स्वत:च्या विरोधात चार शब्द
ग्रंथनामा - आगामी
सुनील कर्णिक
  • सुनील कर्णिक आणि त्यांची सहा पुस्तके
  • Fri , 02 February 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी सुनील कर्णिक Sunil Karnik डिंपल पब्लिकेशन्स Dimple Publication

ज्येष्ठ पत्रकार सुनील कर्णिक यांची सहा पुस्तके ९ फेब्रुवारी रोजी डिंपल पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहेत. हा प्रकाशन सोहळा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर, मुंबई इथे होत आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही पुस्तके प्रकाशित होत आहेत, ही विशेष आनंदाची बाब आहे. यातील ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती असून बाकीच्या ‘‘महानगर’चे दिवस’, ‘सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी’, ‘मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे’, ‘महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं’, ‘म्हाताऱ्या बायका काय कामाच्या’ या पाच पुस्तकांची पहिली आवृत्ती आहे. या सर्व पुस्तकातील लेख वेळोवेळी वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. या पुस्तकांपैकी ‘महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं’ या पुस्तकातील हे एक प्रकरण.

.............................................................................................................................................

‘ललित’ नावाचं ग्रंथप्रसाराला वाहिलेलं मासिक गेली चाळीस वर्षं दरमहा प्रसिद्ध होत आहे. या मासिकात सुरुवातीची अनेक वर्षं जयवंत दळवी ‘ठणठणपाळ’ या टोपणनावाने जे हलकंफुलकं आणि प्रसन्न लेखन करत असत, त्या जागी सध्या ‘टप्पू सुलतान’ या टोपणनावाने पुण्याचे एक गृहस्थ लिहीत असतात. त्यांनी दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखात माझ्याविषयी पुढील मजकूर प्रसिद्ध झाला आहे -

‘महानगरचे सुनील कर्णिक हे महाबिलंदर आणि महाबेरकी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी साहित्यिक ‘तळ आणि गाळ’ उपसणारे अनेक लेख ‘महानगर’मधून लिहिलेले आहेत. आणि श्री. पु. भागवत किंवा नारायण सुर्वे यांसारख्या साहित्यिकाबद्दल ‘न छापण्याजोग्या (पण चविष्ट) गोष्टी’ स्वत:च लिहिलेल्या आहेत.’ वगैरे.

या वर्णनातील ‘महाबिलंदर आणि महाबेरकी’ ही विशेषणं वाचून मला मनातल्या मनात घेरी आली. म्हणजे काही सुचेनासंच झालं. थोड्या वेळाने डोकं थोडं ताळ्यावर आल्यावर मी स्वत:ला विचारलं की, आपल्या अंगात जर इतके मोठे दुर्गुण असतील तर आजवर ते आपल्या लक्षात कसे आले नाहीत? आणि हे आपलं वर्णन जर खरं असेल तर ते दुर्गुण स्वत:मध्ये ठेवून समाजात वावरणं हे समाजाच्या दृष्टीने घातक नाही का?... पण मुळात हे वर्णन खरं मानलं पाहिजे.’

पण ही सगळी अक्कल दुसऱ्याला शिकवायला ठीक असते; ती स्वत: आचरणात आणायची म्हणजे अशक्यप्राय गोष्ट असते; हेच खरं. माझ्या अंगात कोणताही दुर्गुण आहे हे स्वीकारायलाच माझं मन तयार होईना. पण तसं उघडपणे मला बोलताही येईना. त्यामुळे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी माझी विचित्र अवस्था झाली. अखेरीस मी एका मित्राला पकडलंच आणि त्याच्याकडे ‘तो’ विषय काढला.

‘अरे, अरे, हे बघ ‘ललित’मध्ये माझ्याबद्दल काय छापून आलंय.’

हे ऐकताच तो अतिशय निरागसपणे, गोड हसला. त्याचा अर्थ असा होता की ‘ललित’मधलं ते वर्णन त्याने वाचलं होतं, एवढंच नव्हे तर त्याला ते पटलंही होतं. हे आणखी माझ्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं. मी तडफडत त्याला म्हणालो, ‘अरे, पण तू मला सांग, मी एकदम महाबिलंदर आणि महाबेरकी कसा होईन? त्याआधी साधा बिलंदर आणि साधा बेरकी या पहिल्या पायरीवर कोणी तरी मला उभं करायला नको का?’

हे ऐकूनही तो मख्खासारखा गप्प राहिला. आता आपलं म्हणणं त्याला कसं पटवून द्यावं ते मला कळेना. म्हणून मग मी सुचेल ते बडबडलो,

‘तुम्ही मला एकदम काळ्या सिंहासनावर कसं बसवता? त्याआधी बसायला साधं काळं फडकं का देत नाही?’

