ही मराठी वृत्तवाहिन्यांची आत्ताची ‘ब्रेकिंग न्यूज’ आणि वर्तमानपत्रांची उद्याची ‘हेडलाईन’ असायला हवी!
पडघम - साहित्यिक
टीम अक्षरनामा
  • ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि १७व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह
  • Sat , 04 February 2023
  • पडघम साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan विद्रोही मराठी साहित्य संमेलन Vidrohi Marathi Sahitya Sammelan

३ फेब्रुवारीपासून वर्ध्यात ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झाले, तर आज, ४ फेब्रुवारीपासून वर्ध्यातच १७वे विद्रोही साहित्य संमेलन सुरू झाले. आणि आज वर्ध्यात एक ‘ऐतिहासिक’, रोमहर्षक आणि अदभुत गोष्ट घडली. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेन्द्र चपळगावकर यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्यासह १७व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावून संमेलनाध्यक्ष प्रख्यात लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांची भेट घेतली. (छायाचित्र सौजन्य - भक्ती चपळगावकर)

चपळगावकरांनी एक नवीन पायंडा पाडला. तो अतिशय स्तुत्य, स्वागतशील आणि स्पृहणीय आहे. ही घडामोड अशाच प्रकारे दरवर्षी घडो. किंबहुना दोन्ही संमेलनाध्यक्षांनी दोन्ही संमेलनामध्ये आदान-प्रदान वाढेल, यासाठी प्रयत्न करावेत. (छायाचित्र सौजन्य - भक्ती चपळगावकर)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......