प्लीज गो वोट बाबा, प्लीज गो वोट, बट कुणाला डोन्ट वोट?
पडघम - राज्यकारण
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Wed , 15 February 2017
  • राज्यकारण State Politics मतदान Voting प्लीज गो वोट Please Go Vote राजकीय पक्ष Political Party

सध्या राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय पक्षांच्या प्रचारसभा, त्यांचे आरोप-प्रत्यारोप यांचं रणकंदन पाहायला मिळत आहे. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून ते आपल्या घरात, कानात ओतलं जात आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात, एकमेकांना भ्रष्टाचारी ठरवण्यात आणि एकमेकांची उणी-दुणी काढण्यात कुठला पक्ष मागे आहे, असं दिसत नाही. निदान या बाबतीत तरी साऱ्यांचा तोंडवळा सारखाच आहे. म्हणून ‘अक्षरनामा’वरील १० फेब्रुवारीच्या ‘मतदान कोणाला करावं? कोणाला करू नये? का करू नये?’ या संपादकीयात “आपला, आपल्या राज्याचा आणि देशाचा व्यापक पातळीवर विचार करता मतदार म्हणून आपण कुणाला मतदान करावं, हा आपल्या दृष्टीने सर्वाधिक कळीचा मुद्दा असायला हवा. सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते-कार्यकर्ते भ्रष्टाचार करतात, गुन्हेगार उमेदवारांना पाठीशी घालतात. त्यांना तिकिटं देतात. जातीयवादाचं राजकारण करतात. राजकारणात, सत्तेत राहायचं असेल तर हे सर्व करावं लागतं, असं त्याचं खाजगीत समर्थनही करतात. हे दुष्टचक्र थांबवण्यापलीकडे गेलं आहे. पण सुजाण मतदार म्हणून आपण मतदानासाठी काहीएक निश्चित भूमिका ठरवली तर आपण या दुष्टचक्राला काहीएक प्रमाणात रोखू शकतो, पायबंद घालू शकतो,” अशी भूमिका मांडत मतदारांसाठी एक पंचशील सुचवलं होतं.

‘अक्षरनामा’च्या या भूमिकेशी सुसंगत असा एक म्युझिक व्हिडिओ पुण्यातील काही तरुणांनी तयार केला आहे. तो आवर्जून पाहण्यासारखा आहे. कारण मतदार म्हणून आपण आपल्या योग्य निवडीतून नक्कीच बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी मतदान करायलाच हवं. पण कुणाला मत द्यावं असा प्रश्न आपल्यासमोर उभा ठाकलेला असतो. तो संभ्रम दूर करणारा, कुणाला मत द्यायचं आणि कुणाला नाही याबाबत मार्गदर्शन करणारा ‘प्लीज गो व्होट’ हा अनोखा म्युझिक व्हिडिओ आहे.

पाटे डेव्हलपर्स आणि सेतू अॅडव्हर्टायझिंग यांनी या अनोख्या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. ‘प्लीज गो व्होट बाबा, प्लीज गो व्होट’ असे यातील गाण्याचे शब्द आहेत. महाभारताच्या संदर्भातून आताच्या काळाशी सुसंगत असा विचार या म्युझिक व्हिडिओतून मांडण्यात आला आहे. प्रसिद्ध अभिनेता विजय पटवर्धन यांनी या म्युझिक व्हिडिओमध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारली आहे. अनिकेत वाकचौरे, प्रशांत तपस्वी, तेजस कुलकर्णी, हृषिकेश थेटे, करण खजिने, रोहित सातपुते हे कलाकार या म्युझिक व्हिडिओमध्ये आहेत. निखिल खैरे यांनी गीतलेखन, राजेश कोलन यांनी दिग्दर्शन, योगेश राजगुरू यांनी छायांकन, गंधार यांनी संगीत आणि संयोजन, निखिल ठक्कर यांनी संकलन केले आहे. तेजस गोखले, योगेश कोलन कार्यकारी निर्माते आहेत.

तेव्हा, प्लीज गो वोट बाबा, प्लीज गो वोट!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......