देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची घोषणा, अगदी देश स्वतंत्र होण्यापूर्वीच सुरू झाली होती...
ग्रंथनामा - झलक
कुमार केतकर
  • डावीकडे ‘ज्वालामुखीच्या तोंडावर’च्या दुसऱ्या, मध्यभागी चौथ्या आणि उजवीकडे तिसऱ्या आवृत्तीचे मुखपृष्ठ
  • Fri , 13 October 2017
  • ग्रंथनामा Granthanama झलक ज्वालामुखीच्या तोंडावर Jwalamukhichya Tondawar कुमार केतकर Kumar Ketkar ग्रंथाली Granthali काँग्रेसमुक्त भारत Congress-mukt Bharat

‘ज्वालामुखीच्या तोंडावर’ या ज्येष्ठ पत्रकार-संपादक कुमार केतकर यांच्या गाजलेल्या पुस्तकाची नुकतीच चौथी सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली आहे. ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या या आवृत्तीला केतकरांनी लिहिलेलं हे मनोगत…

.............................................................................................................................................

‘ज्वालामुखीच्या तोंडावर’च्या या चवथ्या आवृत्तीचे निमित्त आहे, इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दीचे. पहिली आवृत्ती १९७९च्या अखेरीस आणि १९८०च्या सुरुवातीस प्रसिद्ध झाली होती. पुस्तकाचे लेखन जनता पक्षाचे सरकार सत्तेत असताना झाले होते. त्या आवृत्तीत असे ‘भाकीत’ केले होते की, जनता सरकार फार काळ टिकणार नाही आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत येऊन पंतप्रधान होतील! हे ‘भाकीत’ कोणतीही कुंडली न मांडता आणि कोणत्याही ग्रह-ताऱ्यांना न विचारता केले होते. जनता पक्षाचा जन्म, जयप्रकाशांचे बेभरवशाचे व दिशाहीन राजकारण आणि इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची राजकीय शैली यांचा वेध घेऊन ते भाकीत केलेले होते. ती आवृत्ती दीड-दोन महिन्यांतच संपली.

जनता पक्षाची राजवट मार्च १९७७ ते जुलै १९७९. म्हणजे मोरारजी देसाई पंतप्रधान असल्याचा सुमारे सव्वादोन वर्षांचा काळ. त्यानंतर, म्हणजे मोररजी सरकार गडगडल्यानंतर, चरणसिंग पंतप्रधान झाले. पण ते एकही दिवस लोकसभेसमोर येऊ शकले नाहीत. लोकसभेत विश्वासदर्शक ठराव यायच्या आतच त्यांचे सरकार अंतर्धान पावले. जानेवारी १९८०मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने निवडून येऊन चवथ्यांदा पंतप्रधान झाल्या. (१९६६, १९६७, १९७१ आणि १९८०).

परंतु हा चार वर्षांचा काळ विलक्षण चित्तथरारक आणि महाभयंकर अशा घटनांनी व्यापलेला होता.

पुस्तकाची दुसरी आवृत्ती संजय गांधी यांच्या आपघाती निधनानंतर (२३ जून १९८०) दोन वर्षांनी प्रसिद्ध झाली आणि तिसरी आवृत्ती इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्येनंतर – म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८४नंतर!

आता सुमारे ३३ वर्षांनंतर ही चवथी आवृत्ती प्रकाशित होत आहे. हा काळही सर्वार्थाने झपाटलेला, द्वेषमूलक राजकारणाने बहकलेला, हिंसाचाराने वेढलेला आणि एका अनिश्चिततेच्या भोवऱ्यातून बाहेर येताच दुसऱ्या भोवऱ्यात सापडत जाणारा काळ आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सातच वर्षांनी राजीव गांधींची हत्या झाली – २१ मे १९९१.

त्यानंतर तो आजतागायत नेहरू-गांधी कुटुंबापैकी कुणीही थेट, अप्रत्यक्षपणे सरकारमध्ये नाही. परंतु तरीही गेली २६ वर्षे नेहरू-इंदिरा-राजीव यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, धोरणांचा, राजकारणाचा प्रभाव आणि संदर्भ टिकून आहे. किंबहुना काँग्रेसचेच नव्हे तर देशाचेच राजकारण त्यांच्या जीवनाच्या आलेखापासून वेगळे करता येत नाही.

देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची गर्जना आणि वल्गना सध्या खूपच वरच्या आवाजात चालू आहे. ‘काँग्रेस’ म्हणजे ‘भ्रष्टाचार’ आणि ‘भ्रष्टाचारी व्यवस्था’ म्हणजेच ‘काँग्रेस संस्कृती’ अशी मांडणीही तमाम मीडियामध्ये, विशेषत: ‘सोशल मीडिया’त सुरू आहे. अशी मांडणी करणारे आंधळे आणि बहिरे नाहीत. त्यांनी जाणीवपूर्वक सध्याच्या मोदी राजवटीत सुरू असलेला काळा बाजार, काळ्या पैशाचे प्रचंड व्यवहार, बेबंदशाही आणि बेमुर्वतशाही याकडे पाहायचे नाही वा त्यासंबंधी ऐकायचे नाही, त्याविषयी लिहायचे नाही वा जाहीर बोलायचे नाही असे ठरविले आहे. अनेक भोळसट वा मूर्ख माणसांनीही चेहऱ्यावर बुरखा चढविला आहे.

