‘तुम्ही आम्हाला चांगलं म्हणायचं अन आम्ही तुम्हाला पुरस्कार देऊन गोजारायचं’ असा सत्ताधाऱ्यांचा शुद्ध ‘राजकीय’ व्यवहार असतो!

सगळेच सत्ताधारी आपल्या बाजूनं बोलणाऱ्यांचं कोडकौतुक करत असतात, त्यांना गोंजारून ठेवतात, त्यासाठी त्यांच्यावर पुरस्कारांचीही बरसात करतात. त्यामुळे असे पुरस्कार मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती पात्र आहे का, वगैरे प्रश्न निरर्थक ठरतात. या पुरस्कारांच्या निमित्तानं सत्ताधारी आपल्या अवतीभोवती रेंगाळणारं एक वलयांकित कोंडाळं, आपल्या बऱ्या-वाईटाचा (बहुदा वाईटाचाच) उदो-उदो करणाऱ्या लोकांवर अशी बरसात करत असतात...