यात्रा युरोपची : छ. राजाराम महाराज द्वितीय यांच्या जीवनावर व स्वभावावर प्रकाश टाकणारी रोजनिशी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
रणधीर शिंदे
  • ‘यात्रा युरोपची’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 20 April 2025
  • ग्रंथनामा शिफारस यात्रा युरोपची yatra Yuropchi राजाराम महाराज Rajaram Maharaj

छत्रपती राजाराम महाराज द्वितीय (१८५०-१८७०) यांना कोल्हापूर संस्थानचे छत्रपती म्हणून केवळ चार वर्षाचा कालावधी लाभला. अशा या राजाराम महाराजांचे युरोप दौर्‍यात इटली येथील फ्लोरेन्स येथे वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आजाराने दुःखद निधन झाले. छत्रपती राजाराम महाराज हे आधुनिक दृष्टीने राजे होते. संस्थानच्या प्रगतीविषयी त्यांना विलक्षण आस्था होती.

 

१८७०मध्ये तरुण वयातील छत्रपती राजाराम महाराजांनी युरोपचा दौरा केला. हिंदुस्थानातील संस्थानी राजवटीतील परदेशा दौरा करणारे ते पहिले राजे मानले जातात. राजाराम महाराजांनी या प्रवास दौर्‍याचा वृत्तांत रोजनिशीरूपाने लिहून ठेवला होता. तो ‘डायरी ऑफ द लेट राजा ऑफ कोल्हापूर ड्युरिंग हिज व्हिजिट टू युरोप इन १८७०’ या नावाने १८७२ साली प्रसिद्ध झाला. तब्बल १५३ वर्षांनी ही रोजनिशी शिवाजी विद्यापीठाकडून ‘यात्रा युरोपची यात्रा : छत्रपती राजाराम महाराज द्वितीय यांची रोजनिशी’ या नावाने प्रकाशित होत आहे.

राजाराम महाराजांच्या या रोजनिशीत जून १८७० ते नोव्हेंबर १८७० या काळातील प्रवासवृत्तांत आहे. राजाराम महाराजांनी इग्लंड, फान्स व इटली या युरोपियन देशात प्रवास केला. युरोपातील सामाजिक जीवन, भौतिक प्रगती व सांस्कृतिक जीवन पाहिले, अशी त्यांची या दौऱ्यामागे धारणा होती. युरोपातील समाज, प्रदेश, गावे, टेकड्या, पॅलेस, संग‘हालये, संस्था, प्रदर्शने, खेळमैदाने पाहिले ते कुतूहल दृष्टीने.

 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

 

या रोजनिशीतून राजाराम महाराजांच्या संपन्‍न अशा प्रागतिक दृष्टीच्या व्यक्‍तिमत्त्वाचा व त्यांच्या अंतरंगाचा, जीवनदृष्टीचा भरगच्च आविष्कार झाला आहे. राजाराम महाराजांच्या मनात युरोपीय राष्ट्रांविषयी कुतूहल व जिज्ञासा होती. नवे जग जाणून घेण्याची इच्छा होती. आधुनिक दृष्टीचे हे जग जाणून घ्यावे व ते समजून घ्यावे, अशी दृष्टी यामागे आहे. या दृष्टीने ते युरोपातील आधुनिक जग व त्याची प्रक्रिया ते जाणून घेत आहेत. त्यांनी तेथील विविध आधुनिक संस्थांना व प्रदर्शनांना भेटी दिल्या.

या प्रवासात त्यांनी कालव्याशी निगडित जादुई प्रकाशचित्रे पाहिली. वैज्ञानिक उपकरणे व विविध प्रदर्शने पाहिली. मेणबत्ती व साबण तयार करण्याची प्रक्रिया असो की, कापड गिरण्या, कारखाने पाहिले.  टॉकिंग मशीन (बोलण्याचे मशीन), अग्निशमन यंत्र, वुलनची वस्त्रनिर्मिती करणारी कारखाने पाहिले. त्याचबरोबर युरोपातील राज्यकारभार, प्रशासन व न्यायपद्धती त्यांनी जाणीवपूर्वक न्याहळली. युरोपातील नवे जग व तेथील बदलाची प्रक्रिया ते समजून घेत होते, हे या रोजनिशीवरून लक्षात येते. या आधुनिक प्रगतीचा आपणही अंगिकार करावा अशी त्यांची धारणा या जिज्ञासा सफरीमागे होती.

या जिज्ञासा आवडीपोटी त्यांनी ऑक्सफर्डमधील कुलगुरूंचे भाषण व प्राध्यापकांची व्याख्याने ऐकली. एके ठिकाणी त्यांनी कापसावर शोधनिबंध वाचल्याची नोंद केली आहे. अनेक विद्वानाची भाषणे ते समरसून ऐकत. या भाषणांवरील ठिकठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. राजाराम महाराजांच्या आधुनिक दृष्टीचे द्योतक म्हणजे त्यांनी तेथील महाविद्यालयाचे ग्रंथालयाचे त्यांनी घेतलेले दर्शन. तेथील महाविद्यालयांची शिक्षण स्थिती व विद्यार्थी जीवन त्यांनी जवळून पाहिले.

