ईदच्या दिवशी काय घडले! तुकोबांचे मशिदीत कीर्तन झाले!!
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास हेमाडे
  • तुकाराम महाराजांचे चित्र तुकाराम डॉट कॉम या संकेतस्थळावरून साभार
  • Mon , 25 May 2020
  • पडघम सांस्कृतिक ईद Eid ईद मुबारक Eid Mubarak तुकाराम Tukaram

आज ईद. त्यानिमित्त संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंग आणि त्याची हकीकत सांगणारा हा विशेष लेख... 

..................................................................................................................................................................

१.

तुकोबांना ईश्वराचे कोणतेही रूप, त्याचा कोणताही आविष्कार मान्यच होता. हे लक्षात घेतले तर एका अपूर्व विलक्षण ईदच्या दिवशी काय घडले असावे आणि कसे घडले असावे, याचा एक अंदाज बांधता येतो. 

तुकोबा पुण्यातून दिंडी घेऊन जात होते. जाताना एका चौकात जोराचा पाउस सुरू झाला. एकच तारांबळ उडाली. दिंडीतील साऱ्या वारकरी भक्तांनी इकडेतिकडे आडोसा शोधला. सारे जण वेगवेगळ्या गटांनी उभे राहिले. परंतु तुकोबाराय मात्र पावसातच भिजत होते...

त्या चौकात एका बाजूला मशीद होती, तर एका बाजूला मंदिर होते.

तुकोबा मंदिराकडे येतील, या भीतीने मंदिराच्या ब्राह्मण भटजीनी लगेच दरवाजे बंद करून टाकले.

लांबून मशिदीतील मुसलमान हे पाहत होते. त्यांच्यात कुजबुज अन चर्चा सुरू झाली...

“अरे, वो देखो तुकाराम महाराज भिग रहे है.”

“सुना है, वो बहुत ही बडे संत है”

“सच है, बहोत बडा बंदा है.”

“मगर वो भिग रहा है, उसके लोग भी भिग रहे है... क्या करे...!

“या अल्ला...! उनको बचना चाहिये...”  

अशी काहीशी चर्चा असावी. 

मग तुकोबांना मशिदीत बोलावण्याचा निर्णय झाला...

“जाव रे कोई तो... बुलाव उन्हे अंदर... बाकी के लोगोंको भी बुलावो...!”

आणि मग काय...

त्या मुसलमानांनी तुकोबांना अतिशय आदरपूर्वक आत नेले. 

सगळी दिंडी मशिदीत गेली. सारे वारकरी आत आले.

तुकोबांना, वारकरी मंडळींना कोरडे कपडेही देण्यात आले.

२.

रात्रीची कीर्तनाची वेळ झाली.

इस्लाम मूर्तीपूजा न मानणारा आणि तुकोबा तर विठुरायाच्या दर्शनाचे भुकेले.... तेच साऱ्या वारकरी मंडळींचे.

आता, मूर्तीपूजा न मानणाऱ्या मशिदीत तुकोबा काय बोलतील आणि कसे काय भजन-कीर्तन करतील,
याची प्रत्येकाला उत्कंठा लागली.

तुकोबा किर्तनाला उभे राहिले...

वागीश्वरी अवतीर्ण झाली....

“अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खिलावे।
अल्ला बगर नहीं कोय अल्ला करे सोहि होय ॥१॥

मर्द होये वो खडा फीर नामर्दकुं नहीं धीर ।
आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥२॥

सब रसों का किया मार । भजनगोली एक हि सार ।

इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥३॥

जिन्हो पास नीत सोये । वोहि बसकर तिरोवे ।
सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥४॥

सब ज्वानी निकल जावे। पीछे गधडा मटी खावे ।
गांवढाळ सो क्या लेवे । हगवनी भरी नहि धोवे ॥५॥

मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सोहि पाया ।
तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥६॥

बजारका बुझे भाव। वो हि पुसता आवे ठाव ।
फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥७॥

अर्थ काय? तर...