हे ऐकल्यावर एखाद्या बावळट माणसाला साधा विचार समाजावून सांगावा तसा तो मला म्हणाला,

‘हे बघ, काही वर्षांपूर्वी तू जेव्हा ‘ललित’ मासिकात काम करत होतास, तेव्हा ‘ललित बिलंदर’ होतास. आता तू ‘महानगर’मध्ये असल्यामुळे महाबिलंदर’ आहेस. कळलं?’

‘मला कळलं.’ मी म्हणालो, ‘म्हणजे मी जर ‘मटा’मध्ये काम करत असतो तर ‘मटा बिलंदर’ ठरलो असतो आणि ‘नवा काळ’मध्ये असतो तर ‘नवा बिलंदर’ झालो असतो!’

‘हो. आणि उद्या जर तुझी नोकरी जाऊन तू बेकार झालास तर तू ‘बेकार बिलंदर’ होशील! आणि त्यानंतर तू मेलास तर ‘मेला बिलंदर’ होशील!’

मित्र फारच क्रूर बोलत होता.

‘अरे, अरे! पण तू माझा मित्र आहेत की शत्रू आहेस?’

‘मी तुझा मित्रच आहे. पण ‘ललित’मधल्या त्या सदर लेखकाला तू हा प्रश्न विचारला असतास तर त्याने काय उत्तर दिलं असतं ते मी तुला सांगितलं.’ च्यायला, याने तर मला निरुत्तर केलं.

यानंतर दोनतीन दिवसांचीच गोष्ट. मी कामानिमित्त जिथे जिथे जात असतो त्यांपैकी एका अक्षरजुळणी केंद्रात गेलो, तर तिथे काम करणाऱ्या एका मुलीने गेल्यागेल्याच मला अत्यंत सौम्य शब्दांत हटकलं,

‘अहो, तुम्ही ‘ललित’चा दिवाळी अंक बघितलात का?’

ते उद्गार ऐकताच तिचे सगळे सहकारी अर्थपूर्ण हसले.

मला ते सहन होईना. मी म्हणालो, ‘अरे ‘ललित’ नावाचं काही मासिक आहे हे कालपर्यंत तुमच्या गावीही नसेल! आणि आज तिथे माझी बदनामी झाल्याबरोबर ती ताबडतोब तुमच्यापर्यंत आलीसुद्धा? कमाल आहे. पण याआधी त्याच सदरात माझ्याबद्दल चार चांगले शब्दही छापून आले आहेत, त्याबद्दल मात्र तुम्ही कधी बोलला नाहीत?’

माझा मूळचा काळा चेहरा संतापाने अधिकाधिक काळानिळा होत होता.

‘तसं नाही,’ तिची रदबदली करत तिचा एक सहकारी म्हणाला, ‘आम्हाला वाईट वाटलं म्हणून आम्ही बोललो.’

हे बोलतानाही त्याच्या चेहऱ्यावरचं हसू लपत नव्हतं.

‘हे बघ, आम्हाला वाईट वाटलं हे वाक्य कोणी हसत हसत म्हणत नाही!’

मी कडवट विनोद करू पाहत होतो, पण मनातून मी रडत आहे सर्वांना कळत होतं.

मग मी घाईघाईने चेहर्‍यावरून हात फिरवतोय असं भासवून स्वत:चे डोळे चाचपून पाहिलं. त्यांच्यातून पाणी येत नव्हतं हे बयं होतं.

चार दिवसांनी बाकीचे सगळे ती गोष्ट विसरून आपापल्या कामाला लागले, पण आपल्या चारित्र्याला लागलेला काळिमा मला चैन पडू देईना. मी पुन्हा एकदा मित्राला पकडलं आणि त्याच्याकडे तो विषय उकरून काढला - ‘अरे, इतके लोक इतक्या भानगडी करतात, पण त्यांच्याबद्दल मात्र कोणी ब्र काढत नाही -’

‘उदाहरणार्थ?

‘उदाहरणार्थ, ती भक्ती बर्वे नावाची नटी होती, ती म्हणे दरवेळी नवा मुख्यमंत्री आला की दहा टक्क्यांचा फ्लॅट मिळवायची. असे सहा फ्लॅट म्हणे तिने स्वत:च्या नावावर करून घेतले होते. ही कुजबुज मी अनेक वेळा ऐकली आहे. पण याविरोधात जाहीरपणे कोणीच काही बोलत नाही. आणि माझ्या बाबतीत मात्र -’

‘हे बघ,’ तो मला समजावत म्हणाला, ‘तिचे गुण इतके मोठे होते की त्या तुलनेत तिचे दोष नगण्य ठरले. तुझं तसं नाही.’

त्याला काय उत्तर द्यावं तेच मला कळेना.

हा सर्व वर लिहिलेला मजकूर मी त्या मित्राला दाखवला. तर तो म्हणाला, ‘ललितमध्ये जे छापून आलंय तेच यावरून सिद्ध होतंय.’

‘काय?’

‘हेच की तू महाबिलंदर आणि महाबेरकी आहेस.’

त्याने माझी बोलतीच बंद केली.

.............................................................................................................................................

महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - २०० रुपये. 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4350

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......