तसेच त्यांच्या या आधुनिक दृष्टीचे द्योतक म्हणजे विविध क्रीडा प्रकारांविषयी त्यांना असलेली आस्था. युरोपात अनेक आधुनिक वळणाचे खेळ ते पाहतात. आणि स्वतःही त्यात सहभागी झाले. परदेशातील समाज आणि परिसराची सुंदर वर्णने यात आहेत. अनेक झाडाफुलांची वर्णने, फुलांचे वाफे, सरोवरे, सरोवरातील बदके, पाम हाऊस, हरितगृहे, धबधबे व गुलाब प्रदर्शनांची वर्णने आहेत.

विविध लोकांच्या भेटी घेणे यात त्यांना आनंद वाटे हा त्यांच्या संपन्‍न व्यक्‍तिमत्त्वाचा भाग होता. युरोपातील सार्वजनिक जीवनातील सभ्यतेने ते भारावून गेले आहेत. माणसांमाणसांमधील अगत्यशीलता, शालीन स्नेहशीलता व प्रेममयतेचे त्यांना अप्रुप आहे. या रोजनिशीत राजाराम महाराजांच्या सुसंस्कृत, उमद्या, शालीन, सुजनशील व्यक्‍तिमत्त्वाच्या आविष्कार आहे.

या रोजनिशीत राजाराम महाराजांच्या भारतीयत्वाचा खास असा आविष्कार आहे. या परदेश प्रवासात ते भारतभूमीच्या खुणा शोधताना दिसतात. या भारतखुणांविषयी त्यांना अप्रुप आहे. या प्रवासात भारतीय माणसांना भेटतात. ‘इंडिया ऑफिस’ला वारंवार भेटी दिल्या आहेत. पोस्टात भारतीय पत्रांसाठी असलेला स्वतंत्र विभाग ते आवर्जून पाहतात. इंडिया ऑफिसमध्ये ठेवलेले भारतीय धान्य, भारतीय वस्त्रप्रकार, दागिने, खजिने, हत्ती दंतचित्रे तसेच रणजितसिंह यांचे सोन्याचे सिंहासन पाहून त्यांना आश्यर्च वाटते. प्रवासात त्यांची दादाभाई नौरोजींशी भेट झाली होती.

एके ठिकाणी त्यांनी पंजाबी व शीख शस्त्रे पाहिल्याची नोंद केली आहे. ‘भारतीय अर्थव्यवस्था’ व ‘भारतीय बंदरे आणि खाड्या’ या विषयावरील विद्वानांची भाषणे ते आवर्जून ऐकतात. यात राजाराम महाराजांचे ‘भारतप्रेम’ जसे लक्षात येते तसेच त्यांची आधुनिक दृष्टीही. या त्यांच्या भारतभूमी ओढीच्या खुणा या रोजनिशीत आहेत.

राजाराम महाराजांचे मन अतिशय हळुवार संवेदनशील व कलासंपन्‍न होते. त्यांच्या या कलासंपन्‍नतेच्या असंख्य खुणा या रोजनिशीत पसरलेल्या आहेत. किंबहुना युरोपातील कलाजीवनाचे विस्तृत वर्णने या रोजनिशीत आहेत. युरोपातील अनेक कलासंग्रहालये, नाट्यगृहे त्यांनी पाहिली. चित्र शिल्प दालने, संगीत नृत्य उत्सव, नाटके त्यांनी माहिती. या पाहणीच्या हर्षनोंदी रोजनिशीत आहेत. अनेक ऑपेरा, बॅले व कलावंताच्या नोंदी आहेत. एका नाटकाचा ‘शेवट पाहून आम्ही खूप भावविवश झाल्याची नोंद त्यांनी एके ठिकाणी केली आहे. एके ठिकाणी एका ऑपेरात एका अभिनेत्रीच्या सुंदर आवाजाची नोंद केली आहे.

एका उमद्या संवेदनशील कलाप्रेमी रसिक राजाच्या या कलासक्‍त नोंदी आहेत. राजाराम महाराजांच्या कलाप्रेमाची साक्ष देणार्‍या या आनंदनोंदी आहेत. राजाराम महाराजांच्या अंतरंगाचा व त्यांच्या जीवनदृष्टीचा खास असा आविष्कार या रोजनिशीत आहे. प्रदेश, स्थळे, माणसे, निसर्ग, खानपानाकडे पाहण्याची खास अशी दृष्टी आहे. मानवी संबंधांतील आनंदमयतेबरोबरच मनमोहक अशा निसर्गदृश्याच्या नोंदी या रोजनिशीत आहेत. सौहार्द,नम्रतेबरोबरच त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा आविष्कार या रोजनिशीत आहे. मँचेस्टर शहर सुंदर आहे, परंतु तेथील कारखान्यांमुळे या शहराच्या सुंदरपणात  बाधा आल्याचे त्यांना वाटते.

