ममता बॅनर्जींची ‘मुंगेरीलालगिरी’!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • शरद पवार आणि ममता बॅनर्जी
  • Sat , 04 December 2021
  • पडघम देशकारण शरद पवार ममता बॅनर्जी युपीए एनडीए राष्ट्रवादी काँग्रेस तृणमूल काँग्रेस भाजप सोनिया गांधी राहुल गांधी काँग्रेस

‘अमुक-तमुक पक्षाचा विजय म्हणजे तमुक पक्षाला निवडणूक जिंकण्यात आलेलं अपयश आहे’, अशी भोंगळ विधानं करण्यात आपल्याकडचे बहुसंख्य राजकीय विश्लेषक तरबेज आहेत. तसंच काहीसं बहुसंख्य राजकीय नेत्यांचही झालेलं आहे. वस्तुस्थिती काय आहे, याची कोणतीही तमा न बाळगता देशाचं राजकारण कवेत घेण्याचा प्रयत्न हे नेते करत असतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येऊन (महा)राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत भाजपला पर्याय उभा करण्याची केलेली भाषा, या भोंगळपणाचं उत्तम उदाहरण आहे. जे काँग्रेसमधून वेगळे झाले तरी ज्यांचा राजकीय संसार काँग्रेसला वगळून उभाच राहू शकलेला नाही, त्यांना हे समजतच नाहीये की, आपल्या देशात भाजपला पर्याय काँग्रेसला वगळून उभाच राहू शकत नाही. तरीही ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी केलेली भाषा म्हणा की, त्या दिशेने सुरू केलेले प्रयत्न म्हणजे मतांची विभागणी दोनपेक्षा जास्त विरोधकांत होऊन त्याचा लाभ शेवटी भाजपलाच व्हावा, अशी तर खेळी नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

राजकीय परिस्थिती लक्षात न घेण्याचा भोंगळपणा स्वाभाविकच वस्तुस्थितीला धरून कसा नसतो, याची अनेक उदाहरणं सांगता येतील. इथे हा मुद्दा ममता बॅनर्जी यांच्या निमित्तानं निर्माण झालेला असल्यानं नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाचंच उदाहरण घेऊ. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या सत्तेत येण्याचं भाजपचं स्वप्न ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तणृमूल काँग्रेसनं उधळून लावलं हे खरं आहे. तृणमूल काँग्रेसच्या जागांतही गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा चारने वाढ झाली हेही खरंच आहे, पण याचा अर्थ पश्चिम बंगालमध्ये खरंच भाजपचं पानिपत झालं आहे का? या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे ‘नाही’ हेच वस्तुस्थितीला धरून आहे, याचा विसर आपल्या देशातले (पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणारे सर्व नेते आणि त्यांचे) राजकीय पक्ष, तसंच बहुसंख्य राजकीय विश्लेषकांना पडलेलं आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झालेला नाही, हेच निकालाची आकडेवारी सांगते. गेल्या निवडणुकीत भाजपचे केवळ तीन सदस्य पश्चिम बंगालच्या विधानसभेत होते. या निवडणुकीत तो आकडा तब्बल ७७वर पोहोचलेला आहे. म्हणजे भाजपचं संख्याबळ ७४नं वाढलं आहे आणि ही वाढ मुळीच दुर्लक्षणीय नाही. शिवाय डावे आणि काँग्रेसला नेस्तनाबूत करत राज्यात दुसऱ्या क्रमांकाचं स्थान प्राप्त केलं आहे, मात्र नेमकं याच वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणं, हे मान्य करण्याचं धाडस राजकीय पक्ष आणि विश्लेषकांतसुद्धा नाहीये किंवा त्यांच्या आकलनात भोंगळपणा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही आकडेवाडी लक्षात घेतली आणि त्या आधारे मांडणी सुरू केली की, या देशात काँग्रेस आणि भाजप हेच दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत; अन्य राजकीय पक्षांचं अस्तित्व प्रादेशिक आहे, हे मान्य करावं लागतं!

मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी ज्या काही गाठीभेटी घेतल्या, त्या अपेक्षितच होत्या आणि त्यापैकी शरद पवार वगळता एकही मान्यवर ‘मास बेस्ड’ नेता नाही. ममता आणि त्यांनी गाठीभेटी घेतलेल्या सर्वांना  भाजपच्या विरोधात बळकट पर्याय उभा करायचा आहे आणि ते योग्यच आहे. कोणत्याही लोकशाहीत  देशात सत्ताधारी आणि/किंवा  प्रबळ पक्ष विरुद्ध एखादा पर्याय उभा करण्यात काहीही गैर नाही. उलट ती एक राजकीय गरजच असते. पूर्वी आपल्या देशातल्या राजकीय पक्षांना काँग्रेस विरुद्ध पर्याय उभा करावा असं वाटायचं, आता भाजपच्या विरोधात या हालचाली सुरू आहेत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

एकूणच खूपशी एककल्ली आणि अरेरावीकडे झुकणारी राजवट बघता भाजप विरुद्ध उभं राहणाऱ्या पर्यायाचं स्वागतच करायला हवं, मात्र असा पर्याय उभा करताना वस्तुस्थितीचं भान बाळगायलाच हवं. काँग्रेसला वगळून असा पर्याय उभा करण्यात येत असेल, तर त्यासाठी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ याशिवाय दुसरी कोणतीही प्रतिक्रियाच नाही, हे ममता बॅनर्जी आणि हा पर्याय उभारणाऱ्या सर्वांनी लक्षात घायलाच हवं.

काँग्रेस सध्या मुळीच एकसंध नाही. जनमनावर असलेली काँग्रेसची पकड ढिली झालेली आहे, सलगच्या पराभवामुळे या पक्षाच्या कार्यकर्त्यांत आणि नेत्यातही नैराश्य आलेलं आहे आणि हा पक्ष ‘निर्नायकी’ अवस्थेतही आहे. हे सर्व खरं असलं तरी काँग्रेस हाच एकमेव पक्ष देशव्यापी आहे आणि तोच पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेऊ शकतो, हे वास्तव नाकारताच येणार नाही. अनेकांना कितीही कटू वाटलं तरी, सोनिया आणि राहुल गांधी यांच्यातच देशव्यापी नेतृत्वाची क्षमता; कोणत्याही नेत्यात नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि हेच निखळ सत्य आहे. श्रीमती सोनिया गांधी आता थकल्या आहेत. त्यामुळे नेतृत्वाचा हा क्रूस आता राहुल गांधी यांनाच वाहून न्यावा लागणार आहे.

भाजपच्या विरुद्ध तयार होणाऱ्या संभाव्य आघाडीत एकही नेता देशव्यापी नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या राज्यातील विजय म्हणजे देशव्यापी नेतृत्वाची मान्यता देणारा वज्रलेख मिळाला, हा भ्रम आणि अहंकारही आहे. हे म्हणजे काठीचे वार करून पाणी कायमचं दुभंग करण्याचं स्वप्न पाहण्यासारखं आहे.

शिवाय काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही पक्षाकडे देशभरात किमान २० ते २२ टक्के मतांचा आधार नाही. भाजपच्या विरुद्ध एकत्र येण्याची भाषा करणारे सर्वच पक्ष प्रादेशिक आहेत. ममता बॅनर्जी, मुलायमसिंह यादव, मायावती यांच्यासारखे मोजके अपवाद वगळता अन्य कोणात्याही पक्षात स्वबळावर राज्यात सत्ता निर्माण करण्याची क्षमताही नाही आणि तरीही शरद पवार, चंद्राबाबू नायडू यांच्यासह हे सर्व नेते पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत. म्हणजे केंद्रात सत्ता येण्याआधीच पदासाठी साठमारी आहे!

