संगीत ही अशी कला आहे, जी शिकताना गुरूच्या, शिकवताना शिष्याच्या, सादर करताना श्रोत्यांच्या किंवा आस्वाद घेताना सादरकर्त्याच्या ‘धर्माचं’ विस्मरण होतं…
ग्रंथनामा - झलक
लोकेश शेवडे
  • अश्विनी भिडे-देशपांडे, मालिनीताई राजुरकर, उल्हास कशाळकर, उदय भ‌वाळकर, ‘स्वरभाषिते’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ, दिनकर पणशीकर, श्रुती सडोलीकर-काटकर, नयन घोष, शंकर अभ्यंकर आणि यशवंतबुवा जोशी
  • Tue , 04 July 2023
  • ग्रंथनामा झलक स्वरभाषिते Swarbhashite मालिनीताई राजुरकर Malini Rajurkar उल्हास कशाळकर Ulhas Kashalkar उदय भ‌वाळकर Uday Bhawalkar दिनकर पणशीकर Dinkar Panshikar श्रुती सडोलीकर-काटकर Shruti Sadolikar Katkar अश्विनी भिडे-देशपांडे Ashwini Bhide-Deshpande यशवंतबुवा जोशी Yashvantbuva Joshi शंकर अभ्यंकर Shankar Abhyankar नयन घोष Nayan Ghosh

भारतीय शास्त्रीय संगीतातील मालिनीताई राजुरकर, उल्हास कशाळकर, उदय भ‌वाळकर, दिनकर पणशीकर, श्रुती सडोलीकर-काटकर, अश्विनी भिडे-देशपांडे, यशवंतबुवा जोशी, शंकर अभ्यंकर, नयन घोष अशा नऊ कलावंतांच्या मुलाखतींचा समावेश असलेलं ‘स्वरभाषिते’ हे रोहिणी गोविलकर यांचं पुस्तक नुकतंच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला लेखक-नाटककार लोकेश शेवडे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

प्राचीन काळापासून संगीत, नृत्य, नाट्य, कला, साहित्य या सर्व क्षेत्रांमध्ये उर्वरित जगाशी तुलनीय गती राखत, स्वतंत्र वाटचाल साधलेल्या भारतीय उपखंडाला दस्तऐवजीकरणाबाबत मात्र प्राचीन काळापासूनच वावडं असल्याचं दिसून येतं. त्यामुळे कोणत्याही कलेची वाटचाल नेमकी कशी होत गेली, याबाबत अभ्यासकांना तर्क आणि अंदाजांवर अवलंबून राहावं लागतं. भारतीय संगीताच्या बाबतीत ही बाब अगदी चपखलपणे लागू पडते.

सुरुवातीला दिलेलं छायाचित्र विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांचं आहे. ते अनवधानाने दिलं गेलं. या पुस्तकात उल्लेख मुलाखत असलेल्या ज्येष्ठ सतारवादक पं. शंकर अभ्यंकर यांची ही छायाचित्रं. चुकीबद्दल दिलगीर आहोत. - संपादक

.................................................................................................................................................................

श्रुतिस्थानं, स्वरस्थानं - त्यातून निर्माण होणारे थाट, राग, रागिणी- त्यांचे वादी-संवादी-विवादी- वर्ज्य-वक्री स्वर, आरोह-अवरोह स्वरावली, पकड, ताल, लय अशा अनेकविध नियम-उपनियमांनी करकचून बांधलेलं, पण त्या निर्बंधांच्या कुंपणाच्या आत गायक-वादकाला विहाराचं-विचारांचं-आविष्काराचं संपूर्ण स्वातंत्र्य असलेलं असं ‘शास्त्रीय’ संगीत पृथ्वीतलावर दुसरं नसेल. बुद्धिबळात जसे उंट, घोडा, हत्ती, प्यादं, वझीर अशा प्रत्येक सोंगटीच्या स्थानांना आणि चालींना नियम आहेत, अन्यही अनेक बंधनं आहेत. मात्र ते नियम, बंधनं पाळून पटावरचा पुढचा खेळ पूर्ण मुक्त आहे... हजारो वर्षं हजारो लोक खेळत आहेत.

