मार्क्सचा ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ झाला १७० वर्षांचा!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
शशिकांत सावंत
  • ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’चं एक मुखपृष्ठ आणि कार्ल मार्क्स
  • Sun , 26 February 2017
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो कार्ल मार्क्स Karl Marx द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो The Communist Manifesto फेडरिक एंजल्स Friedrich Engels

२४ फेब्रुवारी १८४८ रोजी लंडनमध्ये २३ पानांची एक छोटी पत्रिका प्रसिद्ध झाली. त्यात असे म्हटले होतं की, आधुनिक उद्योगानं जगात क्रांती केली आहे. याने  केलेल्या गोष्टीने आजवरच्या सगळ्या महान संस्कृतीने केलेल्या - मग त्यात इजिप्तशियन पिऱ्यामिड आले, रोमन बांधकामं आली- गोष्टींनर मात केली आहे. औद्योगिक क्रांतीमध्ये आलेल्या गोष्टी रेल्वे, टेलिग्राफ, वाफेवर चालणाऱ्या बोटी यांनी एक प्रचंड मोठी उत्पादक ऊर्जा मोकळी केली आहे. मुक्त व्यापाराच्या नावाखाली तीनही राष्ट्रांच्या सीमा नाहीशा केल्या आहेत. वस्तूंच्या किमती कमी केल्या आहेत आणि या ग्रहाला कॉस्मोपॉलिटिन बनवलं आहे. तसंच इंटर इंडिपेंडंटही. आता वस्तू आणि कल्पना मुक्तपणे कुठेही जाऊ शकतात. याच व्यवस्थेनं जुनी पायऱ्या पायऱ्यांची रचना तयार केली आहे. आज लोकांना आपले पूर्वज किंवा धर्म यावरून त्यांचं महानपण ठरतं असं वाटत नाही. सर्व माणसं एक दुसऱ्यासारखी आहेत. इतिहासात प्रथमच स्त्री-पुरुष हे बघू शकतात की, आपलं इतरांशी नातं कसं आहे.

उत्पादनाच्या नव्या पद्धती, दळणवळण आणि वितरण यामुळे उदंड संपत्ती निर्माण झाली आहे. पण एक समस्या आहे ही संपत्ती कधीच समान पद्धतीनं वितरीत झाली नाही. जगातील दहा टक्के लोकांनी कायमच संपत्ती हडप केली आहे आणि ९० टक्क्यांकडे जवळपास काहीच नाही. शहरांचं औद्योगिकीकरण होत आहे, तसतशी संपत्ती मूठभरांच्या हातात अधिकाधिक एकवटली जातेय. श्रीमंत श्रीमंत होत आहेत आणि मध्यमवर्गीयांची समस्या मजूर वर्गाप्रमाणे होत आहे. लवकरच जगात दोन पद्धतीची माणसं असतील. एक म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची मालमत्ता आहे आणि दुसरी म्हणजे अशी माणसं जी स्वतःचे श्रम विकत आहेत. पूर्वी असमानता ही नैसर्गिक आणि दैवदत्त वाटायची. जगभरचे मजूर ही व्यवस्था नीट पाहू शकतील आणि एक दिवस उठाव करतील आणि फेकून देतील.

ही सारं लिहिणाऱ्या लेखकाचं नाव होतं- कार्ल मार्क्स आणि त्या पुस्तिकेचं नाव होतं- ‘द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’. आजही त्यातली अनेक भाकितं चुकलेली नाहीत.

नुकतीच कार्ल मार्क्सची दोन चरित्रं प्रसिद्ध झाली आहेत. पहिल्या चरित्राचं नाव आहे- ‘कार्ल मार्क्स इन ९० सेन्चुरी लाईफ’. जोनाथन स्पेरबर हे त्याच्या लेखकाचं नाव. तर दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे, ‘कार्ल मार्क्स ग्रेटनेस अँड इलुजन’. लेखक आहेत, गॅरेस स्टेडमन जोन्स. भूतकाळाचं वर्तमानात रूपांतर करण्याचं काम नेहमीच अभ्यासक करत असतात. जोनाथन बर्बर विद्यापीठात शिकवतात, तर जोन्स क्वीन मेरी विद्यापीठामध्ये.

मार्क्स हा जगातील एक मोठा लढवय्या होऊन गेला. त्याचं बरंचसं लेखन हे त्या त्या विषयानुरूप असायचं. थोडंसं पत्रकारितेनुसारही. मार्क्स निरंतर लेखन करे. त्या लेखनात त्याने भल्या भल्यावर प्रहार केले. अगदी हेगेलसारख्या लेखकावरही. तो कायम तात्त्विक घडामोडीचा विश्लेषण करायचा. आज जो मार्क्स माहीत आहे, त्यापेक्षा मार्क्स वेगळा नव्हता. पण जो जरा अधिक व्हिक्टोरीयन होता, असा वरील चरित्रांचा दावा आहे.

