थोर विचारवंत अजित डोभाल यांची नेताजींविषयीची विचारमौक्तिके ही ‘व्हॉट्सॲप विद्यापीठा’स दिलेली मौलिक भेटच!
पडघम - देशकारण
रवि आमले
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सुभाषचंद्र बोस स्मृतिव्याख्यान देताना
  • Mon , 19 June 2023
  • पडघम देशकारण नेताजी Netaji सुभाषचंद्र बोस Subhashchandra Bose फाळणी Partition काँग्रेस Congress गांधी Gandhi नेहरू Nehru Sardar Patel

नेताजी सुभाषचंद्र बोस असते तर, त्यांनी देशाची फाळणी होऊच दिली नसती, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल म्हणाले. निमित्त होते सुभाषचंद्र बोस स्मृतिव्याख्यानाचे. उद्योजक आणि व्यावसायिकांची ‘असोचम’ नावाची शिखर संस्था आहे. तिने दिल्लीत याचे आयोजन केले होते. उद्योजक आणि व्यावसायिकांनाही सुभाषबाबूंचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा होते व ते त्यासाठी अजित डोभाल यांच्यासारख्या थोर अभ्यासकाचे व्याख्यान ठेवतात, ही मोठीच कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.

डोभाल यांनी ‘इंटेलिजन्स ब्युरो’तून निवृत्त झाल्यानंतर दिल्लीतील चाणक्यपुरीत ‘विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन’ हा विचारमंच स्थापन केला. तो स्वतंत्र आणि नि:पक्षपाती आणि राष्ट्रवादी विचारांचा असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात येते. त्यांचा हा राष्ट्रवाद म्हणजे ‘हिंदू राष्ट्रवाद’. तर असा विचारमंच स्थापन करणारी व्यक्ती ही नक्कीच थोर अभ्यासक असणार. या मंचाचे नावही विवेकानंदांवर ठेवले आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा सुभाषबाबूंवर मोठा प्रभाव होता. हे लक्षात घेतले म्हणजे ‘बादरायण’ न्यायाने डोभाल हे नेताजींवर बोलण्यासाठी प्रचंड योग्य व्यक्ती म्हणावे लागतील.

तर त्यांची विचारमौक्तिके जाणून घेण्याची संधी उद्योजक आणि व्यावसायिकांनी भारतास दिली, ही भारताच्या ज्ञान-जीडीपीत त्यांनी घातलेली भरच म्हणावी लागेल. डोभाल यांचे हे भाषण महत्त्वाचे तर आहेच, शिवाय ‘व्हॉट्सॲप विद्यापीठां’साठी ते मौलिक अशी भेट ठरणार असल्याने त्याचा परामर्श घेणे आवश्यक ठरते. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

व्याख्यानाच्या काही मर्यादा असतात. त्यातील एक असते औचित्याची. म्हणजे असे की, ते एखाद्या नेत्याच्या स्मरणार्थ असेल, तर मग त्यात त्या नेत्यावर केवळ स्तुतिसुमनेच उधळावी लागतात. तोच एकमेवाद्वितीय असे सांगावे लागते. लोकही ते समजून घेतात. या भाषणात मात्र डोभाल यांनी नेताजींबाबत बोलताना असे काही केल्याचे दिसत नाही.

पं. जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान करायचा कट रचण्यात आला होता, म्हणून गांधीजींनी नेताजींना काँग्रेसबाहेर काढले. तसे झाले नसते, तर नेताजीच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते. ते असते तर आजचा भारत म्हणजे एक समर्थ असे हिंदुत्त्ववादी राष्ट्र असते, ही जी तमाम उजव्यांचा श्रद्धा आहे, त्याबाबत डोभाल काही बोललेच नाही.

तसे झाले असते तर नेताजींचे संपूर्ण गुणगान गायल्याचे पुण्य त्यांना लाभले असते. या भाषणाच्या ज्या बातम्या उपलब्ध झाल्या, त्यावरून असे दिसते की, त्यांनी नेताजींबाबत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. एक म्हणजे - त्यांच्यातील गांधीजींच्याही विरोधात जाण्याची धमक. हे सांगताना नेताजींच्या मनात गांधींबद्दल परम आदर होता, हेही त्यांनी सांगितले, हे विशेष. गांधींना अजून भारतीय राष्ट्रवादाने पूर्णतः अव्हेरले नाही, हे यातून जाणकारांनी समजून घ्यावे.

