागणूक देणारी ही कादंबरी मराठी साहित्यातील पितृसत्ताक, विषमलिंगी नियमाच्या चित्रणाच्या इतिहासाला जोरकसपणे छेद देते.......

‘बदलता भारत’ : भारतीय स्वातंत्र्याची कहाणी कुठून व कशी सुरू झाली, ती कुठवर पोहोचली आणि ती अजूनही अधुरी का राहिली आहे, याचा शोध घेणारा महाग्रंथ

स्वातंत्र्याला नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. जगात काही शतके सर्वाधिक वर्चस्वशाली असणाऱ्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध इथल्या कोट्यवधी जनतेने अथक संघर्ष करून मिळवलेले हे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य संग्रामाचा आणि स्वातंत्र्योत्तर देशउभारणीचा आजवरचा दोन शतकांहून अधिक असा हा काळ. अशा आपल्या इतिहासावर विविध अंगांनी बोलणाऱ्या, त्याचे अंतरंग उकलणाऱ्या आणि त्यातून भारताच्या भविष्याची दिशा दाखवणाऱ्या लेखांचा हा महासंग्रह.......

काव्यविषयाच्या नवजाणिवेच्या अनुषंगाने रेगे सर्वार्थाने नवकवी ठरतात, परंतु नवकाव्याच्या अग्रतेचा मान, नवकाव्याच्या प्रवर्तकतेचा मान रेग्यांना देता येणार नाही

नवकवितेचे प्रवर्तक मर्ढेकरच; रेगे हे नवकवी होय. कारण प्रवर्तकाला मागे तशी परंपरा निर्माण व्हावी लागते. मर्ढेकरांच्या तशी परंपरा निर्माण झाली. तशा पद्धतीने काव्यनिर्मितीची संवेदना मर्ढेकरांच्या कवितेने दिली. परंतु रेग्यांची कविता ‘निःसंग’ राहिली. रेग्यांची वृत्ती स्त्रीच्या लास्यसौंदर्यावर पुष्ट झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा केंद्र व काव्याचा परीघ स्त्रीकेंद्री राहिला.......

‘गिधाडांची मेजवानी’ हे पुस्तक सामान्य नागरिकांना ‘खऱ्या भारता’ची ओळख करून देणारा आराखडा आहे. मला ठाऊक असलेल्या भारताच्या वास्तवाची ही एक प्रामाणिक नोंद आहे

आपल्या लोकशाहीच्या हृदयावर अनैतिकतेने मोठा हल्ला केला आहे, भारतीय संस्थांची अवस्था मोडकळीस आली आहे. हे सर्व भ्रष्ट आणि अनैतिक घटक एकत्र येऊन भारतातील बहुसंख्य नागरिकांना लाचार करू पाहत आहेत. या लाचार जनतेला आत्महत्या करायला भाग पाडले जात आहे. अशा मृत्यूंबद्दल वर्तमानपत्रांत येणाऱ्या एकसुरी बातम्या आणि भारतातील उच्चभ्रू लोकांची वाढती असंवेदनशीलता यामुळे मला या पुस्तकासाठी शोधपत्रकारिता करावीशी वाटली.......

मी परत भानावर आले, तेव्हा माझ्या मनातील ताण-तणाव आणि खळबळ निमाली होती. माझ्या या आयुष्यातील तिसऱ्या व अखेरच्या पर्वाच्या नांदीचे सूर मनात झंकारू लागले

बापूंच्या निधनानंतरची गेली दहा वर्षं मी कामात व्यग्र राहिले. परंतु माझ्या अंतर्मनामध्ये सर्व काही थिजून गेल्यासारखी निःस्तब्ध शांतता अनुभवत होते. आता हळूहळू अंतर्मनाला जाग येऊ लागली होती. या अवस्थेतून विधाताच मार्ग दाखवील याची मला खात्री होती. माझ्या मनातली अस्वस्थता हळूहळू वाढत चालली होती. या डोंगरांच्या सान्निध्यात राहून मी दुभंगलेल्या व नवनवीन शोधांमुळे भेदरलेल्या जगापासून पळून तर जात नव्हते ना?.......

सर्चिंग आणि सर्फिंगच्या सवयीला चटावलेले जनमानस असताना लिखित स्वरूपातील फुकटचे सल्ले वाचणारे वाचक म्हणजे विरक्त वृत्तीचे सात्त्विक जणच...

सर्चिंग आणि सर्फिंगच्या सवयीला चटावलेले जनमानस असताना आम्ही हे फुकटचे सल्ले लिहिण्याचे धाडस केले आहे. आम्ही दिलेले असे सल्ले कधी कधी स्वअनुभवावरून आहेत किंवा निरीक्षणातून आलेले आहेत. खरे सांगायचे तर असे सारे काही आम्ही अप्रत्यक्षपणे सुचवले आहे. असे करण्याचे कारण म्हणजे उच्छादाच्या या कालखंडात माहितीलाच ज्ञान समजून जो तो ज्ञानसंपन्न झाल्याच्या आनंदात आत्ममग्न असल्याने आम्ही ही सावधगिरी बाळगली आहे.......

