शरद यादव ‘जयप्रकाश नारायण’ होतील काय?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • शरद यादव आणि जयप्रकाश नारायण
  • Thu , 09 November 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar शरद यादव Sharad Yadav जयप्रकाश नारायण Jaiprakash Narayan काँग्रेस Congress भाजप BJP राहुल गांधी Rahul Gandhi

जनता दल युनायटेडचे खासदार शरद यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्षासह देशभरातील समविचारी पक्षांनी ‘सांझी विरासत बचाव आंदोलन’ सुरू केलंय. बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार भारतीय जनता पक्षाच्या  बगलेत गेले आणि शरद यादव यांनी भाजपविरोधी ही आघाडी गतिमान केली. काँग्रेसला हे हवंच होतं. त्यांना सध्या वाईट दिवस आलेत. प्रभावशाली पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रथ आडवायचा तर एकटे राहुल गांधी, एकटी काँग्रेस पुरी पडणार नाही, हे वास्तव काँग्रेसवाल्यांच्या लक्षात आलंय. म्हणून खुद्द राहुल गांधींनी दिल्लीत झालेल्या पहिल्या ‘सांझी विरासत बचाव संमेलना’ला हजेरी लावली होती. या अभियानात भाजपेतर १८ पक्ष एकत्र आलेत.

दिल्ली पाठोपाठ सांझी विरासतची जयपूर, इंदोर, अहमदाबाद याठिकाणी मोठमोठी संमेलनं झाली. मुंबईत २७ ऑक्टोबरला संमेलन झालं. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद होता. षण्मुखानंद हॉल गर्दीने तुडुंब भरला होता. देशभर विविध राज्यांतल्या मोठमोठ्या शहरांत अशी संमेलनं होणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपविरोधी वातावरण तापवत न्यायचं, त्यासाठी १९७७ साली जसं काँग्रेसविरोधी, इंदिरा गांधी यांच्या एकछत्री नेतृत्वाविरोधी 'जनता प्रयोग' झाला होता, तसा प्रयोग मोदी विरोधात करायचा. जनता प्रयोगात काँग्रेसविरोधाच्या असंतोषाचा चेहरा म्हणून लोकनायक जयप्रकाश नारायण यांना पुढे करण्यात आलं होतं. तसं भाजपविरोधी, मोदीविरोधी बंडाचं नेतृत्व शरद यादव यांच्या गळ्यात टाकून त्यांना दुसरा जयप्रकाश बनवायचा अशी ही रचना दिसतेय.

या रचनेचा भाग म्हणून मुंबईत जनता दल युनायटेडचे राज्य अध्यक्ष आमदार कपिल पाटील व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांझी विरासत संमेलन घेतलं होतं. राज्यभरातून कार्यकर्ते, प्रतिनिधी संमेलनात सहभागी झाले होते. मंचावर शरद यादव, कॉम्रेड सिताराम येचुरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तारिक अन्वर, काँग्रेसचे नेते खासदार आनंद शर्मा, खासदार अशोक चव्हाण, कॉम्रेड डी. राजा, खासदार अन्वर अली, झारखंड विकास मोर्चाचे नेते माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी, राष्ट्रीय जनता दलाचे खासदार जयप्रकाश यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, समाजवादी पक्षाचे आमदार अबु असिम आझमी, जनता दल युनायटेडच्या शेतकरी नेत्या सुशिला मोराळे, तृणमूल काँग्रेसचे खासदार सुकेन्दु शेखर रॉय, लोकदलाचे नेते संजय अजित चौधरी या नेत्यांचा समावेश होता.

