शिवरायांचे तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना अनावृत पत्र!
पडघम - राज्यकारण
एक सातारकर
  • उदयनराजे भोसले
  • Wed , 29 August 2018
  • पडघम राज्यकारण उदयनराजे भोसले Udyanraje Bhosle सातारा Satara संभाजी भिडे Sambhaji Bhide भिडे गुरुजी Bhide Guruji शाहू-फुले-आंबेडकर Shahu-Phule-Ambedkar छत्रपती शिवाजीमहाराज Chhatrapati Shivaji Maharaj

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना,

सादर दंडवत आणि सप्रेम नमस्कार विनंती विशेष!

गेल्या एक-दोन वर्षांपासूनच तुम्हाला पत्र लिहिण्याचा विचार करत होतो, शेवटी आज लिहिण्याचा योग आला. माझ्या लहानपणापासून मी तुम्हाला बघत आहे. तुमचा संघर्ष आम्ही सातारकरांनी बघितला आहे. प्रतापसिंह महाराजांनंतर तुम्ही स्वकष्टानं, हिमतीनं नगरसेवक ते खासदार अशी मजल मारली आहे. याबद्दल मला एक सातारकर म्हणून कायमच अभिमान वाटत आला आहे.

मात्र गेल्या काही दिवसांपासून काही गोष्टींमुळे एक सातारकर म्हणून मी अस्वस्थ आहे. त्याच कारणामुळे या पत्राचा प्रपंच!

राजे, तुम्हास तर ठाऊक आहेच की, आपला पश्चिम महाराष्ट्र ही शिवरायांची कर्मभूमी, जन्मभूमी; त्याचबरोबर लोक राजा राजश्री शाहू महाराज महात्मा फुले ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची भूमी आहे. त्यांच्याच विचारांवर इथली जनता चालली म्हणून इथं बऱ्यापैकी सुबत्ता आली. इथला युवक शिवरायांचं नाव जरी ऐकलं तरी उत्साहित होतो, बेभान होतो. इतका जबरदस्त पगडा आहे शिवरायांचा. आणि हेच हेरून काही विघातक शक्तींनी शिवरायांच्या नावावर इथल्या मातीत हळूहळू विष कालवायला सुरुवात केली. शिवराय ‘मुस्लिमविरोधी’ होते, अशी त्यांची प्रतिमा रंगवून युवावर्गाचं ब्रेनवॉश करण्यात येतंय. त्याचंच फलित म्हणून कोरेगाव भीमा इथं आंबेडकरी जनतेवर हल्ला करण्यात आला. 

राजे, तुम्ही ज्यांना गुरुजी मानता ते सांगलीतले मनोहर भिडे उर्फ भिडे गुरुजी हे त्यामागे आहेत, असा आरोप होतोय. आणि गेल्या काही दिवसांतली त्यांची वक्तव्यं पाहिली तर त्या आरोपांमध्ये तथ्य असावं, असं वाटतं. 

ज्या ‘मनुस्मृती’मुळे शिवरायांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला, शिवरायांना अमाप पैसा देऊन राज्याभिषेक करावा लागला, ज्यांनी संभाजी महाराजांची बदनामी केली, त्याच ‘मनुस्मृती’चा गौरव करणाऱ्या मनोहर भिडेंना तुम्ही ‘गुरु’ मानता! हा शिवरायांचा ‘अपमान’ नव्हे काय? 

गेल्या काही दिवसांत सुधन्वा गोंधळेकर या युवकाला अटक करण्यात आली. सनातन प्रभात या कट्टर धार्मिक संघटनेचं नाव त्यात समोर आलंय. ही तीच संघटना आहे ज्यांच्यावर सातारच्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खूनाचा आरोप आहे. जो बहुतेक थोड्या दिवसांत योग्य पुरावे मिळवता आले तर सिद्धही होईल कदाचित. साताऱ्यात सुधन्वा गोंधळेकरच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. मी स्वतः तो मोर्चा बघितला. युवक, आठवी-नववीची मुलं, महिला त्यात होत्या. ज्या कर्मवीरांनी रयतचं रोपटं लावून वटवृक्ष केला, तिकडेच होता हा मोर्चा! कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांची भेट झाली होती त्याच ठिकाणी. त्यात बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलण्याची भाषा होती. आणि तीसुद्धा शिवरायांचा वारस हयात असताना! इथल्या युवकांच्या डोक्यात जो मुस्लिमद्वेष पेरला जातोय, तो थांबला पाहिजे. किंबहुना तो तुम्हीच थांबवला पाहिजे. शिवरायांचे वंशज म्हणून तुमची ती नैतिक जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी तुमच्याकडे ताकद आणि धमकसुद्धा आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
 

.............................................................................................................................................