‘चित्रपट-अभ्यास’ : चित्रपटाचा अभ्यास ही काहीतरी खुळचट कल्पना आहे, ही (आपल्याकडे तर अजूनही प्रचलित असलेली) समजूत मोडीत काढणारे हे पुस्तक आहे

जी कलाकृती काळाच्या पटलावर निःसंशयपणे सिद्ध होणारी आहे, त्यांना सहसा ‘अभिजात कलाकृती’ असे म्हटले जाते. इथे अशा अभिजात चित्रपटांचीच निवड केलेली दिसते. अशा चित्रपटांचे विश्लेषण करण्याने कलात्मक उत्तमाची एक सखोल जाण आपसूकच निर्माण होते. त्यांतील व्यापक व सूक्ष्म अशा जीवनदर्शनाने प्रगल्भता वाढीस लागते. ‘मुळातला अभ्यास करण्यासाठीचा पहिला गंभीर धडा’ या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध करून दिला आहे.......

‘एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ : मोठ्यांनाही आपला दृष्टीकोन तपासून पहायला लावणारी छोट्यांची रंजक सृष्टी आणि दृष्टी

मुलांना काय समजते, असा सार्वत्रिक गैरसमज आहे, पण त्यांची समज अनेकदा  मोठ्यांच्या डोळ्यात अंजन घालते. वर्तमानातील अनेक चुकीच्या आणि घातक बाबींवर उपाय शोधायचे असतील आणि संविधानिक मूल्यं जपायची असतील, तर या साऱ्या घटनांकडे समाजधुरिणांनी मुलांच्या दृष्टीने आणि दृष्टीकोनातून पाहायला हवे. असे घडले, तर त्यांना त्यांच्या भूमिका अवश्य तपासून पाहाव्याशा वाटतील, हा विचार मांडणारी ही कादंबरी अनेक अर्थाने महत्त्वाची आहे.......

‘नोआखाली’ - गांधीजींसाठी हे एक अग्निदिव्यच होते. तेथे त्यांना केवळ बाह्य परिस्थितीशीच नव्हे, तर स्वतःच्या अंतर्मनाशीदेखील संघर्ष करावा लागला!

गांधीजींचे संपूर्ण जीवन हे मानव कल्याणासाठी धगधगणारे यज्ञकुंड होते. ग. त्र्यं. माडखोलकरांनी लिहिले आहे की, येथे हा अद्वितीय याजक स्वतःच यज्ञ होऊन गेला. या याजकाच्या पूर्णाहुतीची सुरुवात नोआखाली येथेच झाली आणि अंत दिल्लीमध्ये. मानवाच्या इतिहासात सत् आणि असत् शक्तिंमध्ये अखंड चाललेल्या संघर्षात चिरंतन सत् मूल्यांच्या रक्षणासाठी गांधीजींचे नोआखालीत जाऊन राहणे, यास फार मोठे महत्त्व आहे.......

आजच्या लेखकाला मराठीच्या खर्‍या स्वरूपाचे आकलन झाले नाही, तर भिकार लेखकांनी लटपटी करून अध्यक्ष होण्याचे हे समारंभ बिनकामाचे ठरतात

आता एकभाषिक राजकारण फोफावले असले, तरी मराठी ही एका विशाल हिंदू महाव्यवस्थेत या उपखंडात विकसित झालेली एक व्यवस्था आहे, आणि आपल्या पोटभाषा - खानदेशी, अहिराणी, वर्‍हाडी, झाडी, कोंकणी याही मराठीच्या उपव्यवस्था म्हणून विकसित झाल्या पाहिजे. तरच मराठी ही प्रबळ होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ह्या सगळ्या मराठीच्या बोलींचाही सहभाग वाढवावा, असेही पिंपरी-चिंचवडच्या साहित्य संमेलनाचा आढावा घेताना सुचवावेसे वाटते.......

‘इतकं दिलंत तुम्ही मला’ असं पाडगावकरांचं एक बोलगाणं आहे. आपल्यात जे काही थोडंफार चांगलं आहे, ते सगळं पुस्तकांचं देणं आहे, या जाणिवेनं ते मला पुस्तकांना उद्देशून गावंसं वाटतं…

आज जवळपास चार दशकांत ‘वाचणं आणि त्यातून समजून घेणं’ हीच जीविका किंवा जीवनशैली कधी झाली ते लक्षातच आलं नाही, जणू यापेक्षा वेगळं काही होणारच नव्हतं. घरही या काळात आमच्या इतकंच किंबहुना काकणभर जास्तच पुस्तकांचं झालं. बरेच लेखक, वाचकही पुस्तकं पाठवायला लागले. वाचनातून मिळालेलं सौहार्दाचं हे देणं अद्भुत आहे. त्यामुळे हा सन्मान मला व्यक्तिगत माझा नाही, तर एकंदर पुस्तकांचा, वाचनाचा सन्मान वाटतो.......

