‘आमचा बाप आन् आम्ही’ हे पुस्तक घडत्या वयातील तरुणांनी आवर्जून वाचावे आणि त्यातील यशोगाथा समजून घ्याव्यात…
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
जीवन तळेगावकर
  • ‘आमचा बाप आन् आम्ही’
  • Mon , 01 November 2021
  • ग्रंथनामा बुक ऑफ द वीक आमचा बाप आन् आम्ही Aamcha baap aan aamhi नरेंद्र जाधव Narendra Jadhav

डॉ. नरेंद्र जाधव यांच्याआमचा बाप आन् आम्हीया बहुचर्चित पुस्तकाची नुकतीच २०१वी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. या विक्रमी आवृत्तीच्या निमित्ताने या पुस्तकाविषयी

..................................................................................................................................................................

माणूस हा पोटार्थी प्राणी. रोजचे रहाटगाडे ओढणे हे त्याचे प्राक्तन. असे असताना गरिबीची झळ सोसून मूल्य सांभाळत राहणं म्हणजे दोरीवरून तोल सावरत चालण्यासारखं. मुला-बाळांचा संसार चालवत, गरिबीने थकून-भागूनही मोडून न पडता कणा ताठ ठेवून मुलांना मूल्य-शिक्षण देणं हे विलक्षण प्रेरणेशिवाय व आंतरिक जिद्दीशिवाय केवळ अशक्य.

ते साध्य करून दाखवणारी राही आई आणि या संघर्षमय यशोगाथेचा नायक, म्हणजे लेखकाचे वडील- ‘बाप’ आणि त्यांना कायम साथ देणारी लेखकाची आई- ‘मातोसरी’… ही विलक्षण माणसं.

सर्व कष्ट सोसत, दारिद्र्य वागवत, रात्र रात्र जागवत अभ्यास करणारी, त्यांची ध्येयवेडी मुलं त्या आईबापांची कूस उजळवून टाकणारी निघाली, हे त्यांच्या अखंड परिश्रमाला आलेलं फळ. ‘आमचा बाप आन् आम्ही’ हे डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र, एक व्यवहाराचा व्याप नसला तर एका बैठकीत संपवावे असे प्रवाही आहे, किंबहुना एकदा हातात घेतले की, शेवटपर्यंत सोडवत नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’च्या कुलगुरूपदी राहिलेले, एक हाडाचे शिक्षक असूनही कायम विद्यार्थी राहिलेले. एक जागतिक अर्थतज्ज्ञ असूनही विविध प्रांतात सहजपणे संचार करणारे, अगदी राजकारणातदेखील. मराठी, हिंदी, इंग्रजीच नव्हे तर गुरूदेव टागोरांच्या बांग्ला साहित्यावरही मनापासून प्रेम करणारे... त्यांच्या प्रकाशित पुस्तकांची यादी पाहिली की, त्यांनी हाती घेतलेल्या विषयांचा व्याप लक्षात येतो. त्यात अर्थशास्त्र आहे, सी. डी. देशमुखांसारखे अर्थशास्त्री आहेत, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र आणि ज्ञात-अज्ञात विचारशलाकांचा समावेश आहे; ते या विषयावर अभ्यासपूर्ण विचार मांडणारे परखड व्याख्यातेदेखील आहेत. 

या पुस्तकात बोलीभाषेतील संवाद आहेत. ते एकूण प्रसंगांना व संदर्भांना जिवंतपणा देतात. यात आलेली प्रमाण भाषा, लेखक आज कसा आहे, याची प्रतिमा बांधण्यास मदत करते. वडिलांचे आत्मचरित्र किती संवादी स्वरूपात लिहिले आहे, ते मुळातून वाचण्यासारखे आहे. तेही प्रथमपुरुषी एकवचनी भूमिकेतून; जणू त्यांच्या कुडत्यात प्रवेशून, त्यातला कष्टाने कमावलेला घामट रुपया अनुभवून, त्यांच्या चालूनविरून पातळ झालेल्या वाहणांत पाय खुपसून अन् त्यातील जीर्णपणा अनुभवून!

कष्टाला मागेपुढे न पाहणारा एक ‘बाप’ मुलगा पेपर विकून, युरोपीय माणसाच्या घरी पडेल ते काम करून रेल्वेमध्ये नोकरीला लागला. पुढे ‘पोर्ट ट्रस्ट’मध्ये गेला आणि तिथेही आपली कामासंबंधी चिकाटी त्याने सोडली नाही. ‘आपण जे करू ते ‘ए-वन’ असले पाहिजे’, असा जणू त्याचा धोशाच होता. तो शब्दांतून व्यक्तिचित्रणात लेखकाने जिवंत केला आहे.

