‘हिंदू’ :  कादंबरीलेखन स्पर्धा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
एक निवेदन
  • भालचंद्र नेमाडेलिखित ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Sat , 28 July 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade हिंदू Hindu

भालचंद्र नेमाडेलिखित ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी महाकाव्यात्म स्वरूपाची आहे. महाकाव्यात असावीत तशी अनेक कथाबीजे या कादंबरीत विखुरलेली आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’च्या वतीने एक कादंबरीलेखन स्पर्धा जाहीर करत आहोत.

‘हिंदू’ या कादंबरीतील कथाबीजांवर\उपकथांवर आधारलेली, तीमधील नायक, पात्रे, प्रसंग, वातावरण इत्यादींचा आवश्यक तर संदर्भ घेऊन सर्वस्वी नवीन अशी कादंबरी लेखकांनी लिहावी असा प्रस्तुत स्पर्धेमागील हेतू आहे.

कादंबरी पूर्णपणे स्वतंत्र असावी व तीमधून लेखकाची सर्जनशीलता व्यक्त व्हावी. तथापि तिला ‘हिंदू’मधील बीजाचा आधार असावा.

‘हिंदू’मधील बीजांच्या आधारे परंतु आपल्या स्वत:च्या कल्पनाशक्तीच्या\प्रतिभेच्या बळावर लेखकांचे लेखन असावे अशी अपेक्षा आहे.

स्पर्धेच्या आयोजकांना स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लेखकांनी ‘हिंदू’ या कादंबरीची सिक्वेल लिहावी अशी अजिबात अपेक्षा नाही. कादंबरी वाचतना लेखकाच्या नवनिर्मितीक्षमतेचा प्रत्यय वाचकांना यावा.

या स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकेल. अगदी नव्या लेखकांपासून प्रथितयश लेखकांपर्यंत कोणालाही स्पर्धेत सहभागी होता येईल.

कादंबरीला पृष्ठसंख्येचे कोणतेही बंधन नाही. लहान-मोठ्या आकाराचेही बंधन नाही.

स्पर्धेसाठी कादंबरी सादर करण्याचा अखेरचा दिनांक ३१ डिसेंबर २०१८ हा आहे. स्पर्धेसंबंधी काहीही माहिती विचारावयाची असल्यास खाली दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर दुपारी ३ ते ५ या वेळेत संपर्क साधावयास हरकत नाही.

स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या कादंबऱ्यांना रु. पंचवीस हजार, रु. वीस हजार व रु. दहा हजार या रकमांची अनुक्रमे (प्रथम, द्वितीय व तृतीय अशी) तीन पारितोषिके दिली जातील. पारितोषिकासंबंधीचा अंतिम निर्णय परीक्षकांचा असेल. तो स्पर्धकांवर बंधनकारक असेल. निर्णयानंतर त्यासंबंधी कोणतीही चर्चा वा पत्रव्यवहार केला जाणार नाही. निर्णय ३१ मार्च २०१९ पर्यंत जाहीर केला जाईल. प्रथम क्रमांकाची कादंबरी ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’च्या वतीने प्रकाशित केली जाईल.

कादंबरी पाठवण्याचा पत्ता –

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ३०८, फिनिक्स, ४५७ एस.व्ही.पी. रोड, गिरगाव, मुंबई – ४०० ००४.

दूरध्वनी : ०२२ – २३८२६२२५ (दुपारी ३ ते ५)

.............................................................................................................................................

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......