‘नॅशनल तौहिद जमात’ नावाने चार संघटना, एक भारतातही
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
सुधीर अग्रवाल
  • श्रीलंकेतील बॉम्बहल्ल्यातील हल्लेखोरांचे जाहीर केलेले पोस्टर
  • Tue , 30 April 2019
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय श्रीलंका Sri Lanka इसिस आयसिस Islamic State

‘नॅशनल तौहिद जमात’ या श्रीलंकेतील अगदी लहानशा दहशतवादी गटाने संपूर्ण देश हादरवून सोडला. श्रीलंकेतील तपास यंत्रणा, तसेच इंटरपोलकडूनही या नरसंहाराचा तपास केला जात आहे. ‘तौहिद जमात’ हा शब्द नावात असलेल्या संघटनांचाही तपास केला जात आहे. ‘नॅशनल तौहिद जमात’ ही इसिसची श्रीलंकेतील समर्थक संघटना आहे. या संघटनेने स्वत:च आपण इसिस समर्थक असल्याचे सांगितलेले आहे.

संघटनेच्या नामोल्लेखासह देशी व विदेशी गुप्तचर यंत्रणांनी या दहशतवादी हल्ल्याचा इशारा आधीच दिलेला होता. मात्र नॅशनल तौहिद जमात (एनटीजे) ही छोटीशी संघटना असले काही करू शकत नाही, या भ्रमात श्रीलंका सरकार राहिले आणि भ्रमाचा हा भोपळा सलग आठ साखळी बॉम्बस्फोटांच्या रूपात फुटला. इसिसने कोलंबोतील साखळी, मानवी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली असली, तरी या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभाग श्रीलंकन नागरिकांचाच आहे. सीरियाहून कुणीही आलेले नाही. इसिसची केवळ प्रेरणा आणि मदत आहे. ‘नॅशनल तौहिद जमात’च्या श्रीलंकन सदस्यांनीच हे स्फोट घडवून आणलेले आहेत. श्रीलंकन सरकारनेही हाच निष्कर्ष काढलेला आहे.

‘नॅशनल तौहिद जमात’ नावाची एक संघटना भारतातही सक्रिय असल्याने आपल्यासाठी ही बाब अधिक चिंताजनक आहे. श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांनंतर भारतातही हाय अ‍ॅलर्ट जारी होणे, यातच सर्व आले. भारतातील गुप्तचर यंत्रणांकडून तामिळनाडू तौहिद जमातसंदर्भातील इत्थंभूत माहितीही या पार्श्वभूमीवर तपासली जात आहे.  

‘तौहिद’ म्हणजे काय?

‘तौहिद’ म्हणजे अल्लाह एकच आहे. या तत्त्वानुसार मूर्तीपूजा, तसेच अल्लाहव्यतिरिक्त कुणालाही तसा दर्जा देणे गुन्हा आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4810/Shivputra-Chhatrapti-Rajaram

.............................................................................................................................................

‘नॅशनल तौहिद जमात’चा ट्रॅक रेकॉर्ड

या संघटनेचा म्होरक्या मोहम्मद झहरान हा श्रीलंका तौहिद जमात संघटनेतून बाहेर पडला आणि त्याने आपला स्वतंत्र गट नावातून श्रीलंका वगळून स्थापन केला. 

‘नॅशनल तौहिद जमात’ने याआधी डिसेंबर २०१८ मध्ये बौद्ध मंदिरांना आपले लक्ष्य केले होते. गौतम बुद्धांच्या मूर्तीलाही हानी पोहोचवली होती. या संघटनेच्या श्रीलंकन सदस्यांनी आपल्या फेसबुक पेजवर इसिसचे उघड उघड समर्थन केलेले आहे. काही आठवड्यांनंतर हे पेज अपडेट होत असते. या संघटनेचे ट्विटर मात्र मार्च २०१८ पासून अपडेट नाही.

चार ‘तौहिद’, एक तमिळनाडूतही...

‘नॅशनल तौहिद जमात’शी नामसाधर्म्य असलेल्या अन्य एकूण तीन संघटना आहेत. ‘श्रीलंका तौहिद जमात’ आणि ‘सिलोन तौहिद जमात’ या नावाने दोन श्रीलंकेत कार्यरत आहेत. ‘तामिळनाडू नॅशनल तौहिद जमात’ नावाने एक संघटना भारतात अर्थातच तामिळनाडूत कार्यरत आहे. 

विशेष म्हणजे या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात भारतासह काही परदेशी गुप्तचर संघटनांनी हल्ला होण्यापूर्वी दोन तास आधी या बाबत माहिती पुरवली होती. पण श्रीलंका सरकार त्यात कमी पडले.

भारतात अधिक सतर्क राहण्याची गरज

सध्या भारतात १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. विविध राजकीय पक्ष, शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा सगळे जण गुंतलेले आहेत. श्रीलंकेत झालेल्या हल्ल्यानंतर भारतालादेखील सावध राहण्याची गरज आहे.

‘नॅशनल तौहिद जमात’चे ‘इसिस’ कनेक्शन लक्षात घेता भारताला अधिक सतर्क राहून या संघटनेवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. दक्षिण आशिया हे इसिसचे आता सॉफ्ट टार्गेट झाले आहे. भारतात झालेला पुलवामा आत्मघाती हल्ला, तो इसिस ज्या पद्धतीने करते तसाच होता. त्यातही आईडीच वापरण्यात आले होते. जागतिक पातळीवर आपल्या क्रूरतेची दखल घेतली जावी, असा दहशतवादी संघटनांचा हेतू असतो. आज इसिसचे लोण केवळ जम्मू-काश्मीरमध्येच नव्हे तर मुंबई, पुणे, हैद्राबाद, पनवेल आणि विदर्भातदेखील पोहोचले आहे. इसिस भरतीत या भागातील काही तरुण गेले होते.

या सर्व शक्यतांच्या पार्श्वभूमीवर इसिसचा धोका भारताच्या उंबरठ्यावर आला आहे. म्हणून आता भारताला बेसावध राहून चालणार नाही.

.............................................................................................................................................

लेखक सुधीर अग्रवाल प्राध्यापक आहेत.

drsudhiragrawal239@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......