बहुतांश एक्झिट पोल्सनी भाजपला निवडून दिलंय, गुजराती मतदार कुणाला निवडतात ते आज कळेलच
पडघम - गुजरात निवडणूक २०१७
टीम अक्षरनामा
  • प्रशांत पाटील यांची फेसबुक पोस्ट आणि वृत्तवाहिनीवरील वृत्त
  • Mon , 18 December 2017
  • पडघम गुजरात निवडणूक २०१७ Gujarat Elections 2017 नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah राहुल गांधी Rahul Gandhi भाजप BJP काँग्रेस Congress

आज बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित गुजरात विधानसभेचा निकाल जाहीर होणार. देशभर आणि जगभर (पाकिस्तानातसुद्धा!) या निवडणुकीविषयी उत्सूकता आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी भाजपच गुजरातमध्ये सत्तेवर येणार असा ठोस अंदाज वर्तवला आहे. पण गुजराती मतदार खरोखरच भाजपला निवडून देतात की, काँग्रेसला याचा फैसला आज होईल.. दूध का दूध, पानी का पानी...

.............................................................................................................................................

हे ग्राफिक मागच्या पंधरवड्यात मिंट या इंग्रजी वर्तमानपत्रात प्रकाशित झाले होते. गुजरात विधानसभा निवडणुकीची माहिती यातून जाणून घेता येते. 

१२ डिसेंबर रोजी योगेंद्र यादव यांनी भाजपचा गुजरात विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ शकतो, याचा अंदाज वर्तवणारे ट्विट केले. त्यावेळी त्यांनी तीन शक्यता सांगितल्या होत्या. त्या शक्यतांची एका हिंदी वर्तमानपत्रात आलेली ही बातमी. या बातमीनुसार काँग्रेस गुजरातमध्ये सत्तेत येऊ शकते का, याच्या तीन सकारात्मक शक्यता सांगितल्या आहेत.

प्रख्यात निवडणूक तज्ज्ञ योगेंद्र यादव दै. लोकसत्तामध्ये ‘देशकाल’ या नावानं साप्ताहिक सदर लिहितात. त्या सदरामध्ये त्यांनी ७ डिसेंबर रोजी लिहिलेला लेख. यात त्यांनी भाजपचा गुजरातमध्ये पराभव होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली होती.

निवडणूक तज्ज्ञ योगेंद्र यादव यांनी भाजपचा गुजरातमध्ये पराभव होईल, असा आपण वर्तवलेला अंदाज चुकीचा होता, याविषयीची ही ‘फायनान्सिअल एक्सप्रेस’मध्ये आलेली बातमी. ती १५ डिसेंबर रोजी प्रकाशित झाली आहे.

बीबीसी मराठी या पोर्टलनेही वेगवेगळ्या एक्झिट पोल्सची आकडेवारी एकत्र दिली आहे. त्यात भाजपला बहुमत मिळेल असाच दावा केलेला आहे.

‘लोकमत नेटवर्क १८’ या वृत्तवाहिनीने वेगवेगळ्या एक्झिट पोल्सचे अंदाज एकत्रितरीत्या दिले आहेत. त्यात ‘टाइम्स नाऊ’ या टाइम्स समूहाच्या  इंग्रजी वृत्तवाहिन्याच्या वतीने घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला गुजरातमध्ये सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. 

‘लोकमत नेटवर्क १८’ या वृत्तवाहिनीने वेगवेगळ्या एक्झिट पोल्सचे अंदाज एकत्रितरीत्या दिले आहेत. त्यात ‘टाइम्स नाऊ’ या टाइम्स समूहाच्या  इंग्रजी वृत्तवाहिन्याच्या वतीने घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला गुजरातमध्ये बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज आधीच्या अंदाजानंतरचा आहे.

व्यंगचित्रकार युसुफ मुन्ना यांनी मागच्या आठवड्यात आपल्या फेसबुक वॉलवर टाकलेले हे व्यंगचित्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत आणि त्याआधी जे जे बाण सोडले, त्यातला कुठलाच बाण योग्य निशाण्यावर लागणार नाही, असे युसुफ यांनी या चित्रातून सूचित केले आहे.

राहुल शर्मा यांनी गुजरातमध्ये भाजपचा पराभव का होऊ शकतो, याची दिलेली कारणे. ही पोस्ट त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर १६ डिसेंबर रोजी टाकली आहे. कारणं योग्य वाटतात खरी, पण गुजराती मतदारांना ती कितपत ग्राह्य वाटतात, याचा निवाडा आज होईल.

महेश शहा हे दै. सकाळचे अहमदाबादमधील वार्ताहर. त्यांनी मात्र एक्झिट पोल्सनी भाजपला गुजरातमध्ये निवडून दिले असले तरी, गुजरातमधील निवडणूक तज्ज्ञ, अभ्यासक, एनजीओ यांचा हवाला देत गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक आणि आश्चर्यकारक लागण्याची शक्यता कालच्या आपल्या बातमीमध्ये वर्तवली आहे. ती कितपत खरी ठरते, ते कळलेच.

.............................................................................................................................................

‘मध्यमवर्ग- उभा, आडवा, तिरपा’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......