‘आरपारावलोकिता’ : उत्तरं मागणारा कथनाचा वेगळा प्रयोग
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • ‘आरपारावलोकिता’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ. रेखाचित्र - संजय पवार
  • Thu , 16 January 2020
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar आरपारावलोकिता Aarparavlokita विद्युत भागवत Vidyut Bhagvat

डॉ. विद्युत भागवत या स्त्री अभ्यासक म्हणून महाराष्ट्रातच नव्हे, तर देशा-परदेशातही परिचित आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या त्या पहिल्या संचालक. आज या केंद्राचे जे काही स्वरूप आहे, ते उभारण्यात त्यांचा वाटा मोठा आहे.

डॉ. विद्युत भागवत विविध स्त्री संघटनांसह परिवर्तनवादी चळवळीशी जोडून घेत आल्यात. त्यात शेतकरी, दलित, संघटनांशी त्यांचा विविध पातळीवर सहभाग व संवादही राहिलेला आहे. याशिवाय पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात ज्यात गीत, संगीत, नाटक, चित्रपट यांसह इतर कलाक्षेत्रांतही त्यांचा वावर राहिलाय. मात्र त्यांची प्रतिमा अधिकतर अभ्यासक व सोशल एलिट अशीच राहिलीय

डॉ. विद्युत भागवतांनी आजवर कविता व कथालेखनासह भरपूर वैचारिक लेखन केलंय.

‘आरापारावलोकिता’ ही त्यांची पहिलीच कादंबरी. वयाच्या सत्तरीत त्यांनी काहीशा चिकाटीने (मधली आजारपणं सांभाळत) ती पूर्ण केली. पुण्याच्या हरिती प्रकाशनाने ती प्रकाशित केलीय.

रूढार्थाने ‘आरपारावलोकिता’ ही कादंबरी म्हणता येणार नाही. कारण कथानायिका जानकीच्याच मनात द्वंद्व आहे की, आपण कादंबरी लिहावी की आत्मकथन?

कदाचित हेच व्दंद्व डॉ. विद्युत भागवतांच्या मनातही असावं आणि नाटकात जसे नाटक असते किंवा चित्रपटात चित्रपट तसं या कथनात कादंबरीत आत्मकथन किंवा आत्मकथन कादंबरीसारखे लिहिण्याचा प्रयोग विद्युत भागवत जानकी म्हणून करतात. पण अंतिमत: ते ना कादंबरी होते, ना आत्मकथन, तर नुस्तेच कथन म्हणून वाचता येते (किंवा वाचावे लागते).

याला दस्ताऐवजही म्हणता येणार नाही, कारण यात व्यक्ती व स्थळे यांचीही नावे बदलली आहेत. स्थळांची नावे तर काल्पनिक, पौराणिक, वा दोहोंचे मिश्रण. उदा. पंचवटी, बलीस्थान, शूर्पारक. कुरू इ.इ.

अनेकांना हा फसलेला प्रयोग वाटू शकतो. हाती काहीच लागत नाही असे वाटू शकते. लेखिकेला कादंबरी लिहायची नव्हती, पण आत्मकथनही नाही लिहायचे, पण सांगायचे तर आहे खूप. त्यातून काही प्रश्न उपस्थितही करायचे आहेत. अनुभव मांडायचेत. घटना, प्रसंग व व्यक्तीही विशद करायच्यात. पण हे एका विशिष्ट आकृतीबंधात न बांधता.

हे करताना हे कथन एकरेषीय होत गेलेय. या कथनात स्मरण आहे. काळ आहे. व्यक्ती आहेत व विचारही आहेत. हे सर्व कधी एकामागोमाग येतात, कधी पुसटसे स्पर्श करून जातात. कधी तिथेच थबकतात, तर कधी एकमेकांना ओलांडून पुढे जातात.

या क्रियेत कथनाची नायिका कधी भेलकांडते. कधी अस्वस्थ होते. कधी अपराधी तर अनेकदा पाय रोवून उभी राहते.

जानकीच्या समांतरच वाचकाचाही प्रवास होतो. डॉ. विद्युत भागवत जानकीचा सगळा प्रवास म्हटलं तर एकरेषीय म्हटलं तर अधले मधले टप्पे गाळत पुढे नेतात.

डॉ. विद्युत भागवत आणि जानकी या अद्वैतासारख्या कथनभर आपल्याला भेटतात. त्या ज्या पर्यावरणात वाढल्या, वावरल्या. सहभागी झाल्या, तुटून बाहेर पडल्या त्यातली स्थळे, व्यक्ती व घटना यांची मांडामांड करत त्या सतत प्रश्न विचारताहेत अथवा उत्तरे मागतात.

