‘उद्याचा मराठवाडा’ : ‘सेंद्रिय एकात्मता’ आविष्कृत करणारा ‘नवे पर्व’ या विषयावरील वाचनीय दिवाळी अंक
पडघम - साहित्यिक
शंकर विभुते
  • ‘उद्याचा मराठवाडा’ या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 18 November 2021
  • पडघम साहित्यिक उद्याचा मराठवाडा Udyacha Marathwada राम शेवडीकर Ram Shevdikar नयन बाराहाते Nayan Barahate करोना Corona शिक्षण Education

कवितेच्या अस्तित्वाचा मूलभूत घटक म्हणून सेंद्रिय एकात्मेला महत्त्व दिले जाते. कवितेत आलेले शब्द, लय, नाद, अर्थ, प्रतिमा, प्रतीके, रूपक… हे सर्व घटक कवितेत अविभाज्य पद्धतीने जोडले जातात. त्यामुळेच त्यास परिपूर्णता येते. या परिपूर्णतेला समीक्षेच्या भाषेत ‘सेंद्रिय एकात्मता’ असे म्हटले जाते. अर्थात ही संकल्पना फक्त कविता या वाङ्मयप्रकारापुरतीच मर्यादित नाही, तर ती सर्व ललितसाहित्य प्रकारालाही लागू होते. पण त्याकरता कथा, कादंबरी, नाटक, ललितलेख यांतील आशय आणि अभिव्यक्ती या सर्व घटकांनी जोडले गेले पाहिजे. अशा जोडलेल्या गद्यलेखनालाही प्राचीन काळी ‘कविता’ किंवा ‘काव्य’ या अर्थाने ओळखले जात असे. संस्कृत अभ्यासक विश्वनाथ जेव्हा ‘वाक्यं रसात्मकं काव्यं’ असे म्हणतो, तेव्हा ते कविता हा शब्द ‘साहित्य’ या व्यापक अर्थाने व्यक्त होतो. ही व्यापकता ‘उद्याचा मराठवाडा’चा दिवाळी अंक वाचताना वारंवार जाणवते.

‘उद्याचा मराठवाडा’चा प्रत्येक दिवाळी अंक हा उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. २०२१चा ‘नवे पर्व’ हा अंकही परिपूर्ण आहे. या अंकाचे अतिथी संपादक सुरेश वांदिले असून कविताविभाग नयन बाराहाते आणि कथाविभाग मधुकर धर्मापुरीकर यांनी संपादित केला आहे. दुर्दैवाने या अंकाचे काम पूर्णत्वास येत असतानाच बाराहाते यांचे दुःखद निधन झाले. परंतु त्यांनी आजाराशी झुंज देत कविता विभागाचे संपादन पूर्ण केले. त्यांच्याविषयी संपादक राम शेवडीकर यांनी ‘बहती हवा सा था वो...’ या शीर्षकांतर्गत आदरांजली वाहिली आहे. त्यांचा स्वभाव, त्यांची प्रतिभा, त्यांची माणुसकी यांचा त्यांनी घेतलेला आढावा डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. ते लेखाच्या शेवटी म्हणतात, “नयन ज्या वाटेने गेला, त्या वाटेवरच्या लोकांना शोधता येत नाही, हा कोट्यवधी वर्षांपासूनचा अनुभव असूनही वजीराबादचा रस्ता ओलांडताना मी क्षणभर आशाळभूतपणे तिकडे पाहतो आणि पुन्हा छातीत चर्र झाले की, समोर बघत वाट काढतो.”

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

करोना महामारीला आपण तब्बल दोन वर्षांपासून तोंड देत आहोत. किंबहुना संपूर्ण जगच लढा देत आहे. आजही चीन, रशिया यांसारख्या राष्ट्रात तिसरी, चौथी, पाचवी लाट येत असल्याच्या बातम्या आपण ऐकत आहोत. करोनाची भीती अजूनही गेलेली नाही. या महामारीने जगाची अर्थव्यवस्था कोलमडली, जगण्याचे गणित बिघडले, सामान्यांचे कंबरडे मोडले, त्याहीपेक्षा कधीच भरून न निघणारे नुकसान म्हणजे लहान मुलांचं शिक्षण. ज्या वयामध्ये हातात पाटी-लेखणी घेऊन अक्षर गिरवायचे, त्या वयात तोंडाला मुखपट्टी आणि हातात सॅनिटायझर घेऊन घरात स्वत:ला कोंडून घेण्याचे दिवस आले आहेत. अशा काळात मुलांच्या शिक्षणावर कोणता परिणाम झाला? याचा आढावा या अंकातील ‘करोना आणि मूल’ या पहिल्या विभागात वाचायला मिळतो. या

