उतावीळ नाना पटोळे!  
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोळे
  • Sat , 17 July 2021
  • पडघम राज्यकारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस Maharashtra Pradesh Congress नाना पटोळे Nena Patole काँग्रेस Congress भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररची डॉमिनिक केफ्फर याच्या विरुद्धची लढत पाच सेटसपर्यंत आणि जवळजवळ सुमारे अडीच तासावर चालली. फेडरनं हा सामना ७-६, ६-७, ७-६, ७-५ असा जिंकला. म्हणजे दोन्ही खेडाळूंची किती दमछाक झाली असेल, हे लक्षात घ्या. पण त्यातही कौतुक  रॉजर फेडररचं; गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया झालेल्या, शिवाय वय ३९, सामन्यात तीन ट्राय ब्रेक, तरी फेडरर जिंकला. आश्चर्य-स्तंभित करणारी ही फेडररची कामगिरी आहे. म्हणून कायमच जिद्द आणि प्रेरणा यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे फेडरर आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोळे यांना फेडरर माहीत असण्याची शक्यता नाही आणि फेडररसारखा संयम तसंच जिद्दही नाना पटोळे यांच्यात आहे, असं काही दिसत नाही.

एकूणच नाना पटोळे यांची राजकीय कारकीर्द ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ अशा पद्धतीची दिसतेय. १९९० साली भंडारा जिल्हा परिषदेवर झालेली निवड ते २०२१, असा नाना पटोळे यांचा राजकीय प्रवास आहे. अपक्ष ते काँग्रेस ते भाजप ते पुन्हा काँग्रेस अशी वळणं या प्रवासात त्यांनी घेतलेली आहेत. या काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही त्यांनी जिंकलेल्या आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

२०१४ची लोकसभा निवडणूक भाजपचे उमेदवार म्हणून जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेऊन पक्ष सोडणं, हे नाना पटोळे यांच्या राजकीय कारकिर्दीतलं दुसरं शिखर होतं. २०१४ची निवडणूक जिंकताना ज्यांच्या नेतृत्वाखालील शिक्षण संस्थेत महाविद्यालयीन शिक्षण झालं, त्या प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या (महा)राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा त्यांनी केलेला पराभव हे पहिलं शिखर होतं. त्यानंतर ‘जायंट किलर’ ठरलेले नाना पटोळे एकदम प्रकाशझोतात आले आणि राष्ट्रीय पातळीवर चमकले. प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केल्याच्या मोबदल्यात जर केंद्रात मंत्रिपद मिळालं असतं, तर त्यांनी भाजपचा त्याग केला नसता, हे उघड आहे. पण, ते असो. कारण राजकारणात अनेकांच्या वाट्याला असे ‘जर-तर’ खूप येतात आणि जातात; कधी त्या येण्या-जाण्याला मोल मिळतं, तर कधी मिळत नाही.

नाना पटोळे बहुजन समाजातले आहेत आणि त्यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात स्वबळावर केलेली आहे. त्यामुळे आजवर त्यांनी जे काही मिळवलं, त्याचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे, यात कोणतीही शंका नाही. मात्र अशात त्यांनी बरेच ‘लूज बॉल’ टाकले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील स्थैर्यांबाबत चर्चांना नाहक पेव फुटलं.

राजकारणात आलेल्या प्रत्येकाला राज्यात आमदार, केंद्रात खासदार, मंत्री, मुख्यमंत्री व्हावंसं वाटण्यात काहीच गैर नाही. मनातल्या मनात असे मांडे भाजणं प्रत्येकाचाच स्वाभाविक अधिकारच आहे. एकदा तर आपण या राज्याचे सर्वांत सक्षम मुख्यमंत्री आपण कसे होऊ शकतो, याची स्वप्नं पाहत असल्याचं नगरसेवकपदी कसाबसा निवडून आलेला एक राजकारणी गप्पा रंगवत असताना बघायला मिळालेलं आहे.

नाना पटोळे यांचा दर्जा त्या नगरसेवकापेक्षा मोठा आहे हे नि:संशय, पण त्यासाठी (पक्षी : मुख्यमंत्रीपद) जरा कळ सोसणं आणि उतावीळपणा न दाखवता रॉजर फेडररसारखं जिद्दीनं काम करणं आवश्यक आहे, हे काही नाना पटोळे यांच्या लक्षात येत नाही.

स्पष्टवक्तेपणा आणि बेतालपणा, आक्रमकता आणि आतातायीपणा यातल्या सीमारेषा लक्षात घेऊन जो राजकारणात वावरतो, त्याची पावलं यशाच्या मार्गावर कायमच पडत असतात, याचा विसर नाना पटोळे यांना पडलेला दिसतो आहे. अन्यथा ‘आपल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाळत ठेवून आहेत,’ अशी बेताल बडबड त्यांनी केलीच नसती. खणिकर्म महामंडळातील एका कंत्राट प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिताना आपण आपल्याच पक्षाच्या ऊर्जामंत्र्यावर निशाणा साधतो आहोत, याचाही विसर त्यांना पडला. विधानसभेच्या सभापतीपदावर असताना राज्याच्या मुख्य सचिवाला सभागृहात हजर होण्याचा हुकूम देण्याचं (आततायी) धाडस त्यांनी दाखवलं होतं. शिवाय ते भाजप आणि शिवसेनेवरही अधूनमधून गुरगुर करत असतात.

