मोदी सरकारचा शाहीन बागेचे रूपांतर ‘जालियानवाला बागे’त करण्याचा प्रयत्न?
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • शाहीन बागमधील आंदोलक
  • Tue , 04 February 2020
  • पडघम देशकारण सीएए CAA नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स National Register of Citizens एनआरसी NRC नागरिकत्व संशोधन विधेयक Citizenship Amendment Act सीएए CAA नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स National Register of Citizens एनआरसी NRC नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर National Population Register एनपीआर NPR

सीएए, एनआरसी व एनपीआर यांविरुद्ध देशभर शांततेच्या मार्गाने चालू असलेले आंदोलन अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. या सर्व आंदोलनाचे प्रतीक म्हणून दिल्लीतील शाहीन  बागमध्ये गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन चालू आहे. त्याच धर्तीवर दिल्लीत किमान २५ ठिकाणी असे आंदोलन चालू आहे. तसेच लखनऊ, कलकत्ता आणि महाराष्ट्रातील औरंगाबादसारख्या शहरातही असेच आंदोलन चालू आहे. ही आंदोलने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, केंद्रातील मोदी सरकार व उत्तर प्रदेशसारख्या भाजपशासित राज्य सरकारांच्या डोक्याची किरकिरी बनले आहे.

त्यामुळे हे आंदोलन कसे बंद पाडता येईल, किंबहुना कसे उधळून लावता येईल, अशा प्रयत्नात मोदी सरकार व भाजप आहे. त्यासाठी सरकारमधील काही जबाबदार मंत्र्यांनी बेजबाबदार व चिथावणीखोर वक्तव्ये जाहीर सभांतून केलेली आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी एका सभेत ‘देश के गद्दारों को, गोली मारो सालो को’ अशी चिथावणीखोर घोषणा दिली. गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील एका प्रचारसभेत मतदारांना ‘असे जोरात बटन दाबा की, त्याचा झटका शाहीन बागला बसला पाहिजे,’ असे वक्तव्य केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘शाहीन बाग के मर्द घरो में रजाई ओढके सोते है और महिलाओ, बच्चोको आगे करते है’, ‘जो लोग बोली से नहीं मानते, उन्हे गोली मार देनी चाहिए’, अशी चिथावणीखोर वक्तव्ये केली. दिल्ली विधानसभेचे एक भाजप उमेदवार कपिल मिश्रा यांनी ‘दिल्लीमध्ये ८ फेब्रुवारीला रस्त्यावर भारत-पाकिस्तान मॅच होईल आणि त्यात भारत जिंकेल’ असे वक्तव्य केले आहे.

अशा चिथावणीखोर भाषणांची आणखीही उदाहरणे देता येतील. अशा चिथावणीखोर वक्तव्याचा परिणाम काही तरुणांवर निश्चितच होतो. त्याच्याच परिणामी एका हिंदुत्ववादी तरुणाने जामिया मिलिया विद्यापीठात गोळीबार केला. त्यात एक विद्यार्थी जखमी झाला. शाहीन बाग येथे पोलिसांसमक्ष आंदोलन स्थळी घुसून कपिल गुज्जर नावाच्या तरुणाने हवेत गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. अशा विविध प्रकारे दहशत बसवून, गोंधळ माजवून हे आंदोलन संपवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे.

शाहीन बाग आंदोलनात खरं तर महिलांचा पुढाकार आहे. त्यात प्रामुख्याने मुस्लीम महिला असल्या तरी इतर समाजांच्या महिलांचाही त्यात सहभाग आहे. या महिलांना लागणाऱ्या सोयीसुविधा पुरवण्यामध्ये अगदी शीख धर्मियांपासून सर्वांचा सहभाग आहे. त्यांना चहापाणी, नाश्ता, जेवण पुरवण्यांमध्ये सर्व धर्मीयांचे लोक आहेत. आणि हीच नेमकी मोदी सरकारसाठी चिंताजनक बाब आहे.

हे आंदोलन कोणा एका राजकीय पक्ष वा संघटनेच्या नेतृत्वाखाली चालू नसून बिगर पक्षीय महिलांचा त्यात पुढाकार आहे. पण या आंदोलनाला गैरभाजप वा गैरहिंदुत्ववादी संघटनेची सहानुभूती व मदत निश्चितच आहे. त्या ठिकाणी जाऊन या पक्ष-संघटनांचे पुढारी वा कार्यकर्ते आपले समर्थन व्यक्त करत आहेत. त्यामुळे तर सत्ताधारी आणखीच चिडीला येत आहेत. या चिडीतूनच ते ‘या आंदोलक महिलांना पाचशे रुपये रोज देऊन आणलेले आहे, आंदोलनात अतिरेकी घुसलेले आहेत. त्यांना आयएसआयचा पाठिंबा आहे. पाकिस्तान त्यांना मदत करत आहे. विरोधक या आंदोलक अतिरेक्यांना प्रोत्साहन देत आहेत’ असे बिनबुडाचे आरोप करत आहेत.

