मध्यमवर्गीयांनो, तुम्ही कुणाकडे काय मागाल? मागणारे हात तर तुम्हीच तोडलेत!
पडघम - देशकारण
रवीश कुमार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 04 July 2020
  • पडघम देशकारण रवीश कुमार Ravish Kumar मध्यमवर्ग Middle Class

अमेरिकेत करोनामुळे नोकरी गेलेल्या, बिनपगारी सुट्टीवर पाठवलेल्या आणि पगारकपात झालेल्या पत्रकारांची संख्या ३६००० इतकी आहे. त्यामुळे तिथं प्रत्युत्तरादाखल ‘प्रेस फ्रीडम डिफेन्स फंड’ बनवला जात आहे. ज्यातून या पत्रकारांना मदत केली जाणार आहे. हा फंड ‘दि इंटरसेप्ट’ या माध्यम संस्थेनंच बनवला आहे. या फंडातून पत्रकारांना एक किंवा दोन वेळा १५०० डॉलरची मदत केली जाणार आहे. या फंडाकडे आतापर्यंत १००० निवेदनं आली आहेत.

अमेरिकेने जून महिन्यात १०० कोटी डॉलर्स इतका बेरोजगारी भत्ता दिला आहे. पण तरीही तिथं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, सरकारने बेरोजगारांची संख्या पाहता १४२ कोटी डॉलर्स खर्च करणं गरजेचं होतं.

याबाबतीत भारतीय मध्यमवर्ग चांगला आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा भत्ता नकोय. फक्त व्हॉटसअॅपवर मीम आणि व्हिडिओ हवेत. टीव्हीवर गुलामी.

भारतात एडिटर्स गिल्ड, प्रेस क्लब ऑफ इंडिया, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थांनी किती मुक्त, पूर्ण वेळ, कायमस्वरूपी, स्ट्रिंगर, अर्धवेळ पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, कुणाची पगारकपात झालीय, त्यांची काय स्थिती आहे, याचा कमीत कमी सर्व्हे तरी करण्याची गरज आहे. त्यात तांत्रिक कर्मचाऱ्यांचाही समावेश करायला हवा. पत्रकारांची कुटुंबंही फी आणि घरभाडं देऊ शकत नाहीयेत.

अर्थात ही समस्या इतरांचीही आहे. खाजगी नोकरी करणारे सर्वच त्याचा सामना करत आहेत. एका खाजगी शिक्षकानं म्हटलंय की, सरकार सगळ्यांची दखल घेतेय, पण आमची घेत नाहीये. इतकंच नाही तर नव्या आणि तरुणा वकिलांचीही कमाई बंद झालीय. त्यांचीही हालत वाईट आहे. अनेक छोटे छोटे रोजगार करणाऱ्यांची कमाई बंद झालीय. विद्यार्थी म्हणताहेत, आम्ही भाडं देऊ शकत नाही आहोत.

याचा अर्थ असा नाही की, ८० कोटी लोकांना शिधा देणाऱ्या योजनेची खिल्ली उडवली जावी. पण मध्यमवर्ग हेच करतो. या गोष्टींमुळे त्याच्यातली संवेदनशीलता संपलीय. जे खूप गरीब आहेत, त्यांना शिधा तरी मिळतोय. (एरवी तो सडून जातो.) उलट त्यांना अधिक शिधा मिळायला हवा. फक्त पाच किलो तांदूळ आणि एक किलो तूरडाळीनं काय होणार?

..................................................................................................................................................................

लवकरच प्रकाशित होत आहे...

प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

हे चुकीचं आहे की, मध्यमवर्गाला काहीच मिळत नाहीये. व्हॉटसअॅप मीम आणि गोदी मीडियाच्या चर्चांतून त्याची पूर्णपणे काळजी घेतली जातेय. त्याला मीमचं ‘मीमपान’ करता यावं, यासाठी त्याच्या मुलांचं शिक्षण आणि नोकऱ्यांविषयी बोलणं बंद झालंय. त्याच्यामध्ये जितक्या धार्मिक आणि बिगरधार्मिक आकांक्षा आहेत, संकुचितता आहेत, त्या सगळ्यांना खाद्य पुरवलं गेलंय. त्यामुळे तो राजकीय पद्धतीनं मानसिक सुख मिळवत राहिला आहे.

प्रत्यक्षात हा मध्यमवर्ग माध्यमं आणि अन्य संस्था नष्ट करणाऱ्या झुंडींच्या बाजूनं उभा राहत आला आहे, तोच आता माध्यमांना शोधतोय. माध्यमांचं खच्चीकरण करताना तो टाळी वाजवत होता. मध्यमवर्गामध्ये थोडा जरी प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर त्यानं माध्यमांकडे अजिबात आपल्या व्यथांचं गाऱ्हाणं गाऊ नये. त्यानं फक्त मीमची मागणी करायला हवी. इतर काही नाहीतर नेहरूंना मुसलमान करणारं मीम दिवसातून दोन-तीन वेळा मिळालं तरी त्याला समाधान मिळेल.

प्रामाणिक मध्यमवर्गाला माहीत असायला हवं की, पंतप्रधानांनी त्याचे आभार मानलेत. प्रामाणिक करदात्यांचं अभिनंदन केलंय. असं नाहीये की, तुमच्याकडे लक्ष नाहीये.

अनुवाद - टीम अक्षरनामा

..................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख ‘एनडीटीव्ही’च्या पोर्टलवर २ जुलै २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

ADITYA KORDE

Sat , 04 July 2020

"...मध्यमवर्गामध्ये थोडा जरी प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर ..." हे असले तारे तोडताना शरम वाटली पाहिजे होती राविशाकुमार ह्याना


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......