मिशेल फुकोनं म्हटल्याप्रमाणे मार्क्स हा कुठल्याही वाद-चर्चेचा, डिसकोर्सचा प्रणेता होता. आजवर त्याच्या नावानं प्रचंड पुस्तकं आणि लेख लिहिले गेले आहेत. मार्क्सच्या धगधगत्या बुद्धिमत्तेनं विचारवंतांना आणि वाचकांना बौद्धिक खाद्य दिलं आहे. आज दीडशे वर्षानंतरही ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’सारखं पुस्तक ताजंतवानं वाटतं. खरं तर औद्योगिकीकरणावर आणि भांडवलशाहीवर टीका करणारा मार्क्स काही एकटाच नव्हता, पण तो एकमेव क्रांतिकारक होता. कम्युनिस्ट क्रांतीचं भाकीत त्यानं केलं होतं आणि त्या क्रांतीची सूत्रंही अधोरेखित केली होती, कारण त्या क्रांतीबद्दल त्याला खात्री होती. त्याच्या मृत्यूनंतर कम्युनिस्ट क्रांती घडली, पण त्याला अपेक्षित तिथं, त्यानं भाकीत केलेल्या ठिकाणी नव्हे. विसाव्या शतकाच्या मध्यावधी एक तृतीयांश जगावर मार्क्सवादाचं राज्य होतं किंवा इथल्या सत्ता स्वत:ला मार्क्सवाद म्हणवणाऱ्या होत्या.

मार्क्सचे म्हणणं होतं की, ज्या ज्या सैद्धांतिक गोष्टी असतील त्या प्रत्यक्षात यायला हव्यात. म्हणूनच फायरबॉक्ससारख्या विचारवंतांवरच्या लेखात तो म्हणतो- “तत्वज्ञान हे केवळ ‘करून’ उपयोग नाही तर मुद्दा जग बदलण्याचा आहे.” मार्क्सचं म्हणणं असं होतं की, नुसतीच तात्त्विक चर्चा पोकळ आहे. तात्त्विक प्रश्न हे खऱ्याखुऱ्या जगातून वर येतात आणि ज्या परिस्थितीतून ते वर येतात, ती परिस्थिती बदलली की ते प्रश्न सुटतात. तसं झालं म्हणजे जग बदलेल. आणि खरोखरच मार्क्सच्या कल्पनांनी जग बदललं किंवा जगाचा मोठा भाग बदलला, हे नक्की. पण जगाच्या या बदलाला मार्क्सला खरंच कारणीभूत ठरवता येईल का, हाही प्रश्नच आहे.

मार्क्सनं बराच वेळ भांडणात, मारामाऱ्यांत घालवला. अनेकांशी भांडणतंटे केले. लेखनाचे अनेक प्रकल्प पूर्ण केले नाहीत. अगदी ‘कॅपिटल’सारखा ग्रंथ त्याच्या हातून पूर्ण झाला नाही. त्याचा काही भागच त्याने पूर्ण केला आणि हयातीत प्रसिद्ध केला. पण आधुनिक मुक्त भांडवली अर्थव्यवस्था अशीच चालू दिली तर त्यातून प्रचंड विषमता निर्माण होईल, हे त्याचं भाकीत होतं. त्याची विश्लेषणाची पद्धत ही सॉक्रेटिसपासून सुरू झालेल्या पद्धतीची होती. त्यात संकल्पनाची चर्चा करायची आहे, त्या पद्धतीने आपल्याला माहीत आहेत त्या पद्धतीने त्या घ्यायच्या. आणि मग एखादा फळाची साल उलटी करावी त्याप्रमाणे आतून-बाहेरून आर्थिक-सामाजिक व्यवस्था समजून घ्यायची.

फेडरिक एंजल्स हा मार्क्सचा मित्रच  नव्हता, तर त्याचा सहलेखकही होता. इतका की, ‘कॅपिटल’चा उरलेला भाग त्यानेच पूर्ण केला. १८८३ मध्ये मार्क्स मरण पावला, तेव्हा त्याच्या प्रेतयात्रेला केवळ अकरा जण होते. मार्क्स तेव्हा ६४ वर्षांचा होता. त्या उपस्थितांमध्ये फेडरिक एंजल्सही होता आणि त्याचं भाकीत होतं की, एक दिवस मार्क्सची थोरवी जगाला पटेल.