पण तरी प्रत्येक मातब्बराच्या खेळ्या, त्याच्या चाली, शैली भिन्न आहेत आणि वरून नवनवीन खेळ्या विकसित होतच आहेत, त्या वेगळ्या असंच काहीसं उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताचं आहे. मात्र उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताचा पट बुद्धिबळ किंवा कोणत्याही खेळापेक्षा अधिक कठोर निर्बंध असलेला पण अधिक मुक्तता असलेला अधिक रंगतदार आणि अधिक विस्तीर्ण आहे. याखेरीज या पटावरचे नियम आणि निर्बंधदेखील वेळोवेळी बदलत गेले आहेत, ते अलाहिदा.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

भरतमुनीं-मतंगमुनींपासून शारंगदेवपर्यंत आणि अमीर खुश्रो- तानसेनपासून सदारंग (नैमत खान)- अदारंग (फिरोझ खान) अशा असंख्य दिग्गजांच्या प्रभावांमुळे गंधर्वगान-धृपद-थाट अशी स्थित्यंतरं घडत पुढे बडा खयाल, छोटा खयाल (चीज), तराणा, तिरवट, रासपर्यंत आणि विविध लोकसंगीताच्या प्रभावामुळे टप्पा, ठुमरी, होरी, कजरी, गजलपर्यंत - किंबहुना मराठी नाट्यसंगीतापर्यंत उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत येऊन ठेपलं आणि पुढे बॉलिवुडमध्येही मुसंडी मारत गेलं. या प्रदीर्घ विलोभनीय प्रवासातील गेल्या शतकाच्या प्रारंभापर्यंतचे पुरेसे दस्तावेज उपलब्ध नाहीत. तथापि, अनेक दिग्गजांनी आयुष्य वेचून संशोधन करत आजतागायत बरीच माहिती खणून काढली, अद्यापही नवनवी माहिती मिळवत आहेत, ही समाधानाची बाब.

गेल्या शतकाच्या साठोत्तरी दशकापर्यंत ध्वनिवर्धन, ध्वनिमुद्रणाचे प्रकार, सभागृह याबाबत बरीच उलथापालथ झाल्यामुळे, तीन महत्त्वाचे परिणाम झाले. एक म्हणजे शास्त्रीय संगीताचा श्रोतृवर्ग वाढला. त्यामुळे मैफली बांधण्याची पद्धत श्रोताभिमुख – ‘मॉड्युलर’ बनली. दुसरा- शिक्षणाची गुरुकुल पद्धत मावळत जात, संगीतातल्या घराण्यांचं महत्त्व अस्ताकडे गेलं आणि तिसरा- नवनवीन प्रयोग, नवीन राग, जोड राग, अनवट राग-शैली यांचं ध्वनिमुद्रण होऊ लागल्यामुळे ते जतन होऊ लागलं. अर्थात, अन्य कोणत्याही कलेसारखंच भारतीय संगीताचं स्वरूपही गेल्या शतकात वाहतंच राहिलं. पण या काळात भारतीय संगीतान घेतलेली वळणं पूर्वीपेक्षा संख्येनं आणि वेगानं अधिक होती.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

यापैकी बहुतांश प्रयोगांचं-वळणांचं सांगीतिक मुद्रण सुदैवानं त्या त्या वेळी झालं, तरी ते प्रयोग करण्यामागचे कलाकारांचे विचार, ते प्रयोग करताना, वेगवान वळणं घेताना-त्यांचे कलाकारांच्या आयुष्यावर झालेले विविधांगी परिणाम, कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेकविध बाबींमुळे, कलाकारांच्या परस्पर नातेसंबंधांमुळे त्यांच्या विचारांवर, कलेवर, सादरीकरणावर झालेले परिणाम, असा सर्वंकष आढावा घेणं दुरापास्त असल्यामुळे तो घेऊन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम फारसं झालं नाही. रोहिणी गोविलकरांनी घेतलेल्या मुलाखतीतून हाच आढावा आपोआप साकारत जातो.

मागील शतकाच्या मध्यापासून पुढे ‘माईलस्टोन’ ठरलेल्यांपैकी काही गायकांच्या-कलाकारांच्या मुलाखती रोहिणी गोविलकरांनी घेतल्या आहेत. त्यापैकी पं. यशवंतबुवा जोशी, पं. शंकर अभ्यंकर, पं. दिनकर पणशीकर, विदुषी मालिनीताई राजूरकर, यांच्या संगीत शिक्षणाची सुरुवात शतकाच्या पूर्वार्धात झालेली आहे. तर पं. उदय भवाळकर, पं. उल्हास कशाळकर, विदुषी श्रुती सडोलीकर, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या संगीत शिक्षणाची सुरुवात शतकाच्या उत्तरार्धात झाली आहे.