दुसरा मुद्दा नेताजींना स्वातंत्र्य हवे होते ते लढून. भीक मागून नव्हे. तिसरी बाब ही की, जीना हे नेता म्हणून केवळ सुभाषबाबूंचाच स्वीकार करू शकत होते. नेताजी हयात असते तर, फाळणी झाली नसती. या दोन वाक्यांतील संबंध नीट लक्षात घेण्याजोगा आहे. पण त्याविषयी पुढे. चौथी बाब, नेताजी हे सेक्युलर होते आणि धार्मिक होते ही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

यातील एकेक मुद्दा महत्त्वाचा आहे. नेताजी यांच्यात जी धमक होती ती निर्विवादच. ते गांधीजींच्या विरोधात गेले, पण ते एकट्या गांधीजींच्याच विरोधात होते? त्यांचा खरा विरोध तर सरदार पटेल आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील उजव्या गटाला होता. त्याचे मूलभूत कारण हा देश स्वातंत्र्यानंतर आधुनिक औद्योगिक समाजवादी देश असेल की नाही, हे होते.

सुभाषबाबूंची काँग्रेस अध्यक्षपदी फेरनिवड करण्यास पटेलांचा विरोध होता तो त्यावरून. सुभाषबाबू काँग्रेसबाहेर पडले ते त्या संघर्षातून. पण डोभाल यांना हे सांगण्याइतका अवसर मिळाला नसावा. ब्रिटिशांशी लढायचे की, सामंजस्याने त्यांना वाटाघाटींच्या टेबलावर आणायचे, हा नेताजी आणि काँग्रेस नेत्यांतील वादाचा एक मुद्दा होता. ब्रिटिशांकडून भीक मागून स्वातंत्र्य मिळाले, हा फोकनाड षड्‌यंत्र सिद्धान्त मांडणाऱ्यांना तथ्यांशी काहीही देणेघेणे नसते.

काँग्रेस ब्रिटिशांशी लढत नव्हती, असे म्हणता येईल काय? मग नेताजींना स्वातंत्र्य लढूनच हवे होते, या म्हणण्यात काय अर्थ आहे? त्यातून डोभाल आणि उजव्या कंपूला हेच ठसवायचे असते की, कोट्यवधी भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसने स्वातंत्र्य हे भीक मागून मिळवले. ते खरे रणानेच मिळायला हवे होते. पण अहिंसात्मक संघर्षाने मिळाले. या गोष्टीची फार वेदना होते त्यांना. त्यातूनच मग पुढे जाऊन ते हे सांगत असतात की, स्वातंत्र्य काय एकट्या गांधींनी मिळवले? त्यात अनेक क्रांतिकारकही होते.

ते बरोबरच आहे. सत्ता जशी एकट्या मोदींनी मिळवलेली नसते. त्यात ‘पन्नाप्रमुखा’चेही योगदान असते, तसेच हे. पण सर्वसाधारणतः बोलताना नाव घेतले जाते ते नेत्याचे, पण एवढा मेंदू कोण चालवणार? असो. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

डोभाल भाषणातील पुढचा मुद्दा फाळणीचा. ‘सुभाषबाबू असते तर, देशाची फाळणी झाली नसती… जीना म्हणाले होते, मी फक्त एकच नेता स्वीकारीन. तो म्हणजे सुभाषचंद्र बोस,’ असे डोभाल म्हणाले. एका श्वासात आलेली दोन वाक्ये एकमेकांतील अंतर्संबंध सांगत असतात. डोभाल यांच्या या वाक्यांचा भावार्थ असा की, बोस हे फाळणीच्या विरोधात होते.

ते खरेच आहे. या देशात १९३३ पासून ‘द्विराष्ट्र सिद्धान्त’ नांदत होता. सर सय्यद अहमद खान, चौधरी रहमत अली ही त्याची अध्वर्यू मंडळी. वि. दा. सावरकरांनी हिंदूराष्ट्राचा सिद्धान्त मांडला. फाळणीची बीजे आहेत ती यात. याला काँग्रेसचा विरोधच होता. नेताजी हे तर मुस्लीम लीग आणि हिंदू महासभा यांच्या विरोधात होते. याचे कारण एक तर ते काँग्रेसी होते आणि कमालीचे सेक्युलर होते. त्यामुळे ते १९४७मध्ये असते, तर त्यांनी फाळणीला विरोध केलाच असता.