तुकोबा म्हणतात,

अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खिलावे। अल्ला बगर नही कोय अल्ला करे सोहि होय ॥१॥

“रे माणसा, अल्लाच देतो, अल्लाच देववतो. अल्लाच दवादारू पाजतो आणि खाऊही घालतो. अल्लाशिवाय जगात कोणीही नाही. अल्ला करेल तेच होते, असे सतत म्हणतोस ना? मग आता काय सांगतो ते ऐक!”

मर्द होये वो खडा फीर नामर्दकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ २ // 

“अरे, ह्या दारूने तुला धड उभेही रहाता येत नाही. जो मर्द असतो तोच ताठ उभा रहातो, हे विसरलास काय? नामर्दाला ते जमत नाही हे तुला ठाऊक नाही काय?  केवळ दिल खुश व्हावे म्हणून नशा करून हा तीन पैशाचा काय तमाशा लावलायसं तू?”

सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार । इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥३॥

“अरे भल्या माणसा, तुला रसपानच करायचे आहे ना? मग सर्व रसांचा रस, रससार असे हरीभजन तू कर... तुझ्या अंतरात्म्यात थोडेसे जरी इमान शिल्लक असेल तर माझ्या मित्रा, थोडेसे तरी भजन करून बघ!”

जिन्हो पास नीत सोये । वोहि बसकर तिरोवे । सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥४॥

“जवानीने मदमस्त झाला आहेस तू, भ्रमिष्टा बनला आहेस, पण लक्षात ठेव, ज्याने नीतीला झोपविले, आणि अनीतीने वागत राहिला, त्याला कर्माचे फळ, त्याच्या पापाचे फळ चुकलेले नाही. त्याला सारे काही भोगावेच लागते. जवानीत करशील मस्ती, अन उतारवयात पाठीमागून लाथा खाशील!”

सब ज्वानी निकल जावे। पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे । हगवनी भरी नहि धोवे ॥५॥

“अरे मूर्ख...! ही सारी जवानी निघून जाईल आणि मग गधड्या माती खाशील! अरे गावंढळ माणसा, म्हातारपणी तुझी हगवण धुवायलाही कुणी भेटाचये नाही रे.... अशी अवस्था होईल ह्या दारूपायी!”

मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सोहि पाया । तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥६॥

“ये, भाबड्या जीवा, ये... माझी हरीभजनाची दारू जो पिईल, ती ईश्वर भक्तीची नशा चाखेल तोच दर्ग्याचा खरा दीदार होईल. तोच खरा ईश्वराच्या जवळ जाईल. तोच ईश्वराच्या प्रेमाला पात्र राहील.... जगाच्या वासनेची दारू पिऊन खाली मुंडी घालून किती चालत राहाशील रे? अरे, बिगारी कामगार जर झोपून राहिला तर तो छदाम तरी कमावेल का?”

बजारका बुझे भाव। वो हि पुसता आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥७॥

“पण तेच तू करतो आहेस, अशाने बाजार बुडेल. तुला कोणी विचारणार नाही. तू काहीच प्रयत्न नाही केलेस तर तुला देव काय फुकटात भेटणार आहे काय?”

३.

हेच तुकोबा थेट रोकड्या भाषेत क्षेपकाच्या एका अभंगात सांगतात...

वृद्धपणी आली जरा । शरीर कापे थरथरा  

आयुष्य गेले हे कळेना । स्मरा वेगे पंढरी राणा  //

दात दाढा पडल्या ओस । हनुवटी भेटे नाकास  

हात, पाय, राहिले कान । नेत्रे पाझरे हाले मान //

अंगकांती परतली / चिरगुटा ऐसी झाली

आड पडे जिव्हा लोटे / शब्द न ये मुखावाटे //

लांब लोंबताती अंड / भराभरा वाजे गांड

तुका म्हणे आता तरी / स्मरा वेगी हरी हरी //  

भारतात एकही बहुजन संत, महात्मे, साधु, वैष्णव मुसलमानांच्या विरोधात नव्हते. त्या साऱ्यांना माहीत होते ईश्वर एकच आहे, आणि सर्व धर्मही मुलतः एकच आहेत. त्यांना माहीत होते की, मुसलमान आपलेच बांधव आहेत...