कार्ल मार्क्सची पुस्तकं काही बेस्टसेलर नव्हती. ‘कम्युनिस्ट मॅनिफॅस्टो’ प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक वर्षं कोणालाही माहीत नव्हतं. २४ वर्षं ते आउट ऑफ प्रिंट होतं. १८६७ मध्ये ‘कॅपिटल’चा पहिला खंड आला. चार वर्षांत त्याच्या केवळ १००० प्रती खपल्या. १८८६ साली त्याचा अनुवाद इंग्रजीत झाला. त्याचा दुसरा आणि तिसरा खंड मार्क्सच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला. एंजल्सने हा मजकूर सिद्ध केला. मार्क्सचं अक्षर खूप घाणेरडं होतं. एंजल्स आणि कुटुंब सोडून ते कोणालाही लागत नसे. त्याने १८४५मध्ये जे लिखाण केलं ते १८८८ पर्यंत कोणालाही माहीत नव्हतं. एंजल्सने ते सारं प्रसिद्ध केलं.

‘ग्रुंडरीस’ हे त्याचं पुस्तक सोव्हियात संपादकांनी संपादित केलं. १९२० पर्यंत तेही कोणाला माहीत नव्हतं. ‘पॅरिस मॅनुस्क्रिप्ट’ या नावाने ओळखलं जाणारं लेखन १९६० मध्ये प्रसिद्ध झाले. मार्क्सला यातलं कुठलंही लेखन प्रसिद्ध व्हावं असं वाटत नव्हतं.

मार्क्स ज्या कारणामुळे प्रसिद्ध झाला ती पुस्तिका ती १८४८ मध्ये प्रसिद्ध झाली. ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ या नावानं ती ओळखली जाते. कॅम्युन म्हणजे समाजातील एका नव्या रचनेचा पाया. म्हणजे एकत्र येऊन अनेकांनी एकमेकांच्या हितासाठी राहणं. युरोपभर कम्युन वादळ घोंघावतं आहे अशी त्याची सुरवात होती. ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ ही जगप्रसिद्ध घोषणाही त्यातीलच. या लिखाणाला आता १७० वर्षं पूर्ण होतील.

अमेरिका-युरोपमध्ये १८५०नंतर मजुरांच्या स्थितीबद्दल विचार व चिंतन उभं राहिलं आणि त्यांच्या चळवळी सुरू झाल्या. या चळवळीचा गाभा सुधारणा हा होता. पण जसजशी या चळवळीची वाढ झाली, तसतशा त्या समाजवादी विचार स्वीकारू लागल्या आणि त्यामुळे मार्क्सला त्यात रस निर्माण झाला.

मार्क्स आजवर केवळ १९ व्या शतकातील अनेक सामाजिक अर्थशास्त्र, राज्यशास्त्र सैद्धांतिकांपैकी एक असा राहिला असता. रशियन क्रांतीमुळे मार्क्सचं लेखन गंभीरपणे घेतलं गेलं. १९१७ नंतर हा बदल घडला. त्याचे विचार ही केवळ फँटसी राहिली नाही.

मार्क्सचे आयुष्य विलक्षण होतं. मार्क्सचे वडील वकील होते आणि पश्चिम जर्मनीसारख्या छोट्या शहरात ते राहत होते. त्यांना मुलाने वकील बनावं असं वाटत होतं. मार्क्सने वकिलीचं शिक्षण घेतलं, पण तत्वज्ञानाचा अभ्यास करणं स्वीकारलं होतं. त्याने फेड्रिक विल्यम विद्यापीठात प्रवेश घेतला. जिथं हेगेल एकेकाळी शिकवत असे. ‘यंग हेगेलीयन्स’ नावाच्या गटामध्ये तो सामील झाला. हेगेल धर्मावर टीका करताना सावध होता आणि रशियन सरकारवर तो फारशी टीका करत नसे. ‘यंग हेगेलीयन्स’ अगदी याच्या विरुद्ध होतं. १८४१ मध्ये कार्ल मार्क्सला पदवी मिळाली. त्याच सुमारास बंडखोरीवरच्या कारवाईला सुरुवात झाली.१८४३ मध्ये राजसत्ता रुष्ट झाल्याने मार्क्सचा गुरु ब्रुनो बॉयर आणि इतर तरुण हेगेलीयन्स यांना परागंदा व्हावं लागलं. मार्क्सच्या पत्रकारितेमुळे त्याला कायम परागंदा व्हावं लागलं. कारण तो प्रचंड टीका करायचा आणि सरकारं त्याच्यावर नाराज व्हायची. प्रामुख्याने अधिकाऱ्यांना त्याचं लेखन नेहमीच आव्हान द्यायचं. १८४४ मध्ये ‘डोईश जॉरबाकर’ या नियतकालिकाचे त्याने संपादन केलं. पहिल्याच अंकानंतर ते बंद झालं. मात्र या अंकात त्याने मिळवलेल्या आणि प्रसिद्ध केलेल्या एंजल्स आणि हेस आर्थिक-राजकीय सत्तेच्या विश्लेषणामुळे त्याला स्वत:ला याविषयी काम करण्याची प्रेरणा मिळाली.

