ज्यांचे ‘अच्छे दिन’ आले असतील, त्यांनी खुशाल आनंद साजरा करावा…
पडघम - देशकारण
अमित इंदुरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 22 February 2019
  • पडघम देशकारण अच्छे दिन Achhe din नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP काँग्रेस Congress

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी सरकारने देशातील जनतेला विशेषतः युवकांना नोकरी आणि विकासाचे गाजर दाखवून त्यांचे लक्ष आणि मत आपल्या बाजूने वळवून घेतले. लोकांनीदेखील त्यावर विश्वास ठेवला. कारण काँग्रेसने लोकांच्या मनातून आपली विश्वासार्हता गमावली होती. देशात वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना, वाढता भ्रष्टाचार, वाढती महागाई आणि महत्त्वाचे म्हणजे प्रदीर्घ काळ मिळालेली सत्ता. याच मुद्द्यावर नरेंद्र मोदींनी निवडणूक जाहीरनामा तयार करून आपली व आपल्या पक्षाची प्रतिमा उभारण्याचा प्रयत्न केला. वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेला युवक पहिल्यांदाच मतदान करणार होता. त्यामुळे त्यांना भाजप आणि संघाची विचारधारा आणि त्यात नरेंद्र मोदींचे गुजरात येथील राजकारण माहीत नसल्यामुळे आणि देशातील मीडियाने नरेंद्र मोदींचा नियोजनबद्ध प्रचार केल्यामुळे हा युवावर्ग त्यांच्या भूलथापांना बळी पडला.

‘विकास म्हणजे मोदी’ आणि ‘मोदी म्हणजेच विकास’ अशी समजूत ठेवून युवा मतदारांनी वर्तमान सरकारला बहुमताने सत्तेत बसवले. दोन कोटी रोजगार, १५ लाख रुपये, शेतकऱ्यांना हमी भाव, महिलांचा सन्मान यांसारख्या घोषणांच्या पायऱ्या तयार करून नरेंद्र मोदी संसदेपर्यंत पोहोचले. पण आपण दिलेल्या घोषणा पूर्ण करायचे बाजूला ठेवून त्यांनी गाय, पाकिस्तान, राम मंदिर, स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, आधार कार्ड, शौचालय आणि विशेष म्हणजे ‘मन की बात’ यावरच देश चालवण्याचा सपाटा लावला. आणि हे पूर्ण करण्यासाठी त्यांनी मतदाराला दिलेल्या घोषणांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले.

या गोष्टींकडे देशातील सुजाण नागरिकांचे लक्ष जाऊ नये म्हणून ‘सर्जिकल स्ट्राईक’, भारत पाकिस्तान यांसारख्या मुद्द्यांचा बाऊ करून देशात राष्ट्रवादाची नवीन संकल्पना पेरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी सत्य इतिहासाला बगल देऊन कधी न घडलेल्या कपोलल्पित कथांना इतिहासाचा मुलामा लावून तो मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमांतून जनमानसांच्या मनात पेरण्याचा प्रयत्न केला. आणि ते त्यात काही प्रमाणात यशस्वीही झाले.

...............................................................................................................................................................

या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y3g5mf7t

...............................................................................................................................................................

या कपोलकल्पित इतिहासाला व त्यावर रोज होणाऱ्या चर्चेला सर्वसामान्य जनता बळी पडून नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन विसरू लागली आणि देशात जणू काही स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले. आणि आपण त्यातील एक स्वातंत्र्यसैनिक आहोत या भावनेने एकमेकांशी भांडू लागली.

‘मॉब लिंचिंग’ हा यातीलच एक प्रकार आहे. नरेंद्र मोदींनी अचानक केलेली नोटबंदी म्हणजे 'देशातील भ्रष्टाचार एका क्षणात खल्लास झाला!’ हा आविर्भाव काही समर्थकांमध्ये मिरवू लागली, पण रिझर्व्ह बँकेने ९९ टक्क्यांच्या वर पैसे परत आले, असे जाहीर करताच सरकार आणि त्यांचे समर्थक मूग गिळून गप्प बसले. आणि लागलीच दुसरा विषय तयार करून त्यावर चर्चा सुरू झाल्या.

