प्रत्येक ‘न्यूजरूम’मध्ये काम करणाऱ्या काही निवडक पत्रकारांसाठी…
पडघम - माध्यमनामा
रवीश कुमार
  • ‘डाउन टु अर्थ’ या मासिकाच्या नोव्हेंबर २०२१च्या अंकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 02 December 2021
  • पडघम माध्यमनामा न्यूजरूम Newsroom पत्रकारिता Journalism बातमीदारी Reporting पत्रकार Journalist बातमी News गोदी मीडिया Godi Media गोदी पत्रकार Godi Journalist

आम्हा पत्रकारांच्या पेशात दिवसाची सुरुवात ‘आज काय करायचं?’ या चिंतेनं सुरू होते. म्हणायला ढिगभर बातम्या असतात, पण प्रत्येक बातमी तेवढी ‘दमदार’ नसते. ‘काय करायचं?’ ही चिंता त्यांनाच सतावते, जे काहीतरी करू इच्छितात, खोल निराशेनं घेरले जातात, वेड्यासारख्या बातम्या आणि ती पूर्ण करण्यासाठी ‘फॅक्ट्स’ शोधत फिरतात. असे पत्रकार प्रत्येक दिवशी उदास असतात. आपल्याच नजरेपासून दूर पळत राहतात.

तर दुसरीकडे पत्रकारितेच्या पेशात अशा लोकांचीही कमी नाही, जे काम कमी आणि शरीरप्रदर्शन जास्त करतात. ते ऑफिसमध्ये येतात, पण ट्विटरवर जास्त असतात. तिथं आपली उपस्थिती दाखवून देत राहतात, पण पैशाचं काम करत नाहीत. किंवा मग असं काम करतील ज्यात कवडीची जोखीम नसेल, अगदी रुटीन असेल. ते चांगलं करण्यासाठी कुठलेही प्रयत्न करत नाहीत. असे पत्रकार खूप ‘स्मार्ट’ असतात. करतील थोडंसं पण दाखवतील खूप. ट्विटरवर लिहितील, कुठून तरी कॉपी-पेस्ट करतील. पत्रकारितेविषयी चिंता व्यक्त करतील. न्यूजरूममध्ये पगार, पद याबाबत होणाऱ्या अन्यायाबाबत रडतील आणि मैफलीत आपली जागाही बळकावतील. पण आपल्या वाचक वा प्रेक्षकांसाठी कधी पुढाकार आणि मेहनत घेऊन काही तयार करणार नाहीत. अशा पत्रकारांचं आयुष्य प्रत्येक काळात ‘शानदार’पणे व्यतित होत राहतं. ते आपला आळशीपणा सहजपणे आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या कहाणीनं झाकण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या अन्यायाचे किस्से काम करणाऱ्या पत्रकारांकडेही काही कमी नसतात!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

न्यूजरूमची रचना अशा प्रकारे केलेली असते की, काम करणाऱ्या आणि न करणाऱ्या पत्रकारांचं मूल्यमापन एकाच प्रकारे केलं जातं. कॉर्पोरेट मानव संसाधन व्यवस्थापनाची व्यवस्था पत्रकारांवर थोपवली जाते. मला वाटत नाही की, त्यांच्याकडे न्यूजरूम व्यवस्थापनाचा कुठला पूर्ण आराखडा असतो. आणि हे काम संपादकाच्या ‘बस की बात’ नसतं. खासकरून आजकालच्या संपादकांच्या, जे केवळ नावालाच संपादक असतात. त्यांना कुणाला तरी हाकून काम करून घेणं, एवढाच अधिकार असतो. या प्रकारातून कमी पैशात जास्त काम करण्याची किंवा करून घेण्याची व्यवस्था निर्माण केली जाते. काही वेळा पैसा नसतोही आणि जिथं पैसा असतो तिथंही हेच ऐकायला मिळतं. त्याचा अर्थ असा होतो की, पैसा ही अडचण नाहीये. सिस्टिम पत्रकारितेसाठी नसते, पत्रकारितेच्या नावावर पैसे कमवण्यासाठी असते. यात चुकीचं काही नाही, पैसे कमवायला हवेत, पण पत्रकारितेच्या नावावर पैसे कमवत असताना तर पत्रकारिताच करायला हवी. बाकी काही नाही. असो, हा विषय इथंच संपवतो, कारण तो मोठा असल्यानं त्यावर अधिक सविस्तर लिहायला हवं.

