पुण्यात राहुल गांधीमधला ‘शिक्षक’ जिंकला आणि ‘राजकारणी’ टिकला!
सदर - सत्योत्तरी सत्यकाळ
परिमल माया सुधाकर
  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी
  • Mon , 08 April 2019
  • सदर सत्योत्तरी सत्यकाळ परिमल माया सुधाकर Parimal Maya Sudhakar राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congress नरेंद्र मोदी Narendra Modi

पाच एप्रिलच्या सकाळी राहुल गांधीने पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयीन युवकांसमोर भाषण ठोकण्याऐवजी त्याने प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले, किंबहुना शहरी तरुणांच्या मनातील शंका-कुशंकांना उत्तरे दिली. संपूर्ण कार्यक्रमावर काँग्रेसची छाप कुठेच नव्हती, ना काँग्रेसच्या नेते मंडळींची रेलचेल होती, ना राहुल गांधीचा कुठे जयजयकार होता! अर्धेअधिक विद्यार्थी राहुल काय बोलतो या उत्सुकतेने आले होते किंवा माध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या व्यक्तीला बघायची जी इच्छा असते, त्यापोटी आले होते. तर उर्वरीत विद्यार्थी त्यांना बहुदा कार्यक्रमास उपस्थित राहण्यास सांगितले होते म्हणून आलेले वाटत होते. या उर्वरीत विद्यार्थ्यांमध्ये भाजपला नाही तरी मोदींना मानणारे विद्यार्थी होते, तसे एकूणच राजकारणात काडीचाही रस नसणारेसुद्धा होते. या उर्वरीत विद्यार्थ्यांमध्ये राहुलला बघायची-ऐकायची उत्सुकता मनातून नव्हती, पण कशाला उगाच इथे आणण्यात आले आहे असेसुद्धा भाव नव्हते. अशा या विद्यार्थ्यांच्या मिश्र गटाशी राहुलने ५५ मिनिटे संवाद साधला. आयोजकांनी विद्यार्थ्यांकडून प्रश्न मागवले होते आणि त्यातील निवडक प्रश्न त्यांनी राहुल गांधीला विचारले. निवडण्यात आलेले प्रश्न साधारणत: काँग्रेसकडून स्पष्टीकरण मागण्याच्या स्वरूपातले होते, ज्यांना विद्यार्थी श्रोत्यांकडून प्रचंड दाद मिळत होती.

राहुलला विचारण्यात आलेल्या पहिल्याच प्रश्नावर टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रश्न होता की न्याय योजनेअंतर्गत प्रत्येक गरिबाला देण्यात येणारा रु. ७२०००चा वार्षिक निधी काँग्रेसचे भविष्यातील सरकार कुठून आणणार? राहुलने आपल्या उत्तरात पाच मुद्दे मांडले.

१) देश-विदेशातील अर्थतज्ज्ञांशी चर्चा करून न्याय योजनेची संकल्पना पुढे आली आहे. म्हणजे ही उगाचच कुणाच्या ‘मन की बात’ नसून आर्थिक मंथनातून वर आलेली संकल्पना आहे.

२) मोठ्या उद्योगपतींकडे थकीत असलेले सरकारी बँकांचे कर्ज वसूल केले तरी सुरुवातीच्या काही वर्षांत न्याय योजनेसाठीच्या निधीची तरतूद होऊ शकते.

३) फारशा प्रभावी न ठरलेल्या सरकारी योजनांना बंद करत त्यांचा निधी न्याय योजनेकडे वळवायचा, पण मनरेगासारख्या महत्त्वाच्या योजनांना हात लावायचा नाही.

४) मध्यमवर्गावरील आयकर वाढवण्यात येणार नाही.

५) न्याय योजनेअंतर्गत पैसा मिळाल्यावर गरिबांची क्रयशक्ती वाढून बाजारपेठेला चांगले दिवस येतील. ज्यातून नवे रोजगार तयार होतील आणि सरकारचे उत्पन्न वाढेल.

न्याय योजनेची ही चतुसूत्री केन्सीयन अर्थशास्त्राला साजेशी अशी आहे. हे अर्थशास्त्र कळणाऱ्या आणि राहुलच्या माध्यमातून ज्यांना हे पहिल्यांदाच कळाले, अशा विद्यार्थ्यांनी टाळ्यांनी राहुलला दाद दिली. मात्र, ज्यांना हे अर्थशास्त्र उमगले नाही, मान्य झाले नाही आणि कळले तरी वळवून घ्यायचे नाही, असे ठरवलेल्या विद्यार्थ्यांनी निमुटपणे उत्तर ऐकून घेतले!

राहुलला ज्या वेळी ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या आवश्यकतेविषयी प्रश्न विचारण्यात आला, त्या वेळीसुद्धा प्रचंड टाळ्या पडल्या. राहुल व काँग्रेसची ‘सर्जिकल स्ट्राईक’विषयीची खरी भूमिका आणि या मुद्द्यावर भाजपने समाजमाध्यमांतून जाणूनबुजून तयार केलेली प्रतिमा, याचे ते प्रतिध्वनी होते. पण राहुलने दिलेल्या उत्तराने टीकाकारांना गप्प केले आणि अनेक प्रशंसकसुद्धा मिळवले! भारतावर होणाऱ्या दहशतवादी हल्यांची किंमत शत्रूला चुकवावी लागलीच पाहिजे आणि त्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’ आवश्यकता असेल तर करायले हवेत हे राहुलने स्पष्टपणे मांडले. मात्र ‘मी स्वत: मोदींच्या जागी असतो तर अशा ‘सर्जिकल स्ट्राईक’चे श्रेय कधीही लाटले नसते आणि भविष्यात लाटणार नाही’ हे सांगतानाच राहुलने पंतप्रधान मोदी जर असे करत असतील तर तो त्यांच्या सवयीचा भाग असल्याचे सूचित करत त्यांना टोमणा लगावला. आपल्या संवादात राहुलने मोदींच्या एकतर्फी संवादाच्या सवयीवर मिश्किलपणे टीका केली आणि आपण मोदींप्रमाणे ‘सर्व ज्ञानी’ नसल्याचे सांगितले.

