‘पहलगाम’पासून ‘ऑपरेशन सिंदूर’पर्यंत... ‘एकते’च्या परीक्षेवर भारत कुठे उभा आहे?
पडघम - देशकारण
मिथिला राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sun , 29 June 2025
  • पडघम देशकारण पहलगाम Pahalgam काश्मीर Kashmir ऑपरेशन सिंदूर Operation Sindoor

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. सुमारे वीस मिनिटे चाललेल्या या भयानक हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून २६ पुरुषांची निर्दयपणे हत्या केली. त्यापैकी एक स्थानिक काश्मिरी मुसलमान होता. या अमानवी घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली. सर्व धर्माचे नागरिक, धार्मिक नेते, सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

तथापि, भारतातील काही भागांमध्ये काही स्वयंघोषित हिंदुत्व समर्थकांनी निर्दोष भारतीय मुस्लिमांवर प्रतिहल्ले केले, जे त्या दहशतवाद्यांशी किंवा घटनेशी कुठलाही संबंध ठेवत नव्हते आणि अशा हिंसाचारावर त्यांचे कोणतेही नियंत्रण नव्हते. अशा काही घटना पुढीलप्रमाणे-

१) अलिगढ, उत्तर प्रदेश (२८ एप्रिल २०२५) : तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल झाली, ज्यांनी एका मुस्लीम विद्यार्थ्याला जबरदस्तीने पाकिस्तानी झेंड्यावर लघवी करण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. (कुमार, २०२५)

२) उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील तोडा गाव (२६ एप्रिल) : सरफराज नावाच्या २५ वर्षीय तरुणाने आपल्या शेजाऱ्याने (गोविंद) त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला. “तुम्ही २६ मारले, आम्ही तुमचे २६ मारू,” असे त्याने मारहाणी दरम्यान म्हटले, असे सरफराजचे म्हणणे आहे. (कुमार, २०२५)

३) मसूरी, उत्तराखंड : शब्बीर अहमद दर हा २० वर्षांपासून पश्मिना शाल विकणारा काश्मिरी व्यापारी आणि त्याचा सहकारी, एका हिंदू उजव्या गटाकडून मारहाणीत सापडले. त्यांच्या दुकानांचीही तोडफोड झाली. (मतीन व जावेद, २०२५)

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

४) डेराबस्सी, पंजाब (२३ एप्रिल) : ‘युनिव्हर्सल ग्रुप ऑफ हन्स्टिट्यूट्स’च्या होस्टेलमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यावर हल्ला झाला. (इंडिपेंडंट, २०२५)

५) खरावर गाव, रोहतक, हरियाणा : मुस्लीम कुटुंबांना २ मे पर्यंत गाव सोडण्याचा आदेश देण्यात आला. व्हॉट्सअॅप ग्रुपवर दीपक मलिकसह काहींनी पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देऊन त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. १५ मुस्लीम कुटुंबे गेली १०-१२ वर्षे तिथे राहत आहेत. त्यांपैकी बहुतेक लोक जवळच्या फॅक्टरीमध्ये मजूर, मेकॅनिक अशी कामे करत आहेत किंवा छोटे भंगार विक्री करणारे आहेत. (सुरा, २०२५)

६) दादर, मुंबई (२४ एप्रिल) : सोफियान शाहिद अली या २१ वर्षीय युवकावर रोहिंग्या मुस्लीम समजून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी भाजप माहीम युनिट अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांच्यासह ९ जणांविरुद्ध शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. अक्षताने नंतर फेसबुकवर आपल्यावरचे आरोप नाकारले. तक्रार करणारा सौरभ मिश्र दादर मार्किटमध्ये टॉवेल विकण्याचा स्टॉल चालवतो आणि त्याच्याकडे उत्तर प्रदेशच्या सोफियानसह ६ लोक काम करतात. (चिटणीस. २०२५)

७) वाकोला, सांताक्रूझ, मुंबई (२६ एप्रिल) : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि पॅलेस्टाईनचे झेंडे रस्त्यावर लावून निषेध केला. पॅलेस्टाईनच्या झेंड्याचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ मुस्लीम युवकांनी आक्षेप घेतल्याने संघर्ष झाला. काही लोक जखमी झाले. जेव्हा ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सेक्युलरिझम’ची टीम या घटनेची सत्यता तपासण्यासाठी गेली, तेव्हा त्यांना कळले की, या वाकोलाच्या गोळीबार वस्तीत गेली कित्येक वर्षे हिंदू-मुस्लीम एकोप्याने राहत होते, एक दुसऱ्यांच्या सणसमारंभात सहभागी होत होते, पण गेल्या दोन वर्षांपासून हथे धार्मिक भेदभाव पसरवायला सुरुवात झाली. या संघर्षात एक तरुण अबरार शेख फक्त असीम त्याच्या भावाचे नाव, या नावाचा टी-शर्ट घालून असल्याने मारहाणीला सामोरे गेला.