अशा परिस्थितीत काम करणाऱ्या पत्रकारांवर काम न करणाऱ्या पत्रकारांचा मोठा प्रभाव पडतो. एकीकडे ते आधीच ‘आज काय करायचं?’ या विवंचनेत असतात आणि दुसरीकडे त्यांना हेही दिसत असतं की, बाकीचे पत्रकार मौजमजा करत आहेत. मला अनेक न्यूजरूममध्ये काम करणारे पत्रकार भेटतात, तेव्हा गप्पांमध्ये हा विषय येतोच. मी त्या सगळ्यांना सांगतो की, तुम्ही स्वत:लाच उत्तरदायी आहात, सहकारी आणि संपादक यांना नाही... त्यांच्यावर पगार आणि पद या दोन्हीबाबतीत अन्याय होतोय, हे माहीत असतानाही. अन्यायाशी लढण्यासाठी अन्याय सहनही करावा लागतो. कारण ही सतत चालणारी लढाई आहे. न्यायाची कुठलीही लढाई निर्विवादपणे जिंकली जात नाही.

‘गोदी अँकर आणि पत्रकारां’ची जीवनशैली पहा. त्यांचं सगळं कसं ‘मजेत’ चाललंय. पत्रकारितेत राहूनसुद्धा सत्य बोलणाऱ्या\सांगणाऱ्यांपेक्षा ते जास्त खूश आहेत. ते आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि समाजात प्रतिष्ठित आहेत आणि सुरक्षितही. तुम्हाला ठरवायचंय की, तुम्ही त्यांच्यासारखं जगू इच्छिताय का? मग तुम्ही मोठमोठ्या दलालांकडे पहा, जे लाखो-कोट्यवधी रुपयांचा ‘खेळ’ खेळत असतात. या चिरगुटांचा कशाला आदर्श घेता? दुसऱ्या बाजूला, हेही पहा जो ‘गोदी पत्रकार’ नाहीत, ते किती कष्ट घेत आहेत का? पत्रकाराला त्याच्या पत्रकारितेबरोबरच त्याच्या कामासंदर्भातल्या मेहनतीवरूनही पारखा. फरक तुमच्या लक्षात येईल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मला कुठल्याही परिस्थितीत काम करणाऱ्या पत्रकारांना भेटायला आवडतं. त्यांच्याकडूनच काम करण्याची प्रेरणा मिळते. अशा पत्रकारांना आपल्या अपयशाची कल्पना असते आणि ते कुठल्याही यशाच्या आशेनं काम करत नाहीत. फक्त काम करत राहतात. दिवसभरात अशा एखाद्या पत्रकाराची भेट झाली की, धन्य झाल्यासारखं वाटतं. व्यापक दृष्टीकोनातून पाहिलं तर न्यूजरूममध्ये कुणाच्याही बाबतीत न्यायाचं वर्तन होत नाही, त्याचे कसले मापदंडही नसतात. पण तरीही हे कारण पुढे करत काम न करणारे ते न करण्यासाठी शंभर बहाने शोधून काढतात. आणि काम करणारे ‘आज काय करायचं?’ या एकाच कारणामुळे मरमर मरतात. ते प्रत्येक दिवशी कठीण बातमी निवडतात आणि दमूनभागून जातात. प्रत्येक न्यूजरूममध्ये अशा प्रकारे काम करणाऱ्या पत्रकारांमधले पत्रकार स्वत:वर अपराधीपणाचं ओझं टाकत राहतात की, ‘आज काय करायचं?’ ही सामान्य स्वरूपाची चिंता नाही. हा चिंतेचा डोंगर छातीवरून ठेवून दिवसाची सुरुवात करावी लागते. माझ्याकडे अशा पत्रकारांच्या समस्येवर कुठलाही उपाय नाही, पण त्यांच्याविषयी खूप आपुलकी वाटते. मनातल्या मनात मी त्यांना सलाम करत राहतो.