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

संसारास लागेल तो हातभार लावण्यास मागे पुढे न पाहणारी, मुलांच्या प्रगतीबद्धल विशेष जागरूक नसलेली; कारण तो ध्यास वडिलांनी घेतलेला, पण त्यांच्या यशाबद्धल प्रचंड अभिमान बाळगणारी ‘कलेक्टरची आई’- मातोसरी. त्यांचे व्यक्तिचित्र अधूनमधून डोकावत राहते. लेखकाचा मोठा भाऊ ‘कलेक्टर’ आहे, याचा आईला सार्थ अभिमान आहे, तो उपरोक्त संबोधनातून व्यक्त होत राहतो.   

यशस्वी मुलांनी लिहिलेले या पुस्तकात एक-एक प्रकरण आहे. स्वतःच्या जीवनप्रवासाचे त्यांचे संक्षिप्त चरित्र विशेष भावते, ते त्यातील मोकळेपणामुळे. आपण काय काय विशेष संपादन केले, हे सांगताना त्या मुलांची छाती जशी अभिमानाने फुलून येते, तसेच नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात आपल्या हातून काही विशेष, भरीव घडू शकले नाही, याची प्रांजळ कबुलीही येते. मार्गक्रमण करत असताना जसे एखाद्या अनाठायी रूढीबद्दल तीव्र चीड व्यक्त होते, तसेच ज्यांनी मनोमन सहकार्य केले, त्यांच्याविषयी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन व्यक्त होणारी कृतज्ञभावनादेखील ओसंडते.

आजकाल आत्मचरित्र अधिक अभिनिवेशी आणि अतिवास्तववादी (सरीअलिस्टिक) पद्धतीने आकार घेताना दिसतात. या पार्श्वभूमीवर या आत्मचरित्रातील एकूण विवेचनात जाणता कोणाचा तिरस्कार व्यक्त होत नाही, हे विशेष. अनुचित घटितांचा निर्देश करणारे काही संवाद आहेत, नाही असे नाही, पण ते परिस्थितीजन्य आहेत; त्याचा मागोवा ज्यांनी ते सोसले त्यांनीच घ्यावा हे योग्य, आणि तो तसा घेतला आहे, पण असे सहजोद्गार निर्विष आहेत हे महत्त्वाचे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

‘आम्ही सऱ्याजणी’, ‘जनरेशन नेक्स्ट’ ही प्रसंगोपात घातलेली विलक्षण संवादी भर परिवारातील सदस्यांचे परस्परांतील नातेसंबंध दर्शवणारी आहे आणि पुढील पिढीत किती आत्मविश्वास भरून वाहतो आहे, याची निदर्शक आहे. हा अदम्य विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाने प्रज्ञेच्या व समाज क्रांतीच्या बळावर पुरवलेल्या प्रेरणेवर जसा आधारित आहे, तसेच त्यांच्यावर विश्वसून परिवाराचे मानस घडवणाऱ्या ‘बापा’च्या विजिगीषा वृत्तीवरही.

एखाद्या प्रकाशकाला क्वचित लाभणारे यश या पुस्तकाच्या रूपाने ‘ग्रंथाली’ला लाभले आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती अगदी प्रकाशनाच्या समारंभातच संपली, तेव्हाही याच्या दोनशेच्यावर आवृत्ती निघतील, याची कल्पना त्यांना आली नसावी कदाचित, एवढे हे पुस्तक वाचकप्रिय ठरले आहे. याशिवाय कित्येक जागतिक भाषांमध्ये याचा अनुवाद झाला आहे. आपले पुस्तक सोल या साऊथ कोरियातील शहरात एका मॉलमध्ये पाहिल्यावर लेखक आत जातो आणि तिथे त्यांना जी आपुलकीने ओतप्रोत वागणूक मिळते, ती समाधानची लकेर देऊन जाते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

डॉ. नरेंद जाधव यांचे आत्मकथन प्रेरणादायी झाले आहे. एकदा वर्तमानपत्रामध्ये त्यांचा ‘यशस्वी व्हा!’ हा लेख वाचण्यात आला, ‘यशाची गुणसूत्रं अशी गोळीबंद कशी सांगता आली?’, याबद्धल मनात उत्सुकता असतानाच हे चरित्र वाचण्यात आले आणि उत्तर मिळाले.

मराठी वाचकांनी विशेषतः घडत्या वयातील तरुणांनी हे स्वतःवरील विश्वास वाढवणारे चरित्र आवर्जून वाचावे आणि त्यातील यशोगाथा समजून घ्याव्यात. त्यामागील अविरत कष्टांचा, यशाच्या ध्यासाचा मंत्र त्यांच्या उडण्याच्या व आकाशाला गवसणी घालण्याच्या प्रेरणेचा अंतःस्रोत बनावा!

‘आमचा बाप आन् आम्ही’ - डॉ. नरेंद्र जाधव 

ग्रंथाली, मुंबई

पाने : २९९, मूल्य – १५० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......