वाचलीच पाहिजेत अशी काही पुस्तकं - भाग २
ग्रंथनामा - झलक
टीम अक्षरनामा
  • पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 01 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक

‘अक्षरनामा’वर दर शुक्रवारी मराठी पुस्तकांची परीक्षणे, त्यातील काही भाग किंवा संबंधित लेखकांच्या मुलाखती प्रकाशित होतात. फेब्रुवारी २०१८ या महिन्यात ‘अक्षरनामा’वर आलेल्या पुस्तकांविषयी...

.............................................................................................................................................

आठवणी गुरुजींच्या - प्रा. मधुकर राहेगावकर

वैचारिक निष्ठा आणि वैयक्तिक ऋणानुबंध यात मानसिक संघर्ष निर्माण करणारे प्रसंग गुरुजींच्या आयुष्यात अनेकदा आले. त्या वेळी सारे दोषारोप सहन करूनही त्यांचा कल मानवी संबंधांकडे अधिक झुकलेला असे. जीवनावरील व माणसांवरील अतीव श्रद्धेने ते असेच वागत राहिले. स्वत: स्वीकारलेल्या वैचारिक तत्त्वाविरुद्ध वागून लोकनिंदेने भाजून जात असताना आपण कुणाच्या तरी ऋणाची किंमत मोजत आहोत, यात अंतिमत समाधान आहे.

​​‘नरहर कुरुंदकर : ते होते जीवित’  ​- ​संपा. प्रा. मधुकर राहेगावकर, अभंग प्रकाशन, नांदेड, पाने - १६७, मूल्य - २३० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4346

.....................................................................................................................................

अश्लील, बीभत्स, शी शी! - सुनील कर्णिक

हे खळबळजनक पुस्तक प्रकाशित होऊन आता सहा महिने झाले; पण अजून त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. जणू काही तो प्रकार आपल्या घरात घडेपर्यंत आपण त्याची दखल घेणार नाही आहोत. ‘भारतातील मुलांच्या लैंगिक शोषणाच्या विदारक कहाण्या’ असं या पुस्तकाचं वर्णन मुखपृष्ठावर केलेलं आहे. आणि खरोखर या कहाण्या थरकाप उडवणाऱ्या आहेत.

म्हाताऱ्या बायका काय कामाच्या? - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १५० रुपये. 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4351

.....................................................................................................................................

मराठी पुस्तकवाल्यांचा मूळ पुरुष - सुनील कर्णिक

ज्ञानप्रसारासाठी झपाटून काम करणारी माणसं समाजाला किती मोलाचा ठेवा देऊन जातात याचं नमुनेदार उदाहरण म्हणून विल्यम कॅरे आणि त्याचं सिरामपूर गाव यांची कहाणी खरोखर विलक्षण आहे. हा विल्यम कॅरे होता कोण? त्याने बंगालमधल्या सिरामपूर गावी, इतक्या जुन्या काळी मराठी पुस्तकं लिहिण्याचा आणि छापण्याचा खटाटोप कसा केला? ते पहिलं पुस्तक ‘अ ग्रामर ऑफ द मऱ्हाटा लँग्वेज’ या नावानं असावं, याचं नेमकं कारण काय?

सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १८० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4353

.....................................................................................................................................

मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे - सुनील कर्णिक

मराठी साम्राज्याचा कर्ता शहाजी किंवा शिवाजी नव्हे, तर मलिक अंबर आहे, असा भालचंद्र नेमाडे यांचा दावा आहे. ‘साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण’ या नावाची त्यांची एक पुस्तिका आहे. आपले मुद्दे पटवण्यासाठी नेमाड्यांनी छोट्यामोठ्या मर्मभेदक हकिगती सांगितल्या आहेत. नेमाड्यांचं हे सुबोध, सुरेख पुस्तक हिंदी-इंग्रजीसह सर्व भाषांमध्ये अवश्य अनुवादित व्हावं इतकं मोलाचं आहे.

मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १८० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4352

.....................................................................................................................................

‘महानगर’चे दिवस - सुनील कर्णिक

त्यांनी शिवसेनेशी झुंज दिली आणि तिच्या फुग्याला ठोसा लगावून त्याच्यातली हवा घालवली. त्यांनी ‘निर्भय बनो’ आंदोलन छेडलं...आणि मग ते गुंडाळून ठेवलं. ते सुटाबुटात टीव्हीवर येतात आणि आवाज चढवतात. तो सूटबूट हे प्रस्थापितपणाचं प्रतीक आहे, तर समोरच्या नेत्याला आक्रमकपणे कोंडीत पकडणं हे प्रस्थापित-विरोधाचं लक्षण आहे! त्यांच्या विचारांना खोली नाही. त्यांच्या दृष्टीला दूरचं दिसत नाही.

