ज्यांच्याकडे भरपूर भांडवल आहे, त्यांचा विकास सत्तेतून होत जातोय. पण साधे कामधंदेही नसल्याने जे बेकार आहेत, अशांचे काय? ते ‘रामभक्ती’त इतके मग्न आहेत!
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • अयोध्या आणि राममंदिराचं एक संग्रहित छायाचित्र
  • Wed , 31 January 2024
  • पडघम देशकारण अयोध्या Ayodhya राममंदिर RamMandir राम Ram

अखेर २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. गेल्या कित्येक वर्षांपासून ज्या दिवसाची भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते, तो हा दिवस! धार्मिक वृत्तीच्या बहुसंख्य हिंदूधर्मीयांनीसुद्धा हा दिवस दिवाळीसारखा साजरा केला. तो तसा व्हावा, यासाठी केंद्र सरकारने व भाजप-संघाशी संबंधित असलेल्या राज्य सरकारांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची, तर राज्य सरकारने पूर्ण दिवसाची सुट्टी जाहीर केली होती. घरोघरी अक्षता दिल्या होत्या. अनेक ठिकाणी फटाके फोडून, रोषणाई करून हा दिवस साजरा करण्यात आला.

देशभरातील काही नामांकित व्यक्ती, राजकीय पक्षांचे पुढारी, सिनेसृष्टीतील तारे-तारका, मोठमोठे उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक, धार्मिक साधू-संत इत्यादींना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. निमंत्रितांपैकी काही लोक हजर राहिले, तर काहींना शक्य झाले नाही. बऱ्याचशा विरोधी पक्षांनी या कार्यक्रमाला राजकीय रंग असल्याचे कारण देत जाणेच टाळले.

केजरीवालांनी दिल्लीत, तर ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये ‘सर्वधर्मसमभावा’ची भूमिका स्पष्ट केली. ‘आम्हीही हिंदू धर्मीय असलो, तरी धर्म हा ज्याची त्याची खाजगी बाब आहे, ज्याने त्याने इतरांच्या धर्माचा द्वेष न करता आपापला धर्म पाळावा, पण शासनाने भारतीय संविधानानुसार धर्मनिरपेक्ष पद्धतीने व्यवहार केला पाहिजे’, अशी अपेक्षा डाव्या पक्षाच्या पुढार्‍यांनी व्यक्त केली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हिंदू धर्मियातील सर्वोच्च धार्मिक स्थान असलेल्या चारही शंकराचार्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. पण त्यांच्यापैकी एकही शंकराचार्य उपस्थित राहिले नाहीत. आपल्या अनुपस्थितीची कारणे देताना, त्यांनी सदरील राममंदिर अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याने, अशा अवस्थेत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करणे, हे धार्मिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे सांगितले. अशा अवस्थेत त्या मूर्तीमध्ये देवादिकांचा संचार होण्याऐवजी दैत्य-दानवांचा संचार होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मात्र पंतप्रधान मोदी यांना मंदिराचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत थांबण्यास अवधी नव्हता. तोवर २०२४च्या निवडणुका निघून जातील, अशी भीती त्यांना वाटली असावी. कारण पुन्हा पंतप्रधान व्हायचे असल्याने, त्यांना मंदिराच्या अपूर्ण अवस्थेतच श्रीरामाच्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करणे महत्त्वाचे वाटले!

जानेवारीतील तिसरी महत्त्वाची तारीख

आतापर्यंत जानेवारी महिन्यात ‘२६ जानेवारी’ (प्रजासत्ताक दिन) आणि ‘३० जानेवारी’ (गांधी हत्या) या तारखांना विशेष महत्त्व महत्त्व होते. त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘२२ जानेवारी’ ही तारीख नोंदवली आहे.

खरे तर २२ जानेवारी १९९९ या दिवशी संघाशी संबंधित बजरंग दलातील दारासिंगने ओरिसात ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन मिशनरी ग्रॅहॅम स्टेंस यांना त्यांच्या सहा व दहा वर्षांच्या दोन मुलांसह जीप गाडीमध्ये जाळून मारले होते. त्याला २२ जानेवारी २०२४ रोजीच बरोबर २५ वर्षे झाली. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.

