एन. राम, शेखर गुप्ता आणि नरेश फर्नांडिस हे तिन्ही संपादक पुरोगामी व सेक्युलर आहेत, आणि आपल्या विचारकार्यासाठी भारतीय संविधान प्रमाण मानतात
ग्रंथनामा - झलक
विनोद शिरसाठ
  • ‘तीन संपादकांच्या मुलाखती’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 18 March 2023
  • ग्रंथनामा झलक तीन संपादकांच्या मुलाखती एन. राम शेखर गुप्ता नरेश फर्नांडिस

‘तीन संपादकांच्या मुलाखती’ हे ‘द हिंदू’चे माजी संपादक एन.राम, ‘द प्रिंट’चे संपादक शेखर गुप्ता आणि ‘स्क्रोल’चे संपादक नरेश फर्नांडिस या भारतातील तीन राष्ट्रीय पातळीवरील प्रभावशाली संपादकांच्या मुलाखतींचे पुस्तक नुकतेच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला ‘साधना’ साप्ताहिक व ‘कर्तव्य साधना’ पोर्टल, यांचे संपादक विनोद शिरसाठ यांनी लिहिलेले हे प्रास्ताविक...

.................................................................................................................................................................

‘साधना’ साप्ताहिकाचा ७३वा वर्धापनदिन आणि ‘कर्तव्य साधना’ या डिजिटल पोर्टलचा पहिला वर्धापनदिन १५ ऑगस्ट २०२० रोजी येत होता. तेव्हा इंग्रजीतील तीन नामवंत संपादकांच्या मुलाखती घ्यायच्या आणि ‘कर्तव्य साधना’वर इंग्रजीतून, तर ‘साधना’ साप्ताहिकातून मराठीत विशेषांक रूपात प्रसिद्ध करायच्या, असे नियोजन केले होते. त्या प्रक्रियेतून आकाराला आलेल्या तीन संपादकांच्या मुलाखती आता अडीच वर्षांनंतर पुस्तक रूपातही येत आहेत.

या तीन मुलाखती इंग्रजीतून घेणे, त्यांचे शब्दांकन करणे आणि मग अनुवाद करणे, असे तीन टप्पे होते. हे सर्व काम चार तरुणांनी केले आहे. यातील एन.राम यांची प्रत्यक्ष भेटून पुणे शहरात मुलाखत घेणे (डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती कार्यक्रमाला ते २० ऑगस्ट २०१९ रोजी आले तेव्हा) आणि नरेश फर्नांडिस यांची मुलाखत फोनवरून घेणे आणि त्या दोन्ही मुलाखतींचे शब्दांकन करणे, हे सर्व काम संकल्प गुर्जर या तरुणाने केले. शेखर गुप्ता यांची मुलाखत व्हिडिओ कॉलद्वारे घेणे आणि तिचे शब्दांकन करणे, हे काम जायली वाव्हळ या तरुणीने केले. त्याचप्रमाणे एन.राम व शेखर गुप्ता यांच्या मुलाखतींचे अनुवाद प्रभाकर पानवलकर या तरुणाने केले, तर नरेश फर्नांडिस यांच्या मुलाखतीचा अनुवाद सुहास पाटील या तरुणाने केला आहे.

या मुलाखती घेण्याची संकल्पना व सर्वसाधारण रूपरेषा जरी आम्ही दिली असली तरी, सर्व प्रश्न तयार करणे आणि मुलाखतींची कार्यवाही संकल्प व जायली यांनीच पार पाडली आहे. त्याचप्रमाणे अनुवादाचे कामही प्रभाकर व सुहास यांनी केले आहे. हे सर्व ठळकपणे अधोरेखित करण्याचे कारण, हे तपशील सांगितले नाहीत, तर कोणाही प्रगल्भ वाचकांच्याही ते लक्षातही येणार नाही, इतके हे काम परिपक्व झाले आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

एन.राम, शेखर गुप्ता आणि नरेश फर्नांडिस हे तीन संपादक मुलाखतींसाठी का निवडले आणि त्यांच्या मुलाखतींचा फोकस थोडा-थोडा वेगळा का ठरवला, याची चांगली कल्पना या मुलाखती वाचून येईलच. पण इथे आमचे मानस थोडक्यात स्पष्ट करणे आवश्यक वाटते. पहिला मुद्दा हा होता की, पत्रकारितेला असलेले वैश्विक परिमाण लक्षात घेता तिन्ही संपादक इंग्रजीतील घ्यावेत. दुसरा मुद्दा होता, तीन वेगवेगळ्या पिढ्यांचे म्हणता येतील असे घ्यावेत. तिसरा मुद्दा, तिघेही वेगवेगळ्या माध्यमांत काम केलेले असावेत. आणि चौथा मुद्दा होता, तिघांच्याही दृष्टिकोनांत काहीअंशी फरक असेल, मात्र ते प्रभावशाली असावेत आणि पत्रकारितेच्या नीतिमूल्यांशी त्यांची बांधीलकी पक्की असावी. त्यातून पटकन समोर आलेली ही तीन नावे आहेत.

