शरद जोशी : आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात इतका विचार करणारा नेता आलेला नव्हता…
पडघम - सांस्कृतिक
विनय हर्डीकर
  • शरद जोशी आणि विनय हर्डीकर
  • Fri , 23 December 2022
  • पडघम सांस्कृतिक शरद जोशी Sharad Joshi शेतकरी संघटना Shetkari Sanghatna विनय हर्डीकर Vinay Hardikar

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांची ३ सप्टेंबर ही जयंती, तर १२ डिसेंबर ही पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांचे सहकारी आणि पत्रकार-संपादक विनय हर्डीकर यांनी त्यांच्या विचारविश्वाची करून दिलेली ही व्हिडिओ ओळख... त्यांचं हे भाषण ५४ मिनिटे आणि ११ सेकंद इतक्या कालावधीचं आहे. आवर्जून ऐकावं असं...

.................................................................................................................................................................

“नमस्कार, शेतकरी भावांनो आणि बहिणींनो…

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक वादळ बनून आलेले, प्रतिभावान शेतकरी नेते, आपल्या सगळ्यांचे आवडते, आदरणीय शरद जोशी यांना जाऊन आता सात वर्षं झाली. मी ३ सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस आणि १२ डिसेंबर हा त्यांचा निर्वाण दिवस, या दोन्ही दिवशी त्यांच्याबद्दल आपल्याशी काही ना काही बोलत असतो.  

आज मी अंगारमळा (मु. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) इथून आपल्याशी बोलतो आहे. माझ्या उजवीकडे शरद जोशींचं छायाचित्र आहे आणि पाठीमागे दोन्ही बाजूला त्यांचा ग्रंथसंग्रह आहे. आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात इतका विचार करणारा नेता आलेला नव्हता. आपण सगळ्यांनीच आपल्या वाढत्या वयात अनेक प्रकारचे नेते पाहिले. परंतु ज्या नेत्याच्या सबंध जडणघडणीमध्ये तत्त्वज्ञान आणि विचार यांना सगळ्यात जास्त महत्त्व होतं, अशी व्यक्ती बहुतेकांच्या बाबतीत शरद जोशीच होते.

आज मी तुमच्याशी बोलायला नेहमीचा विषय टाळून शरद जोशींच्या आपल्या आयुष्यामध्ये सूत्र होऊन गेलेल्या काही वाक्यांवर बोलणार आहे…”

संपूर्ण भाषणासाठी पहा - 

..................................................................................................................................................................

लेखक विनय हर्डीकर पत्रकार, लेखक आणि कार्यकर्ते आहेत. त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.

vinay.freedom@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......