विरोधी पक्ष विरुद्ध सत्ताधारी अर्थात महत्त्वाकांक्षांना ‘वास्तवाची’ टाचणी विरुद्ध महत्त्वाकांक्षांना ‘स्वप्नाचं’ खतपाणी!
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 11 August 2018
  • पडघम देशकारण काँग्रेस Congress भाजप BJP राहुल गांधी Rahul Gandhi नरेंद्र मोदी Narendra Modi

संयुक्त जनता दलाचे नेते हरिवंश नारायण सिंग यांना राज्यसभेच्या उप-सभापतीपदाच्या शर्यतीत विजय मिळवून देत सत्ताधाऱ्यांनी आपण प्रत्येक कुरघोडीत सरस ठरल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. लोकसभेत मिळालेल्या अजस्त्र बहुमताच्या जोरावर सत्तेवर विराजमान उजव्यांची वाटचाल प्रारंभी मंदगतीने होती. पण राज्यसभेतील बदलत्या समीकरणानंतर त्यांची गती वाढली. राज्यसभेच्या उप-सभापतीपदाच्या शर्यतीत आपल्याच मित्र पक्षाच्या नेत्याची वर्णी लावल्यानंतर ही गतिमानता निर्धोक असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१९ पर्यंत संसदीय आयुधांसाठी झालेल्या सर्वच लढायांत आपण किती उजवे आहोत, हे उजव्यांनी सिद्ध केले आहे. लोकसभा सभापती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यसभा उपाध्यक्षपद अशा सर्वच महत्त्वाच्या निवडणुकीत विरोधकांना शह देण्यात मोदी-शहा जोडगोळी यशस्वी ठरली आहे.

येत्या लोकसभेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून या सर्व घडामोडी महत्त्वपूर्ण ठरतात. सत्ताधारी आघाडीला पडणारी खिंडारे बुजवण्याची घाई करत भाजपने संयुक्त जनता दल या मित्रपक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सन्मान देण्याची संधी तर साधलीच, शिवाय बिजू जनता दल या नितीशकुमार यांच्या पक्षासारखाच तोंडवळा असलेल्या कुंपणावरच्या पक्षालाही साद घातली आहे.

जयप्रकाश नारायण यांच्या जनआंदोलनाचा वैचारिक वारसा सांगणारे हे दोन्ही समविचारी पक्ष तूर्तास तरी आपल्याकडे असल्याचा संदेश भाजपने विरोधी पक्षांच्या मनोमीलनास उत्सुक धुरिणांना दिला आहे. ‘तू तिथे मी’ अशी गत असलेली शिवसेना, पहिले प्रेम असलेली तेलंगणा राष्ट्र समिती सत्ताधारी आघाडीसोबतच आहेत.

हरिवंश नारायण यांच्या निवडीनंतरचा अंक बिहारमधील लोकसभेच्या जागावाटपाच्या बोलणीत पुरा केला जाईल. तर नवीन पटनाईकांच्या महत्त्वाकांक्षांना खतपाणी घालण्यात येईल. ओडिशात विधान परिषद स्थापन करण्याचा त्यांचा इरादा आहे. लोकसभेपूर्वी भाजपकडून आणखी काही मित्र गोळा केलेले असणारच. कदाचित वायएसआर काँग्रेस, अद्रमुक त्यांच्यासोबत जातील.

याउलट देशातील सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्याची नांदीही अद्याप पाहावयास मिळत नाही. उप-सभापतीपदाच्या शर्यतीसाठी उमेदवार घोषित करण्यास झालेला विलंब अथवा द्रमुकच्या तिरुची सिवा, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांच्या नावांबाबतीत एकमत न होई शकल्यामुळे ऐनवेळी काँग्रेसच्या बी. के. हरिप्रसाद यांना मैदानात उतरवण्यात आले.

२०१९ साली सर्वाधिक जागा काँग्रेसच्या असतील तर आपण पंतप्रधानपदाचे दावेदार असू, या राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर सर्वच विरोधी पक्षांत निर्माण झालेली अस्वस्थता आणखी कशी वाढेल, कुंपणावरचे खेळगडी आणखी कसे वाढतील यासाठी सत्ताधारी आघाडीकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

समविचारी पक्षांचे ऐक्य महत्त्वाचे आहे, पंतप्रधानपदाच्या दावेदारीचे नंतर बघू, असा राहुल गांधी यांचा खुलासा आल्यानंतरही तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची सुप्त महत्त्वाकांक्षा बळावत जातानाच दिसते आहे. ममतांशिवाय पंतप्रधानपदाचे वेड असलेले डझनांहून अधिक नेते रिंगणात आहेत. त्यात नव्यानं दाखल झालेल्या चंद्राबाबूंसह अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक जुन्या जाणत्यांचाही समावेश आहे.

भाजपच्या विचारपूर्वक खेळल्या जाणाऱ्या कृतींना प्रत्युत्तर देण्यासाठी, देशासमोर सत्ताधाऱ्यांना एक सशक्त पर्याय आहे हे दाखवून देण्यासाठी विरोधकांकडून कसल्याच हालचाली होताना दिसत नाहीत. काँग्रेसला अद्याप सूर गवसलेला नाही आणि ममतांनाही तो गवसण्याची शक्यता नाही. संभाव्य मित्र जमवताना त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची ग्वाही द्यावी लागते. आघाडी धर्म पाळताना त्यांच्या कुवतीनुसार मान-सन्मानही द्यावा लागतो.

आजघडीस काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी गत संयुक्त पुरोगामी आघाडीतील रीतीनुसार संभाव्य मित्रांना अशी हमी दिलेली आहेच; पण अद्याप या मित्रांमध्ये म्हणावी तेवढी विश्वासार्हता निर्माण झालेली दिसत नाही. कर्नाटकात काँग्रेसनं बिनशर्थ म्हणून धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या कुमारस्वामी यांना संख्याबळाचा टेकू दिला आहे. त्या संख्याबळाचं ओझं असह्य होत असल्याची तक्रार कुमारस्वामी अधूनमधून करत असतात. त्यामुळे संभाव्य मित्रांच्या जवळ येण्यातील कालावधी वाढत चालला आहे, ही काँग्रेससमोरील मोठी समस्या आहे.

यापूर्वी काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचा हिस्सा असलेल्या मित्रांना समविचारी पक्षांची संयुक्त आघाडी तर हवी आहे, पण त्यांना ती काँग्रेसप्रणीत असायला नको आहे. संसदेत सर्वाधिक सदस्यसंख्या असणाऱ्यांना केंद्रीय महत्त्वाकांक्षा खुणावत आहेत. अशा वेळी त्यांच्या महत्त्वाकांक्षांना वास्तवाची टाचणी लावत ऐक्य साधण्याचं आवाहन प्रमुख विरोधी पक्षासमोर आहे, तर या महत्त्वाकांक्षांना खतपाणी घालणं, ही सध्याच्या सत्ताधाऱ्यांसमोरील अनिवार्य गरज बनली आहे.

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......