हा ग्रंथसागरू येव्हडा
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
टीम अक्षरनामा
  • ‘हा ग्रंथसागरू येव्हडा’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 13 April 2018
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो हा ग्रंथसागरू येव्हडा विवेक गोविलकर

‘युनायटेड आयर्न अँड स्टील’ ही पुरस्कारप्राप्त कादंबरी आणि ‘पाऊल वाजे’ हा कॉर्पोरेट जगातल्या कथांचा संग्रह, यानंतर विवेक गोविलकर यांचं ‘हा ग्रंथसागरू येव्हडा’ हे नवीन पुस्तक उद्या प्रकाशित होत आहे. लेखकानं गेल्या पाच वर्षांमध्ये ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘लोकसत्ता’, ‘सामना’, ‘साधना’, ‘मायमावशी’, ‘लोकमुद्रा’, ‘अंतर्नाद’, ‘ललित’ या नियतकालिकांमधून लिहिलेल्या इंग्रजी पुस्तक परिचय-परीक्षण, अशा स्वरूपाच्या लेखांपैकी काही निवडक लेखांचा समावेश या पुस्तकात आहे.

वाचनासाठी पुस्तकं निवडताना लेखकानं स्वतःवर विषयांचं बंधन घातलेलं नाही. ‘द न्यू यॉर्क टाईम्स’ किंवा ‘द गार्डियन’ यांसारख्या भारदस्त वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या ‘बेस्ट सेलर्स’ किंवा वर्षभरातील सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या यादीतून, महत्त्वाची पुस्तकं निवडताना नोबेल, पुलित्झर, बुकर, डीएससी असे पुरस्कार मिळवणाऱ्या किंवा त्यांच्या अंतिम यादीत पोहचणाऱ्या पुस्तकांचा इथं विचार झालेला दिसतो. त्याचबरोबर, काही कारणांमुळे बातम्यांमध्ये किंवा प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत येणाऱ्या पुस्तकांच्या विषयांची सध्याच्या काळातली प्रस्तुतता किंवा बातमी-मूल्य, अशा गोष्टींनाही लेखकानं महत्त्व दिलेलं दिसतं. मुख्य म्हणजे, या संग्रहासाठी निवडलेली सर्व पुस्तकं नवीन आहेत. सर्व लेखांची वर्गवारी सहा भागांत केली आहे.

व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र – या विभागात चार लेख आहेत. देवदत्त पटनाईक यांच्या ‘बिझनेस सूत्र’ या पुस्तकात, कर्मचारी आणि मालक यांची श्रद्धा आणि त्यातून निर्माण होणारा व्यवस्थापनाचा अस्सल देशी मार्ग, यावर विवेचन आहे.

२१व्या शतकातील अर्थशास्त्रावरील सर्वांत महत्त्वाच्या पुस्तकांपैकी मानल्या गेलेल्या ‘कॅपिटल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’ या थॉमस पिकेटी यांच्या पुस्तकात, असमानतेची कारणं आणि उपाय यांच्यावर चर्चा आहे. ‘सुपर फ्रीकनॉमिक्स’ या पुस्तकात अर्थतज्ज्ञ लेविट आणि पत्रकार डबनर यांनी अर्थशास्त्रासारखा विषय खोडकरपणे आणि मनोरंजकरीत्या मांडलेला आहे. ‘द ग्रेट एस्केप’ या अर्थशास्त्रासाठी नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे मानकरी अँगस डीटन यांनी गेल्या काही शतकांमधल्या मानवाच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला आहे.

इतिहास आणि आत्मचरित्रे – या विभागात नोबेल शांतता पुरस्काराची मानकरी मलाला युसुफझाई, पुलित्झर विजेती झुंपा लाहिरी, थरारकथांचे लेखक आणि खऱ्या आयुष्यातले गुप्तहेर फ्रेडरिक फोर्साइद आणि प्रखर बुद्धिनिष्ठ वैज्ञानिक रिचर्ड डॉकिन्स यांची आत्मचरित्रं आहेत. त्याच्या जोडीला रोमिला थापर यांचं इतिहास या विषयावर काही सखोल चिंतन आहे. शिवाय अफगाणिस्तानातील युद्ध, इतिहासातला जीझस आणि भारतीयांना अभिमानास्पद वाटणाऱ्या काही ऐतिहासिक घटना यावर काही प्रकाश टाकणारी पुस्तकं आहेत.