‘महानगर’चे दिवस ​- सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4348

.....................................................................................................................................

स्वत:च्या विरोधात चार शब्द - सुनील कर्णिक

‘महानगरचे सुनील कर्णिक हे महाबिलंदर आणि महाबेरकी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी साहित्यिक ‘तळ आणि गाळ’ उपसणारे अनेक लेख ‘महानगर’मधून लिहिलेले आहेत. आणि श्री. पु. भागवत किंवा नारायण सुर्वे यांसारख्या साहित्यिकाबद्दल ‘न छापण्याजोग्या (पण चविष्ट) गोष्टी’ स्वत:च लिहिलेल्या आहेत.’ वगैरे. या वर्णनातील ‘महाबिलंदर आणि महाबेरकी’ ही विशेषणं वाचून मला मनातल्या मनात घेरी आली.

महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - २०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4350

.....................................................................................................................................

छापण्याजोग्या गोष्टी, लिहिण्याजोग्या आणि वाचण्याजोग्याही - विजय तेंडुलकर

वास्तविक या लेखनात आलेली माणसे, त्यांचे जग मला अपरिचित नव्हते. इतकेच नव्हे तर त्यातले काही अतिपरिचयाचे होते. तरीही या लेखनाने मला रमवले, काही नवे दिले, विचाराला प्रवृत्त केले, हे त्याचे यश म्हटले पाहिजे. कर्णिक चांगले संपादक आहेत हे माहीत होते. पण ते चांगले लेखक आहेत हे आता कळले.

न छापण्याजोग्या गोष्टी - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - २२० रुपये. 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4349

.............................................................................................................................................

कादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावणारा कादंबरीकार - राम जगताप

या पुस्तकानंतर तरी मराठी वाचक आणि समीक्षक मराठी कादंबरीचे अक्षांश-रेखांश धसाला लावणाऱ्या श्याम मनोहरांकडे जरा सहृदयतेनं पाहतील, अशी आशा करायला हरकत नाही. आता प्रश्न एवढाच आहे की, मनोहर यांचं हे नवं पुस्तक वाचून मराठी समीक्षक त्यांच्या कादंबऱ्यांना नव्यानं भिडण्याचं धाडस करतील की नाही? जे करतील, त्यांना हे लक्षात ठेवावं लागेल की, जुन्या हत्यारांनी नव्या लढाया लढता येत नाहीत, जिंकता तर अजिबातच येत नाहीत.

श्याम मनोहर यांची पुस्तके खरेदी करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा - 

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4354

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य - रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

मार्क्सवाद, नवभांडवलवाद, सुप्रजननशास्त्र (Eugenics) नववसाहतवाद, पर्यावरणवाद, यासारख्या परस्परविरोधी विचारसरणीही वेगवेगळ्या कालखंडात डार्विनवादाशी नाते सांगतात (व त्याद्वारे आपला वैज्ञानिक आधार मजबूत असल्याचा दावा करतात). या एका बाबीवरूनदेखील डार्विनच्या कामगिरीचा आवाका व व्यामिश्रता (तसेच वादग्रस्तताही) स्पष्ट व्हायला हरकत नाही.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4355

.............................................................................................................................................

कहाणी मानवप्राण्याची - मानवी संस्कृतीची चित्तथरारक रहस्यकथा - कुमार केतकर

‘कहाणी मानवप्राण्याची’ इतकी चित्तथरारक, उत्कंठावर्धक आहे की, तिचे काहीसे संक्षिप्त रूपही आपल्याला एखाद्या रहस्यकथेप्राणे गुंतवून टाकू शकते. ही सिव्हिलिझेशनची रहस्यकथा मानवी संस्कृतीची रहस्यकथा असली तरी ती ‘हू डन इट’ शैलीत एका रात्रीत वाचून संपवण्यासारखी नाही. मानसिक व वैचारिक रवंथ करीतच ती ‘पचवावी’ लागेल. पण तिची चव मात्र सतत चांगलीच राहील हे निश्‍चित.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4357

.............................................................................................................................................

