सोलापूरच्या अ‍ाडम मास्तरांच्या घरकुलात भाजपची घुसखोरी! 
पडघम - राज्यकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • सोलापुरातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत कम्युनिस्ट नेते नरसय्या उर्फ आडम मास्तर (डावीकडून)
  • Mon , 04 February 2019
  • पडघम राज्यकारण नरेंद्र मोदी Narendra Modi देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आडम मास्तर Adam Master काँग्रेस Congress भाजप BJP कम्युनिस्ट Communist

नऊ जानेवारी २०१९ रोजी सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. तशा त्यांच्या सभा सर्वत्र आणि सतत चालूच असतात. पण सोलापूरची सभा तशी नव्हती. ही सभा भाजपने आयोजित केलेली असली तरी ती यशस्वी व्हावी यासाठी भाजपप्रमाणेच त्यांच्याशी देशभर विळा-भोपळ्याचे संबंध असणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी अ‍ाडम मास्तर यांनीही प्रयत्न केले होते. या सभेला त्यांचे २०,००० लोक उपस्थित होते. स्वखर्चाने आलेले हे लोक भाजपने चहापाणी, नाष्टा-जेवण, रोजंदारी देऊन आणलेल्या लोकांत उठून दिसत होते. म्हणून भाजपनेदेखील मोठ्या उदार मनाने त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल विद्यासागर राव यांच्या बरोबर व्यासपीठावर स्थानापन्न केले. अ‍ाडम मास्तरही त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसले. इतकेच नव्हे तर भाजपने त्यांना साडेतीन मिनिटे भाषण करण्याची संधीही दिली. मग काय, या संधीचे सोने करत अ‍ाडम मास्तरांनीही ‘बहाद्दर’ मुख्यमंत्री फडणवीस आणि ‘प्यारे’ पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोंडभरून स्तुती केली.

या तोंडभरल्या स्तुतीने सभेस उपस्थित असलेल्या कितींना आश्चर्यचकित केले असेल ते नक्की सांगता येणार नाही, पण व्यासपीठावर विराजमान असलेल्या फडणवीस, मोदी, गडकरी, राव इत्यादींना निश्चितच गहिवरून आले असणार. आणि का येऊ नये? ते ज्या ‘बंच ऑफ थॉटस’ला आदर्श ग्रंथ मानतात, त्या त्यांच्या ‘विचारांच्या गठ्ठ्यात’ मुस्लिम, ख्रिश्चनानंतर कम्युनिस्टच प्रमुख शत्रुस्थानी आहेत. म्हणूनच तर सत्तेवर आल्यानंतर कम्युनिस्ट ‘देशद्रोह्यां’चा वैचारिक अड्डा असलेल्या जेएनयुविरोधात त्यांनी मोहीम उघडलेली आहे. पण अजूनही तेथील ‘कन्हैय्या’ त्यांना आटपत नाही.

त्याशिवाय त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीत कम्युनिस्टांचा पराभव झाल्यानंतर तेथील कित्येक कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना संघाने यमसदनी पाठवले, त्यांच्या घरादारांची राखरांगोळी केली, त्यांची कार्यालये उदध्वस्त केली. केरळमध्ये तर संघ आणि कम्युनिस्टांचा कायमच जीवघेणा संघर्ष चालू असतो. तरीही ते आटोक्यात येत नाहीत. म्हणून तर तेथील मुख्यमंत्र्यांचे ‘शीर’ आणून देणाऱ्यास १०-१० लाखाची बक्षीसे संघ स्वयंसेवकाकडून जाहीर केली जातात. कारण प्रत्येक संघ स्वयंसेवकाला हे माहीत आहे की, आपले खरे शत्रू कम्युनिस्टच आहेत, काँग्रेसी  नव्हे. अशा या खऱ्या शत्रूपैकी एक, तीन वेळा आमदार राहिलेले आणि आता माकपचे राज्य सेक्रेटरी असलेले कम्युनिस्ट आपली स्तुती करतात म्हणजे काय?

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4637/Maza-Talamay-Jeevan---Zakir-Hussain

.............................................................................................................................................

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर आणि जगभर सभा घेत फिरतच असतात. पण अशा कोणत्याही सभेत एखाद्या कम्युनिस्टाला बोलू द्यावे व त्या कम्युनिस्टाने त्यांची स्तुती करावी असा करिश्मा आजपर्यंत कोठेच घडला नाही. संघ-कम्युनिस्टांचे हाडवैर अ‍ाडम मास्तरांना माहीत नाही असे थोडेच आहे? त्यांना या संबंधाची पुरेपूर कल्पना आहे, तरीही त्यांनी संघ स्वयंसेवकाची स्तुती केली. याला जबाबदार आहे काँग्रेसचे राजकारण.