आता ‘जय श्रीराम’ची पुढील वाटचाल कशी राहणार आहे, हे या दिवशी व त्यानंतर घडलेल्या काही घटनांतून दिसून येते. २२ जानेवारी रोजी निघालेल्या मिरवणुकांत अनेक ठिकाणी नथुराम गोडसेचा त्याचं छायाचित्र मिरवून जयजयकार करण्यात आला. मुंबईचे उपनगर मीरा-भाईंदरमध्ये मिरवणुकीच्या गाड्यावर दगडफेक केल्याच्या कारणावरून मुस्लीम समाजाच्या घरादारांवर व दुकानांवर बुलडोझर फिरवण्यात आला.

या शिवाय या मिरवणुकीच्या वेळेस देशातील काही मशिदींवरही हल्ल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. बाबरी मशिद पाडत असतानाच ‘ये तो अभी झाकीं हैं, काशी-मथुरा बाकी हैं’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यानुसार भविष्यात काशीतील ज्ञानवापी मंदिर आणि मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराचाही नंबर लागणार आहे. त्याबाबतच्या कोर्टकचेऱ्या चालू असून नुकताच त्या संदर्भातला एएसआयचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. आता मुस्लिमांनी ज्ञानवापी मंदिरात आम्हाला प्रार्थना करू द्याव्यात, त्यातूनच सामाजिक समरसता वाढू शकेल, असे आवाहन केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विटवरून केले आहे.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

पंतप्रधान मोदी आणि संसद टीव्हीनं संविधानात ‘रामा’चं चित्र आणि ‘रामराज्या’चा उल्लेख असल्याचं सांगणं, हे ‘अर्धसत्य’ आहे…

‘‘काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी, देशोऽयम क्षोभरहितो मानवः संतु निर्भयाः’’

न्यायालय केवळ ‘निवाडा’ करते, ‘निकाल’ देते, मात्र ‘न्याय’ देतेच असे नाही!

दुधखुळी माणसं आणि त्यांचा फायदा घेण्यासाठी टपलेली लबाड माणसं, यांचा सुळसुळाट झालेल्या जगात ‘देव’ या कल्पनेचा वापर स्वतःच्या ‘पोळ्या’ भाजून घेण्यासाठी सर्रास केला जात आहे!

..................................................................................................................................................................

अयोध्या पर्यटनस्थळ आणि ‘बूमिंग सिटी’ही!

खुद्द अयोध्यावासीय त्यांचे शहर तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित होत असल्याने तेथील सर्वसामान्य रहिवाशीही खुश आहेत. कारण आता तेथे हिंदूधर्मीयांची व इतरही पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. पूजापाठ साहित्य, श्रीरामाच्या मूर्ती, त्याची छापील छायाचित्रं, ताईत, अंगठ्या, माळा, अशा नानाविध गोष्टींची मागणी वाढणार. त्याचा तेथील लहान-मोठ्या दुकानदारांना फायदा होणार आहे. पर्यटकांची वर्दळ वाढल्यामुळे हॉटेलिंग, लॉजिंगच्या धंद्यातसुद्धा वाढ होणार. महाराष्ट्रात शिर्डी देवस्थान आणि आंध्रातील बालाजी जे महत्त्व आलेले आहे, कदाचित त्यापेक्षाही जास्तच अयोध्येतील राममंदिराला येणार आहे.

अयोध्येत राममंदिराच्या उभारणीसोबत २०२२पासून धार्मिक पर्यटनस्थळ बनवण्याचेही काम सुरू होते. त्यामध्ये १३ किलोमीटर लांबीचा ‘रामपथ’, ८०० मीटर लांबीचा ‘भक्ती पथ’ आणि ८०० मीटर लांबीचा ‘जन्मभूमी मार्ग’ यांच्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. मंदिराचे बांधकाम सुरू होताच सरकारने रस्ते, विमानतळ, रेल्वे स्टेशन, रुग्णालये, रस्ते रुंद करणे आणि गटारांच्या लाईनचे काम वेगाने केले. राममंदिर प्राधिकरणाने मंदिराच्या आसपासचा परिसर ‘धार्मिक क्षेत्र’ म्हणून घोषित केला आहे.