एखादी भूमिका वठवून वा जगून झाल्यावर बुद्धिमान नट जसा त्या व्यक्तिरेखेच्या गाभ्यात शिरतो. कथानक मूळातून समजून घेत, सुटलेल्या जागा जशा शोधत राहतो तशा डॉ. विद्युत भागवत जानकीच्या माध्यमातून मराठी सवर्ण मध्यमवर्ग, तिथली पुरुषप्रधानता, बायकांनी स्वीकारलेल्या भूमिका, त्यानंतर शिक्षण आणि मग त्यातून स्त्री अभ्यास करतानाच परिवर्तनवादी संघटना, राजकीय पक्ष, बिगर संसदीय गट ते एनजीओ असा चौफेर संचार करतात. बहुतांश वेळा अभ्यासक, विश्लेषक, मार्गदर्शक तर अगदी थोडा काळ कार्यकर्त्याच्या भूमिकेत त्या शिरतात.

हा सगळा काळ, त्यावेळची सामाजिक राजकीय, कौटुंबिक स्थिती आणि साठोत्तरी चळवळीने निर्माण केलेले वातावरण, विचारकलह याचं दर्शन घडवत त्या त्यांच्या मनातले प्रश्न जानकीच्या माध्यमातून उपस्थित करतात.

या सर्वाच्या मुळाशी एक अपराध गंड असा आहे की, परिवर्तनाच्या चळवळीतील स्त्री-पुरुषांनी आपल्या जातजाणीवा समूळ नष्ट न करता त्या फक्त खुल्या केल्या. पुढच्या स्त्रीवादी चळवळींवीही तोच कित्ता गिरवला. त्यामुळे जानकीची विद्यार्थिनी मुक्ता खोब्रागडे जानकीला जेव्हा विचारते- दलितांची, दलित स्त्रियांची आत्मकथने उचलून धरणाऱ्या तुम्ही, त्यावर विश्लेषण करत दलित जीवनाचा जो उभा आडवा छेद घेता, त्यातल्या उघड्या नागड्या वर्णनांना धिटाई म्हणत थोपटता, पण तुम्ही तुमची आत्मकथने लिहीत नाहीत. केशवपन, विधवांचे गर्भपात, घरातला, समाजातला जातीवाद, घरातली पुरुषसत्ता, अविचार, व्यभिचार मांडत नाही. तुम्ही कधी आपले आयुष्य स्कॅनरखाली आणणार? तेव्हा जानकी (पर्यायाने डॉ. विद्युत भागवतही?) मूळापासून हादरते आणि विचार करायला प्रवॄत्त होते आणि आत्मकथन लिहायचे ठरवते व लिहिते ते म्हणजेच आरपारावलोकिता!

कादंबरी की आत्मकथन या गोंधळातूनही आरपारावलोकितातून जात या विषयाच्या अनुषंगाने जे काही मांडलेय, लिहिलेय, प्रश्न विचारलेत आणि हे सर्व करत असताना सवर्ण-दलित हा भेद प्रत्यक्ष कार्य ते विचारवेध घेताना आजही कसा प्राथमिक पातळीवर आहे, हे या कथनातून उजागर होते.

या कथनातून सर्व चळवळी, वाद, अभ्यासक यांच्यापुढे आरसा धरण्याची धिटाई दाखवलीय. ती कदाचित अनुल्लेखाने मारली जायची शक्यता आहे. कारण साचेबंद आकृतिबंध नाही की पुस्तक गाजवणारा प्रकाशक नाही. त्यामुळे डॉ. विद्युत भागवतांनी केलेला हा प्रयोग जमला नाही असं म्हणत त्यातल्या प्रतिपादनाला सतरंजीखाली ढकलण्याचा चलाख प्रयत्न नक्कीच केला जाईल. कादंबरी प्रकाशित होऊन बरेच महिने झाले तरी साहित्य वा चळवळीशी संबंधित पर्यावरणात याची पुसटशीही दखल घेतली गेलेली दिसत नाही.

‘आरपारावलोकिता’ची वर्गवारी कशात करायची या प्रश्नात गुंतून पडून त्यातल्या प्रतिपादनाकडे दुर्लक्ष होणे हे चांगले नाही.

हरिती प्रकाशनाने त्याकडे अधिक लक्ष देऊन ही कलाकृती सर्वत्र सहज उपलब्ध करून द्यायला हवी.

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......