गांधींचा ईश्वर पारंपरिक पद्धतीचा ईश्वर नाही, तो पूर्ण सत्याच्या रूपातला होता. मात्र गोरांना कोणत्याही रूपातला ईश्वर मुळातच मान्य नव्हता, इतके ते कट्टर नास्तिक होते…

गांधीजींचा ईश्वर कुठल्याही अर्थाने चमत्कार करणारा, स्वत:चे अस्तित्व त्या आधारे टिकवून ठेवणारा अशा प्रकारचा ईश्वर नाही. त्यांची ईश्वराची कल्पना निराकार पद्धतीची आहे. त्यांना कुठल्याही कर्मकांडाची गरज भासत नाही. गोरांच्या समोर असलेली ईश्वराची संकल्पना आणि तिची समाजात असलेली राबवणूक आणि गांधीजींचा ईश्वर यांचा मेळ जमून येत नाही. तरीही गोरा गांधीजींशी संवाद करताना त्याच ईश्वर कल्पनेच्या आधारे बोलतात.......

नंदा खरेंनी वैचारिक प्रबोधनाला वेगळ्या स्तरावरचे कार्यच मानले आहे. त्या अर्थाने ते ‘ॲक्टिव्हिस्ट’च आहेत. उत्तर-आधुनिकतावाद उर्फ ‘पोस्ट-मॉडर्निझम’च्या ‘इंटेलेक्चुअल फॅशन’च्या विरोधात ते ‘वैचारिक तलवार’ घेऊन उभे ठाकतात

‘नंदा खरे निर्मित-दिग्दर्शित’ ही एक न स्थापलेली, अदृश्य भासणारी, पण अस्तित्वात असलेली संस्थाच होती. या सर्व व्यापक नेटवर्किंगचे व त्यातून येणाऱ्या मुद्द्यांचे, तसेच समाजातील समस्यांचे दर्शन आपल्याला या लेखनात प्रत्ययास येते. किंबहुना म्हणूनच कार्यकर्ते त्यांच्याकडे सातत्याने येत, त्यांच्याशी चर्चा करत आणि काही बौद्धिक / वैचारिक शिदोरी बरोबर घेऊन जात.......

स्त्रिया आणि इतर शोषित यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी सजग असणाऱ्या, करुणा आणि मानवता यांना पारख्या न झालेल्या हिंदी साहित्याने मला खूप प्रभावित केलं…

हिंदी नियतकालिकांचा शोध लागला आणि त्यांच्या श्रीमंतीने मी हरखून गेलो. या साहित्याचं स्वरूपसुद्धा अनोखं होतं. महाराष्ट्रातल्या महामानवांच्या विचारांचा मुख्य धारेतल्या मराठी साहित्याला किती स्पर्श झालाय, हे पाहू गेल्यास हाती काय लागेल? याउलट, अशा सुधारकांच्या बाबतीत जे पिछाडीला आहेत, असं आपल्याकडच्या अहंकारातून मानलं जातं, त्या हिंदी भाषकांचं साहित्य बव्हंशी पुरोगामी, प्रगतिशील असल्याचं मला आढळलं.......

२०१४पर्यंत भारतात काहीच झालं नाही, असं मानणाऱ्या अंधभक्तांना आणि नंतर झालेल्या अनेक चांगल्या गोष्टींमध्ये फक्त दोष काढणाऱ्या मंडळींना हे पुस्तक बरंच काही शिकवून जाईल!

भारताच्या ७५ वर्षांच्या प्रगतीचा विस्तीर्ण पट मांडणे, हे एक शिवधनुष्यच आहे आणि ते लेखक धर्माधिकारी यांनी समर्थपणे पेललंय. सोपी ओघवती भाषा आणि रेखीव बांधणी; चित्रं, नकाशे, आलेख, संख्याशास्त्र याचा यथायोग्य वापर, या सर्व गोष्टींमुळे हे पुस्तक वेगळ्या उंचीवर जातं. शक्य असल्यास या पुस्तकाची ‘जनआवृत्ती’ काढावी. दुसरं म्हणजे भारतातल्या प्रमुख, निदान हिंदी आणि इंग्रजी, भाषांत हे पुस्तक उपलब्ध करावं.......

सयाजीराव ठोस पुरावा मागे ठेवत नसल्याने, बलाढ्य सत्ता हतबल त्यांच्याविरुद्ध राजद्रोहाचे आरोप असलेल्या एकेक फाईल नाइलाजाने ‘A Banded Box Case’ असा शिक्का मारून बंद करून टाकायचे!