राजकीय आणि कायदेविषयक – ‘पॅट्रिअट्स् अँड पार्टिझॅन्स्’ या पुस्तकात सुप्रसिद्ध लेखक, इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केलेली लोकशाहीवरची वादचर्चा आहे. अमेरिकन लेखक टिमथी स्नायडर यांनी अमेरिकेच्या सध्याच्या अध्यक्षांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून, हुकूमशाहीचा धोका कसा निर्माण होऊ शकतो, याबाबत दिलेला इशारा आहे. कायदेतज्ज्ञ झिया मोदी यांनी भारतीयांच्या समाजजीवनावर मोठा परिणाम करणाऱ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या दहा निकालांची ओळख सर्वसामान्य वाचकांना सोप्या भाषेत  करून दिलेली आहे. ‘द गुड इमिग्रंट’ या निकेश शुक्ला यांनी संपादित केलेल्या पुस्तकात, इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या, विविध देशांच्या आणि वर्णाच्या स्थलांतरितांच्या अनुभवांवर आधारित लेखांचा समावेश आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र – या विभागात मूळ भारतीय वंशाच्या डॉ. अतुल गवांदे यांचं वार्धक्य आणि अटळ मृत्यू, यावरचं सखोल चिंतन आहे. हिग्स बोसॉन या सूक्ष्मकणाच्या शोधासाठी अनेक राष्ट्रांनी एकत्रितपणे उभारलेल्या, ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ या महाकाय उपकरणाची आणि त्या प्रयोगाची माहिती आहे. इंटरनेट हे जनसामान्यांचं व्यासपीठ कसं होऊ शकेल यावर सखोल चर्चा आहे. हॉलिवुडच्या ‘इंटरस्टेलर’ या भन्नाट विज्ञान-चित्रपटात वापरलेल्या वैज्ञानिक संकल्पना, भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे किप थॉर्न यांनी सुगम पद्धतीनं मांडलेल्या आहेत. नेयोमी क्लाईन यांनी वातावरणातील बदलांच्या संदर्भात सत्य परिस्थिती मांडून सर्वांना दिलेला इशारा आहे. ‘वॉट इफ?’ या पुस्तकात रँडॉल मुन्रो यांनी स्वतःच्या बेबसाईटवर लोकांनी पाठवलेल्या ‘मूर्खपणाच्या, हास्यास्पद, काल्पनिक किंवा बिनबुडाच्या’ प्रश्नांना, गंभीरपणे आणि विज्ञानाच्या आधारे उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

कादंबरी – या विभागात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय लेखकांच्या सहा गाजलेल्या कादंबऱ्यांवरचे लेख आहेत. त्यात पेरूमल मुरुगन यांची वादग्रस्त ‘मादोरुबागन’ ही कादंबरी आहे. ‘अ थाऊजंड स्प्लेन्डीड सन्स’ ही अफगानिस्तानातल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या शोकांतिकेची कथा आहे. तिआनमेन स्क्वेअर या चौकात झालेल्या निरपराध आंदोलनकर्त्यांच्या झालेल्या शिराकाणाची कथा ‘डू नॉट से वी हॅव्ह नथिंग’ या कादंबरीत सांगितलेली आहे. ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ या गाजलेल्या कादंबरीचा पुढचा भाग ‘गो सेट अ वॉचमन’ या नावानं आलेला आहे. हॅरी पॉटरच्या यशानंतर जे. के. रोलिंग यांनी प्रौढांसाठी लिहिलेली पहिलीच कादंबरी, ‘द कॅज्युअल व्हेकन्सी’ आहे. ‘द सेलाउट’ या बुकर विजेत्या कादंबरीत, वंशद्वेषासारखा अजूनही धगधगणारा विषय हाताळला आहे. 

संकीर्ण – या विभागात ‘चेर्नोबिल प्रेअर’ या पुस्तकातून चेर्नोबिल अणुभट्टीच्या अपघाताचे सामाजिक परिणाम स्वेतलाना अलेक्सिविच या लेखिकेनं जगाला सांगितले आहेत. ‘वी शुड ऑल बी फेमिनिस्ट्स’ या पुस्तकातून, चिमामांडा अंगोझी अदीची या नायजेरिअन लेखिकेनं स्त्रीवादाचा व्यावहारिक अर्थ कुठल्याही प्रकारे आक्रस्ताळेपणा न करता, लोकांना पटवून दिला आहे. संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं विचार करून आपले प्रश्न स्वतःच सोडवायला वाचकांना उद्युक्त करणाऱ्या पुस्तकातून लेविट आणि डबनर यांनी ‘फ्रिकनॉमिक्स’ची परंपरा ‘थिंक लाईक अ फ्रीक’ या पुस्तकातून पुढे नेली आहे. शेवटी लक्षावधी अनुयायांच्या प्रेमाचा आणि आदराचा विषय असलेले दलाई लामा, डेझमंड टूटू या दोन धर्मगुरूंमधल्या आनंदाच्या स्रोतांच्या शोधाबद्दलचा संवाद ‘द बुक ऑफ जॉय’ या पुस्तकात आहे.

या पुस्तकांत आलेल्या विषयांचं वैविध्य आणि त्यांचा आवाका फार मोठा आहे. वाचकांना त्यांची ओळख लेखकानं सोप्या भाषेत करून दिली आहे. हे लेख वाचून मूळ पुस्तक वाचण्याची उत्कंठा निर्माण होते आणि तेच या लेखांचं प्रयोजन आहे. नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले लेख, वृत्तपत्रीय शब्दमर्यादेतच यावे लागतात. या संग्रहात सर्व लेख विस्तृत स्वरूपात आले आहेत. त्यामुळे या पुस्तकांची वाचकांना होणारी ओळख केवळ वरवरची राहत नाही. या पुस्तकाचं नाव ज्ञानेश्वरीमधल्या एका ओवीमधून घेतलं आहे. लेखकानं प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, ‘इंग्रजी भाषेतला हा ग्रंथसागरु येव्हडा – त्याच्या तळाशी असणारं रत्नभांडार कितीही लुटलं तरी न संपणारं आहे!’

.............................................................................................................................................

हा ग्रंथसागरू येव्हडा - विवेक गोविलकर, अनघा प्रकाशन, ठाणे; पाने – २१२, मूल्य – ३०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4407

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......