मध्यमवर्गीयांनो, तुम्ही कुणाकडे काय मागाल? मागणारे हात तर तुम्हीच तोडलेत!
पडघम - देशकारण
रवीश कुमार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 04 July 2020
  • पडघम देशकारण रवीश कुमार Ravish Kumar मध्यमवर्ग Middle Class

अमेरिकेत करोनामुळे नोकरी गेलेल्या, बिनपगारी सुट्टीवर पाठवलेल्या आणि पगारकपात झालेल्या पत्रकारांची संख्या ३६००० इतकी आहे. त्यामुळे तिथं प्रत्युत्तरादाखल ‘प्रेस फ्रीडम डिफेन्स फंड’ बनवला जात आहे. ज्यातून या पत्रकारांना मदत केली जाणार आहे. हा फंड ‘दि इंटरसेप्ट’ या माध्यम संस्थेनंच बनवला आहे. या फंडातून पत्रकारांना एक किंवा दोन वेळा १५०० डॉलरची मदत केली जाणार आहे. या फंडाकडे आतापर्यंत १००० निवेदनं आली आहेत.

अमेरिकेने जून महिन्यात १०० कोटी डॉलर्स इतका बेरोजगारी भत्ता दिला आहे. पण तरीही तिथं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, सरकारने बेरोजगारांची संख्या पाहता १४२ कोटी डॉलर्स खर्च करणं गरजेचं होतं.

याबाबतीत भारतीय मध्यमवर्ग चांगला आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा भत्ता नकोय. फक्त व्हॉटसअॅपवर मीम आणि व्हिडिओ हवेत. टीव्हीवर गुलामी.

भारतात एडिटर्स गिल्ड, प्रेस क्लब ऑफ इंडिया, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थांनी किती मुक्त, पूर्ण वेळ, कायमस्वरूपी, स्ट्रिंगर, अर्धवेळ पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, कुणाची पगारकपात झालीय, त्यांची काय स्थिती आहे, याचा कमीत कमी सर्व्हे तरी करण्याची गरज आहे. त्यात तांत्रिक कर्मचाऱ्यांचाही समावेश करायला हवा. पत्रकारांची कुटुंबंही फी आणि घरभाडं देऊ शकत नाहीयेत.

अर्थात ही समस्या इतरांचीही आहे. खाजगी नोकरी करणारे सर्वच त्याचा सामना करत आहेत. एका खाजगी शिक्षकानं म्हटलंय की, सरकार सगळ्यांची दखल घेतेय, पण आमची घेत नाहीये. इतकंच नाही तर नव्या आणि तरुणा वकिलांचीही कमाई बंद झालीय. त्यांचीही हालत वाईट आहे. अनेक छोटे छोटे रोजगार करणाऱ्यांची कमाई बंद झालीय. विद्यार्थी म्हणताहेत, आम्ही भाडं देऊ शकत नाही आहोत.

याचा अर्थ असा नाही की, ८० कोटी लोकांना शिधा देणाऱ्या योजनेची खिल्ली उडवली जावी. पण मध्यमवर्ग हेच करतो. या गोष्टींमुळे त्याच्यातली संवेदनशीलता संपलीय. जे खूप गरीब आहेत, त्यांना शिधा तरी मिळतोय. (एरवी तो सडून जातो.) उलट त्यांना अधिक शिधा मिळायला हवा. फक्त पाच किलो तांदूळ आणि एक किलो तूरडाळीनं काय होणार?

..................................................................................................................................................................

लवकरच प्रकाशित होत आहे...

प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

हे चुकीचं आहे की, मध्यमवर्गाला काहीच मिळत नाहीये. व्हॉटसअॅप मीम आणि गोदी मीडियाच्या चर्चांतून त्याची पूर्णपणे काळजी घेतली जातेय. त्याला मीमचं ‘मीमपान’ करता यावं, यासाठी त्याच्या मुलांचं शिक्षण आणि नोकऱ्यांविषयी बोलणं बंद झालंय. त्याच्यामध्ये जितक्या धार्मिक आणि बिगरधार्मिक आकांक्षा आहेत, संकुचितता आहेत, त्या सगळ्यांना खाद्य पुरवलं गेलंय. त्यामुळे तो राजकीय पद्धतीनं मानसिक सुख मिळवत राहिला आहे.

प्रत्यक्षात हा मध्यमवर्ग माध्यमं आणि अन्य संस्था नष्ट करणाऱ्या झुंडींच्या बाजूनं उभा राहत आला आहे, तोच आता माध्यमांना शोधतोय. माध्यमांचं खच्चीकरण करताना तो टाळी वाजवत होता. मध्यमवर्गामध्ये थोडा जरी प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर त्यानं माध्यमांकडे अजिबात आपल्या व्यथांचं गाऱ्हाणं गाऊ नये. त्यानं फक्त मीमची मागणी करायला हवी. इतर काही नाहीतर नेहरूंना मुसलमान करणारं मीम दिवसातून दोन-तीन वेळा मिळालं तरी त्याला समाधान मिळेल.

प्रामाणिक मध्यमवर्गाला माहीत असायला हवं की, पंतप्रधानांनी त्याचे आभार मानलेत. प्रामाणिक करदात्यांचं अभिनंदन केलंय. असं नाहीये की, तुमच्याकडे लक्ष नाहीये.

अनुवाद - टीम अक्षरनामा

..................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख ‘एनडीटीव्ही’च्या पोर्टलवर २ जुलै २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

ADITYA KORDE

Sat , 04 July 2020

"...मध्यमवर्गामध्ये थोडा जरी प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर ..." हे असले तारे तोडताना शरम वाटली पाहिजे होती राविशाकुमार ह्याना


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......