गुरुदत्तने वयाच्या ३२व्या वर्षी ‘प्यासा’, ३४व्या वर्षी ‘कागज के फूल’, ३६व्या वर्षी ‘साहिब बीबी और गुलाम’ केला आणि वयाच्या ३९व्या वर्षी हे जग सोडले!

चंदेरी दुनियेचे रिवाज आणि बेमुर्वतपणा गुरुदत्तना माहिती होता, पण तरीही त्यांनी कलात्मक चित्रपट काढले. ‘Cash and classics’ या लेखात (‘सेल्युलॉइड’ या मासिकातील लेख) गुरुदत्त म्हणतात, “कलात्मक मूल्ये आणि यश यांचे गणित जपण्याचा प्रयत्न करायला हवा. जगातील अनेक कलासक्त माणसांनी सातत्याने हे अपयश आणि अवहेलना पचवली आहे... बुचकळ्यात टाकणाऱ्या या अनिश्चिततेमुळे खरे तर, निर्मितीच्या उत्कट आनंदाची ‘नशा’ अनुभवता येते.”...

प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांच्या ‘माफुआ’ आणि ‘सौत्रान्तिक मार्क्सवादा’चा त्यांच्या वारसदाराकडून विकास झाला नाही, तर शरद् पाटील हेच शेवटचे ‘माफुआवादी’ आणि ‘सौत्रान्तिक मार्क्सवादी’ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील, प्रा. दि. य. देशपांडे आणि डॉ. रावसाहेब कसबे हे भारतीय वैचारिक व तत्त्वज्ञानात्मक परंपरेला आव्हान देणारे, त्या परंपरेस स्वतःविषयी पुनर्विचार करण्यास भाग पाडणारे ‘क्रांतिकारी विचारवंत’ म्हणून परिचित आहेत. शरद् पाटील यांचे वर्णन ‘महाराष्ट्रातीलच नव्हे, तर विख्यात जागतिक प्राच्यविद्यापंडित आणि सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत’ असे केले जाते...