देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची घोषणा, अगदी देश स्वतंत्र होण्यापूर्वीच सुरू झाली होती...
ग्रंथनामा - झलक
कुमार केतकर
  • डावीकडे ‘ज्वालामुखीच्या तोंडावर’च्या दुसऱ्या, मध्यभागी चौथ्या आणि उजवीकडे तिसऱ्या आवृत्तीचे मुखपृष्ठ
  • Fri , 13 October 2017
  • ग्रंथनामा Granthanama झलक ज्वालामुखीच्या तोंडावर Jwalamukhichya Tondawar कुमार केतकर Kumar Ketkar ग्रंथाली Granthali काँग्रेसमुक्त भारत Congress-mukt Bharat

‘ज्वालामुखीच्या तोंडावर’ या ज्येष्ठ पत्रकार-संपादक कुमार केतकर यांच्या गाजलेल्या पुस्तकाची नुकतीच चौथी सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली आहे. ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या या आवृत्तीला केतकरांनी लिहिलेलं हे मनोगत…

.............................................................................................................................................

‘ज्वालामुखीच्या तोंडावर’च्या या चवथ्या आवृत्तीचे निमित्त आहे, इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दीचे. पहिली आवृत्ती १९७९च्या अखेरीस आणि १९८०च्या सुरुवातीस प्रसिद्ध झाली होती. पुस्तकाचे लेखन जनता पक्षाचे सरकार सत्तेत असताना झाले होते. त्या आवृत्तीत असे ‘भाकीत’ केले होते की, जनता सरकार फार काळ टिकणार नाही आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत येऊन पंतप्रधान होतील! हे ‘भाकीत’ कोणतीही कुंडली न मांडता आणि कोणत्याही ग्रह-ताऱ्यांना न विचारता केले होते. जनता पक्षाचा जन्म, जयप्रकाशांचे बेभरवशाचे व दिशाहीन राजकारण आणि इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची राजकीय शैली यांचा वेध घेऊन ते भाकीत केलेले होते. ती आवृत्ती दीड-दोन महिन्यांतच संपली.

जनता पक्षाची राजवट मार्च १९७७ ते जुलै १९७९. म्हणजे मोरारजी देसाई पंतप्रधान असल्याचा सुमारे सव्वादोन वर्षांचा काळ. त्यानंतर, म्हणजे मोररजी सरकार गडगडल्यानंतर, चरणसिंग पंतप्रधान झाले. पण ते एकही दिवस लोकसभेसमोर येऊ शकले नाहीत. लोकसभेत विश्वासदर्शक ठराव यायच्या आतच त्यांचे सरकार अंतर्धान पावले. जानेवारी १९८०मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने निवडून येऊन चवथ्यांदा पंतप्रधान झाल्या. (१९६६, १९६७, १९७१ आणि १९८०).

परंतु हा चार वर्षांचा काळ विलक्षण चित्तथरारक आणि महाभयंकर अशा घटनांनी व्यापलेला होता.

पुस्तकाची दुसरी आवृत्ती संजय गांधी यांच्या आपघाती निधनानंतर (२३ जून १९८०) दोन वर्षांनी प्रसिद्ध झाली आणि तिसरी आवृत्ती इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्येनंतर – म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८४नंतर!

आता सुमारे ३३ वर्षांनंतर ही चवथी आवृत्ती प्रकाशित होत आहे. हा काळही सर्वार्थाने झपाटलेला, द्वेषमूलक राजकारणाने बहकलेला, हिंसाचाराने वेढलेला आणि एका अनिश्चिततेच्या भोवऱ्यातून बाहेर येताच दुसऱ्या भोवऱ्यात सापडत जाणारा काळ आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सातच वर्षांनी राजीव गांधींची हत्या झाली – २१ मे १९९१.

त्यानंतर तो आजतागायत नेहरू-गांधी कुटुंबापैकी कुणीही थेट, अप्रत्यक्षपणे सरकारमध्ये नाही. परंतु तरीही गेली २६ वर्षे नेहरू-इंदिरा-राजीव यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, धोरणांचा, राजकारणाचा प्रभाव आणि संदर्भ टिकून आहे. किंबहुना काँग्रेसचेच नव्हे तर देशाचेच राजकारण त्यांच्या जीवनाच्या आलेखापासून वेगळे करता येत नाही.

देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची गर्जना आणि वल्गना सध्या खूपच वरच्या आवाजात चालू आहे. ‘काँग्रेस’ म्हणजे ‘भ्रष्टाचार’ आणि ‘भ्रष्टाचारी व्यवस्था’ म्हणजेच ‘काँग्रेस संस्कृती’ अशी मांडणीही तमाम मीडियामध्ये, विशेषत: ‘सोशल मीडिया’त सुरू आहे. अशी मांडणी करणारे आंधळे आणि बहिरे नाहीत. त्यांनी जाणीवपूर्वक सध्याच्या मोदी राजवटीत सुरू असलेला काळा बाजार, काळ्या पैशाचे प्रचंड व्यवहार, बेबंदशाही आणि बेमुर्वतशाही याकडे पाहायचे नाही वा त्यासंबंधी ऐकायचे नाही, त्याविषयी लिहायचे नाही वा जाहीर बोलायचे नाही असे ठरविले आहे. अनेक भोळसट वा मूर्ख माणसांनीही चेहऱ्यावर बुरखा चढविला आहे.