पण - आता जर ‘जर-तर’च्या भाषेतच बोलायचे आहे, तर - तेव्हाची हिंदुस्थानातील परिस्थिती पाहता त्यांनाही नाईलाजाने होकारच द्यावा लागला असता. जसा तो सरदारांनी, नेहरूंनी आणि सरते शेवटी महात्मा गांधींनी दिला. हिंदू आणि मुस्लीम कट्टरतावाद्यांनी एकमेकांचे गळे चिरावेत, एकमेकांना हाकलून देण्याची मागणी करावी, त्यातून राष्ट्र दुभंगावे. आणि ते दुभंगले की त्याचा दोष कुणाचा, तर काँग्रेसचा?

हे हिंदुत्ववाद्यांनी भलेही मानावे, पण ते तार्किकतेच्या आणि तत्कालिन वास्तवाच्या कुठल्याही कसोटीवर खरे ठरत नाही, हे सर्वांनी ध्यानात घ्यावे. जीना नेताजींना नेता म्हणून स्वीकारण्यास तयार होते, म्हणून नेताजी असते, तर फाळणी टळली असती, असे म्हणणे यात शुद्ध लबाडी आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

ब्रिटिशविरोधी लढ्यात काँग्रेस, हिंदू महासभा, मुस्लीम लीग यांनी एकत्र यावे, हे सुभाषबाबूंचे आवाहन होते. त्याला जीनांनी किती साथ दिली आणि हिंदू महासभेने हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पण तरीही डोभाल असे म्हणतात, याचे कारण त्यांना हे सांगायचे असते की, नेहरूंमुळे फाळणी झाली. फाळणीचे खरे गुन्हेगार तेव्हा एकमेकांची डोकी फोडणारे धार्मिक कट्टरतावादी होते, हा इतिहास लपवून, चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे एक कारस्थान वर्षानुवर्षे येथील कुजबुज आघाड्यांनी चालवले. त्याचाच हा भाग. हे म्हणजे मुला-सुनांनी एकमेकांशी भांडून घर फोडावे आणि दोष म्हातारा-म्हातारीला द्यावा, तसेच झाले.

नेताजी हे सेक्युलर होते हे खरेच. ‘धार्मिक बाबतीत जगा आणि जगू द्या हे तत्त्व आणि आर्थिक व राजकीय मुद्द्यांवर एकमेकांना समजून घेणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे,’ असे म्हणणारे नेताजी. ‘वंदे मातरम्’ची कडवी गाळण्याच्या वादात गांधीजी आणि रविंद्रनाथांच्या बाजूने ठाम उभे राहणारे नेताजी. समाजवादी विचारांचे काँग्रेसी नेताजी. ते सेक्युलरच होते आणि धार्मिकही होते. ‘गीता’ वाचत असत ते. सेक्युलर व्यक्ती धार्मिक नसते, असे कोण म्हणाले? सेक्युलरॅझिम म्हणजे काही नास्तिकवाद नाही. धर्म घरातच ठेवा, राज्य कारभारात आणू नका, जगा आणि जगू द्या, एवढेच सेक्युलॅरिझम सांगत असतो. नेताजीही तेच सांगत होते. तेव्हा, महात्मा गांधी हे जसे धार्मिक होते, तसेच नेताजीही होते. त्यात विशेष असे काही नाही.

डोभाल यांनी त्यांच्या भाषणात एक बाब मात्र सांगितली नाही. १९४५नंतर नेताजी असते, तर फाळणीचे काय झाले असते, ते माहीत नाही, ते पंतप्रधान झाले असते की काय, हाही वादाचा मुद्दा आहे, कारण त्या वेळी सरदार पटेलांचा काँग्रेस संघटनेतील अख्खा गट त्यांच्या विरोधात होता, पण एक मात्र नक्की की, समजा ते पंतप्रधान झाले असते, तर त्यांनी पहिल्यांदा येथील कट्टरतावाद्यांचा कायमचा बिमोड केला असता. हा देश सेक्युलर आणि समाजवादी राहील, हेच त्यांनी पाहिले असते. त्याकरता प्रसंगी त्यांनी हातात अधिकारशाहीचा असूड घेतला असता.

.................................................................................................................................................................

लेखक लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, ‘मनोविकास’ प्रकाशित ‘बदलता भारत’ या महाग्रंथात त्यांच्या ‘नेताजींचे गूढ, काँग्रेस आणि उजवे राजकारण’ या प्रदीर्घ प्रकरणाचा समावेश आहे.

ravi.amale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......