भाजपच्या कोंडीचं गुऱ्हाळ!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, Eknath Shinde
  • Sat , 30 November 2024
  • पडघम राज्यकारण महायुती Maha Yuti देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis एकनाथ शिंदे Eknath Shinde अजित पवार Ajit Pawar

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. राज्यात भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, यांच्या ‘महायुती’ला मिळून सव्वादोनशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या... म्हणजे अतिशय स्पष्ट बहुमत मिळालं आहे. निकाल लागून नऊ दिवस होत आहेत, तरी अजून मुख्यमंत्री ठरतच नाहीये. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार, हे कळत नाहीये.

‘महायुती’त सर्वांत मोठा पक्ष भाजप आहे आणि भाजपमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात सर्व काही आलबेल नाही, असा याचा अर्थ आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर असलं, तरी अजून त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही, असा याचा अर्थ आहे. माध्यमांच्या आणि त्यातही प्रकाश वृत्तवाहिन्यांच्या बातम्यावर जाऊ नका. त्यांची घाई सर्वश्रुत आहे. राज्याचे सर्व निकाल हाती येण्याच्या आधीच वाहिन्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारच्या शपथविधीची तारीख व स्थळ जाहीर करून टाकलं, आणि आतापर्यंत ते तीन वेळा बदललं.

मतदार कधीही मुख्यमंत्री, मंत्री किंवा विरोधी पक्षनेता निवडून देत नाहीत, तर ते विधानसभेचा सदस्य निवडून देतात. विजयी उमेदवारानं सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर तो अधिकृत आमदार होतो. त्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवडणूक होते आणि तो (पक्षश्रेष्ठींनी ठरवलेला!) नेता मग मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो, अशी ती प्रक्रिया असते.

इथे तर तीन पक्ष (महा)युतीत आहेत आणि त्यापैकी केवळ राष्ट्रवादीच्याच विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन अजित पवार यांचं नाव नेता म्हणून निश्चित झालेलं आहे. भाजप आणि शिवसेनेची विधिमंडळ बैठक अजून बाकी आहे; (अद्याप निवड न झालेल्या) विधानसभा अध्यक्षाचा विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार स्वत:च्या हाती घेत सरकार स्थापनेच्या एकापाठोपाठ बातम्या देण्याची नुसती घाई आणि स्पर्धा वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार नक्कीच आहेत, पण त्यांची निवड त्या पदावर अजूनही झालेली नसताना त्यांचा जणू काही ‘भोंगा’ असल्याची वाहिन्यांची घाई अनेक संशय निर्माण करण्यास वाव देणारी आहे, हे निश्चित. 

निकालानंतरच्या गेल्या नऊ दिवसांतील राजकीय घटनांचं सखोल विश्लेषण (swot analysis) केलं, तर लक्षात येतं की, एवढ्या मोठ्या आणि अनपेक्षित विजयानं भाजपच कोंडीत सापडला आहे-

१) देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे सर्वांत प्रबळ दावेदार आहेत.

२) देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे.

३) देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचाही पाठिंबा आहे. ही बातमी क्षणभर खरी मानूयात, पण भाजपच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत संघ सतत हस्तक्षेप करत नाही, हे लक्षात घ्यायला हवं.

४) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला विरोध नाही, तर सशर्त पाठिंबा आहे (त्या अटी अजून अटकळबाजीच आहेत) तरी महाराष्ट्रात अजून सरकार का स्थापन होऊ शकलेलं नाही!

...........................................................................................................................................

देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा विनाअट आहे आणि अगदी टोकाची शक्यता म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेनं साथ सोडली, तरी भाजप-राष्ट्रवादी ही युती सत्ताप्राप्तीसाठी पुरेशी बहुमतात आहे. तरी भाजप मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडून देतो, या म्हणण्याला पुष्टी नको, असा मतप्रवाह प्रभावी आहे... म्हणून शिंदे गट दुरावेल याचे संकेत अजून मिळालेले नाहीत. या सर्व चर्चा आहेत, हे खरं असलं तरी, याचा एक अर्थ भाजपश्रेष्ठींत अजून महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत एकमत झालेलं नाही.

...........................................................................................................................................

दिल्लीतून मिळालेली आणि संघाशी संबंधित काहींशी बोलल्यावर हाती आलेली माहिती अशी-

१) देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबत भाजप श्रेष्ठी अजून एकमतावर आलेले नाहीत. मराठा आणि बहुजन समाजाच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एखादा नवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून द्यावा आणि फडणवीस यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जागी घ्यावं, असा  एक मतप्रवाह दिल्लीत आहे, पण यातील एक अडथळा असा की, नवा चेहरा राष्ट्रवादी तसंच शिवसेनेला मान्य व्हावा लागेल आणि तसा चेहरा (यातील काही नावंही समजली आहेत.) अजून तरी भाजपला सापडलेला नाही. म्हणूनच महायुतीची बैठक दोन दिवस पुढे ढकलण्यात आलेली असू शकते.

२) भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी जे सात-आठ संख्याबळ कमी पडते, त्याची चाचपणी या दोन/तीन दिवसांत होऊ शकते, पण ही स्वबळाची शक्यता कमी आहे.

३) अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा विनाअट आहे आणि अगदी टोकाची शक्यता म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेनं साथ सोडली, तरी भाजप-राष्ट्रवादी ही युती सत्ताप्राप्तीसाठी पुरेशी बहुमतात आहे. तरी भाजप मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडून देतो, या म्हणण्याला पुष्टी नको, असा मतप्रवाह प्रभावी आहे... म्हणून शिंदे गट दुरावेल याचे संकेत अजून मिळालेले नाहीत.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

या सर्व चर्चा आहेत, हे खरं असलं तरी, याचा एक अर्थ भाजपश्रेष्ठींत अजून महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत एकमत झालेलं नाही. याआधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणं राजकारण हा अनेक शक्यतांचा खेळ असतो (politics is game of possibilities) म्हणूनच सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी, भाजपश्रेष्ठींकडून सरकार स्थापनेला विलंब होत असावा, असं म्हणण्यास जागा आहे.

अर्थात एक निर्विवाद आहे, आणि ते म्हणजे महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच असेल आणि अर्थात त्यात आघाडीवर नाव नि:संशय देवेंद्र फडणवीस यांचंच आहे, कारण भाजपच्या विजयात त्यांचाही मोठा वाटा आहे. मात्र ते मुख्यमंत्रीपदावर फार फार तर अडीच-तीन वर्षंच असतील. पुढच्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांना केंद्रात एखादं बडं पद दिलं जाईल आणि मुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे सोपवलं जाईल, अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.

अर्थात नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अशी गुऱ्हाळं अहोरात्र पेटलेलीच असतात. या चर्चा खोट्या, एकतर्फी नसतात आणि त्या लगेच खऱ्या ठरतात असंही नसतं. कारण ठिणगी पडल्याशिवाय धूर निघत नसतो. काही चर्चा खऱ्या ठरण्यासाठी तीन-चार वर्षांचा अवधी लागतो असा अनुभव आहे.

थोडक्यात, सध्या महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेचं निर्णय केंद्र नवी दिल्ली झालेलं आहे. आणि तिथं चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. गुऱ्हाळात गूळ पूर्ण तयार होईपर्यंत शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......