म. गांधी : शाश्वताचा यात्रिक
सदर - गांधी @ १५०
उत्तम कांबळे
  • म. गांधी यांच्या विविध भावमुद्रा
  • Mon , 02 October 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram

भारत महासत्ता कधी होईल हे सांगता येत नाही. मात्र कोणत्याही महासत्तेला नम्र होण्यास भाग पाडील अशी महात्मा गांधी यांच्यासारखी व्यक्ती या देशात काम करून गेली, याचे स्मरण त्यांच्या १३६व्या जन्मदिनी (उद्या) ठेवले पाहिजे. काहींना कालबाह्य वाटणारे त्यांचे विचार वस्तुत: कालोचित आहेत. इराक युद्धाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या सिंडी शिहान यांना गांधींच्या सत्याग्रहाची मदत होते, तर ब्रॅड पिटशी घटस्फोट झाल्यावर जेनिफर अॅनिस्टन या मॉडेललाही गांधींचे पुस्तक आधार देते. ‘वर्ल्ड सोशल फोरम’मध्ये हजारो तरुण गांधी साहित्य विकत घेण्यासाठी गर्दी करतात. ‘गुगल’वर ‘महात्मा गांधी’ या नावाने सर्च केल्यास २१ लाख ३० हजार नोंदी संगणक क्षणार्धात तुमच्यासमोर ठेवतो आणि गांधींच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणाऱ्या अधिकृत संकेतस्थळाला आजपर्यंत ३०, १८, ८३८ व्यक्तींनी भेट दिलेली आढ‌ळते. कोणत्याही राष्ट्राचे वा व्यक्तीचे हक्क उघडपणे हिरावून घेताना राष्ट्रप्रमुखाला, कॉर्पोरेट लीडरना किंवा राज्यकर्त्यांना लाज वाटते, तेव्हा कुठे तरी गांधींचा ‘अहिंसे’चा आदर्श काम करीत असतो. जगातील पिळवणूक संपलेली नाही; पण आता पिळवणुकीचे कुणी जाहीर समर्थन करीत नाही. हाही गांधींच्याच विचाराचा प्रभाव. ‘ब्रह्मचर्य’ ही गांधींची संकल्पना चेष्टेचा विषय झाली असली, तरी एड्ससारख्या रोगाचा प्रतिबंध करायचा असेल, तर औषधे वा कंडोमपेक्षा एकपत्नीव्रत हे अत्यावश्यक आहे, असे जेव्हा डॉक्टर सांगतात, तेव्हा ते ‘ब्रह्मचर्या’च्याच जवळ जात असतात. लहानमोठ्या शहरांतील हॉटेलांमध्ये तुडुंब गर्दी होत असली तरी आरोग्यविषयक प्रकाशनांची होत असलेली विक्री आणि डाएटिंगच्या सूचना या गांधींच्याच ‘अस्वाद’ व्रताची आठवण करून देतात. नेल्सन मंडेलापासून चीन, जपानमधील विविध प्रयोगांचा उल्लेख करीत ही यादी बरीच वाढविता येईल. महाभारतकाळापासून जगावर नेहमीच अर्थ आणि सत्ता यांचा प्रभाव आहे. आता तो ठळकपणे जाणवतो इतकेच. परिस्थितीवश झालेले सर्व जण मार्केट इकॉनॉमीच्या हमरस्त्यावर सुसाट धावत असले तरी बेचैनी आतून पोखरत असते. याला कारण मार्केट हे नेहमीच तात्कालिक असते आणि आपल्या अंतरंगाला कायम शाश्वताची ओढ असते. व्यक्तिमत्त्वाचे पोषण शाश्वत विचारांनीच होते. गांधी ती भूक भागवितात. कारण गांधीजींनी शाश्वताशी असलेले नाते कधीच तुटू दिले नाही.

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

मात्र, शाश्वताशी असलेले हे नाते गूढ नव्हते, तर प्रयोगशील आणि बुद्धिनिष्ठ होते. जीवनाच्या मूलभूत तत्त्वांवरची त्यांची श्रद्धा ही प्रयोगनिष्ठ होती. प्रयोगातून मिळणारा आत्मविश्वास त्यांच्या लहानसहान कृतीतून आणि वक्तव्यातून सहजी प्रकट होत असे. जीवन सिद्धान्त आमच्याकरिता नाहीत, तर आम्ही त्यांचे पालन करण्यासाठी आहोत, ही बाब मनावर बिंबली की जीवन एकरस आणि अखंड असल्याचा अनुभव येतो, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांच्या अंतर्बाह्य एकतेच्या अवस्थेमुळे मी मुग्ध झालो, असे वर्णन विनोबांनी केले आहे. मार्केट इकॉनॉमीमध्ये ही एकरसता आपण गमावतो, कारण आपले व्यक्तिमत्त्व सतत दुभंगत असते. सत्यनिष्ठा यासाठी आवश्यक असते आणि याचीच तरफदारी स्टीफन कोवेसारखे सध्याचे मार्केट गुरू ‘प्रिन्सिपल ओरिएंटेड लिडरशिप’मधून करतात, तेव्हा पुन्हा गांधीच भेटतात. आयुष्यात बॅरिस्टर, विणकर ते भंगीकामापर्यंत २७ प्रकारच्या भूमिका आत्मीयतेने रंगविताना गांधीजींनी असंख्य प्रयोग केले व ते नोंदवून ठेवले. ही प्रयोगनिष्ठा अंगी न मुरविल्यामुळे त्यांच्या पश्चात अनुयायांनी आत्मविश्वास गमाविला. गांधीप्रणीत उपक्रम मग सरकारी कृपेवर अधिकाधिक अवलंबून राहू लागले. भारतीय तत्त्वज्ञानातील ईशावास्योपनिषद आणि गीतेतील स्थितप्रज्ञ दर्शन, रोजच्या प्रार्थनेत समाविष्ट करण्यात त्यांची बुद्धिनिष्ठता दिसते. ‘अंतस्त्यागी बहि:संगी लोके विचर राघव’, या योगवासिष्ठातील उपदेशाप्रमाणे समाजामध्ये सतत राहूनही आतून बुद्धीने त्याग करीत ते विचरत राहिले. लोकमान्यांनी म्हटल्याप्रमाणे, पोचण्याचे ठिकाण कोणतेही असले तरी ध्रुवताऱ्याचा संदर्भ ठेवूनच कोणतेही जहाज मार्गक्रमण करते. गांधींचे विचार हे ध्रुवताऱ्याप्रमाणे आहेत. मार्केट इकॉनॉमी ही आपली सध्याची प्रवृत्ती असली तरी गांधींचे जीवन सिद्धान्त हेच चिरंतर समाधान देणार आहेत. म्हणून त्यांचे स्मरण अनिवार्य आहे.

(हा लेख १ ऑक्टोबर २००५ रोजी दै. सकाळचे संपादकीय म्हणून प्रकाशित झाला होता.)

लेखक उत्तम कांबळे दै. सकाळचे संपादक संचालक आहेत.

tusharmhatre1@gmail.com

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......