सुखरूप रहा, जे काही शिकायचं असतं प्रणयातून,  ताटातूटीतून, वेदनेतून, ते शिक
पडघम - महिला दिन विशेष
नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती
  • नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती आणि भारतीय स्त्रीचं एक प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 07 March 2020
  • पडघम महिला दिन विशेष जागतिक महिला दिन International Women's Day नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती Nirendranath Chakravarty

नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती (१९ ऑक्टोबर १९२४-२५ डिसेंबर २०१८) हे बंगालीतील एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांच्या ‘उलंगा राजा’ (नग्न राजा) या कवितासंग्रहाला १९७४ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर कोलकाता विद्यापीठाने त्यांना २००७ साली डी. लिट या पदवीनेही सन्मानित केले. त्यांनी काही रहस्यमय कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. त्यांच्या एका कवितेचा हा बंगालीतून थेट मराठीमध्ये केलेला अनुवाद.

.............................................................................................................................................

सुखरूप रहा

 

सुखरूप रहा,

जो कोणी आहे दूरवर-जवळ,

सुखरूप रहा.

 

हात ठेव

ओळखी-अनोळखी सर्व

हातांवर.

 

पहा विचार करून,

ज्याची आशा केली नव्हती, ते ही मिळालय

बाहेरही घरातही.

 

अचानक गोंगाट थांबला की

त्याला हाक मार,

ज्याला घरच्या नावानी हाक मारता येते.

 

जे काही शिकायचं असतं प्रणयातून,  ताटातूटीतून, वेदनेतून,

ते शिक.

 

सुखरूप रहा.

.............................................................................................................................................

अनुवाद : रेखा शहाणे

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......

बाबाबुवा, गुरू, साधू, संत या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी लोकांच्या मानसिक दुर्बलतेचा, अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सातत्याने समाजाचे शोषण केले आहे – विशेषत: स्त्रियांच्या

अनेक बाबाबुवांनी ‘आध्यात्मिक साधना’, ‘देवाची कृपा’ किंवा ‘उपचार’ यांच्या नावाखाली स्त्रियांचे लैंगिक शोषण केले आहे. तरीही त्यांच्या अनुयायांनी त्यांना समर्थन दिले, ही गोष्ट समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. याचा विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते - अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची समस्या नाही, तर ती एक सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे.......