या बहुसंख्याकवादी राजकीय गटांची ही कृत्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना न्याय मिळवून देण्यासाठी नसून मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवण्याचे साधन ठरत आहेत. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केलेल्या अमानवी कृतींसाठी भारतीय मुस्लिमांवर, जे त्यांचे प्रतिनिधीही नाहीत आणि त्यांच्या प्रभावाखालीही नाहीत, त्यांच्यावर सूड उगवणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आणि कायदेशीरदृष्ट्याही अन्यायकारक आहे.

भारत सरकारच्या मते, २२ एप्रिलचा पहलगाम हल्ला हा सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा कट होता. ७ मे रोजी रात्री १:४४ वाजता भारताने या हल्ल्याला उत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. ८ मे रोजी परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “या हल्ल्याचे उद्दिष्ट जम्मू-कश्मीर आणि देशात साम्प्रदायिक तणाव निर्माण करणे होते. सरकार व जनतेच्या दक्षतेमुळे हा कट उधळून लावण्यात आला.” (हाय कमिशन ऑफ इंडिया, २०२५) या कटाविरोधात भारतीय मुस्लिमांसह प्रत्येक भारतीयाने एकतेने उभे राहत भूमिका बजावली.

जर अशा घटना घडल्यावर प्रत्येक वेळी भारतीय मुस्लिमांना हिंसा व धमक्यांचा सामना करावा लागला, तर पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रांचे भारतात सांप्रदायिकतेचे विष पसरवण्याचे उद्दिष्टच पूर्ण होते. इतिहास सांगतो की, सामाजिक स्थैर्य डळमळल्यावर आर्थिक स्थैर्यही संकटात येते, आणि त्यात सर्वाधिक नुकसान सामान्य व गरीब लोकांचेच होते. निर्दोष भारतीय मुस्लिमांवर राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली हल्ले करणे हे देशभक्ती नसून राष्ट्रीय एकतेवर घाव आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

पण या सगळ्यात एक आशेचा किरण आहे.

अनेक इस्लामी विद्वानांनी इस्लामच्या नावावर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर निषेध केला आहे. त्यांनी कुराणाच्या पाचव्या अध्यायातील ३२व्या चरणाचा दाखला दिला आहे : “जो कोणी एका निरपराध व्यक्तीचा जीव घेतो, तो जणू संपूर्ण मानवतेचा जीव घेतो; आणि जो कोणी एखाद्याचे प्राण वाचवतो, तो जणू संपूर्ण मानवतेचे प्राण वाचवतो.”

भारताची खरी ओळख म्हणजे ‘विविधतेत एकता’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ३० मार्च २०२५ रोजी ‘मन की बात’मध्ये देशातील विविध सण व नववर्ष साजरे केल्याने एकतेची भावना दृढ होते, असे सांगितले. त्यांनी ईदसह इतर सणांच्या शुभेच्छा दिल्या आणि एकतेस बळकटी देण्याचे आवाहन केले. (द हिंदू, २०२५)

भारतीयांनी वारंवार दाखवून दिले आहे की ते दहशतवादाविरोधात एकदिलाने उभे आहेत. मुस्लीम समुदायानेही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जोरदार निषेध केला आहे. जम्मू-कश्मीर, दिल्ली, महाराष्ट्र. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, आसाम आणि कर्नाटकमध्ये मुस्लिमांनी शांततामय निषेध केला. जमीयत उलेमा- ए-हिंद, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमात-ए-इस्लामी हिंद यांसारख्या प्रमुख मुस्लीम संघटनांनी दहशतीचा निषेध केला व कडक कारवाईची मागणी केली. ‘जमीयत उलेमा-ए-हिंद’ या मुस्लीम प्रमुख धार्मिक संस्थेने दहशतवादाला ‘कॅन्सर’ असे संबोधले व हस्लामच्या शांततेच्या तत्वांविरुद्ध असल्याचे सांगितले.

.................................................................................................................................................................

‘आंदोलन शाश्वत विकासासाठी’ मासिकाच्या जून २०२५च्या अंकातून साभार

‘Secular Perspective ग्रुप’च्या फेसबुक पेजवरील लेखाचा अनुवाद - मीनल उत्तुरकर

meenalutturkar16@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......