राजे, शिवराय निजामशहा, आदिलशहा हे मुस्लिम आहेत म्हणून केवळ त्यांच्याविरुद्ध लढले नाहीत. त्यांची लढाई होती ती एका ‘स्वराज्याची’! तसं असतं तर त्यांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नसते आणि जावळीच्या मोऱ्यांसोबत त्यांना लढाई करावी लागली नसती! 

सांगलीचे भिडेगुरुजी रायगडावर बत्तीस मण सोन्याचं सिंहासन बसवण्यासाठी आवाहन केलं जात आहे. वर्षातून अनेकदा गडकोट मोहिमा काढल्या जातात. त्यात युवकांचा किती वेळ वाया जातो! शिवरायांची लढाई ही तलवारीची होती, पण आजची लढाई पेनाची आहे. त्या युवकांची जी ऊर्जा तिकडे वाया जात आहे, ती जर स्पर्धा परीक्षा आणि बाकीच्या विधायक कामात लागली, तर येणारा काळ वेगळा असेल.

राजे, साताऱ्यात तुमची गाडी समोरून येत असली तर लोक आदरानं जागीच थांबतात. परवा जो मोर्चा काढला त्याकडे तुम्ही नुसते डोळे वटारून पाहिलं असतं तर निम्म्या पोरांची चड्डी ओली झाली असती. आणि ते घरी गेले असते. माझी तुम्हास मनापासून कळकळीची विनंती आहे की, या शक्तींपासून आपला साताऱ्याला आणि महाराष्ट्र्राला रोखा.  

माझ्यासारखे सातारचे जे हजारो युवक कामासाठी पुण्या-मुंबईत आहेत, ते तुमच्याकडे आशा लावून आहेत, की कधीतरी तुम्ही फुले-शाहू-आंबेडकर आणि शिवराय यांच्या विचारधारेसाठी उभे राहाल. आणि शिवरायांचे वंशज म्हणून स्वतःला सिद्ध कराल.

राजे, तुम्ही आता मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे ही दिलासादायक गोष्ट आहे. त्या निमितानं मराठा युवक तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे, ही एक योग्य संधी आहे तुमच्याकडे. त्यांना पुरोगामी विचारधारा समजून सांगा. फुले-शाहू-आंबेडकर-शिवराय कोण होते, त्यांनी काय केलं, हे सांगा. (बहुतांश लोकांनी त्यांचं लेखन वाचलं आहे, पण एक मोठा समूह त्यापासून वंचित आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी कॉलेजमधून शिकलेला एक सातारचा युवक कर्मवीरांना गुरू मानत नाही, पण भिडेगुरुजींना ‘गुरू’ मानतो! ही किती मोठी शोकांतिका आहे?)

राजे, लोकसभेच्या निवडणूक जवळ येत आहेत. गेल्या काही दिवसांत ‘जात’ नको इतकी अधोरेखित झालीय. सामाजिक एकता तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इथल्या जनतेला आर्थिक विकास नसला तरी चालेल एकवेळ, पण सामाजिक एकता पाहिजे असते. तुमच्याजवळ एक वर्षाच्या कालावधी आहे. तुम्ही पुरोगामी विचारांची मशाल हाती घेऊन सनातनी, कट्टर विचारधारेला रोखा. आणि दाखवून द्या स्वतःला आणि समस्त जगाला की, तुम्ही कुणा ऐऱ्यागैऱ्याचे वारसदार नाही, रयतेचा राजा असणाऱ्या ‘शिवरायां’चे वारस आहात!

राजे, तुम्हाला मानाचा मुजरा!

कळावे!

तुमच्यावर प्रेम करणारा एक सातारकर

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

Sagar Pansare

Wed , 29 August 2018

खासदार उदयन भोसले हे नक्की खुलं पत्र वाचतील का? अपेक्षा खूप साध्या आणि सरळ आहेत त्या त्यांना झेपतील का?लेखकाच्या मनाची घालमेल त्यांना समजेल का? त्यांच्या कडून सकारात्मक प्रतिसाद मिळवा आणि हा खेळ थांबावा हि अपेक्षा.


Sagar Patil

Wed , 29 August 2018

मुळात लेखक महाशय नाव दडवून लिहितात यातूनच त्यांच्या मनात उदयन भोसले यांच्या बद्दलची दहशत दिसते आणि असल्या अपेक्षा पूर्ण करणारे उदयन भोसले आहेत का हा मुख्य प्रश्न आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......