सरकारने आपण दिलेल्या घोषणा लोकांना आठवू नये म्हणून नवनवीन पण अनावश्यक मुद्दे उकरून काढण्याचा सपाटा सुरू केला. शेतकऱ्यांना हमीभाव तर सोडाच, पण त्यांना त्यांच्या शेतात लागणाऱ्या खर्चाचे साधे उत्पन्नही मिळाले नाही. कोट्यवधी बेरोजगार युवकांना रोजगार देऊ म्हणणारे सरकार एका खासगी वाहिनीवर व संसदेतदेखील ‘पकोडे विकणे’ हादेखील एक रोजगाराचा भाग आहे, असे म्हणून रोजगाराच्या प्रश्नाला बगल देण्याचा पद्धतशीर प्रयत्न करतात. महाराष्ट्रात मेगाभरती करू म्हणणारे फडणवीस सरकार या ना त्या कारणाने ती भरती पुढे ढकलण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहे.

आपल्या या त्रासदायक कामाकडे सामान्य जनतेचे लक्ष जाऊ नये वा त्याकडे कुणी लक्ष वेधू नये म्हणून या सरकारने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथील काही विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे खटले टाकून त्या विद्यापीठाला बदनाम करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला. देशातील गरीब, बेरोजगार विद्यार्थी आणि कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले.

आता उंबरठ्यावर असणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि आपल्या विरोधात जाणारा जनमताचा कौल पाहून केंद्र सरकारने पुन्हा सर्वसामान्य जनतेला योजनांचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे. येणारी २०१९ ची लोकसभा निवडणूक प्रत्येक पक्ष युद्धपातळीवर लढणार आहे. आता जनतेचा भाषणांवरील विश्वास कमी झालेला आहे.

गेल्या साडेचार वर्षांत गौ रक्षकांचे, नेत्यांचे आणि माल्या, अंबानी, अडाणी, चौक्सी यांसारख्या उद्योगपतींचे ‘अच्छे दिन’ नक्कीच आलेत, पण देशातील सर्वसामान्य आणि गरीब जनतेचे ‘बुरे दिन’ आले आहेत. ज्या समर्थकांचे ‘अच्छे दिन’ आले असतील त्यांना नक्कीच पंधरा लाख रुपये आणि घरातील सदस्यांना नोकरी मिळाली असेल. त्यांनी खुशाल आनंद साजरा करावा, पण ज्यांचे ‘अच्छे दिन’ होते, तेदेखील हिरावून घेतले गेले. ते मात्र निश्चितच येणाऱ्या निवडणुकीत बदल घडवावण्याकरता सज्ज असतील.

.............................................................................................................................................

लेखक अमित इंदुरकर पत्रकार आहेत.

mr.amitindurkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 25 February 2019

ओ इंदुरकर भाऊ, जरा जागे व्हा. मोदी हिंदू मतांवर निवडून आलेत. हिंदू धर्माच्या आधारे उघडपणे मतं मागता येत नाहीत म्हणून मोदी विकासाच्या गप्पा मारताहेत. तसंही पाहता काँग्रेसच्या ६५ वर्षांच्या सत्तेत सामान्य माणूस स्वत:चा विकास स्वत:च करायला शिकलाय. मोदींकडून सामान्य माणसाच्या ज्या कः इअपेक्षा आहेत त्या अत्यंत किरकोळ आहेत. त्या पुऱ्या झालेल्या बघण्यासाठी कुठल्याही आकडेवारीची गरज नाही. कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे गावगन्ना उगवलेल्या भुरट्या तत्ज्ञांच्या तथाकथित विश्लेषणांची तर आजिबात नाही. हे झालं गावच्या मतदारांविषयी. शहरांत तर मोदींना याहून अधिक पाठींबा आहे. मी शहरी मध्यमवर्गीय आहे. माझा विकास करायला मी समर्थ आहे. मला कुठल्या मोदीबिदीनी भीक घालायची गरज नाही. मी मोदींना मत देतो, कारण की ते हिंदुहितदक्ष आहेत म्हणून. त्यामुळे मोदींच्या नावाने तुम्ही कितीही कंठशोष केला तरी लोकं ऐकणारे नाहीत. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......