या मुलाखतींत कलावंतांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घराणी, गुरुकुल पद्धत यांची वर्णनं आली आहेत आणि त्यासोबत अजमेर संगीत शाळा, धृपद केंद्र, गंधर्व महाविद्यालय, संगीत रिसर्च अकॅडमी, अशा स्वतंत्र संस्था, अन्य घराण्यांशी संवाद-सांगीतिक देवाणघेवाण इत्यादी बाबींचेही तपशीलवार उल्लेख आहेत. शिवाय पं. देवधर मास्तर, पं. गजाननबुवा जोशी, पं. गुणिदास, पं. फिरोझ दस्तूर, पं. गुलुभाई जझदानवाला अशा नामांकित गुरुजनांच्या आणि पं. बडे गुलाम अली, गझल सम्राज्ञी बेगम अख्तर, पं. डागर बंधू, पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, विदुषी माणिक वर्मा, अशा उत्तुंग कलावंतांच्या अनुभवांचे संदर्भही आले आहेत.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

या मुलाखतींतून ठळकपणे लक्षात येणाऱ्या दोन गोष्टी नमूद करणं अनिवार्य आहे. एक म्हणजे पं. देवधर मास्तर- पं. गजाननबुवा जोशी यांच्या गुरुस्थानाबाबत, गंधर्व महाविद्यालय-संगीत रिसर्च अकॅडमी या संस्थांच्या संगीत संवर्धनाबाबत आणि पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी यांच्या उत्कृष्ट गायनाबाबत मुलाखत घेतलेल्या बहुतांश कलावंतांकडून कुठे ना कुठे आदरपूर्वक कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला गेला आहे. याचा अर्थ, या संस्था, हे गुरुजन आणि आणि हे कलावंत किमान ५०-७५ वर्षं शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावर अढळ राहिले, इतकी त्यांच्या कर्तृत्वाची व्याप्ती आहे.

दुसरी नमूद करण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाखत घेतलेल्या बहुतांश कलावंतांना उत्कृष्ट ‘संगीत’ हे ‘ईश्वरी’ संकल्पनेशी निगडित वाटतं. असं असूनही त्यांना संगीत सादर करताना श्रोत्यांचा धर्म किंवा ऐकताना सादरकर्त्याचा धर्म आठवत नाही. किंबहुना, त्यांच्या गुरू-शिष्य नात्यामध्ये, अगदी संगीताच्या गुरुकुल पद्धतीतदेखील गुरू-शिष्यांना परस्परांचा धर्म कधी आड आला नाही.

ज्येष्ठ गायिका विदुषी श्रुती सडोलीकर याच पुस्तकातल्या एका मुलाखतीत म्हणतात, “संगीतात कुठल्याही जाति-धर्माशी न जोडता मिळणारा आनंद आहे. हा मुसलमान आनंद, हा हिंदू आनंद, हा ख्रिश्चन आनंद असं काही नसतं… स्वर सुंदर लागल्यावर आतून ज्या ऊर्मी निर्माण होतात, त्याला कुठली जात, भाषा, धर्म नसतो.”

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

याचा अर्थ, संगीत ही अशी कला आहे, जी शिकताना गुरूच्या, शिकवताना शिष्याच्या, सादर करताना श्रोत्यांच्या किंवा आस्वाद घेताना सादरकर्त्याच्या ‘धर्माचं’ विस्मरण होतं आणि ‘ईश्वराचं’ स्मरण होतं! अशी ही अद्भुत ‘स्मरण-विस्मरण’ शक्ती असलेलं भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पोहोचवणं, हे सुज्ञांचं एक आद्यकर्तव्य ठरतं आणि त्यासाठी त्याचा गेल्या अर्धशतकाचा आढावा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणंदेखील!

दिग्गज कलावंतांच्या मुलाखतींद्वारे तो समग्र आढावा साध्या-सोप्या भाषेत मांडणारं, हे पुस्तक पुढच्या अनेक पिढ्यांना अत्यंत मोलाचा ‘दस्तऐवज’ ठरेल, यात शंका नाही.

‘स्वरभाषिते’ – रोहिणी गोविलकर

अक्षर प्रकाशन, मुंबई | पाने – २३१ | मूल्य – ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......