शेतकऱ्याला पूरक व्यवसायाचे सल्ले देण्याचा फाजिलपणा थांबायला हवा आता!
पडघम - राज्यकारण
देवेंद्र शिरुरकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 04 October 2018
  • पडघम राज्यकारण शेती Agriculture शेतकरी Farmer शेतमाल भाव शरद जोशी Sharad Joshi

साधारणत: कोणत्याही उत्पादकाला त्याच्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार असतो. आपला उत्पादनखर्च आणि व्यावसायिक समीकरण यांचा विचार करून संबंधित उत्पादक आपली वस्तू बाजारात विक्रीस उपलब्ध करून देतो. अगदी पाच रुपयांच्या पेनपासून पंचवीस हजारांच्या वॉशिंग मशिनपर्यंतच्या उत्पादकांना हा स्वत:च्या उत्पादनाचे मूल्य ठरवण्याचा अधिकार बहाल केलेला आहे. याला अपवाद केवळ शेती आणि शेतकऱ्यांचा.

आधुनिक भाषेत उद्योगक्षेत्रातील मार्केट इकॉनॉमी आणि रिस्क फॅक्टर शेती क्षेत्रातही असतोच की. उलट शेतकऱ्याला त्याच्या व्यवसायासाठी प्रतिकूल धोरणे असताना तो आपले उत्पादन बाजारात आणत असतो. नुकसान होण्याची शंभर टक्के हमी असताना तो सरकार आणि निसर्ग या दोन्हींसोबतचे आव्हान पेलत असतो. त्यानंतरही त्याच्या वाट्यास घोर निराशाच येते.

हे सगळे शेती क्षेत्रातच का होते? गल्ली-बोळातल्या छोट्या-मोठ्या स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणारे सरकार १३० कोटी लोकांच्या खाण्याची ददात मिटवणाऱ्यांच्या उद्योगाला, उत्पादनाला प्रोत्साहन देतानाच का माघार घेते? शेतकऱ्यांच्या नशिबी हा असा कायमचा दुष्काळ का मारला जातो? हा आतबट्ट्याचा व्यवहार त्याने आणखी किती दिवस करायचा? हा शेतकऱ्यांसमोरील गहन प्रश्न आहे. पण याहूनही त्याचे गांभीर्य अधिक आहे. केवळ ही व्यवस्था त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते आहे. हे दुर्लक्ष व्यवस्थेला महागडे ठरू नये.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

...............................................................................................................................................................

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सत्ताकाळात भारतात राबवण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांनंतरही खुल्या अर्थव्यवस्थेचा लाभ शेती व त्या क्षेत्रातल्या उत्पादकांच्या वाट्यास येऊ नये का? हे क्षेत्र आणखी किती काळ धोरणात्मक दुष्टचक्रात अडकवून ठेवण्याचा विचार आहे? पक्षीय अभिनिवेश दूर ठेवत या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मात्र ते धाडस दाखवायलाच कोणी तयार नाही. व्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाला या क्षेत्रातील वेदनांमधून काहीतरी साध्य करावयाचे आहे. या क्षेत्रातल्या उणीवांवर स्वत:च्या आकांक्षा साध्य करावयाच्या असतात. या दुष्टचक्राला राजकीय व्यवस्था, समाज, मध्यमवर्गीय साहित्यिक प्रवाह कोणीही अपवाद नाही.

दोन रुपयांची चॉकलेट गोळी निर्माण करणाऱ्याला उत्पादनाचा खर्च काढण्याचे स्वातंत्र्य आहे आणि शेतकऱ्याला ते नाही. हा उफराटा न्याय कशासाठी सहन करावा लागतो जगाच्या पोशिंद्याला? काँग्रेस असो वा भाजप, शेतकऱ्यांसाठी सर्वच राजकीय विचारसरणी व त्या विचारांची सरकारे वांझोटी ठरली आहेत.

शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी एक विधान करत असत- ‘सरकार क्या समस्या सुलझाये, सरकार खुद एक समस्या है’. आजही हे विधान तंतोतंत लागू होते. जागतिक बाजारपेठ आणि शेतकरी यांच्यात एक अभेद्य, अजस्त्र तटबंदी रचणारी व्यवस्था त्यांच्यासाठी मोठीच समस्या आहे. ही तटबंदी बऱ्याच लोकांच्या करिअरसाठी राखीव कुरण बनलेली आहे. कर्जमाफी, वीज फुकट, असले फुटकळ उपाय शेतकऱ्यांना कधीच अपेक्षित नव्हते.

शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणारे, तशी धोरणे राबवणारे सरकार आजवर त्यांना कधीच मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे नाकारण्याचे धाडस भारतातल्या कुठल्याच राजकीय पक्षात नाही. आजवर शेतकऱ्याला अनुकूल, शेतीक्षेत्रास अनुकूल धोरणे, तशी व्यवस्था निर्माण करण्यात आली नाही. शेतीक्षेत्राचे तथाकथित जाणकार, कळवळा व्यक्त करणारे वरवरच्या मलमपट्ट्यांचे देखावे करण्यात सत्ताधीश झालेले आहेत. त्याची किमान हमीभावाची मागणी प्रलंबित ठेवून पूरक व्यवसाय सुचवण्यातच यांचा शहाणपणा जिरून गेला आहे, सिंचनप्रकल्पांप्रमाणे.

जो पिकवतो त्याचे मूल्य त्याला ठरवू द्या आणि मगच करायचे त्या वर्गाचे कोटकल्याण करा, असे सांगण्याचे धाडस शेतकऱ्यांत निर्माण झाले आहे. मात्र या धाडसाला जात, धर्माचा मुलामा देऊन शांत करण्यात येते. मुक्त अर्थव्यवस्थेचा प्रवाह कधी त्याच्या बांधावर, धुऱ्यावर जाऊच देण्यात आला नाही. प्रतिकूल धोरणे, निसर्गाशी खेळ करत पिकवायचे व कवडीमोल भावाने विकून मोकळे व्हायचे, हे भाकित त्याच्या भाळी लिहिले गेले. हे आणखी किती दिवस चालायचे? हा प्रश्न व्यवस्था म्हणून सगळ्यांनीच स्वत:ला विचारण्याची वेळ आली आहे. त्याला पूरक व्यवसायाचे सल्ले देण्याचा फाजिलपणा थांबायला हवा आता.

हे असले सल्ले देणाऱ्यांनी आता ते इतर क्षेत्राला द्यावेत, कारण शेतकऱ्यांच्या संयमाचे बांध फुटायला लागले आहेत आता. सरकार म्हणून, एक व्यवस्था म्हणून एका मोठ्या उत्पादक समाजघटकाला समजून घेण्यात आलेल्या अपयशाचे प्रायश्चित घेण्याची ही वेळ नाही का? त्याला किमान पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या, उत्पादनाचे मूल्य ठरवू द्या तरच तुमच्या जागतिकीकरणाच्या गप्पांना तो साद देईल.

२१ व्या शतकातही शेती, शेतकऱ्यांच्या मानगुटीवरील हे धोरणात्मक गुलामगिरीचे जू अद्याप का शिल्लक ठेवले जात आहे? त्याने काय पिकवावे, कसे व किती पिकवावे, त्याने ते उत्पादन कुठे विकावे व किती किमतीत विकावे? या सगळ्यांची बंधने त्याच्यावर का लादल्या जाताहेत? याचा विचार व्यवस्था कधीतरी करणार आहे का? व्यवस्थेचे हे सगळ्यात मोठे अपयश व्यवस्थेला स्वत:हून कधी स्वीकारायचे आहे काय? या व्यवस्थेतून तो आज स्वत:ला संपवत आहे, उद्या त्याने  आणखी काही संपवायला सुरुवात केली तर... व्यवस्थेला ते परवडणार आहे काय? 

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......