संजय निरुपम यांनी सुरुवातीला संमेलनाची भूमिका सांगितली. ते म्हणाले, “सांझी विरासत म्हणजे आपल्या सगळ्यांची संयुक्त विरासत. सर्वांचा वारसा. हजारो वर्षं आपण गुण्यागोविंदानं एकत्र राहतोय. विविध धर्म, हजारो जाती, अनेक पंथ, विभाग या सर्व विविधतेत आपण भारतीय होऊन जगतोय. या संयुक्त वारशाला साडेतीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं धक्के मारायला सुरुवात केली. सत्तेची नशा त्यांना एवढी चढली की, ते विकासाच्या नावावर मते मिळालीत हे विसरले आणि या सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवायला सुरुवात केली. हा अजेंडा देश, समाज तोडण्याचा आहे. देश वाचवण्यासाठी या मंचावर १८ पक्ष एक झालेत. आम्ही मिळून २०१९ ला भाजपला हरवल्याशिवाय राहणार नाही. मुंबईतल्या या पाचव्या सांझी विरासत संमेलनात भाजपला धूळ चारण्याचा निर्धार करूयात.” निरुपम यांनी संमेलनाचा संदेशच सांगितला. त्यानंतर कपिल पाटील यांनी शरद यादव यांचं म. फुले पगडी, घोंगडी देऊन स्वागत केलं. शरद यादवांनी डोक्यावरची फुले पगडी समारंभात शेवटपर्यंत ठेवली होती. त्यानंतर सिताराम येचुरींसह इतर नेत्यांचाही घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कारानंतर प्रमुख नेत्यांची मनोगतं सुरू झाली. त्यात तृणमूल काँग्रेसचे खासदार सुकेन्दू शेखर रॉय म्हणाले, “मी बंगालच्या उपसागराच्या काठावरनं मुंबईत पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निरोप घेऊन आलोय. ममता दीदी म्हणाल्या की, सांझी विरासत संमेलनास बंगाली जनतेच्या शुभेच्छा आहेत. सांझी विरासत म्हणजे आपलं संविधान. हे संविधान भाजप सरकारने मोडीत काढण्याचा डाव टाकलेला आहे. तो सारे भारतीय मिळून हाणून पाडूयात. या आंदोलनात सारी बंगाली जनता आपल्या सोबत आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीत तृणमूल काँग्रेस नेहमी पुढे राहील.”

सुकेन्दू शेखर यांनी बंगाली जनतेचा निरोप संमेलनात सांगितल्यानंतर तारिक अन्वर यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, “साडेतीन वर्षांपासून देशात धर्माच्या नावावर फक्त देश तोडण्याची कृती होतेय. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैद्राबाद विद्यापीठ, काशीतली हिंदू विद्यापीठ, पुण्यातलं फिल्म इन्स्टिट्यूट, अलिगढ विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ रा. स्व. संघाच्या दबावाखाली कुलगुरू, संस्थाप्रमुख काम करतात. विद्यार्थ्यांना ‘देशद्रोही’ ठरवतात. शिक्षणाचं संघीकरण करतात. गुजरात, उत्तरप्रदेशात गोरक्षक दलितांना टार्गेट करतात. उघडं-नागडं करून मारतात. विद्यार्थ्यांना गायब केलं जातं, रोहित वेमुल्लाला आत्महत्या करायला भाग पाडणारं वातावरण तयार केलं जातं. या घटना म्हणजे संविधानाला मोडीत काढण्याची पावलं आहेत. ही पावलं रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होऊन संघाच्या अजेंड्याला विरोध केला पाहिजे.”

.............................................................................................................................................

नवनवीन पुस्तकांसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

कम्युनिस्ट नेते डी. राजा यांनी तर थेट उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच टार्गेट केलं. ते म्हणाले, “हा माणूस मुख्यमंत्री आहे की पुजारी? शेकडो रामाची लेकरं ऑक्सिजनशिवाय यांच्या राज्यात मरतात. रामाला किती दुःख होत असेल? लेकरांना दावाखान्यात हा मुख्यमंत्री ऑक्सिजन देऊ शकत नाही. मात्र आयोध्येत शरयू नदीच्या काठी रामाचा भव्य पुतळा उभारण्याच्या घोषणा हा मुख्यमंत्री करतो. त्यासाठी करोडो रुपये देण्याचा निर्णय घेतो. याला काय म्हणावं? हे धार्मिक लोक आहेत की नरभक्षक? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान यांना मोडीत काढायचं आहे. त्यांच्या या मनसुब्यांना हाणून पाडूयात.”

