‘अ‍ॅनिमल फार्म’ : ही कादंबरी उपहास, उपरोध शैलीत राजकीय विडंबन मांडते. लोककथेचं मिथक वापरून एकाधिकारशाही व हुकूमशाही नेतृत्वाचं पितळ उघडं पाडते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘अ‍ॅनिमल फार्म’चे मुखपृष्ठ
  • Sat , 25 June 2022
  • ग्रंथनामा शिफारस अ‍ॅनिमल फार्म Animal Farm जॉर्ज ऑर्वेल George Orwell

साहित्याची भाषा ही लक्षार्थ किंवा व्यंजनार्थ स्वरूपात असते. ती संदेशवहनाचं काम करत असली तरी त्याचं स्वरूप बदलतं असतं. याविषयी वेलेक आणि वॉरेन यांचं मत बोलकं आहे. ते म्हणतात, “शास्त्रीय साहित्याची भाषा ही शुद्ध अभिधात्मक (denotative) असते. त्यातील एका (शब्द)चिन्हाची जागा समतुल्य असे दुसरे (शब्द)चिन्ह घेऊ शकते. निर्दिष्ट वस्तू आणि तद्दर्शक चिन्ह यांत एकास एक संबंध राखला जावा, हा तिचा हेतू असतो. या भाषेचा कल गणिती किंवा प्रतीकात्मक तर्कशास्त्राच्या चिन्हपद्धतीकडे झुकलेला असतो.”

साहित्यिक मात्र या भाषेचा वापर फक्त भाव व्यक्त करण्यासाठी करत नाही, तर तो भावानुभव साक्षात करतो. प्रतिमा, प्रतीक, रूपक, प्राक्कथा या माध्यमांतून तो जे भावविश्व वाचकांसमोर उभा करतो, ते स्थळ, काळ, व्यक्ती पलीकडे जाऊन समकालावरील भाष्य वाटायला लागतं. जॉर्ज ऑर्वेल यांच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कादंबरीत आजच्या सत्तासंघर्षाचीही रूपकं जाणवतात, ती त्यामुळेच. जॉर्ज ऑर्वेल यांनी या कादंबरीतून साम्राज्यशाही व एकाधिकारशाहीवर कोरडे ओढले. प्रस्तुत कादंबरीत रूपकात्मक माध्यमातून जे सत्तासंघर्ष नाट्य रंगते, ते कोणत्याही काळात समकालीनच वाटायला लागते.

‘टाइम’ या जगविख्यात साप्ताहिकाने निवडलेल्या इंग्रजीतील १०० सर्वोत्तम कादंबऱ्यांपैकी एक असलेली आणि विसाव्या शतकातील सर्वाधिक प्रसिद्ध राजकीय उपहासात्मक कादंबरी म्हणून ‘अ‍ॅनिमल फार्म’कडे पाहिलं जातं. भारती पांडे यांनी मराठीत अनुवाद केलेली ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. जॉय बॅचलर आणि जॉन हलास यांच्या रेखाचित्रांमुळे हा अनुवाद देखणा झाला आहे.

‘ॲनिमल फार्म’ची सुरुवात मनॉर फार्मच्या मि.जोन्सनं यांच्या फार्म हाऊसवर पाळलेल्या प्राण्यांच्या बंडापासून होते. मेजर अनेक उदाहरणं देऊन बंड करणं किती महत्त्वाचं आहे, हे समजावतो. अनेक प्रलोभनं व भविष्यातल्या भव्यदिव्य जगण्याची स्वप्नं दाखवून मि.जोन्स यांच्या विरोधात बंड केलं जातं. मात्र सत्ता संपादन करताच सुरुवातीच्या आश्वासनांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं, इतकंच नव्हे तर हेच आपले नियम होते, असं सांगितलं जातं.