करोनाच्या भयंकर रूपाविषयी या अंकाचे अतिथी संपादक सुरेश वांदिले यांचे एकच वाक्य खूप बोलके आहे. ते म्हणतात, ‘झाडावरून टपटप फळे गळून पडावीत तशी माणसे मरून पडत होती. यातून अमेरिका सारखा प्रगत देश वाचला नाही की, सोमालियासारखा अप्रगत देशही सुटला नाही.’ खरंय, आपणही खूप जवळची माणसं गमावली. कुणाची आई, कुणाचे वडील, कुणाचे भाऊ, कुणाची बहीण, कुणाची पत्नी, कुणाचे जवळचे मित्र... अशा अनेकांना गमावून बसलो आहोत.

यासोबतच भविष्यात किती मोठ्या संकटांना सामोरं जावं लागेल, याची प्रचिती मुलांच्या शिक्षणावरून येते आहे. या सर्वांचा आढावा या विभागात केलेला आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, प्रदीप आवटे, शुभांगी पारकर, राजश्री हेमंत पाटील, श्रीकांत चोरघडे, संजीव लाटकर, राजीव तांबे, जयश्री देसाई, रवींद्र चिंचोलकर, डॉ. राणी खेडीकर, एकनाथ आव्हाड, चिंतन थोरात, समीक्षा गोडसे, अंजली अंबेकर, अलका गाडगीळ, आदित्य चाकूरकर, बाळ फोंडके, वैशाली चौधरी, यांच्या अभ्यासपूर्ण लेखांतून करोनामुळे मुलांच्या शिक्षणावर कोणता परिणाम झाला, याची बारकाव्यांनिशी केलेली मांडणी समजून घेता येते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

बालसाहित्यिक राजीव तांबे म्हणतात, “घरातली लहान मुले सतत मोठ्या माणसांच्या सहवासात राहिल्याने लहान मुलांचा निरागसपणा, खट्याळपणा, त्यांची फॅंटसी संपली. त्यांची म्हणून स्वतःची असणारी भाषा ते विसरून गेले.” पत्रकार संजीव लाटकर म्हणतात, “पावसामुळे झालेले नुकसान एक वेळ मोजता येतं. वादळामुळे झालेल्या हानीचा थोडाफार अंदाज येऊ शकतो, पण covid-19 नावाच्या महासाथीने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जे महावादळ आणलं, त्याने किती मोठी आणि दीर्घकालीन हानी केली आहे, याची मोजदाद करणं केवळ अशक्यच आहे.” चिंतन थोरात म्हणतात, “स्क्रीनवरील आभासी जगाचे व्यसन लागल्यामुळे मुलांना ADHDचा म्हणजेच Attention Deficit Hyper-active Dis-orderची समस्या भेडसावू लागली. याचा अर्थ मन सतत विचलित होणे, सहा सेकंदाच्या वर कुठेही लक्ष न टिकणे, एकाग्रताच घालून बसणे. एक अख्खी पिढी या आभासी व्यसनाच्या विळख्यात सापडली आहे.”

या तीन प्रातिनिधिक उदाहरणांवरून या विभागातील लेखांची कल्पना येऊ शकते. यातल्या मुलांच्या प्रतिक्रिया तर अतिशय बोलक्या आहेत. ते वाचताना संवेदनशील मनाच्या कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावीत शिकणारी शिवकन्या उमाकांत बाजगिरे म्हणते, “दिवस मावळला. सारे जण अंधारातच सडकनं निघालो होतो. थोड्या अंतरावर एक बंद डब्यांची माल घेऊन जाणारी गाडी थांबली होती. त्या गाडीच्या बंद डब्यात बाबांनी आम्हाला बसवलं. तेबी बसले. आधीच काही माणसं आतमध्ये बसली होती. दरवाजा बंद झाला. गाडी निघाली. डब्यात अंधार होता, काही, काही दिसत नव्हते. आमचा दम कोंडल्यावनी होत होता. अंग घामाने ओलेचिंब झाले होते. फोनच्या उजेडात कोणी झेंडू बाम लावून डोस्क चोळत होते. कोणी बेशुद्ध पडत होते...”

