एन. राम, शेखर गुप्ता आणि नरेश फर्नांडिस हे तिन्ही संपादक पुरोगामी व सेक्युलर आहेत, आणि आपल्या विचारकार्यासाठी भारतीय संविधान प्रमाण मानतात
ग्रंथनामा - झलक
विनोद शिरसाठ
  • ‘तीन संपादकांच्या मुलाखती’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 18 March 2023
  • ग्रंथनामा झलक तीन संपादकांच्या मुलाखती एन. राम शेखर गुप्ता नरेश फर्नांडिस

‘तीन संपादकांच्या मुलाखती’ हे ‘द हिंदू’चे माजी संपादक एन.राम, ‘द प्रिंट’चे संपादक शेखर गुप्ता आणि ‘स्क्रोल’चे संपादक नरेश फर्नांडिस या भारतातील तीन राष्ट्रीय पातळीवरील प्रभावशाली संपादकांच्या मुलाखतींचे पुस्तक नुकतेच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला ‘साधना’ साप्ताहिक व ‘कर्तव्य साधना’ पोर्टल, यांचे संपादक विनोद शिरसाठ यांनी लिहिलेले हे प्रास्ताविक...

.................................................................................................................................................................

‘साधना’ साप्ताहिकाचा ७३वा वर्धापनदिन आणि ‘कर्तव्य साधना’ या डिजिटल पोर्टलचा पहिला वर्धापनदिन १५ ऑगस्ट २०२० रोजी येत होता. तेव्हा इंग्रजीतील तीन नामवंत संपादकांच्या मुलाखती घ्यायच्या आणि ‘कर्तव्य साधना’वर इंग्रजीतून, तर ‘साधना’ साप्ताहिकातून मराठीत विशेषांक रूपात प्रसिद्ध करायच्या, असे नियोजन केले होते. त्या प्रक्रियेतून आकाराला आलेल्या तीन संपादकांच्या मुलाखती आता अडीच वर्षांनंतर पुस्तक रूपातही येत आहेत.

या तीन मुलाखती इंग्रजीतून घेणे, त्यांचे शब्दांकन करणे आणि मग अनुवाद करणे, असे तीन टप्पे होते. हे सर्व काम चार तरुणांनी केले आहे. यातील एन.राम यांची प्रत्यक्ष भेटून पुणे शहरात मुलाखत घेणे (डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती कार्यक्रमाला ते २० ऑगस्ट २०१९ रोजी आले तेव्हा) आणि नरेश फर्नांडिस यांची मुलाखत फोनवरून घेणे आणि त्या दोन्ही मुलाखतींचे शब्दांकन करणे, हे सर्व काम संकल्प गुर्जर या तरुणाने केले. शेखर गुप्ता यांची मुलाखत व्हिडिओ कॉलद्वारे घेणे आणि तिचे शब्दांकन करणे, हे काम जायली वाव्हळ या तरुणीने केले. त्याचप्रमाणे एन.राम व शेखर गुप्ता यांच्या मुलाखतींचे अनुवाद प्रभाकर पानवलकर या तरुणाने केले, तर नरेश फर्नांडिस यांच्या मुलाखतीचा अनुवाद सुहास पाटील या तरुणाने केला आहे.

या मुलाखती घेण्याची संकल्पना व सर्वसाधारण रूपरेषा जरी आम्ही दिली असली तरी, सर्व प्रश्न तयार करणे आणि मुलाखतींची कार्यवाही संकल्प व जायली यांनीच पार पाडली आहे. त्याचप्रमाणे अनुवादाचे कामही प्रभाकर व सुहास यांनी केले आहे. हे सर्व ठळकपणे अधोरेखित करण्याचे कारण, हे तपशील सांगितले नाहीत, तर कोणाही प्रगल्भ वाचकांच्याही ते लक्षातही येणार नाही, इतके हे काम परिपक्व झाले आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

एन.राम, शेखर गुप्ता आणि नरेश फर्नांडिस हे तीन संपादक मुलाखतींसाठी का निवडले आणि त्यांच्या मुलाखतींचा फोकस थोडा-थोडा वेगळा का ठरवला, याची चांगली कल्पना या मुलाखती वाचून येईलच. पण इथे आमचे मानस थोडक्यात स्पष्ट करणे आवश्यक वाटते. पहिला मुद्दा हा होता की, पत्रकारितेला असलेले वैश्विक परिमाण लक्षात घेता तिन्ही संपादक इंग्रजीतील घ्यावेत. दुसरा मुद्दा होता, तीन वेगवेगळ्या पिढ्यांचे म्हणता येतील असे घ्यावेत. तिसरा मुद्दा, तिघेही वेगवेगळ्या माध्यमांत काम केलेले असावेत. आणि चौथा मुद्दा होता, तिघांच्याही दृष्टिकोनांत काहीअंशी फरक असेल, मात्र ते प्रभावशाली असावेत आणि पत्रकारितेच्या नीतिमूल्यांशी त्यांची बांधीलकी पक्की असावी. त्यातून पटकन समोर आलेली ही तीन नावे आहेत.