अशोक चव्हाण यांनी या संमेलनात प्रभावी भाषण केलं. त्यांच्या चेहऱ्यावर, देहबोलीत नांदेड विजयाची यशाची झलक दिसत होती. ते म्हणाले, “आम्ही नांदेडमध्ये भाजपला तीन नगरसेवकांवर आणून भुईसपाट केलं. दलित, मुस्लीम, शेतकरी, गरीब जनता आता भाजपच्या ढोंगाला वैतागली आहे. नोटाबंदी, जीएसटी, पेट्रोल-डिझेल महागाई, बेरोजगारी यांमुळे त्रस्त जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा वीट आलाय. मोदी म्हणतात- चाय, चाय; योगी करतात, गाय, गाय; लोक म्हणू लागलेत, बाय बाय..! लोक २०१९ सालातल्या निवडणुकांत भाजपला बाय करणार आहेत. त्यासाठी सर्वांनी एक झालं पाहिजे.”

राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं की, “भाजपने शेतकऱ्यांना फसवलं. भाजपच्या लोकांनाच फक्त अच्छे दिन आलेत. बाकी कष्टकरी, कामगारांना या सरकारने पीडा दिलीय. शेती मालाला किफायतशीर भाव, दरवर्षी दोन कोटी रोजगार ही आश्वासनं न पाळता दररोज नवनव्या पोकळ घोषणा करणाऱ्या  सरकारला जनता विटली आहे.” राजू शेट्टींच्या भाषणाला लोक टाळ्यांनी दाद देत होते.

या संमेलनात आनंद शर्मा, सिताराम येचुरी, शरद यादव यांची भाषणं मोदी सरकारवर हल्ला चढवणारी होती. गेल्या ७० वर्षांत एवढं वाईट सरकार भारतीय जनतेनं पाहिलं नव्हतं, अशी साऱ्यांची मांडणी होती. शरद यादव यांच्याभोवती सर्व विरोधी पक्ष एकत्र करायचे आणि २०१९ ला मोदी, भाजपला हरवायचं असा सगळ्यांचा निर्धार दिसला. काँग्रेसच्या पुढाकारानं एकत्र आलेल्या अशा या मंचावर राजू शेट्टी पहिल्यांदा दिसले. शेट्टी यांचं राजकारण काँग्रेसविरोधी राहिलंय. शरद यादव हेही समाजवादी नेते व डॉ. राममनोहर लोहियांचे शिष्य. लोहिया, यादव, जयप्रकाश हे काँग्रेसविरोधी राजकारण करणारे नेते. पण आज समीकरणं बदलली आहेत. भाजप काँग्रेसपेक्षा बदतर झाल्याची शरद यादवांची मांडणी आहे. २००४ साली सोनिया गांधींनी भाजपविरोधी पक्षांना एक करू सत्ता मिळवली होती. त्यापुढे जाऊन राहुल गांधी बेरजेचं राजकारण करताना दिसत आहेत.

.............................................................................................................................................

नवनवीन पुस्तकांसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

या नव्या भाजपविरोधी प्रयोगात शरद यादव जयप्रकाशांची भूमिका बजावू शकतील काय, या प्रश्नाचं उत्तर काळाच्या पोटात दडलेलं आहे. राजकारण ही खूप निसरडी प्रक्रिया असते. त्यात काय काय घडेल हे सांगता येत नाही. पण शरद यादव हे अभ्यासू, लढावू आणि चारित्र्यवान नेते आहेत. हवाला पैसा देवघेवीत नाव आलं तर त्यांनी तत्काळ  खासदारकी सोडली होती. ते सत्तेमागे पळणारे नेते नाहीत. सत्तेला अंगावर घेणारे आहेत. सर्व पक्षांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटताना दिसतोय. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे समन्वयक म्हणूनही त्यांचा अनुभव मोठा आहे. सध्याच्या घडीला भाजपविरोधकांकडे त्यांच्या इतका अनुभवी आणि विश्वासार्ह नेता कुणी नाही. या नेत्याच्या भोवती जमून विरोधक भाजपला कसं राजकीय आव्हान देतात, हे येत्या काळात बघणं कुतुहलाचं ठरणार आहे.

.....................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Rohit Deo

Thu , 09 November 2017

भाजपाचा हिंदूतवाचा अजेंडा आहे हे खरं, पण जेपिच्या नेतृत्वाखाली जे सरकार बनला ते किती दिवस आणि कसे चालले हे सर्वांना माहित आहे. काँग्रेस आणि मित्र पक्षांनी जाती बरोबर विकासच राजकारण करणं अपेक्षित आहे. जे इतके दिवस दिसून आले नाही.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......