या रोजनिशीचा एक विशिष्ट रचनाबंध आहे. प्रत्येक नोंदीत पूर्वाधात युरोपातील समाज व प्रदेशाच्या नोंदी आहेत व उत्तरार्धात कलाजीवनाच्या. रोजनिशी आत्मपर वाङ्मयप्रकार असल्यामुळे या रोजनिशीत महाराजांच्या अंतरंगाचा व जीवनदृष्टीचा आविष्कार झाला आहे. ‘थकून गेलो’, ‘आनंद वाटला’, ‘फेरफटका मारला’, ‘आमच्याशी त्यांनी प्रेमाने संवाद साधला’ अशा शब्दप्रयोगांचा ठिकठिकाणी वापर आहे. राजाराम महाराजांच्या सौजन्यशील व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार या रोजनिशीत आहे.

या रोजनिशीला शोकांत अनुभवाची गडद अशी किनार आहे. या प्रवासात नोव्हेंबर १३ ते १६ या काळात महाराज आजारी पडले. अल्पशा आजाराने राजाराम महाराजांचे दुखद निधन झाले. १ डिसेंबर १८७० रोजी फ्लोरेन्स शहरातील अर्नो नदीकाठी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. या अंत्यसंस्काराचा विस्तृत वृत्तांत परिशिष्टात दिला आहे.

ही रोजनिशी इंग्रजीत प्रकाशित करण्याचे श्रेय राजाराम महाराजांचे गार्डियन (पालक-सहचर) कॅ. एडवर्ड वेस्ट यांचे. ते महाराजांच्या समवेत या प्रवासात सोबतीला होते. महाराजांवरील अकृत्रिम प्रेमापोटी त्यांनी ही रोजनिशी प्रकाशित केली आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

कॅ. वेस्ट यांनी परिशिष्टात दिलेली त्या काळाविषयी माहिती उपयुक्‍त आहे. तसेच राजाराम महाराजांच्या निधनाचा व त्यांच्या पार्थिव अंत्यसंस्काराची दिलेला विस्तृत वृत्तांत अतिशय महत्त्वाचा आहे. या रोजनिशीचा अनुवाद इंग्रजी-मराठी साहित्याचे व्यासंगी प्राध्यापक आणि अभ्यासक  डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी केला आहे. तो मराठी वळणाचा आहे. दीडशे वर्षांपूर्वीच्या इंग्रजी भाषेतील रोजनिशीचे भाषांतराचे काम जिकिरीचे होते. डॉ. कडाकणे यांनी भाषांतररसाठी घेतलेले कष्ट रोजनिशीच्या पानोपानी दिसतात. इतक्या सुलभ आणि प्रगल्भ सहजभाषेत हा अनुवाद झाला आहे.

कडाकणे यांचा हा अनुवाद खास मराठी वळणाचा आहे. इंग्रजी शब्दांना खास असे मराठी शब्दांची निवड त्यांनी केली आहे. ‘सुखद आणि संस्मरणीय’, ‘आनंद वाटला’, ‘फेरफरका मारला’, ‘कमॅमोरेन्शन सेरेमनीसाठी’, ‘स्मरण सोहळा’, ‘समुद्र अगदी शांत होता’, ‘निसर्गरम्यता पाहून डोळे सुखावले असे मराठीकरण ठिकठिकाणी आहे.’ कॅ. एडवर्ड वेस्ट यांच्याविषयीचे माहितीपूर्ण टिपण प्रा. अवनीश पाटील यांनी लिहिले आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या आजवरच्या प्रकाशन वाटचालीतील हा महत्त्वाचा दस्तऐवज या रोजनिशी रूपाने प्रकाशित होतो आहे. या रोजनिशीचे महत्त्व एका कारणासाठी आहे ते म्हणजे शाहूपूर्व काळातील कोल्हापूर संस्थानातील घडामोडींचे चित्र यामध्ये आहे. इतिहास तसेच सामाजिक शास्त्राच्या अभ्यासकांना नवी दृष्टी देणारी ही रोजनिशी आहे. शाहूपूर्व कालखंडाकडे पाहण्याची पुनर्दृष्टी यात आहे, तसेच ती राजाराम महाराजांच्या जीवनावर व स्वभावावर प्रकाश टाकते.

.................................................................................................................................................................

लेखक रणधीर शिंदे मराठी समीक्षक आहेत.

randhirshinde76@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 01 May 2025

रंजक व माहितीपूर्ण लेख आहे. नक्की कोणत्या विकाराने महाराजांचा मृत्यू झाला ते कळायला हवं. असो.
इ.स. १८७० म्हणजे इटलीतील धामधुमीचा काळ. तेव्हा जर्मनी हे एक अखंड राष्ट्र म्हणून अनेक संस्थानांच्या विलीनीकरणातून उदयास येत होतं. तर इटलीत हाच प्रकार १८७१ साली घडला. राजाराम महाराजांनी यासंबंधी काही निरीक्षणं नोंदवली आहेत का ते पहाणं रोचक ठरावं.
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......