भंडारा जिल्ह्यासारख्या अरण्य प्रदेशातून नाना पटोळे आले आहेत. त्या अरण्यात अनेक वाघ आणि बिबटे आहेत. त्या वाघांपासूनच ही गुरगुर करण्याची सवय त्यांना लागली, असं कुणी म्हणेलही, पण राजकारण करताना एकाच वेळेस स्व आणि विरोधी पक्षालाही एकाच वेळी अंगावर ओढावून घेण्यात कोणताही शहाणपणा नसतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

त्यात पुढे जाऊन देशातले एक ज्येष्ठतम नेते शरद पवार यांच्यावरही एक उसळता चेंडू भिरकावण्याचा उतावीळपणा नाना पटोळे यांनी केला. पवार यांचं वय, अनुभव आणि त्यांच्या राजकारण करण्याची शैली याची कोणतीही पोच न ठेवता, केलेला हा स्वैर मारा येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला महाग पडू शकतो, याची जाणीव नाना पटोळे यांना नसावी, हे केवळ त्यांचंच नाही तर काँग्रेस पक्षाचं दुर्दैव म्हणायला हवं. योग्य वेळी ‘धडा’ शिकवणं ही शरद पवार यांची शैली आहे आणि ती योग्य वेळ निवडणूक असते, ही काही नाना पटोळे यांच्या लक्षात आलेलं नाही.

विधानसभेचं अध्यक्षपद सोडून नाना पटोळे यांनी प्रदेश काँगेसचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे (किंवा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना ते स्वीकारायला लावलं आहे). काँगेस पक्षाचा गाडा देश आणि राज्यातही  सध्या सर्व बाजूने चिखलात रुतलेला आणि मोडकळीसही आलेला आहे. एकेकाळी स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणाऱ्या काँग्रेसला १९९९पासून म्हणजे ‘महा’राष्ट्रवादी काँग्रेसचा सहारा घ्यावा लागत आहे.

आता तर (महा)राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेलाही सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी तिघांची आघाडी काँग्रेसला करावी लागली आहे. राज्यात विधानसभेतलं संख्याबळ पन्नासच्या खाली उतरलं आहे. अनेक जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर पंचायती, नगर परिषदा, महापालिका आणि ग्रामपंचायतीही काँग्रेसच्या हातून अन्य पक्षांनी खेचून घेतल्या आहेत. महाराष्ट्राच्या काही लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची वाणवा पडावी, इतक्या केविलवाण्या परिस्थितीत काँग्रेस पक्ष सापडलेला आहे.

तरीही काँग्रेस पक्षाची पाळंमुळं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजूनही रुजलेली आहेत, काँग्रेसचे सहानुभूतीदार शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात आहेत, हे न विसरता हा मोडून पडलेला गाडा आधी चिखलातून काढून आणि मग दुरुस्त करून चालवावा, याचं भान नाना पटोळे यांना राहिलेलं नाही, असंच त्यांच्या या आततायी विधानावरून स्पष्ट होतं.

मोडून पडलेल्या या गाड्याला नव्या दमाचे घोडे किंवा बैल जोडून कुशलपणे सारथ्य नाना पटोळे करतील अशी अपेक्षा होती. थेट राहुल गांधी यांचा वरदहस्त लाभल्यामुळे संकटनात्मक पातळीवर डागडुजी करून नाना पटोळे काँग्रेस पक्षात चैतन्य निर्माण करतील असं वाटत होतं, पण तसं काही घडताना दिसत नाहीये. गावोगाव मेळावे घेणं आणि सर्वांना एकाच वेळी अंगावर ओढवून घेणं, हेच पक्षकार्य असतं, असा बहुधा त्यांचा समज झालेला असावा. त्यात त्यांच्या अशा भडकावू वक्तव्यांना मोठी प्रसिद्धी मिळते. ती पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आणि काडीमात्र उपयोगाचीही नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. अशी प्रसिद्धी  देणं ही माध्यमांची गरज आहे, हेही त्यांनी विसरता कामा नये.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

माझी एक आवडती मांडणी आहे- माध्यमं ही ‘नाच्या’ असतात. त्यांना बॅंड कोण वाजवतंय आहे, याच्याशी काही घेणं-देणं नसतं; वाजवण्याचे आवाज आले की, नाच्या जसा नाचायला सुरुवात करतो, तसं चटपटीत किंवा भडकावू वक्तव्य हाती आलं की, ते करणाऱ्या व्यक्तीला प्रसिद्धी देण्यात माध्यमांना रस असतो. कारण ती व्यक्ती नव्हे तर पद माध्यमांसाठी महत्त्वाचं असतं. पक्षाचं संघटन मजबूत होतं किंवा नाही, कोणाचं कुठे तरी स्थान मजबूत होतं की नाही, याच्याशी माध्यमांना काही सोयरसूतक नसतं, तर ती माध्यमांची मजबूरी असते.

नाना पटोळे यांनी हे कायम लक्षात ठेवावं की, ते सांगडी मतदारसंघातून भंडारा जिल्हा परिषदेवर निवडून आलेले सदस्य आजही असते, तर त्यांना आज मिळते तेवढी प्रसिद्धी कधीही मिळाली नसती. ते प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून माध्यमांचे कथित लाडके आहेत. आणि माध्यमांचं लाडकं असण्यापेक्षा नाना पटोळे पक्ष संघटन कसं मजबूत करतात. यात काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी, तसंच समर्थक आणि हितचिंतकाना रस आहे. उतावीळपणे वागून आणि बोलून भलेही मोठी प्रसिद्धी मिळत असेल, पण त्याचा पक्षवाढीसाठी काडीमात्र उपयोग नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......