हा संपूर्ण संवाद म्हणजे राहुल गांधींनी घेतलेली शाळा होती – राजकारणावर कमी आणि अर्थकारणावर जास्त! या संवादात राहुलने तीन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले.

१) योजना आयोग ही धोरण निश्चित करणारी संस्था होती आणि ती तशीच असायला हवी. आजच्या नीती आयोगाप्रमाणे अंमलबजावणी व त्यातील बारकाव्यांचा भार योजना आयोगावर नको. योजना आयोगसारख्या संस्थांचे काम नवी धोरणे ठरवण्याआधी अस्तित्वात असलेल्या धोरणांचा सखोल आढावा घेणे हेसुद्धा असते, ही बाब ध्यानात घेतली तर राहुलने व्यक्त केलेले मत महत्त्वाचे ठरते. जी संस्था धोरणांच्या अंमलबजावणीत सहभागी असेल, ती संस्था निष्पक्षपणे धोरणांच्या प्रभावाचा आढावा घेऊ शकणार नाही. पूर्वीच्या योजना आयोगाने ज्याप्रमाणे शेती व उद्योगांसाठी पायाभूत सुविधा निर्मितीचे धोरण आखले, हरित क्रांती व दुग्धक्रांतीचे धोरण आखले, डिजिटल क्रांतीचे धोरण आखले, त्याप्रमाणे नव्या योजना आयोगाचे काम भारताच्या अर्थव्यवस्थेला आवश्यक ती राष्ट्रीय स्तराची नवी धोरणे निश्चित करणे असेल आणि अंमलबजावणीचे काम राज्यस्तरावर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर असायला हवे, हे राहुलने स्पष्टपणे मांडले.

२) शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सरकारने मोठी गुंतवणूक करत खाजगी क्षेत्राला स्पर्धेसाठी आदर्श ठरतील, अशा संस्था व व्यवस्था निर्माण करण्याच्या आवश्यकतेवर राहुलने भर दिला. जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सरकारने सामाजिक क्षेत्रातून माघार घेण्याची प्रक्रिया सुरू केली. याचा सर्वाधिक फटका आरोग्य व शिक्षण क्षेत्राला बसला आहे. आता ही चक्रे उलटी फिरवत या दोन क्षेत्रांत सरकारी गुंतवणूक वाढवण्याचे सूतोवाच करणे स्वागतार्ह आहे. ‘सर्वांना परवडेल असे गुणवत्तापूर्ण शिक्षण’ आणि ‘सर्वांना परवडेल असे गुणवत्तापूर्ण आरोग्य’ या सुविधा पुरवल्याशिवाय न्याय योजनेला अर्थ उरणार नाही. म्हणूनच राहुलने उपस्थित केलेला हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आरोग्य व शिक्षणातील सरकारच्या गुंतवणुकीमुळे या क्षेत्रात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील. केंद्र सरकारच्या अख्यत्यारीतील सध्या रिक्त असलेल्या २ लाखांहून अधिक जागांशिवाय देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १० लाखांपर्यंत नव्या नोकऱ्या तयार होऊ शकतील.

३) आपण भारतात व विदेशात दोन्ही ठिकाणी शिक्षण घेतले असल्याने दोन्ही शिक्षण पद्धतींतील  गुणदोष ठाऊक असल्याचे राहुलने सांगितले. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्न सुचतील आणि ते विचारण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणारी व्यवस्था विकसित करण्याला आपले प्राधान्य असेल असे राहुलने सूचित केले. हा बदल जर प्राथमिक शिक्षणापासून घडवला गेला तर भारताच्या शिक्षण क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील ते क्रांतिकारी पाऊल असेल. आजच्या राजकीय व सामाजिक वातावरणात जिथे प्रस्थापितांना व सरकारला प्रश्न विचारणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे आणि ‘नेता सांगेल ती पूर्व दिशा’ मानण्याच्या काळात प्रश्न विचारणारी पिढी निर्माण करणे गरजेचे आहे.

राहुलने साधलेल्या संवादाने तिथे उपस्थित विद्यार्थी फार भारावून गेल्याचे दिसले नाही, पण तो काही चुकीचे अथवा निरर्थक बोलला असे कुणाला जाणवत होते असेसुद्धा वाटले नाही. राहुलच्या पुण्यातील वर्गात जे अभ्यासू, जिज्ञासू, मेहनती, भविष्याची काळजी असलेले व संवेदनशील विद्यार्थी होते, त्यांना राहुलने नक्कीच जिंकले. उर्वरीत विद्यार्थ्यांपैकी अनेकांच्या मनात त्याने आपल्या साध्या व स्पष्ट संवाद शैलीने नवे प्रश्न नक्कीच निर्माण केले आणि खोडी काढायला तत्पर बसलेल्या टवाळखोर विद्यार्थ्यांना सहजपणे तोंड दिले! पुण्यात राहुलमधला शिक्षक जिंकला आणि राजकारणी टिकला, हाच अन्वयार्थ या विद्यार्थी संवादातून काढता येऊ शकतो!!  

.............................................................................................................................................

लेखक परिमल माया सुधाकर एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे इथं अध्यापन करतात.

parimalmayasudhakar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......