जगातले प्रमुख धर्म तिरस्कार, संघर्ष आणि युद्ध यांविषयी काय म्हणतात?
पडघम - सांस्कृतिक
ओ. पी. घई
  • ओ. पी. घई यांच्या मूळ इंग्रजी व त्याच्या मराठी अनुवादित पुस्तकांची मुखपृष्ठे. दोन्हींमधील चित्र प्रातिनिधिक आहे.
  • Fri , 14 September 2018
  • पडघम सांस्कृतिक ओ. पी. घई O. P. Ghai युनिटी इन डायव्हर्सिटी Unity in Diversity

ओ.पी. घई हे विविध धर्मांचे गाढे अभ्यासक. ते दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल डेव्हलमेंट या संस्थेचे संचालकही होते. त्यांचे ‘Unity in Diversity’ हे इंग्रजी पुस्तक १९८६ साली प्रकाशित झाले. पुढच्याच वर्षी (१९८७) त्याचा ‘विविधतेतून एकता’ या नावाने मराठी अनुवाद प्रकाशित झाला. प्रा. शिरीष चिंधडे यांनी हा अनुवाद केला असून तो दास्ताने रामचंद्र आणि कंपनी, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. जवळपास ११० पाने असलेल्या या छोट्याशा पण महत्त्वाच्या पुस्तकाचे महत्त्व कालातीत आहे.

घई यांनी जवळपास ५० वर्षे विविध धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. त्यातून हे पुस्तक साकारले आहे. या पुस्तकामागची कल्पना सांगताना त्यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे – “…हे लहानसे संकलन प्रसिद्ध करण्यासाठी नेमकी हीच वेळ निवडण्यामागे आज जगात प्रचंड वाढत चाललेली धार्मिक असहिष्णुता हे कारण आहे.” गेल्या पंचवीस-तीस वर्षांत आणि विशेषत: गेल्या चार वर्षांत देशात आणि देशाबाहेरही धार्मिक असहिष्णुता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ही घईप्रस्तुत झलक.

.............................................................................................................................................

तिरस्कार

बौद्ध धर्म

तिरस्कार मानवाचा विनाश करतो. तिरस्काराच्या आहारी जाणारा स्वत:ला आत्मसंयमी म्हणवू शकत नाही.

ख्रिस्ती धर्म

द्वेषाचे नव्हे तर प्रेमाचे साम्राज्य हवे. एखाद्याच्या मनात तिरस्कार असलाच तर धर्मकृत्ये करण्यापूर्वी तो काढून टाकला पाहिजे. तिरस्कार करणे म्हणजे खुनी असणे होय.

कन्फ्यूशयसचा धर्म

कठोरपणे बोलणारे तिरस्कारबुद्धी जागृत करतात. स्वत:कडून भरपूर अपेक्षा ठेवावी, इतरांकडून नव्हे. असे केल्यानेच तिरस्कार टाळता येईल.

हिंदू धर्म

तिरस्काराने संमोहन निर्माण होतो. हृदय तिरस्कारापासून मुक्त असेल तरच शुद्ध विचार आणि सुजाण कृती संभवते.

इस्लाम

अबू अय्यूब अल् अन्सारी याने ईश्वराचा संदेश पुढीलप्रमाणे सांगितलेला आहे – “तीन दिवसांपेक्षा जास्त काळ स्वबंधूपासून विनासंपर्क राहणे आणि भेट झाल्यास काणाडोळा करणे मंजूर होण्यासारखे नाही. अशा दोघांपैकी प्रथम अभिवादन करतो तो चांगला.”

जैन धर्म

तिरस्कार आत्म्याला पायदळी तुडवून अपवित्र बनवतो. चित्तशुद्धी प्राप्त करून घेण्यासाठी वाटेल ती किंमत मोजून तिरस्कार टाळावयास हवा.

ज्यू धर्म

बांधवाचा तिरस्कार हा प्रमाद आहे. तिरस्कारातून संघर्ष निर्माण होतो आणि संघर्षामुळे मनुष्यहानी घडते. केवळ मूर्ख माणसेच तिरस्काराला थारा देतात.

ताओ धर्म

तिरस्काराच्या बदल्यात प्रेम द्या. ज्ञानी पुरुष तिरस्कार न करता सत्कर्म करायचा प्रयत्न करतो. तो वितंडवादात पडत नाही. त्यामुळे कोणी त्याचा प्रतिवाद करण्याचा किंवा तिरस्कार करण्याचा प्रश्नच उदभवत नाही.

शीख धर्म

ईश्वराचे छायीच ज्याचे चित्त विलीन झालेले आहे अशी व्यक्ती कोणाचाही मत्सर करीत नाही.

