‘देवी’ हे आंतरविरोध स्पष्ट करणारे सत्य तुम्हाला या समाजाचा घटक म्हणून लाज वाटायला भाग पाडतं.
पडघम - महिला दिन विशेष
अनुज घाणेकर
  • ‘देवी’ या लघुपटाची पोस्टर्स
  • Sat , 07 March 2020
  • पडघम महिला दिन विशेष जागतिक महिला दिन International Women's Day देवी Devi

कमी वेळात मोठं काहीतरी उलगडण्याचा पायंडा ‘शॉर्ट फिल्म्स’ संस्कृती सिनेजगतात पाडत आहे. अनेक उत्तम कलाकार त्यांमध्ये अभिनय करून अधिकाधिक दर्शकांना खेचत आहेत. या परंपरेला पुढे नेणारी आणि अल्पावधीतच ‘ट्रेंडिंग’कडे वाटचाल करणारी ‘देवी’ नावाची शॉर्ट फिल्म नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. चुकवून चालणार नाही, अशी कल्पना आणि एका भयाण वास्तवाचा अंगावर येणारा हा लेखाजोखा अस्वस्थ करून सोडणारा आहे.

पहिल्या फ्रेमपासून एक दर्शक म्हणून तुमची उत्सुकता ताणली जाते. टीव्ही रिमोट घेऊन धडपड करणारी ती, खुर्चीत रेलून बसलेली काहीशी त्रासलेली ती, भक्तिभावाने प्रार्थना करणारी ती, पत्ते खेळण्यात रमलेल्या त्या, अभ्यास करणारी ती, पायाचं व्हॅक्सिंग करत आपल्याच मस्तीत असलेली ती, दारूची बाटली घेऊन नशेत असलेली ती - आणि या सगळ्यांना जोडणारी काहीशी एक अस्वस्थ गूढ शांतता.

प्रत्येक मिनिट आणि मिनिट महत्त्वाचं असणाऱ्या शॉर्ट फिल्मसारख्या माध्यमात पहिली काही मिनिटे तुम्ही अंदाज घेत राहता की, हे नक्की काय आहे. एका बाजूने वेशभूषा, केशभूषा, धर्म, वय, क्षमता, जीवनशैली, विचार, वर्तन - अशा सर्वतोपरी भिन्न असणाऱ्या व्यक्तिरेखा तुम्हाला कोड्यात टाकत राहतात.

तर दुसऱ्या बाजूने काजोल, नेहा धुपिया, नीना कुलकर्णी, मुक्ता बर्वे, ज्योती सुभाष यांसारख्या मातब्बर अभिनेत्रींची मांदियाळी तुमच्या अपेक्षा उंचावत राहते. टीव्हीवरील प्रथम पत्रकार क्रूर घटनेचं वर्णन करतो, पण घटना काय ते स्पष्ट सांगत नाही.

फिल्म पुढे सरकते आणि कथेतील पात्रे बोलू लागतात, भांडूच लागतात. त्यांनी व्यापलेल्या अवकाशात एक नवीन स्त्री येण्याची सूचना असते. कोणी तिथे राहावे आणि कोणी राहू नये, याचे अंगावर शहारे आणणारे निर्देश चर्चिले जातात आणि तुम्हाला दर्शक म्हणून कथेचा अंदाज येतो. बलात्कार आणि नंतर खून किंवा मृत्यू झालेल्या पीडितांच्या जगात तुमचा शिरकाव होतो. आणि जेवणात भाजी कुठली करायची, अशा प्रकारच्या सहज वाटणाऱ्या संवादातून भारतीय समाजाचे एक नग्न सत्य तुम्हाला बोचू लागते. टीव्हीवरील दुसरी पत्रकार तुम्हाला अधिक स्पष्ट स्वरूपात, देशात असलेल्या बलात्कार प्रकरणाची बातमी देते.

आपण साऱ्याच एकाच अन्यायाच्या बळी आहोत, हे लक्षात आल्यावर भांडण थांबते आणि नवीन पीडितेला सामावून घेण्यासाठी दरवाजा उघडतो. ती आत येते आणि सगळ्यांचेच काळीज द्रवल्याशिवाय राहत नाही. एक दर्शक म्हणून तुम्ही सुन्न होता. ८० टक्क्यांहून जास्त भारतीय देवीची पूजा करतात आणि त्या देशात दर दिवशी साधारण ९० बलात्कारांच्या घटना नोंदवल्या जातात. अशा प्रकारचं क्रूर सत्य पडद्यावर तरळतं आणि ‘देवी’ हे आंतरविरोध स्पष्ट करणारे सत्य तुम्हाला या समाजाचा घटक म्हणून लाज वाटायला भाग पाडतं.

एक समाज म्हणून आरसा दाखवणाऱ्या अशा कलाकृतींची ताकद आज निरनिराळ्या अन्यायाच्या बाबतीत किती गरजेची आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते.

.............................................................................................................................................

लेखक अनुज घाणेकर मानववंशशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.

anujghanekar2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......