महाराजा सयाजीराव गायकवाड हे सार्वभौम राजे आहेत. त्यामुळे आयुष्यातील दीर्घकाळ बलाढ्य ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करत होते. क्रांतिकारकास हिमतीने मदत करत होते. स्वातंत्र्यवीरांचे पाठीराखे झाले, हे आम्ही वाचत होतो, दुसऱ्यास सांगत होतो. याचा संदर्भ म्हणून लंडनच्या उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णयही दिला, हा संदर्भही वाचला; पण न्यायसंस्थेचा हा मूळ आदेश कसा शोधायचा, कुठे शोयायचा?.......

देवल-खाडीलकरांपासून मराठी नाटक आणि रंगभूमी समाजाभिमुख आणि विचाराभिमुख राहूनदेखील ‘मराठी नाट्याभिरूची’ मात्र वैचारिकतेशी फटकूनच राहिलेली दिसते!

वैचारिकता हे एक मूल्य मानणाऱ्या काही नाटककारांनी आणि त्यांच्या नाटकांनी त्या त्या काळात अल्प प्रमाणातील का होईना ‘नाट्याभिरूची’ समृद्ध, संस्कारित केलेली आहे. ही अभिरूची तात्कालिकापेक्षा मूलभूत स्वरूपाच्या जीवनानुभवाची / नाट्यानुभवाची मागणी करणारी आहे. आणि म्हणूनच ती, संस्कृती संवर्धनाचा आग्रहही धरणारी आहे. हीच आजच्या विषण्ण, उदास आणि चिंतीत करणाऱ्या ‘नाटकीय’ वर्तमानात एक दिलासाजनक बाब आहे.......

‘स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान’ या छोटेखानी ग्रंथामुळे स्वामी विवेकानंद यांच्या कोल्हापूर भेटीबाबत असणारे अनेक गैरसमज दूर होतील!

राहुल माळी स्वामी विवेदाकनंद यांच्या चरित्र व कार्याचे निस्सीम भक्त आहेत. परंतु त्यांची ही भक्ती आंधळी नाही! किंवा ती त्यांच्या अंधश्रद्धेचा भाग नाही. स्वामी विवेकानंदांच्या कोल्हापूर भेटीबाबत अनेक गैरसमजुती आहेत. त्यांचे वास्तव्य कोल्हापुरातील कोणत्या पेठेत, कोणत्या बंगल्यात होते? त्यांची व्याख्याने कोणत्या ठिकाणी झाली? इत्यादीसंबंधी गैरसमजुती आहेत. त्यांचे निराकरण करण्याचा या ग्रंथात केला आहे.......

निसर्ग विनाश हीच आपल्या दैनंदिन जीवनातील ‘मनोविकृती’ झाली आहे. निसर्गनाशामुळे समाजाची ‘मानसिक अवस्था’ बिघडत चालली आहे!

निसर्ग हाच अडथळा मानून त्याला नाहिसं करण्याचा चंग बांधला आहे. हे ऱ्हासपर्व मानवकेंद्री मानलं जात असलं, तरी ते प्रत्यक्षात भांडवलशाहीकेंद्री आहे. निसर्ग खरवडून संपत्तीची निर्मिती हा तिचा बाणा आहे. या उद्ध्वस्तीकरणात धोरणकर्ते सक्रिय सामील आहेत आणि ते सामान्य माणसाला ‘लाभार्थी’ बनवण्याचा वेग वाढवत आहेत. सामूहिक विवेकशून्यता (मूर्खपणा) वाढत चालली आहे. त्यातून उत्पन्न झालेला अंतर्बाह्य कोलाहल मानवाला पेलवेनासा .......

अत्यंत दुर्दैवी आयुष्य वाट्याला येऊनही मी अत्यंत दुर्मीळ असं, ‘अर्थपूर्ण’, मूल्यात्म आयुष्य दुर्दम्य चिवटपणाच्या बळावर ताठ मानेने जगले…

स्वतःच्या कुठल्याही चांगल्यासाठी हवी ती किंमत मोजणं, कमालीचा संयम या सर्व घटकांनाच जगण्याचा आधार बनवलं. कितीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी एकटीने; धैर्याने नि वैचारिक व भावनिक परिपक्वतेच्या आधारे तिला सामोरी गेले. माझं लिखाण, संशोधन वगैरेंची सभोवतालच्या प्रस्थापित समाजाला नोंद घ्यायला भाग पाडलं. या सगळ्याचा मला सार्थ असा अभिमान आहे. प्रयत्नपूर्वक शाबूत ठेवलेला आत्मसन्मान नि संवेदनशीलता मी मरू दिली नाही.......