वाचलीच पाहिजेत अशी २५ पुस्तकं
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
राम जगताप
  • पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 19 October 2018
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक Book Of the Week राम जगताप Ram Jagtap

वाचण्यासारखी खूप पुस्तकं असतात. अभिजात, सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम पुस्तकांच्या याद्या, साहित्याच्या वाङ्मय प्रकारानुसार त्यातील उत्कृष्ठ पुस्तकांच्या पुष्कळ याद्या यापूर्वी मराठीमध्ये केल्या गेल्या आहेत. यापुढेही केल्या जातील. ही तशाच याद्यांपैकी एक छोटीशी यादी. प्रत्येक मराठी माणसानं वाचलीच पाहिजेत अशा पुस्तकांची ही यादी.

............................................................................................................................................

१) भारतीय संविधान (अधिकृत प्रत)

आपल्या देशाचा ‘धर्म’ नेमका काय आहे आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाचा धर्म कसा असायला हवा, हे जाणून घेण्यासाठी देशाची राज्यघटना वाचणं अपरिहार्यच!

२) स्त्रीपुरुषतुलना - ताराबाई शिंदे

हे छोटंसं पुस्तकं भारतातील स्त्रीवादी मांडणीचा ‘एन्सायक्लोपीडिया’ आहे. एकोणिसाव्या शतकात स्त्रीवादी मांडणी करणारं, काळाच्या अत्यंत पुढे असलेलं हे पुस्तक प्रत्येक भारतीय स्त्री-पुरुषानं वाचलंच पाहिजे.

३) स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक

एका सामान्य स्त्रीच्या संसारातील साध्यासुध्या, कडू-गोड, आंबट-तुरट आठवणींची, संगती-विसंगतींनी भरलेली, पण प्राजंळपणे, सूक्ष्मपणे आणि विनोदबुद्धीनं सांगितलेली ही असामान्य आणि अद्वितीय कलाकृती आहे.

४) झेंडुची फुले - केशवकुमार

‘विडंबन’ या विषयावरचं मराठीतलं एकमेव श्रेष्ठ पुस्तक आहे. यानंतर एकाही पुस्तकाचं नाव घेता येत नाही.

५) आगरकर वाङ्मय (खंड १ ते ३)- संपा. दि. य. देशपांडे व नातू

आगरकर वाचल्याशिवाय बुद्धिवाद म्हणजे काय आणि विचारकलह म्हणजे काय, हे समजून घेता येत नाही.

६) दिवाकरांच्या नाट्यछटा

‘नाट्यछटा’ हा वाङ्मयप्रकार मराठीमध्ये फक्त दिवाकरांनीच लिहिला आणि तोही उत्तम प्रकारे. त्यामुळे तो जाणून घेतलाच पाहिजे.

७) युगान्त - इरावती कर्वे

महाभारताकडे कसं पाहावं आणि महाभारत कसं वाचावं याचे वस्तुपाठ जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

८) निवडक ठणठणपाळ - जयवंत दळवी

मराठीतलं सर्वाधिक काळ चाललेलं सदर आणि मराठी साहित्यिकांची निर्भेळपणे टिंगलटवाळी करणारं हे सदाबहार पुस्तक आहे.

९) गावगाडा - त्रिंबक नारायण आत्रे

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील बारा बलुतेदार व्यवस्थेचं समाजशास्त्रीय रीतीनं चित्रण करणारं हे पुस्तक. आत्रे यांच्या करड्या नजरेतून ग्रामीण भागाचा कुठलाच भाग आणि विषय सुटलेला नाही.

१०) साता उत्तराची कहाणी - ग. प्र. प्रधान

समाजवादी, साम्यवादी, रॉयवादी, पत्री सरकार, आंबेडकरवादी, हिंदुत्ववादी आणि गांधीवादी अशा सात विचारसरणींची १९४० ते ८० या काळातली वैचारिक चर्चा ललित अंगानं करणारं आणि त्यासाठी पत्रं, आठवणी, गप्पा आणि फ्लॅशबॅक असा तंत्रांचा वापर करणारं हे पुस्तक राजकीय भान समृद्ध करतं.

११) बहिणाबाईची गाणी

जगण्याचं तत्त्वज्ञान इतक्या सोप्या आणि नेमक्या शब्दांत तत्त्वज्ञानाच्या कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही.

१२) निवडक म. श्री. माटे (खंड १ व २)

विचार असाही करायचा असतो आणि खरं तर असाच करायचा असतो, याचं ‘तारतम्य’ माटेंच्या या निवडक लेखनातून ठसठशीतपणे दृग्गोचर होतं.

१३) वाचू आनंदे (बालगट व कुमारगट) - संपा. माधुरी पुरंदरे

बालवयीन आणि कुमारवयीन मुलांचं भावविश्व आणि जाणिवा समृद्ध करणारा हा पुस्तकसंच (मुलं आणि पालकांसाठीही) प्रत्येकानं वाचला पाहिजे, संग्रही ठेवला पाहिजे.

१४) जागर - नरहर कुरुंदकर

‘विचार कसा करावा?’ हा कुरुंदकरांच्या एकंदर लेखनाचाच गाभा आहे. ‘जागर’मध्ये तो अधिक तीव्रपणे समोर येतो आणि आपलं विचारविश्व बदलून टाकतो.