एकीकडे करोना महामारीने अशी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली असताना दुसरीकडे आजही आपण अंधश्रद्धेला घट्ट चिटकून आहोत. त्यामुळे या सर्व व्यवस्थेला जबाबदार कोण, असाच चिंतनात्मक प्रश्न आपल्या लेखातून ज्येष्ठ अभ्यासक व संपादक प्रवीण बर्दापूरकर उभे करतात. ते आपल्या लेखात म्हणतात, “कर्मकांड करणाऱ्या परंपरागत ब्राह्मण्यापासून असंख्य ब्राह्मण कधीचेच कोसो दूर गेले आहेत. हे लक्षात घेतलं न जाण्याइतकं बहुसंख्य ब्राह्मणेतरांच्या सारासार विवेकबुद्धीचं दिवाळं वाजलं आहे, असं जर त्यावर म्हटलं तर त्यात गैर काय? कुणीच कुणाची जातिधर्मावरून हेटाळणी करायला नको. धर्म-देव-जात असेपर्यंत समता प्रस्थापित होणार नाही. या देशाची घटना हाच माझा धर्म आणि तीच माझी जात, यावर जोपर्यंत आपलं एकमत होत नाही, तोपर्यंत आपला समाज जात आणि धर्माच्या तुकड्या-तुकड्यात विभागलेला राहणार.”

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

करोना महामारीसोबतच महाराष्ट्रात आणि भारतात आरक्षणाचा प्रश्न हा सर्वांच्या चर्चेचा, चिंतनाचा विषय बनलेला आहे. आरक्षणामुळे सर्वच प्रश्न सुटून जातील आणि प्रगतीचा विकासाचा अश्व चौफेर पद्धतीनं दौडू शकेल, असंच सर्वांना वाटू लागल्यानं जी परिस्थिती निर्माण झाली, तिचा समतोल आढावा तिसऱ्या विभागमध्ये घेतला आहे. ज्येष्ठ अभ्यासक प्रा. हरी नरके, पत्रकार-संपादक राही भिडे, राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आसबे यांचे लेख या विषयावर प्रकाश टाकतात.

हे वर्षे मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या तीन लेखांचाही या अंकात समावेश आहे. ‘आठवणीचा बकुळगंध’, ‘त्यांना होता चंद्र गवसला’, ‘तिची शब्दमोहिनी, चित्रमयी शैलीचा गोडवा…’ या लेखांतून विनय तरवडे, डॉ. विनिता हिंगे व साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी शांताबाईंच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  

शेवटच्या विभागात रत्नाकर मतकरी, श्रीकांत बोजेवार, गणेश मतकरी, नंदू मुलमुले, मधुकर धर्मापुरीकर यांच्या कथा, शिवाजी जवरे व प्रशांत कुलकर्णी यांची व्यंगचित्रे, तर जवळपास २६ कवींच्या कविता यांचा समावेश आहे.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

गुलजार यांच्या एका गीताचा संदर्भ देत कविता विभागाचे संपादक नयन बाराहाते म्हणतात, “ ‘नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है...’ ” ‘समकालीन कविता’ असा विषय न घेता त्यांनी कवितेतील नावीन्य ही भूमिका ठेवून या विभागाचं संपादन केलं आहे. यामुळे यातील सर्व कविता वाचकरसिकांना एक वेगळा आनंद देऊन जातात. यातील सर्व कवी, कवयित्री सुप्रसिद्ध, नामांकित नाहीत, पण त्यांच्या कविता मात्र दखल घेण्यासारख्या आहेत.

थोडक्यात, या अंकातील ‘कोरोना आणि मुलं’, ‘मराठा आरक्षण टोलवाटोलवी’, ‘शांताबाई शेळके जन्मशताब्दी’निमित्तचे लेख, कविता, कथा, व्यंगचित्रे, या सर्वांमधून ‘सेंद्रिय एकात्मता’ आविष्कृत झाली आहे.

‘उद्याचा मराठवाडा’ : संपादक राम शेवडीकर

पाने - २०४, मूल्य – २०० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते मराठीचे प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......