या बंडाचं नेतृत्व मेजर करतो. या बंडात मि.जोन्स फार्म हाऊसवरील कुत्री, कोंबडी, कबुतर, गायी, घोडा, शेळी, गाढव, बदक, मांजर हे सर्व प्राणी सामील होतात. मेजर म्हणतो, “आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा कॉम्रेडस, तुमचा निश्चय कधीही डळमळू देऊ नका. कोणत्याही युक्तिवादानं तुमचा रस्ता सोडू नका. माणूस आणि प्राणी यांचं  ध्येय एकच आहे- एकाची भरभराट म्हणजे दुसऱ्यांची भरभराट, असं तुम्हाला कोणी सांगितलं, तर त्यावर कधीही विश्वास ठेवू नका. ते साफ खोटं आहे. माणूस स्वतःखेरीज दुसऱ्या कुणाचेही हित बघत नाही. आणि या लढ्यांमध्ये आपणा सर्व प्राण्यांमध्ये संपूर्ण एकजूट असू द्या. संपूर्ण कॉम्रेडशिप असू द्या. सर्व माणसं शत्रू आहेत, सर्व प्राणी कॉम्रेडस आहेत.” (पृ.३१)

भाषणाच्या शेवटी संघटनेचे काही नियम बनवले जातात. एक गीत, ध्वज व उदघोषणा तयार केली जाते. जोन्स या मालकाच्या मृत्यूनंतर स्नोबॉल व नेपोलियन हे दोन बुद्धिमान तरुण (असा समज अन्य प्राण्यांमध्ये करून दिलेला असतो.) डुक्कर मेजरकडे येतात. नेपोलियन थोरला, काहीसा उग्र दिसणारा, आपल्या मनासारखं करून घेणारा हुशार, तर स्नोबॉल बोलका अधिक कल्पक, परंतु पुरेसा सखोल विचार नसलेला. त्यांचा प्रवक्ता स्क्वीलर चपळ, कर्कश आवाजाचा, बोलून प्रभावीत करणारा आणि काळ्याला पांढरा ठरवण्यात तरबेज असतो.

यांचे सर्वांत निष्ठावान शिष्य (?) बॉक्सर आणि क्लोव्हर दोन घोडे असतात. शिष्यत्व पत्करल्यानंतर ते डोक्याचा वापर करणं सोडून देतात. ‘नेपोलियन नेहमीच बरोबर असतो व आपण नेहमी काम करत राहायचं’ एवढंच त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. अन्य प्राणी व पक्ष्यांना अस्तित्वाची भीती दाखवून आपलं नेतृत्व ताकदवान करण्यात नेपोलियन पटाईत असतो. विशेष म्हणजे अन्य प्राणी व पक्ष्यांना आपणच पूर्वीचे नियम विसरलो आहोत, सध्या आहे हेच बरोबर असेल, हे पटवण्यात नेपोलियन यशस्वी होतो.

दर रविवारी तो सर्वांना मार्गदर्शन करतो. पूर्वीच सगळं कसं चुकीचं होतं, हे सांगून ते सर्व नव्या रूपात बदलून टाकतो. कोबंड्यांसाठी अंडी निर्मिती समिती, गायींसाठी स्वच्छ शेपट्या समिती, उंदीर व सशांसाठी आदिवासी पुनर्शिक्षण समिती, अशा अनेक समित्या स्थापन करून त्यांवर आपली हुकूमत गाजवतो. स्वत: कुठलंही काम न करता इतरांना कामं करायला लावतो आणि त्या बदल्यात त्यांची तुटपुंज्या अन्नावर बोळवण करतो. उलट ‘तुमच्या कल्याणासाठी व सुरक्षिततेसाठी आमची अजिबात इच्छा नसताना व आवडत नसताना पौष्टिक आहार (दूध, सफरचंद इ.) आम्हाला घ्यावा लागतो,’ हे तत्त्वज्ञान इतरांच्या मनात बिंबवलं जातं.

