सुखरूप रहा, जे काही शिकायचं असतं प्रणयातून,  ताटातूटीतून, वेदनेतून, ते शिक
पडघम - महिला दिन विशेष
नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती
  • नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती आणि भारतीय स्त्रीचं एक प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 07 March 2020
  • पडघम महिला दिन विशेष जागतिक महिला दिन International Women's Day नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती Nirendranath Chakravarty

नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती (१९ ऑक्टोबर १९२४-२५ डिसेंबर २०१८) हे बंगालीतील एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांच्या ‘उलंगा राजा’ (नग्न राजा) या कवितासंग्रहाला १९७४ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर कोलकाता विद्यापीठाने त्यांना २००७ साली डी. लिट या पदवीनेही सन्मानित केले. त्यांनी काही रहस्यमय कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. त्यांच्या एका कवितेचा हा बंगालीतून थेट मराठीमध्ये केलेला अनुवाद.

.............................................................................................................................................

सुखरूप रहा

 

सुखरूप रहा,

जो कोणी आहे दूरवर-जवळ,

सुखरूप रहा.

 

हात ठेव

ओळखी-अनोळखी सर्व

हातांवर.

 

पहा विचार करून,

ज्याची आशा केली नव्हती, ते ही मिळालय

बाहेरही घरातही.

 

अचानक गोंगाट थांबला की

त्याला हाक मार,

ज्याला घरच्या नावानी हाक मारता येते.

 

जे काही शिकायचं असतं प्रणयातून,  ताटातूटीतून, वेदनेतून,

ते शिक.

 

सुखरूप रहा.

.............................................................................................................................................

अनुवाद : रेखा शहाणे

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......