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

अन्य राज्यांत हे नेते आणि त्यांच्या पक्षांनी जे काही प्रयत्न केले, त्यातून थोडाफार मायावती वगळता अन्य कुणाच्या हाती फारसं काही लागलेलं नाही. मायावतींना मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा अशा काही राज्यांत विधानसभा निवडणुकीत कधी तरी का असेना पाच-दहा जागा नक्कीच मिळालेल्या आहेत. बाकीच्या नेत्यांना तसं अपवादात्मक यशही कोणत्याच निवडणुकीत मिळालेलं नाही. २०१४च्या दिल्ली विधानसभा निवडणुका लढवण्याचा फुगा ममता बॅनर्जी म्हणजे तृणमूल काँग्रेसनं माध्यमात चांगल्यापैकी फुगवला होता, पण अण्णा हजारे यांनी तो फुगा कसा टचकन फोडून टाकला, हे अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. (महा)राष्ट्रवादीचे समर्थक गोवा आणि गुजरातमधल्या एकेका जागेचे दाखले देण्याचा प्रयत्न करतील, पण त्या  यशाचं श्रेय पक्षाचं नव्हे तर त्या उमेदवारांचं होतं हे विसरता येणार नाही.

हे सर्व लक्षात घेता काँग्रेसला बाजूला ठेवून ममता बॅनर्जी आणि (त्यांच्या काँग्रेसबद्दलच्या विधानापासून नेहेमीप्रमाणे सावध लांब उभं राहण्याची भूमिका घेणारे आणि १९७८पासून महाराष्ट्रावरची काँग्रेसची पकड सैल करण्यास सुरुवात करणारे) शरद पवार नेमकं काय साध्य करू इच्छितात, याबद्दल शंका निर्माण होते.

युपीए कुठे आहे, असा प्रश्न विचारणाऱ्या ममता बनर्जी हे विसरतात की, याच युपीएच्या केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांच्या पक्षाचे त्यांच्यासकट सहा मंत्री होते आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतही अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रीमंडळात आपण मंत्री होतो. त्याचाही विसर त्यांनी पडू देऊ नये. दोन्ही डगरीवर हात ठेवण्याची राजकीय कसरत करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विरोधात लढताना काँग्रेसशिवाय पर्याय उभा करण्याची केलेली भाषा, हे त्यांच्या अहंकारी चंचलपणाला शोभणारी  आहे; ते मुंगेरीलालचं  स्वप्नरंजनच म्हणायला हवं.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

आपल्या अस्तित्व आणि (मर्यादित का असे ना उरलेल्या) शक्तीबद्दल अशी शंका का उपस्थित झाली, याचा विचार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी करायला हवा. गेली दोन वर्षं या पक्षाला कायमस्वरूपी नेतृत्व नाही, जे काही कथित नेतृत्व आहे, ते सक्रिय नाही आणि सोनिया व राहुल गांधी वगळता कुणीही देशव्यापी नेता या पक्षाकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे.

काँग्रेसच्या झालेल्या या स्थितीला हेच नेते जबाबदार आहेत, पण ती जबाबदारी उचलून अचेतन होत चाललेल्या काँग्रेसमध्ये जीव फुंकावा असे यापैकी कुणालाही वाटत नाही, ही खरी शोकांतिका आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाला पर्याय नाही, ही वस्तुस्थिती मान्य करून या नेत्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करावं, हाच देशाच्या राजकारणातून काँग्रेसला ‘एलिमिनेट’ करू पाहणाऱ्या, या सर्व मुंगेरीलालच्या स्वप्नरंजनांवर पर्याय आहे; तो पर्याय स्वीकारण्याची सुबुद्धी काँग्रेस नेत्यांना सुचो!

शेवटी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी शिष्टाचार म्हणूनही ममता बॅनर्जी रुग्णालयात गेल्या नाहीत; घरी जाऊन केवळ शरद पवार यांनाच भेटल्या, संकेत समजून घेण्यासारखा आहेच!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......