पत्रकारितेतून मिळणारे थोडेशे पैसे आणि पुस्तक लिहिण्याच्या आश्वासनावर घेतलेली आगाऊ रक्कम हेच मार्क्सच्या उत्पन्नाचं साधन होतं. एक कथा असे सांगते की, त्याने रेल्वे क्लार्कच्या पदासाठी अर्ज केला होता, पण अक्षर घाणेरडं असल्यामुळे त्याला ती नोकरी नाकारण्यात आली. १८४० मध्ये मार्क्सने युरोपमधून एक वर्तमानपत्र संपादित केलं. तसेच पत्रकारितेतलं लेखनही केलं. १८५२ ते १८६२ या काळात न्यूयॉर्क डेली ट्रब्युन या वर्तमानपत्रात स्तंभलेखन केलं. हे त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय वर्तमानपत्र होतं. वृत्तपत्रीय काम संपत आलं तेव्हा मात्र मार्क्सच्या आर्थिक विवंचनेचा काळ सुरू झाला. कधी कधी त्याला एंजल्सकडून पैसे मिळत, तर कधी श्रीमंत नातेवाईकांकडून. कधी कधी खाण्यापिण्याचेही हाल होत. एक काळ असा आला की, मार्क्सला अंगावरचा कोटही विकावा लागला. त्यामुळे त्याला घराबाहेरही पडता येत नसे. असं असूनही तो आणि त्याची बायको आणि तीन मुली हे सारेच जे काही थोडेथोडके पैसे येत ते संगीत, चित्रकलेसारख्या गोष्टींवर उधळून टाकत. खरं तर उधळण्याइतके पैसे मार्क्सकडे नव्हते. तो फारच गरीब होता. त्याच्या तीन मुलांपैकी एक खूप कमी वयात दगावलं, तर चौथं जन्मण्याच्या आधीच मरून गेलं. गरिबी आणि खाण्यापिण्याचे हाल हे याला कारणीभूत असावं.

एंजल्स त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता. पण मार्क्स आणि त्याची राजकीय मतं जुळू लागली. त्या दोघांनी एकत्र येईन ‘द कंडीशन ऑफ वर्किंग क्लास इन इंग्लंड’ हे अफलातून पुस्तक लिहिलं. ज्यात तिथल्या मजुरांचं भीषण वर्णन आहे. याच पुस्तकात पहिल्यांदा क्रांती घडून येईल असंही सुतोवाच केलं आहे.

१८४४ मध्ये मार्क्सला फ्रान्समधून हाकलण्यात आलं. तो ब्रशेल्सला गेला. तीन वर्षानंतर काहीतरी वेगळं घडलं आणि युरोप, फ्रान्स अमेरिकेत क्रांतीची चळवळ सुरू झाली. ही अशांती ब्रशेल्सपर्यंत पोहचत होतीच, तेवढ्यात मार्क्सने सशस्र क्रांतिकारकांना मदत करण्याचं. आणि बेल्जियममधूनही त्याला परागंदा व्हावं लागलं. मग तो पॅरिसला परतला. तिथं प्रचंड गोंधळ आणि मारामाऱ्या चालू होत्या. फ्रान्सच्या राजमुकुटाला आग लावण्यात आली होती.

वर्षभरानंतर या साऱ्या चळवळी आणि क्रांती दडपून टाकली गेली. युरोपियन आर्ट आणि लिटरेचरमधल्या प्रस्थापित अशा साऱ्यांना क्रांतीच्या चळवळीची झळ बसली. परिणामी राजकारणाबद्दल सर्वांच्या मनात अढी निर्माण झाली. १८४८ मधल्या क्रांतीच्या अपयशामुळेच मार्क्सने लिहिलं की, ‘क्रांती पहिल्यांदा शोकांतिका म्हणून येते आणि नंतर फार्स म्हणून.’                             

लेखक पुस्तकविक्रेते आणि संग्राहक आहेत.

shashibooks@gmail.com

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......