स्नोबॉल वरचढ होतो आहे, हे लक्षात येताच नेपोलियन गुप्तपणे पाळून ठेवलेल्या अतिशय हिंस्र नऊ कुत्र्याच्या मदतीनं त्याला हाकलून देतो. मग ‘तो किती वाईट होता आणि शत्रूपक्षाला जाऊन मिळालेला होता’ हे अन्य प्राणी-पक्ष्यांच्या गळी उतरवलं जातं. सर्वांत ज्येष्ठ असलेलं बेंजामिन गाढव मात्र आपलं कोणतंच मत व्यक्त करत नाही. ते फक्त एवढंच म्हणतं, ‘गाढवं खूप जगतात, तुम्ही कोणीही कधी मेलेलं गाढव पाहिलेलं नसेल’. यावरून ‘कातडी बचाव’ धोरण बाळगऱ्यांची मानसिकता अधोरेखित केली जाते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

नेपोलियन म्हणतो, “शौर्यापेक्षा एकनिष्ठा, शिस्त आणि आज्ञाधारकपणा जास्त महत्त्वाचा असतो. खरा आनंद हा काटकसरीनं राहण्यात आणि खूप काम करण्यात आहे”. शेवटी शेवटी तर ज्या व्यवस्थेला दोष देऊन, टीका करून, चुका दाखवून सत्ता संपादन केली जाते, त्याच व्यवस्थेशी हातमिळवणी केली जाते. माणूस हा आपल्या सगळ्यांचा शत्रू आहे, हे सांगणारा नेपोलियन (डुक्कर) माणसांसोबतच व्यवहार करतो. त्यांच्या गुप्तपणे होणाऱ्या बैठका पाहून “बाहेरचे प्राणी डुकराकडून माणसाकडे बघत होते -माणसाकडून डुकराकडे बघत होते; पण आत्ता त्यांच्यामध्ये वेगळेपण दिसणं- कोण माणूस आणि कोण डुक्कर हे सांगणं अशक्य झालं होतं.” (पृ.१४८) या भयग्रस्त अवस्थेत ही कादंबरी संपते.

१५२ पानांची ही कादंबरी तिच्या रूपकात्मक विडंबन शैलीनं जगप्रसिद्ध झाली. तीत आलेल्या संवादातून मानवी वृत्ती-प्रवृत्तीचे विविध रंग उलगडतात. एकाधिकारशाही व हुकूमशाही या प्रवृत्ती लोकशाही व्यवस्थेत अवतरल्याचा संकेत ही कादंबरी देते. कडवट विनोद व उपहासगर्भ भाषा, ही या कादंबरीची ताकद आहे. ही कादंबरी प्रत्येक राष्ट्रात व राज्यात आपल्या अवतीभवती असलेल्या नेतृत्वाकडे संशयानं पाहायला लावते.

थोडक्यात ही कादंबरी प्रतिमा, प्रतीकं, रूपकं या माध्यमांतून उपहास, उपरोध शैलीत राजकीय विडंबन मांडते. लोककथेचं मिथक वापरून एकाधिकारशाही व हुकूमशाही नेतृत्वाचं पितळ उघडं पाडते.

‘अ‍ॅनिमल फार्म’ (सचित्र आवृत्ती) – जॉर्ज ऑर्वेल

मराठी अनुवाद – भारती पांडे

मधुश्री पब्लिकेशन, पुणे

पाने - १५२

मूल्य – १५० रुपये

..................................................................................................................................................................

हेही वाचा\पहा -

‘अ‍ॅनिमल फार्म’ची पंचाहत्तरी साजरी करण्याचे काही प्रयोजन आहे काय?

दुःस्वप्नासारखी कादंबरी आणि दुःस्वप्नासारखाच वर्तमान

‘1984’ : २०१७ साली वाचलंच पाहिजे असं पुस्तक!

ऑर्वेलच्या अंतरंगाचा वेध घेताना त्याचं व्यक्तित्व आणि साहित्य यांचा संगम साधण्याचा हा प्रयत्न आहे. हे पुस्तक वाचकांना ऑर्वेलशी जोडणारा पूल ठरावं...

हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपवण्यासारखं नाही. ‘ऑर्वेलियन’ मते आपल्याला विचार करायला भाग पाडतात...

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते मराठीचे प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......