परंतु देश ‘काँग्रेसमुक्त’ करायचा विडा उचलणारे फक्त नरेंद्र मोदी-अमित शहा नाहीत. त्या घोषणेचा ‘कॉपीराईट’ही त्यांच्याकडे नाही! देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची घोषणा, अगदी देश स्वतंत्र होण्यापूर्वीच सुरू झाली होती. लॉर्ड कर्झन (बंगालची फाळणी करणारे इंग्रज राजवटीचे स्वयंभू शहेनशहा) यांनी देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची प्रतिज्ञा सुमारे ११० वर्षांपूर्वीच केली होती. काँग्रेस तेव्हा पंचवीस वर्षांचीही नव्हती, पण लॉर्ड कर्झन आणि पर्यायाने इंग्रज साम्राज्यवाद्यांनी तेव्हाच काँग्रेसचा धसका घेतला होता. पुढे तीच गर्जना राम मनोहर लोहियांनी केली. त्यानंतर देशाला ‘काँग्रेसमुक्त’ आणि ‘भ्रष्टाचारमुक्त’ करण्याचा विडा जयप्रकाश नारायणांनी उचलला होता. तोच अर्धवट उरलेला विडा विश्वनाथ प्रतापसिंग यांनी उचलला. पण जनता पक्ष आणि जयप्रकाश नामोहरम होऊन इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या होत्या. काँग्रेसचा आणि खुद्द इंदिरा गांधींचा १९७७मध्ये पराभव झाल्यावर तशाच जल्लोषात जाहीर केले गेले की, ‘इंदिरा गांधी संपल्या’ आणि काँग्रेसही!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

इंदिरा गांधी जाऊन ३३ वर्षे झाली तरी आजही त्यांना ‘संपविण्याचे’ प्रयत्न चालू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत जनसंघाला आणि त्याच्या भारतीय जनता पक्ष या १९८०च्या अवताराला आणि नरेंद्र मोदीरूपी त्यांच्या महा-अवताराला तर नेहरू प्रणालीची व कुटुंबाची इतकी धास्ती वाटते की, जशी कंसाला वसुदेवाच्या मुलांबद्दल (जन्माला आलेल्या व न आलेल्या) वाटावी तशी!

नेहरू, इंदिरा  वा राजीव यांचे नाव, चिन्ह आणि प्रतिमा व संस्था मुळापासून उखडून काढण्याचा संघपरिवाराचा अक्राळ-विक्राळ प्रयत्न चालू आहे. पंडित नेहरूंनी उभे केलेले ‘प्लॅनिंग कमिशन’ उर्फ नियोजन आयोग असो वा इंदिरा गांधींनी आणलेले बॅंक राष्ट्रीयीकरण असो – त्या सर्व गोष्टींना विस्मृतीत ढकलून नवे ‘हिंदू राष्ट्र’ निर्माण करण्याचे जोरदार, आक्रमक आणि हिंस्र प्रयत्न सुरू आहेत. नरेंद्र मोदी हे नेहरू-इंदिरा-राजीव या सर्वांपेक्षा श्रेष्ठच नव्हे तर भारताच्या इतिहासात न भूतो-न भविष्यती असे मसीहा आहेत, असे चित्र सर्व मीडिया-सोशल मीडियाला दावणीला बांधून रंगविले जात आहे.

तरीही त्यांना इंदिरा गांधींना संपविता आलेले नाही – कारण इंदिरा गांधींचे स्थान कोट्यवधी लोकांच्या हृदयात कोरले गेलेले आहे. त्यांची प्रतिमा मीडियाला हाताशी धरून निर्माण केली गेली नव्हती. इंदिरा गांधींच्या काळात इतके खासगी टीव्ही चॅनेल नव्हते, इंटरनेट नव्हता, सोशल मीडिया नव्हता आणि तरीही त्यांचे कार्यकर्तृत्व आणि त्यांच्या प्रतिभेची प्रतिमा लखलखीत आहे. त्या कार्यकर्तृत्वाचा आणि प्रतिभेचा शोध आणि वेध या चवथ्या आवृत्तीत पुन्हा घेत आहे.

.................................................................................................................................................................

‘ज्वालामुखीच्या तोंडावर’ या कुमार केतकर यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4256

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 16 October 2017

मोहनदास करमचंद गांधींनाही भारत काँग्रेसमुक्त करावासा वाटंत होता. यामागचं जे तत्कालीन कारण होतं तेच कारण आज २०१७ सालीही आहे. मग मोदींच्या नावाने बोंबाबोंब कशाला? अशी फुकाची अपप्रचारामुळे मोदींना मतं मिळतात. असो. राष्ट्रनिर्मिती म्हंटली की हिंसा होतेच. कुठलंही राष्ट्र त्यातनं सुटलं नाहीये. अगदी शिवाजीमहाराजांनाही राष्ट्रनिर्मितीसाठी हिंसेचाच आधार घ्यावा लागला. मग कुणाची तरी एव्हढी का फाटलीये? -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......