...................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...................................................................................................................................................................

संघर्ष\युद्ध

बौद्ध धर्म

हेतुत: कोणत्याही प्राणीमात्राची केलेली हत्या मनुष्यास रौरवात टाकते. युद्ध हा मानवाचा आदर्श नसून शांती हे उद्दिष्ट आहे. आणि सर्व धर्मनिष्ठांनी तेच प्राप्त करावयास हवे.

ख्रिस्ती धर्म

शांतीदूतांना ईश्वरी कृपा लाभते, युद्धपिपासू व्यक्तींना नव्हे. जे तलवार उचलतील ते स्वत:च तलवारीचे बळी ठरतील. युद्ध हा विनाशाचा मार्ग आहे आणि शांती हा वैभवाचा, सुखाचा मार्ग होय.

कन्फ्यूशयसचा धर्म

युद्ध नव्हे, तर शांतता नांदावी ही ईश्वराची इच्छा आहे. प्रत्येकाने आपल्या बांधवांसह शांततेने राहिले पाहिजे. बळाने नमविलेल्या माणसाच्या हृदयात बंड असते; परंतु प्रेमाने जिंकलेला सदैव एकनिष्ठ असतो.

हिंदू धर्म

कोणत्याही प्राणीमात्राची हत्या अनुचित होय. सुज्ञ मनुष्य नेहमी संघर्ष टाळून शांततेने राहतो. पार्थिव जीवनाचा आदर्श युद्ध नसून शांतता हा आहे. युद्धाने आपली शक्ती वाढविण्याचा प्रयत्न कोणी करू नये.

इस्लाम धर्म

सर्वांनी शांततेचा शोध घ्यावा. युद्ध भडकलेच तर धर्माचरणी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील. शांती ही ईश्वराची आज्ञा आहे आणि साऱ्या जगाचीच स्थिरता धोक्यात न आणता कोणीच युद्ध करू शकणार नाही.

जैन धर्म

कोणत्याही प्राणीमात्राची कोणत्याही कारणासाठी कदापि हत्या करू नका. पडेल ते मोल देऊन सुज्ञ माणसे सर्वांसह शांततेने राहतात. युद्ध हे पूर्णपणे निषद्ध होय.

ज्यू धर्म

केवळ मूर्खच युद्धाचा मार्ग पत्करतात. सुज्ञ लोक शांततेचा शोध घेतात. शांतीप्रिय आणि निर्बल यांनाच पृथ्वीच्या साम्राज्याचा वारसा प्राप्त होईल. ईश्वर राष्ट्रांचा न्याय करील, तेव्हा युद्धाचा काहीच उपयोग होणार नाही.

ताओ धर्म

युद्धानंतर येणारा काळ नेहमीच यातनामय असतो. चांगला राज्यकर्ता असतो तो राष्ट्रावर युद्धाची पाळी येऊ देत नाही. शस्त्र हे शापित असून दु:खमय आहे.

शीख धर्म

युद्ध समाप्तीचे सर्व मार्ग खुंटले आणि शहाणपणाचा शब्द निरुपयोगी ठरला की, तलवारीचे पाते तळपू देणे हेच योग्य ठरते.

.............................................................................................................................................

या पुस्तकाचा मराठी अनुवाद आता बाजारात उपलब्ध नाही. तो ग्रंथालयात मिळू शकेल. मूळ इंग्रजी पुस्तक पुढील लिंकवरून ऑनलाईन खरेदी करता येईल -

https://www.amazon.in/Sterling-Book-Unity-Diversity-Religions/dp/8120737393/ref=tmm_pap_swatch_0?_encoding=UTF8&qid=&sr=

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

Alka Gadgil

Fri , 14 September 2018

गीते त काय सांगितलेय बरे, अर्जुना बाण मार


Ram Jagtap

Fri , 14 September 2018

@ Ashok Rajwade - दुरुस्ती केली. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!


Ashok Rajwade

Fri , 14 September 2018

संदर्भ: इस्लाम अबू अय्यूब अल् अन्सारी याने ईश्वराचा संदेश पुढीलप्रमाणे सांगितलेला आहे – “तीन दिवसांपेक्षा जास्त काळ स्वबंधूपासून विनासंपर्क राहणे आणि भेट झाल्यास कानाडोळा करणे मंजूर होण्यासारखे नाही. अशा दोघांपैकी प्रथम अभिवादन करतो तो चांगला.” यात 'कानाडोळा' असा शब्द वापरला आहे. पण तो 'काणाडोळा' असा असायला हवा असं वाटतं. -अशोक राजवाडे


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......