एकूणात विचार करता, भारतातील सर्वोत्कृष्ट इंग्रजी वृत्तपत्र म्हणून १४५ वर्षांची परंपरा असलेल्या ‘द हिंदू’चा उल्लेख करावा लागेल, असे आम्हाला वाटते. म्हणून या वृत्तपत्राची मालकी ज्या अय्यंगार कुटुंबाकडे मागील ११५ वर्षांपासून आहे, त्या कुटुंबाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी असलेले एन.राम यांच्याच तोंडून त्या वृत्तपत्राची महती नेमकी कशात दडली आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

दुसरे, राजकीय भूमिका सातत्याने घेणे आणि त्याचा प्रभाव पडत राहणे या बाबतीत तरी ‘इंडियन एक्सप्रेस’ अव्वल नंबरवर आहे. तिथे शेखर गुप्ता तब्बल दोन दशके मुख्य संपादकाच्या भूमिकेत राहिले आहेत; शिवाय त्यांनी सुरुवातीच्या काळात दशकभर ‘इंडिया टुडे’ या पाक्षिकात व गेल्या चार वर्षांत ‘द प्रिंट’ या डिजिटल पोर्टलवर केलेले कामही लक्षणीयच आहे. त्यामुळे त्यांनी त्या तिन्ही टप्प्यांवर केलेली पत्रकारिता समजून घेणे, कमालीचे रोचक असणार हे उघड होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

आणि डिजिटल पोर्टल हे माध्यम भारतात अद्याप बाल्यावस्थेत असले तरी, मागील साडेसहा वर्षे ‘स्क्रोल’ हे पोर्टल सर्व बाजूंनी क्रमाक्रमाने विकसित होत राहिले आहे. त्यामुळे त्याचे संपादक नरेश फर्नांडिस यांच्याकडून हे नवे माध्यम समजून घेणे आवश्यक वाटले.

एन. राम हे वयाच्या पंचाहत्तरीत आहेत, शेखर गुप्ता यांनी पासष्टी पार केलेली नाही आणि नरेश फर्नांडिस हे पन्नाशीच्या दरम्यान आहेत. म्हणजे मर्यादित अर्थाने का होईना तिघे तीन पिढ्यांचे आहेत. अनुक्रमे चेन्नई, दिल्ली, मुंबई या तीन महानगरांत त्या तिघांनी काम केले आहे, देशाच्या तीन टोकांवर असलेल्या या महानगरांतील वास्तव्याचा त्यांच्या जडण-घडणीवर व दृष्टिकोनांवर काहीएक परिणाम निश्चित झालेला असणार. मात्र तिघेही पुरोगामी व सेक्युलर आहेत आणि आपल्या विचारकार्यासाठी भारतीय संविधान प्रमाण मानतात. आणि म्हणून बरेच मंथन होईल, पण तिघांच्या मुलाखतीतून एकसंध व मूलभूत म्हणावे असे काही बाहेर येईल हे उघड होते.

आणि ते आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगले आले आहे. इतके की, एकाच अवाढव्य व प्राचीन वृक्षाच्या तीन मोठ्या फांद्या आहेत, असे सुखद आश्चर्य या मुलाखती वाचून आम्हाला वाटले. मात्र खंत वाटावी असे आश्चर्य हे आहे की, या तिघांच्याही इतक्या दीर्घ व या प्रकारच्या मुलाखती इंग्रजीमध्ये अन्यत्र कुठेही प्रसिद्ध झालेल्या नाहीत, अन्य भाषांमध्येही झालेल्या असण्याची शक्यता कमी आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

भारतात इंग्रजी पत्रकारितेचा इतिहास सव्वादोनशे वर्षांचा आहे, आणि मराठी पत्रकारितेलाही आता १९० वर्षांची परंपरा आहे. १८३२मध्ये बाळशास्त्री जांभेकर या वीस वर्षांच्या तरुणाने ‘दर्पण’ हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी ‘दिग्दर्शन’ हे मासिक सुरू केले. केवळ ३४ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बाळशास्त्री यांना मराठी पत्रकारितेचे जनक असे संबोधले जाते. त्यांनी ठेवलेली ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ ही नावे इतकी समर्पक आहेत की, कोणत्याही काळातील, कोणत्याही देशातील व कोणत्याही भाषेतील पत्रकारितेची मूलतत्त्वे याच दोन शब्दांत सांगता येतील.

आणि याच पार्श्वभूमीवर प्रस्तुत अंकातील तीन मुलाखतींकडे पाहिले, तर यामधून पत्रकारितेच्या नीतिमूल्यांचे प्रतिबिंब निश्चित दिसेल. एवढेच नाही तर, एका मर्यादित अर्थाने हे पुस्तक म्हणजे एक छोटा आरसा आहे, असेही वाटू शकेल. अर्थातच, गांभीर्याने पत्रकारिता करू पाहणाऱ्या कोणालाही या मुलाखतींमधून ठोस दिशा सापडून किती दूरवरचे दिसेल, याबाबतचा दावा आम्ही करू इच्छित नाही, पण कोणत्या दिशेने जाऊ नये, हे यातून ठळकपणे पुढे आले आहे हे मात्र निश्चित!

‘तीन संपादकांच्या मुलाखती’ – संवादक - संकल्प गुर्जर, जायली वाव्हळ | अनुवाद प्रभाकर पानवलकर, सुहास पाटील साधना प्रकाशन, पुणे | पाने – ७६ | मूल्य – ९० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......