मोदी सरकारची बटीक असलेली मुख्य धारेतील प्रसारमाध्यमेसुद्धा तसाच अपप्रचार करत आहेत. ‘शाहीन बाग हा देशांतर्गत वेगळाच देश झाला आहे. तेथे जायला व्हिसा घ्यावा लागेल की काय? हे आंदोलक लोकशाहीचा गैरफायदा घेत आहेत. संविधानाचा अवमान करत आहेत,’ असे बिनबुडाचे आरोप करण्याची मोहीमच या प्रसारमाध्यमांनी सुरू केली आहे.

त्यामुळे त्यांनी या भागातून नोएडा, कालिंदीसारख्या ठिकाणी नोकरी वा इतर कामानिमित्त ज्यांना जावे लागते, अशा लोकांना चिथावणी देऊन या आंदोलकाविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘गेल्या दीड महिन्यापासून आम्हाला लांबच्या रस्त्याने जावे लागत आहे. त्यामुळे आमचा वेळ व पैसा विनाकारण खर्च होत आहे. मुलांना शाळेत जाण्यासाठी अथवा आजारी माणसांना दवाखान्यात नेण्यासाठी अडचणी येत आहेत. हे आंदोलन सर्वांनाच गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाच्या जीविताला धोका पोहोचू शकतो’ अशा रीतीच्या चर्चा सुरू करण्यात आल्या आहेत.

हा रस्ता मोकळा करावा यासाठी न्यायालयातही दाद मागण्यात आली होती. परंतु न्यायालयाने राज्यकर्त्यांची वक्तव्येच यासाठी जबाबदार असल्याने आंदोलनकांविरुद्ध कार्यवाही करण्यास नकार दिला. तरीही मोदी सरकार व त्याच्या समर्थकांनी या आंदोलनाच्या विरोधातील प्रयत्न सोडलेले नाहीत. ‘जय श्रीराम, शाहीन बाग खाली करो’ अशा घोषणा देत या आंदोलनस्थळी जथ्ये पाठवण्यात येत आहेत. तिथे प्रतिधरणे आंदोलन करण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे. पुढे चालून दोन गटात दंगल झाली, असे स्वरूप देण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न त्यातून उघड होत आहे.

रस्ता रोखण्याबाबत शाहीन बाग आंदोलकांचे म्हणणे आहे की, ‘आम्ही फक्त एकाच बाजूचा रस्ता रोखलेला आहे, पण पोलिसांनी दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून रस्ता जाम केलेला आहे. त्यामुळे पोलिसांनी एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून द्यायला आमची हरकत नाही.’ परंतु पोलीस तसे करायला अजिबात तयार नाहीत. तसेच आंदोलक स्कूल बसेस, ॲम्बुलन्स इत्यादी आवश्यक बाबींना रस्ता मोकळा करून देतात, पण पोलीस ॲम्बुलन्स इत्यादींना जाऊ देण्यास मज्जाव करतात.

या आंदोलक महिलांची मागणी आहे की, ‘सरकारामधील कोणाही जबाबदार मंत्र्याने आमच्या पुढे येऊन नागरिकत्वाबद्दलचे आश्वासन द्यावे म्हणजे आम्ही हे आंदोलन मागे घेण्यास तयार आहोत.’ पण आंदोलकांची एवढी साधीशी मागणी पूर्ण करण्यास मोदी सरकार तयार नाही. त्यामुळे हे आंदोलन शांततेत मिटावे असे तरी या सरकारला वाटते काय, याबद्दल शंका येते.   

मोदी सरकार व भाजपकडून बेजबाबदार व चिथावणीखोर वक्तव्ये व व्यवहार होत असला तरी शाहीन बाग आंदोलकांनी मात्र खूपच संयम पाळलेला आहे. त्यांच्याकडून कोणत्याही रीतीची आगळीक अद्याप झालेली नाही. शांततेला कोणत्याही रीतीची बाधा पोहोचेल असा व्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही. ज्या जबाबदारीने समुदाय बसलेला आहे आणि त्यांचे स्वयंसेवक ज्या रीतीने काम करत आहेत, यावरून त्यांच्याकडून शांतताभंग होईल, असा कोणताही व्यवहार ते करणार नाहीत याची खात्री वाटते.

पण मोदी सरकार व भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांची चिथावणीखोर वक्तव्ये आणि त्यांच्या तरुणांकडून पोलिसांसमक्ष होणारा गोळीबार, प्रसारमाध्यमांतून चालू असलेला अपप्रचार इत्यादी सर्व बाबींवरून सत्ताधारी पक्षाला या शाहीन बागचे ‘जालियनवाला बागे’त रूपांतर करायचे आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे. अर्थात आता देशातील तमाम जनता जागरूक आणि संघटित झाली आहे. विविध जाती धर्मीयात दंगली पेटवून अराजक माजवण्याचा प्रयत्न ते निश्चितच हाणून पाडतील.  

.............................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 08 February 2020

मोदी व शहा शाहीनबागेचा बरोब्बर राजकीय फायदा उठवंत आहेत. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका संपली की शाहीनबाग आपोआप विसर्जित होईल. चिंता नसावी.
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......