आज सकाळी याच चिंतेचा सामना करत होतो, तेव्हा ‘डाउन टु अर्थ’ या नियतकालिकाच्या मुखपृष्ठाकडे लक्ष गेलं. ते करणाऱ्याविषयीचा आदरभाव उमळून आला. या विचारानं मन भरून आलं की, कुणीतरी किती मनापासून हे मुखपृष्ठ केलंय. याची कल्पना असताना की, असे विषय केवळ औपचारिकेचे झाले आहेत, किती कमी लोक ते वाचतील, तरीही अजित बजाज यांनी किती मन लावून हे आकर्षक मुखपृष्ठ केलंय. त्यासाठी त्यांनी किती विचार केला असेल, या अंकात पत्रकारांनी लिहिलेले लेख\बातम्या\वृत्तांत लोकांपर्यंत पोहण्यासाठी किती रंगांचा विचार केला असेल. काम मनात नसेल, तर असं काम होत नाही.

तात्पर्य हे आहे की, जोवर पत्रकारितेच्या पेशात आहात आणि जेवढं तुम्हाला शक्य आहे, तेवढं मन लावून करण्याचा प्रयत्न करा. पण कायमस्वरूपी राहण्याचा विचार करू नका. या देशात बाहेर पडण्याचे पर्याय कमी आहेत आणि दुसऱ्या कामाची निवड करणं सोपंही नाही. पण तरीही याच पेशात आयुष्यभर राहण्याचा विचार करत असाल तर त्रास होणार. विशिष्ट काळानंतर पत्रकारिता सोडून दिली पाहिजे. पण जोवर करत आहात, तोवर करत रहा. तुम्हाला जेवढं शक्य आहे, तेवढं करा, पण मनापासून करा. हे केलं नाही आणि ते होऊ शकलं नाही, याची भरपाई कधीही करता येणार नाही. जे केलं, जेवढं केलं, ते कसं केलं, त्याविषयी उत्तरदायी रहा.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

आता प्रेक्षक हे ‘प्रेक्षक’ राहिलेले नाहीत. त्यांना तुम्ही आंब्याची स्टोरी दाखवलीत तर ते म्हणतात चिंचेची दाखवली नाहीत. अशा प्रेक्षकांची फिकीर करू नका. ते केवळ तुम्हाला निराश करण्यासाठी येतात. साऱ्या जगातल्या साऱ्या बातम्या एक पत्रकार करू शकत नाही. एका देशातल्या सगळ्या बातम्याही एक पत्रकार करू शकत नाही. अशी अपेक्षा करणारे मोठे बदमाश असतात, जे प्रेक्षक आणि फॅनचा वेश पांघरून येतात आणि तुम्ही केलेल्या कामाला ‘बेमतलब’ ठरवतात. असं करून ते सगळ्या प्रश्नांना पायदळी तुडवतात आणि त्यांचा सामना करण्यापासून स्वत:ला वाचवतात. त्यांना कुठल्याही परिस्थितीत आपला ‘खोटेपणा’ जपायचा असतो. त्यांची चिंता करू नका, आपलं काम करत रहा.

हे लक्षात ठेवायला हवं की, तुम्ही केलेलं प्रत्येक काम हे ‘बेमतलब’ ठरवलं जाईल, आपल्या कामात तुम्हालाच ‘अर्थ’ भरायचा आहे. एखादा नवा रंग भरायचा आहे. जसा ‘डाउन टु अर्थ’च्या पत्रकारांनी आणि त्या अंकाचं मुखपृष्ठ करणाऱ्या अजित बजाज यांनी भरलाय.

ही पोस्ट प्रत्येक न्यूजरूममध्ये काम करणाऱ्या एक वा दोन पत्रकारांसाठी आहे. प्रत्येक न्यूजरूममध्ये काम करणारे एवढेच असतात. संख्येच्या प्रमाणानुसार पाच किंवा दहाही असू शकतात. प्रत्येक दिवशी जेवढं शक्य असेल तेवढं नव्यानं करण्याचा प्रयत्न करा, जुनं नव्यानं करण्याचा प्रयत्न करा. ‘डाऊन टु अर्थ’च्या मुखपृष्ठावरील रंगांसारखं उजळत रहा. सूर्यादयाचा रंग आहे...

अनुवाद - टीम अक्षरनामा

रवीश कुमार यांनी ११ नोव्हेंबर २०२१ रोजी फेसबुकवर लिहिलेल्या मूळ हिंदी पोस्टचा हा मराठी अनुवाद आहे

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......