अ‍ाडम मास्तर यांनी आपल्या भाषणात ‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी...राज्य के प्यारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी...’ असा उल्लेख करून आपल्या भाषणाला सुरुवात केली. पुढे ते म्हणाले, “मोदीजी, या कामासाठी गेल्या आठ वर्षांपासून संघर्ष करतोय. मागच्या आघाडी सरकारनं या प्रकल्पाला तीन वर्षं बासनात गुंडाळून ठेवलं होतं. पण आमच्या बहाद्दर मुख्यमंत्र्यांनी या फाईलवरची धूळ झटकली आणि पंतप्रधानाकडे सुपुर्द केली. आज ते स्वप्न साकार झालं आहे. २०२२ पर्यंत आम्ही घरं बांधून पूर्ण करू. आज तुम्ही आम्हाला या कामाचा चेक देत आहात, पण लवकरात लवकर सबसिडीचा प्रश्न मार्गी लावा. या प्रकल्पातील सभासद हे भाजी विक्रेते, कचरा गोळा करणाऱ्या महिला यांसारख्या थरातून आलेल्या आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रेरणेनं यापूर्वी १० हजार घरं गोरगरिबांना दिलीत. तेव्हा मोदीसाहेब, हे घर नव्हे तर बंगला आहे. आम्ही स्वप्नातही विचार करत नव्हतो की, हे स्वप्न पूर्ण होईल. तुम्ही आमच्या घरांना मंजुरी दिली ही गोष्ट आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही.” शेवटी ३० हजार घरकुलांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मास्तरांनी मोदी आणि फडणविसांचे आभार मानले.

मोदींनीही देशभरातून गोरगरिबांना किती कोटी घरे दिली याची आकडेवारी देऊन ‘आम्ही दिखाव्यासाठी काम करीत नाही, कोनशिला लावा आणि निवडणुका उरकून घ्या... त्यानंतर तुम्ही तुमच्या घरी आणि आम्ही आमच्या घरी. ही राजकीय संस्कृती आम्ही पूर्णपणे बंद करून टाकली आहे. गोरगरिबांच्या ३० हजार घरांची कोनशिला आज आम्ही लावली आहे. २०२२ मध्ये या घरांच्या चाब्या देण्यासाठीही आम्हीच येऊ,’ असे सांगितले.

या प्रकारे मोदी व फडणविसांनी अ‍ाडम मास्तरांनी गोरगरीब कष्टकऱ्यांच्या घरकुलांसाठी दाखवलेल्या चिकाटीचा स्वत:च्या प्रचारासाठी फायदा घेतला. असा फायदा काँग्रेसवाल्यांना का घेता आला नाही? त्यासाठी त्यांचे संकुचित स्थानिक राजकारण जबाबदार आहे. यावरून असे सिद्ध होते की, काँग्रेसवाल्यांना व भाजपवाल्यांना गोरगरीब कष्टकऱ्यांच्या घरकुलादी समस्यांशी काहीच देणेघेणे नाही. त्यांना फक्त गोरगरिबांच्या नावे संकुचित राजकारण करायचे असते. अ‍ाडम मास्तरांनी मात्र राजकारणाबरोबरच गोरगरीब कष्टकऱ्यांप्रती असलेली आपली तळमळही त्यांच्या या प्रयत्नातून दाखवून दिली.

वास्तविक पाहता सोलापुरात काँग्रेसचे समंजस नेते म्हणून मागासवर्गीय जातीतून आलेले व अनेक मंत्रीपदापासून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रीपदे भूषविलेले सुशीलकुमार शिंदे आहेत. त्यांची मुलगी, प्रणिती शिंदे या अ‍ाडम मास्तरांच्या विरोधात आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यांच्याच राजकीय दबावामुळे त्यावेळचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सदर प्रकल्पाची फाईल ठराव करून केंद्राकडे पाठवली नाही. हे जे मास्तर बोलले ते सत्य आहे. तशी ती पाठवली असती व प्रकल्प पूर्णत्वास गेला असता तर त्याचे श्रेय अ‍ाडम मास्तरांना मिळाले असते. कदाचित प्रणिती शिंदे यांना आमदारकीला निवडून येण्यात अडचणी आल्या असत्या, असा संकुचित विचार करून गोरगरिबांचे उठताबसता नाव घेणाऱ्या काँग्रेसने ही फाईल थंड्या बस्त्यात ठेवली.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत खरी लढत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे व अ‍ाडम मास्तर यांच्यातच झाली होती. त्यात ते पराभूत झाले. पण तेव्हा ते दुसऱ्याच क्रमांकावर होते. पुन्हा २०१४ ला झालेल्या निवडणुकीत ते सरळ चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना व तिसऱ्या क्रमांकावर भाजप आले. त्यामुळे निदान पुढे येणाऱ्या निवडणुकीत तरी हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊन, आपले राजकारणही भाजप, संघाच्या मदतीने पुढे नेण्याचा अ‍ाडम मास्तरांचा हा प्रयत्न तर नाही ना अशी रास्त शंका उपस्थित होते. कारण अशा प्रयत्नातून जमल्यास पुढील निवडणुकीत भाजप व अ‍ाडम मास्तरांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांना सहकार्य करण्याचा संकेत दिला गेला. पण हा संकेत वास्तवात कोणाच्या बाजूने कसा उतरेल याबाबत मात्र प्रचंड शंका आहेत. कारण जेवढे सख्य भाजप-काँग्रेसचे आहे, त्याच्या तसूभरही भाजप-कम्युनिस्टांचे नाही, किंबहुना ठिकठिकाणचा भाजप म्हणजे निम्मी काँग्रेसच आहे, हे देशभरच्या अनेक घटनांनी दिसून येते. तेव्हा अ‍ाडम मास्तरांचा हा प्रयत्न यशस्वी होईल की, नाही ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसून येईल. 

.............................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.

bhimraobansod@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................                                        

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......