१५) रामनगरी - राम नगरकर

स्वत:कडे अतिशय तटस्थपणे पाहत स्वत:च्या बावळटपणाची, चुकांची खिल्ली यात लेखकानं ज्या खिळाडूवृत्तीनं उडवली आहे, तशी मराठीतल्या इतर आत्मचरित्रांमध्ये क्वचितच दिसते. मराठी आत्मचरित्रांमध्ये इतका प्रांजळ नितळपणा क्वचितच दिसतो.

१६) कथा आणि कथेमागची कथा (खंड १ व २) - राजन खान

एक आघाडीचा सर्जनशील कथाकार (आणि कादंबरीकारही) आपल्या कथा लिहिताना काय काय पूर्वतयारी करतो, त्याविषयी कसकसा विचार करतो, त्याला विषय कसे सुचतात, तो ते कसे फुलवतो, अशा वाचकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणारं हे मराठीतलं अभिनव पुस्तक आहे.

१७) मी कसा झालो- आचार्य अत्रे

अत्रे यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, त्यांची भाषा, वाक्यरचना आणि विचारसौंदर्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक लेखन करू इच्छिणाऱ्या प्रत्येकानं वाचलेच पाहिजे.

१८) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे

आजच्या निर्बंधपूर्ण शरीरसंबंधांच्या काळात एकेकाळी भारतात विवाहाचे आणि शरीससंबंधांचे कोणकोणते मार्ग होते, याचा इतिहास यात वाचायला मिळतो.

१९) सारांश - अरुण टिकेकर

आजच्या सामाजिक अनारोग्याची कारणं आणि त्यावरील उपाय या पुस्तकातील सात निबंधांतून जाणून घेता येतात.

२०) तुकारामदर्शन - डॉ. सदानंद मोरे

तुकाराम आधुनिक काळात कुठे कुठे आणि कसेकसे सापडतात, त्याचं या पुस्तकातलं विविधांगी दर्शन थक्क करणारं आहे. तुकाराममहाराज महाराष्ट्राचं जगणं किती व्यापून राहिले आहेत, त्याची यातून प्रचीती येते.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

२१) दगडावरची पेरणी - सय्यदभाई

तोंडी तलाकच्या विरोधात हमीद दलवाई यांच्या प्रेरणेतून आणि स्वत:च्या बहिणीच्या अनुभवातून गेली ३५-४० वर्षं मोहीम चालवणाऱ्या एका जिद्दीच्या कार्यकर्त्याचं हे कार्यकथन आहे.

२२) गांधींनंतरचा भारत - रामचंद्र गुहा, अनु. शारदा साठे

भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास अतिशय नेमकेपणानं, तटस्थपणे आणि रंजकपणे सांगणारं हे पुस्तक भारतीय राजकारण समजून घेण्यासाठी आवर्जून वाचायला हवं.

२३) शाळा - मिलिंद बोकील

पौगंडावस्थेतून प्रत्येक जण जातो. त्यामुळे त्या प्रत्येकाच्या मनात एक ‘शाळा’ असते. कधीतरी शाळेत गेलेल्या आणि कधीही न गेलेल्या असा सर्वांची ही कादंबरी आहे.

२४) नक्षलवादाचे आव्हान - देवेंद्र गावंडे

नक्षलवादी चळवळीचे इतकं जवळून, इतकं सत्य आणि वास्तव चित्रण करणारं हे पुस्तक वाचल्यावर सदसद्विवेदबुद्धी असलेली कुठलीही व्यक्ती नक्षलवादाच्या रोमँटिसिझममध्ये अडकणार नाही.

२५) अरेबियन नाईट्स (खंड १ ते १६)- रीचर्ड बर्टन, अनु. गौरी देशपांडे

माणसांच्या चांगूलपणाच्या, दांभिकतेच्या, नैतिक-अनैतिकतेच्या, वासना-आकांक्षेच्या, असूया-मत्सर-द्वेष आणि सद्भावनेच्या इतक्या धमाल आणि रंजक गोष्टी केवळ याच पुस्तकात वाचायला मिळतात.

.............................................................................................................................................

पूर्वप्रसिद्धी - दै. सकाळ, मुंबई आवृत्ती, १५ ऑक्टोबर २०१८

............................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Chintu M

Sun , 21 October 2018

पुल देशपांडे यांचे एकही पुस्तक जगतापजींना वाचनीय वाटत नाही का ? माझ्या मते पुल देशपांडे यांना वगळून मराठी साहित्याचा विचारही करता येणार नाही.


real india

Sun , 21 October 2018

thank you


santosh singe

Fri , 19 October 2018

सर, आपण वारंवार तीच यादी देता असे दिसते. आपल्याच नावाने ही यादी लोकप्रभेच्या अंकात वाचली होती, आता या वर्षी सकाळ, परत अक्षरनामा. आपण या यादीनंतरची पुस्तके वाचत नाही का?


Makarand Kulkarni

Fri , 19 October 2018

सर ही पुस्तके एकत्रित थोड्या सवलतीत मिळतील का


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......