‘नमस्कार, मैं रवीश कुमार’, एव्हाना तुम्हाला अंदाज आलाच असेल की, मी काय सांगणार आहे…
पडघम - माध्यमनामा
रवीश कुमार
  • छायाचित्रं रवीश कुमार यांच्या आजच्या व्हिडिओ-मनोगतातून...
  • Thu , 01 December 2022
  • पडघम माध्यमनामा रवीश कुमार Ravish Kumar एनडीटीव्ही NDTV गोदी मीडिया Godi media

२९ नोव्हेंबर रोजी एनडीटीव्हीचे संस्थापक दाम्पत्य प्रणव व राधिका रॉय यांनी राजीनामा दिला आणि तो देशभर (आणि देशाबाहेरही) बातमीचा आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला. त्या धक्क्यातून एनडीटीव्हीचे आणि सच्च्या पत्रकारितेचे चाहते, पाठीराखे बाहेर येतात न येतात, तोच काल ३० नोव्हेंबर रोजी एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनीही राजीनामा दिला. काल दिवसभर त्याविषयी सोशल मीडियावर आणि हजारो पोर्टल्सवर लिहिलं, बोललं गेलं.

रवीश कुमार यांनी काल कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र आज सकाळी सकाळी त्यांनी ‘Ravish Kumar Official’ या त्यांच्या यु-ट्युब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. २४ मिनिटे आणि १२ सेकंदांच्या या त्यांच्या मनोगतात त्यांनी एनडीटीव्हीमध्ये सलग २७ वर्षं केलेल्या कामाचा, तिथं शिकलेल्या पत्रकारितेच्या नीतीमूल्यांचा आणि मिळालेल्या स्वातंत्र्ययुक्त जबाबदारीचा जसा उल्लेख केला आहे, तसाच आपल्या सहकाऱ्यांचा, विशेषत: महिला सहकाऱ्यांचा, त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या देशभर (आणि जगभरच्याही)च्या पत्रकारांचा आणि इतरांचाही उल्लेख केला आहे. त्यात मराठीचाही समावेश आहे.

रवीश कुमार अस्वस्थ जरूर आहेत, पण आक्रस्ताळे झालेले नाहीत. त्यांच्या बोलण्यात खंत, नाराजी आहे, पण द्वेष, तिरस्कार नाही. अतिशय संयत स्वरात, काहीशा भावूक अवस्थेत ते नेहमीच्या आपल्या हटके व काव्यमय शैलीत, अतिशय सहजसुंदर, ओघवत्या हिंदीत बोलले आहेत. राष्ट्रीय पत्रकारितेत अशी काव्यमय शैली असलेले ते बहुधा एकमेव टीव्ही पत्रकार आहेत. आता खरं तर, ‘होते’ असं म्हणावं लागेल.

रवीश कुमार यांचं हे जवळपास अर्ध्या तासाचं मनोगत आहे. त्याचा सर्वाधिक भाग त्यांनी खर्च केलाय तो त्यांच्या प्रेक्षक-चाहत्यांसाठी... त्यांचे आभार मानण्यासाठी, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. त्यांनी म्हटलंय – “मैंने इस्तीफ़ा दे दिया हैं। यह इस्तीफ़ा आपके सम्मान में हैं। आप दर्शकों का इक़बाल हमेशा बुलंद रहे। आपने मुझे बनाया। आप ने मुझे सहारा दिया। करोड़ों दर्शकों का स्वाभिमान किसी की नौकरी और मजबूरी से काफ़ी बड़ा होता है। मैं आप के प्यार के आगे नतमस्तक हूँ।”

आपल्या वाट्याला आलेली खेळी\सामना समरसून खेळलेल्या एका साहसी पत्रकाराचं हे मनोगत, एका श्रेष्ठ पत्रकाराचं ‘निरोपाचं स्वगत’ कसं असावं, याचा नमुना म्हणूनही आदर्श ठरावं.

ऐका, तर… रवीश कुमार ‘रवीश कुमार’च्याच आवाजात…

.................................................................................................................................................................

रवीश कुमार यांचे यु-ट्युब चॅनेल - ‘Ravish Kumar Official’

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......