एकूणात विचार करता, भारतातील सर्वोत्कृष्ट इंग्रजी वृत्तपत्र म्हणून १४५ वर्षांची परंपरा असलेल्या ‘द हिंदू’चा उल्लेख करावा लागेल, असे आम्हाला वाटते. म्हणून या वृत्तपत्राची मालकी ज्या अय्यंगार कुटुंबाकडे मागील ११५ वर्षांपासून आहे, त्या कुटुंबाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी असलेले एन.राम यांच्याच तोंडून त्या वृत्तपत्राची महती नेमकी कशात दडली आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

दुसरे, राजकीय भूमिका सातत्याने घेणे आणि त्याचा प्रभाव पडत राहणे या बाबतीत तरी ‘इंडियन एक्सप्रेस’ अव्वल नंबरवर आहे. तिथे शेखर गुप्ता तब्बल दोन दशके मुख्य संपादकाच्या भूमिकेत राहिले आहेत; शिवाय त्यांनी सुरुवातीच्या काळात दशकभर ‘इंडिया टुडे’ या पाक्षिकात व गेल्या चार वर्षांत ‘द प्रिंट’ या डिजिटल पोर्टलवर केलेले कामही लक्षणीयच आहे. त्यामुळे त्यांनी त्या तिन्ही टप्प्यांवर केलेली पत्रकारिता समजून घेणे, कमालीचे रोचक असणार हे उघड होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

आणि डिजिटल पोर्टल हे माध्यम भारतात अद्याप बाल्यावस्थेत असले तरी, मागील साडेसहा वर्षे ‘स्क्रोल’ हे पोर्टल सर्व बाजूंनी क्रमाक्रमाने विकसित होत राहिले आहे. त्यामुळे त्याचे संपादक नरेश फर्नांडिस यांच्याकडून हे नवे माध्यम समजून घेणे आवश्यक वाटले.

एन. राम हे वयाच्या पंचाहत्तरीत आहेत, शेखर गुप्ता यांनी पासष्टी पार केलेली नाही आणि नरेश फर्नांडिस हे पन्नाशीच्या दरम्यान आहेत. म्हणजे मर्यादित अर्थाने का होईना तिघे तीन पिढ्यांचे आहेत. अनुक्रमे चेन्नई, दिल्ली, मुंबई या तीन महानगरांत त्या तिघांनी काम केले आहे, देशाच्या तीन टोकांवर असलेल्या या महानगरांतील वास्तव्याचा त्यांच्या जडण-घडणीवर व दृष्टिकोनांवर काहीएक परिणाम निश्चित झालेला असणार. मात्र तिघेही पुरोगामी व सेक्युलर आहेत आणि आपल्या विचारकार्यासाठी भारतीय संविधान प्रमाण मानतात. आणि म्हणून बरेच मंथन होईल, पण तिघांच्या मुलाखतीतून एकसंध व मूलभूत म्हणावे असे काही बाहेर येईल हे उघड होते.

आणि ते आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगले आले आहे. इतके की, एकाच अवाढव्य व प्राचीन वृक्षाच्या तीन मोठ्या फांद्या आहेत, असे सुखद आश्चर्य या मुलाखती वाचून आम्हाला वाटले. मात्र खंत वाटावी असे आश्चर्य हे आहे की, या तिघांच्याही इतक्या दीर्घ व या प्रकारच्या मुलाखती इंग्रजीमध्ये अन्यत्र कुठेही प्रसिद्ध झालेल्या नाहीत, अन्य भाषांमध्येही झालेल्या असण्याची शक्यता कमी आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

भारतात इंग्रजी पत्रकारितेचा इतिहास सव्वादोनशे वर्षांचा आहे, आणि मराठी पत्रकारितेलाही आता १९० वर्षांची परंपरा आहे. १८३२मध्ये बाळशास्त्री जांभेकर या वीस वर्षांच्या तरुणाने ‘दर्पण’ हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी ‘दिग्दर्शन’ हे मासिक सुरू केले. केवळ ३४ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बाळशास्त्री यांना मराठी पत्रकारितेचे जनक असे संबोधले जाते. त्यांनी ठेवलेली ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ ही नावे इतकी समर्पक आहेत की, कोणत्याही काळातील, कोणत्याही देशातील व कोणत्याही भाषेतील पत्रकारितेची मूलतत्त्वे याच दोन शब्दांत सांगता येतील.

आणि याच पार्श्वभूमीवर प्रस्तुत अंकातील तीन मुलाखतींकडे पाहिले, तर यामधून पत्रकारितेच्या नीतिमूल्यांचे प्रतिबिंब निश्चित दिसेल. एवढेच नाही तर, एका मर्यादित अर्थाने हे पुस्तक म्हणजे एक छोटा आरसा आहे, असेही वाटू शकेल. अर्थातच, गांभीर्याने पत्रकारिता करू पाहणाऱ्या कोणालाही या मुलाखतींमधून ठोस दिशा सापडून किती दूरवरचे दिसेल, याबाबतचा दावा आम्ही करू इच्छित नाही, पण कोणत्या दिशेने जाऊ नये, हे यातून ठळकपणे पुढे आले आहे हे मात्र निश्चित!

‘तीन संपादकांच्या मुलाखती’ – संवादक - संकल्प गुर्जर, जायली वाव्हळ | अनुवाद प्रभाकर पानवलकर, सुहास पाटील साधना प्रकाशन, पुणे | पाने – ७६ | मूल्य – ९० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......