तुकोबा आणि विठुराय यांचे नाते अद्वैताचे आहे. त्या दोघांमध्ये सकृतदर्शनी फरक करता येत असला आणि त्यांना अलग करता येत असले तरी दोघेही आध्यात्मिकदृष्ट्या फरक करता येण्याजोगे आणि अलग करता येण्याजोगे नाहीत, ते दोघेही एकच आहेत. गांधीजीही हेच सांगतात – “ईश्वर अल्ला तेरो नाम... सबको सन्मती दे भगवान....”

हे तुकोबांच्या सर्व भाषिक साहित्य निर्मितीतून ते प्रतीत होते, जाणवत राहते.

वैदिक हिंदु तत्त्वज्ञानातील अद्वैत वेदान्ताच्या मते, ब्रह्म हेच एकमेव तत्त्व आहे, अन्य काही नाही. हा एकतत्त्ववाद आहे. आणि इस्लामी तत्त्वज्ञानानुसार केवळ अल्लाह हेच एकमेव तत्त्व आहे. या अर्थाने हिंदू-इस्लाम एकतत्त्ववादी धर्म आहेत, हे त्यांच्यातील मूलभूत तात्त्विक नाते आहे. ते सुफी संप्रदायाने हिंदू-मुसलमान अद्वैतातून अवतरीत केले.   

समग्र अभंग रचनेत तुकाराम महाराजांनी हिंदीत एकूण ६२ रचना केल्या आहेत. तुकारामडॉटकॉम या संकेतस्थळावर ‘तुकारामजी की हिन्दी रचनाँए’ या नावाने त्या दिल्या आहेत. अल्लाहविषयक अभंग त्यातच समाविष्ट आहेत. तेथे हिंदीतील सर्व अभंगांचे त्यातील प्रत्येक अभंगांच्या प्रकृतिनुसार वेगवेगळ्या नावांनी वर्गीकरण केले आहे. मुंढा, डोई फोडा, मलंग, वैद्यगोळी, साख्या, अशी नावे आहेत. या मुसलमानी अभंगात मुंढा ३, दरवेस अभंग १, डोईफोडा अभंग १, मलंग अभंग १, वैद्यगोळी अभंग १. 

माझ्या खासगी गाथा प्रतीत (संपादक कै. ह. भ. प. विष्णु नरसिंह जोग) हिंदी अभंगांची उत्तराधि पदे, दोहरे आणि मुसलमानी अभंग अशी वर्गवारी दिली आहे. उत्तराधि पदे, दोहरे ही राम-कृष्ण यांच्याविषयी हिंदीत रचलेले अभंग आहेत तर ‘मुसलमानी अभंग’ हे अल्लाहसाठी रचलेले अभंग आहेत.

..................................................................................................................................................................

संदर्भ 

१. श्रीतुकारामाची गाथा, भाग १ ला व २ रा, संपादक : कै. ह. भ. प. विष्णु नरसिंह जोग, प्रकाशक : केशव भिकाजी ढवळे, गिरगांव –मुंबई, आषाढ शके १८४९, सन १९२७, किंमत अडीच रुपये, पान क्रमांक २७९ ते २८१. खासगी प्रत : श्री. ओंकार नारायण हेमाडे, खरेदी दिनांक : ०८ जानेवारी १९६८. 

२. http://tukaram.com/hindi/tukaramji_hindi.asp

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास हेमाडे संगमनेर महाविद्यालय, संगमनेर इथं तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

shriniwas.sh@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Abhay jagtap

Tue , 26 May 2020

या कथेला काही आधार आहे का ? मशिदीमध्ये वाद्य , संगीत त्याकाळी चालत होते का ? - अभय जगताप


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......