परंतु देश ‘काँग्रेसमुक्त’ करायचा विडा उचलणारे फक्त नरेंद्र मोदी-अमित शहा नाहीत. त्या घोषणेचा ‘कॉपीराईट’ही त्यांच्याकडे नाही! देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची घोषणा, अगदी देश स्वतंत्र होण्यापूर्वीच सुरू झाली होती. लॉर्ड कर्झन (बंगालची फाळणी करणारे इंग्रज राजवटीचे स्वयंभू शहेनशहा) यांनी देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची प्रतिज्ञा सुमारे ११० वर्षांपूर्वीच केली होती. काँग्रेस तेव्हा पंचवीस वर्षांचीही नव्हती, पण लॉर्ड कर्झन आणि पर्यायाने इंग्रज साम्राज्यवाद्यांनी तेव्हाच काँग्रेसचा धसका घेतला होता. पुढे तीच गर्जना राम मनोहर लोहियांनी केली. त्यानंतर देशाला ‘काँग्रेसमुक्त’ आणि ‘भ्रष्टाचारमुक्त’ करण्याचा विडा जयप्रकाश नारायणांनी उचलला होता. तोच अर्धवट उरलेला विडा विश्वनाथ प्रतापसिंग यांनी उचलला. पण जनता पक्ष आणि जयप्रकाश नामोहरम होऊन इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या होत्या. काँग्रेसचा आणि खुद्द इंदिरा गांधींचा १९७७मध्ये पराभव झाल्यावर तशाच जल्लोषात जाहीर केले गेले की, ‘इंदिरा गांधी संपल्या’ आणि काँग्रेसही!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

इंदिरा गांधी जाऊन ३३ वर्षे झाली तरी आजही त्यांना ‘संपविण्याचे’ प्रयत्न चालू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत जनसंघाला आणि त्याच्या भारतीय जनता पक्ष या १९८०च्या अवताराला आणि नरेंद्र मोदीरूपी त्यांच्या महा-अवताराला तर नेहरू प्रणालीची व कुटुंबाची इतकी धास्ती वाटते की, जशी कंसाला वसुदेवाच्या मुलांबद्दल (जन्माला आलेल्या व न आलेल्या) वाटावी तशी!

नेहरू, इंदिरा  वा राजीव यांचे नाव, चिन्ह आणि प्रतिमा व संस्था मुळापासून उखडून काढण्याचा संघपरिवाराचा अक्राळ-विक्राळ प्रयत्न चालू आहे. पंडित नेहरूंनी उभे केलेले ‘प्लॅनिंग कमिशन’ उर्फ नियोजन आयोग असो वा इंदिरा गांधींनी आणलेले बॅंक राष्ट्रीयीकरण असो – त्या सर्व गोष्टींना विस्मृतीत ढकलून नवे ‘हिंदू राष्ट्र’ निर्माण करण्याचे जोरदार, आक्रमक आणि हिंस्र प्रयत्न सुरू आहेत. नरेंद्र मोदी हे नेहरू-इंदिरा-राजीव या सर्वांपेक्षा श्रेष्ठच नव्हे तर भारताच्या इतिहासात न भूतो-न भविष्यती असे मसीहा आहेत, असे चित्र सर्व मीडिया-सोशल मीडियाला दावणीला बांधून रंगविले जात आहे.

तरीही त्यांना इंदिरा गांधींना संपविता आलेले नाही – कारण इंदिरा गांधींचे स्थान कोट्यवधी लोकांच्या हृदयात कोरले गेलेले आहे. त्यांची प्रतिमा मीडियाला हाताशी धरून निर्माण केली गेली नव्हती. इंदिरा गांधींच्या काळात इतके खासगी टीव्ही चॅनेल नव्हते, इंटरनेट नव्हता, सोशल मीडिया नव्हता आणि तरीही त्यांचे कार्यकर्तृत्व आणि त्यांच्या प्रतिभेची प्रतिमा लखलखीत आहे. त्या कार्यकर्तृत्वाचा आणि प्रतिभेचा शोध आणि वेध या चवथ्या आवृत्तीत पुन्हा घेत आहे.

.................................................................................................................................................................

‘ज्वालामुखीच्या तोंडावर’ या कुमार केतकर यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4256

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 16 October 2017

मोहनदास करमचंद गांधींनाही भारत काँग्रेसमुक्त करावासा वाटंत होता. यामागचं जे तत्कालीन कारण होतं तेच कारण आज २०१७ सालीही आहे. मग मोदींच्या नावाने बोंबाबोंब कशाला? अशी फुकाची अपप्रचारामुळे मोदींना मतं मिळतात. असो. राष्ट्रनिर्मिती म्हंटली की हिंसा होतेच. कुठलंही राष्ट्र त्यातनं सुटलं नाहीये. अगदी शिवाजीमहाराजांनाही राष्ट्रनिर्मितीसाठी हिंसेचाच आधार घ्यावा लागला. मग कुणाची तरी एव्हढी का फाटलीये? -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......