या सर्व प्रकारामुळे गेल्या चार वर्षांत अयोध्येतील मालमत्तेच्या किमती दहा पटीने वाढल्या आहेत. चार वर्षांपूर्वी २,००० रुपये प्रति चौरस फूट दराने उपलब्ध असलेली जागा आता १५,००० रुपयांना स्क्वेअर फूटमध्येही मिळत नाहीये.

लखनौ-गोरखपूर महामार्गावरून एक रस्ता नव्या घाटाकडे जातो. तेथून राममंदिर जवळ आहे. तिथे २०१९मध्ये ५ हजार स्क्वेअर फूटाच्या व्यावसायिक मालमत्तेची किंमत ४५०० रुपये प्रति स्क्वेअर फूट म्हणजे २ कोटी २५ लाख रुपये एवढी होती, ती २०२०मध्ये ३ कोटी रुपये झाली. आणि आता ५ कोटींवर त्याचा भाव गेला आहे.  केवळ राममंदिराच्या आसपासच नाही, तर संपूर्ण अयोध्या आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मालमत्तेच्या किमती झपाट्याने वाढत आहेत.

भाजपशी संबंधित मुंबईतील खासदार मंगल प्रसाद लोढा, ताज ग्रुप, हैदराबाद ग्रुप, तिरुपती बालाजी ग्रुप अयोध्येत हॉटेल्स आणि टाऊनशिपमध्ये गुंतवणूक करत आहेत. केवळ बड्या रिअल इस्टेट व्यावसायिकांनाच नाही, तर धार्मिक नेत्यांनाही अयोध्येत त्यांची उपस्थिती हवी आहे. अलीकडच्या काळात तिथे अनेक मठ आले आहेत, काही नव्याने निर्माण झाले आहेत.  यापैकी एक दक्षिण भारतातील उत्तरादि मठ आहे.

अशाच लोकांचा उत्तरोत्तर चढत्या भाजणीने विकास होत आहे. त्यामुळे त्यांना आहे हीच सत्ता कायम राहावी, त्यातच आपला विकास सामावलेला आहे, याचे भान आहे. म्हणून या राज्यसत्तेला कोणत्याही जनसमुदायाकडून धोका पोहोचत असल्यास, त्यापासून ती सत्ता वाचावी, यासाठी ते त्यांच्या परीने आटोकाट प्रयत्न करत असतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

बेकारांच्या फौजा ‘रामभक्ती’त मग्न

ज्यांच्याकडे भरपूर भांडवल असते, त्यांचा विकास सत्तेतून होत जातो. पण साधे कामधंदेही नसल्याने जे बेकार आहेत, अशांचे काय? पण ते रामभक्तीत इतके मग्न आहेत की, त्यांना स्वतःच्या प्रश्नाचेही भान राहिलेले नाही. देशातील बेकारांचा प्रश्न फार गंभीर आहे असे सातत्याने म्हणतात, पण हेच बेकार युवक या सत्तेचे झेंडे खांद्यावर घेऊन, मिरवणुका काढून, मशिदीवर हल्ले करून, राममंदिर झाल्याच्या आनंदात गल्लोगल्ली पताका लावण्यात आणि फटाके फोडण्यात मग्न आहेत.

यापूर्वी निदान महाराष्ट्रात तरी भगव्या झेंड्यावर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र व त्याखाली ‘जाणता राजा’ असे लिहिलेले असायचे. आता मात्र या भगव्या झेंड्यावर श्रीरामाचे चित्र आले असून, त्याखाली ‘जय श्रीराम’ लिहिलेले असते. पुढे-मागे प्रसंगोपात त्यात बदल होऊ शकेल, असे वाटते.

खरं म्हणजे भारतात गेल्या हजारो वर्षांपासून एकमेकाबद्दलचा संबंध, आपुलकी, मित्रत्व वाढवण्यासाठी, एकमेकाला अभिवादन करण्यासाठी ‘राम राम’ या शब्दाचा उपयोग होत आला आहे. या शब्दात मृदूता होती, त्यात कोणाहीबद्दलच्या द्वेषाचा लवलेश नव्हता. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही…

.................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......