वैताग, करुणा आणि उदासी या तीन पेड्यांची पाऱ्यासारखी कविता - आशुतोष जावडेकर

वैताग, करुणा आणि उदासी या तीन पेड्यांची वेणी बांधावी आणि चिमुरडी ‘अच्छा’ म्हणत कुठे दूर खेळायला निघूनही जावी, तशी कविता आहे विठ्ठलची. ती हातात येणारी नाही. ती पाऱ्यासारखीच आहे. त्या पाऱ्याचा स्पर्श, त्याची चकाकी, त्याचं ओघळणं याचा आस्वाद घेणं मात्र आपल्याला शक्य आहे. आणि हे काम आनंदाचं, मैत्रीचं आणि समृद्ध करणारं असं आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4386

.............................................................................................................................................

कुठे भिंत खचली, खांब कलथूनी गेले… - कुमार केतकर

रक्ताटे आणि कांदळकर जेव्हा या चिरेबंदी वाड्यात आले, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजे निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात, तेव्हा त्यांना लगेचच दिसू लागले की, वाडा तसा चिरेबंदी नाही! कुठे भिंत खचते आहे, खांब कलथूनी जात आहे असे त्यांना दिसू लागले. पण त्या अशा मोठ्या चिरेबंदी वाड्याची उद्ध्वस्त धर्मशाळा होईल हेही शक्य नसल्याचे त्यांना जाणवत होते.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383

.............................................................................................................................................

...म्हणून मला उजळ माथ्यानं कुणबीपण मिरवताना विशेष आवडतं - श्रीकांत देशमुख

बापूजी आयुष्यभर ज्या खेड्याविषयी, ग्रामस्वराज्याविषयी बोलले त्याला भिडून पिढ्यानपिढ्या जगणारा आणि मातीवर राबताना माती होणारा हा विश्वव्यापी समूह आहे. म्हणून मला उजळ माथ्यानं कुणबीपण मिरवताना विशेष आवडतं. कुणबीपण ही कुठल्याही अर्थानं मला जात, प्रदेश, धर्म, भाषानिष्ठ संवेदना वाटत नाही. शेती करणं हे पवित्र काम आहे, असं मानणारा थोरो यासाठीच मला थोर वाटतो.

श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावें ते आम्ही’ या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवितासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4335

.............................................................................................................................................

‘हळक्षज्ञ’चा श्रीगणेशा! - सतीश तांबे

पठडीबाह्य विचार हे नेहमीच योग्य, उपयुक्त वा कामाचे असतात असं नाही. त्यामध्ये गफलतीही असू शकतात. मात्र विचारांच्या क्षेत्रात त्यांचा वापर हा अत्यंत आवश्यक असतो. तावून-सुलाखून घेतल्याशिवाय शुद्ध विचार निर्माण होणं असंभव असतं. विचारसंकोचाच्या काळात तर ‘हळक्षज्ञ’ विचारांची मोठीच गरज असते. चिकित्सा ही गोष्ट आपण यापुढे सांस्कृतिक क्षेत्रातून बादच करायची आहे का?.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4390

.............................................................................................................................................

पुन्हा सुप्रिया सुळे आणि वसंत पुरके यांची ओळख कुणाला सांगितली नाही! - हेरंब कुलकर्णी

मला त्यांचा राग येण्यापेक्षा माझाच राग येत होता. आपल्याला कुणीतरी दलाल समजावं. हाच मला माझा अपमान वाटला. आपण इतके विकाऊ लोकांना का वाटलो? आपण शिक्षण सुधारण्यासाठी काही मुद्दे मांडतो, पण ती तळतळ करत काही प्रश्न मांडताना त्याचा बाजार किती थंडपणे मांडता येतो, हे या प्रकरणात माझ्या लक्षात आलं. पुन्हा सुप्रिया सुळे आणि वसंत पुरके यांची ओळख कुणाला सांगितली नाही.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4388

.............................................................................................................................................

अल्पकाळाचे मुख्यमंत्री, निर्णय मात्र प्रदीर्घ स्वरूपाचे - डॉ. व्ही. एल. एरंडे

कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना निलंगेकर राज्य विधिमंडळाचे नेते झाले होते. मुख्यमंत्रिपदावर आरूढ होताच निलंगेकरांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे एक मॉडेल तयार केले. काँग्रेस पक्षाने आपल्यावर टाकलेली ही जबाबदारी आपण तेवढ्याच समर्थपणे केली पाहिजे, अशी खुणगाठ उराशी बाळगून ते कामाला लागले. त्यांना मुख्यमंत्री म्हणून फार मोठा कालावधी मिळाला नसला तरी अल्पकाळातदेखील त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4389

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......