भाजपचा नक्षा उतरवणारा कौल!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Tue , 04 June 2024
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

संसदीय लोकशाहीत मतदारच निर्णायक असतो, कुणी ईश्वरानं पाठवलेला ‘अंश’ किंवा ‘मंदिर-निर्माता’ नाही, असा इशाराच जणू नरेंद्र मोदी आणि भाजपला या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिला आहे.

केवळ ‘चारशे पार’च नाही, सोबतच नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ‘धर्मांध अहंकारा’चा फुगाच भारतीय मतदारांनी फोडला आहे,

...आणि सत्ता मिळाली म्हणून यापुढे उतू नका, मातू नका, अन्यथा पुढच्या निवडणुकीत सरळ घरचा रस्ता दाखवू, असं स्पष्टपणे बजावलं आहे.

खरं तर, या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले, तेव्हा निवडणुकीचा कौल सुरुवातीपासूनच मोदी आणि भाजपला अनुकूल असल्याचं वातावरण होतं. स्थिर सरकार यावं, अशा मताचं आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्र होतं, म्हणजेच हे दोन्ही घटक अप्रत्यक्षपणे मोदींना अनुकूल होते.

गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या जागांचा संख्या शास्त्रीय कौल बाजूनं होता, मध्यमवर्गीय बहुसंख्येनं मोदींच्या प्रेमात होते, माध्यमं अंकित होती, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ट्रोल्सच्या टोळ्या हाती होत्या, रामाच्या नावानं माजवलेला धर्मांध उन्माद सोबतीला होता आणि समोर एकसंघ प्रबळ विरोधी पक्ष नाही, अशी स्थिती असल्यानं भाजप पुन्हा सत्तेत येणार आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे स्पष्ट होतं.

‘हिंदुत्वा’चा उरलेला ‘अजेंडा’ अमलात आणण्यासाठी त्यामुळे सभागृहात तीन चतुर्थांश बहुमताची महत्त्वाकांक्षा बळावली. ती संधी होण्यासाठी विरोधी पक्षाला खिंडार पाडण्याचे उद्योग केले गेले आणि त्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या चौकशी यंत्रणांचा खुले आम वापर झाला.

गेल्या दहा वर्षांत संसदीय लोकशाहीला साजेसे वर्तन मोदी यांच्याकडून घडले नाही, यात कोणताही संशय नाही. लोकशाहीला मुळीच अपेक्षित नसलेला एक वेगळा अजेंडा नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांना साथीला घेऊन वापरला.

‘अंकित व्हा नाही, तर कारागृहात जाण्याची तयारी करा’, हे धोरण अवलंबून या काळात किती राजकीय नेत्यांना कारागृहात पाठवण्यात आलं, त्याची यादी मोठी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्याचं अगदी ताजं उदाहरण आहे.

महाराष्ट्रात अजित पवार ते हर्षवर्धन देशमुख अशी ती फार मोठी साखळी आहे. राज्य व  देशातील जे राजकीय नेते त्यांचा पक्ष सोडून भाजपसोबत गेले, ते एका रात्रीत ‘स्वच्छ’ ठरले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

याच काळात सरकार आणि पक्ष या पातळीवरही नरेंद्र मोदी (आणि अर्थातच अमित शहा) यांनी हेच धोरण अवलंबलं. विरोधी पक्षांना तुच्छ लेखण्यात धन्यता मानली जाऊ लागली. लोकशाहीत विरोध हे लोकशाही सुदृढ करणारे हत्यार असते, पण मोदी-पर्वात त्यावर ‘देशद्रोहीपणा’चे शिक्के मारले जाऊ लागले.

जळणारं माणिपूर न विझवण्याची मग्रुरी दाखवली, करोनाच्या काळातील मृतांच्या तळतळाटाकडे दुर्लक्ष केलं. (त्याचा फटका उत्तर प्रदेशात बसला आहेच.) पक्षातही त्यांनी विरोधक शिल्लक ठेवला नाही. भाजप राजकीय पक्ष न राहता ‘मोदी परिवार’ झाला. पक्षातले सर्व लोक त्या परिवाराचे सदस्य झाले. सर्वांच्या ‘टॅगलाईन’मध्ये तो पक्षाचा नव्हे, तर मोदी परिवाराचा सदस्य, असा उल्लेख आला. सरकार देशाचे ना राहता मोदी सरकार झाले आणि सरकारची हमी ‘मोदी की गॅरंटी’ झाली...

नरेंद्र मोदी यांचं वर्तन ते जणू या देशाचे सर्वेसर्वा आहेत असं होत गेलं. ‘मी, माझं आणि माझं’च असा त्यांचा प्रवास होत गेला. स्वत:ला ईश्वराचा अंश मानण्यापर्यंत मोदी यांनी मजल मारली. हे ‘व्यक्तीमाहात्म्य’ संघपरिवारालाही पसंत नव्हतं. त्याबद्दल संघपरिवारानं उघड व्यक्त केली नसली, तरी त्याबद्दल नाराजी होती आणि तो खाजगीत बोलूनही दाखवली जात होती.

पक्षाच्या संघटन सचिवपदावरून संघाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय झाला. ‘भाजपला आता संघाच्या मदतीची गरज नाही’, अशी उद्दाम भाषा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे ‘पोपट’ अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली सरकार आणि पक्षात जुने-जाणते बाजूला पाडले गेले. राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासारख्यांनी मोदींच्या या वर्चस्वासमोर अक्षरक्ष: नांग्या टाकल्यावर बाकीच्या अंतर्गत टिकाकरांनी मौन बाळगलं, यात आश्चर्य नव्हतं.  (नुकत्याच झालेल्या नागपूरच्या चकरेत हे अनेकांकडून ऐकायला मिळालं. संघ आणि मोदी यांच्यातले संबंध पूर्वीसारखे मधुर राहिलेले नाहीत, हेही ऐकायला मिळालं.)

‘पप्पू’ म्हणून ज्याची हेटाळणी केली गेली, त्या राहुल गांधींनी नरेंद्र मोदी यांना अक्षरक्ष: जेरीस आणलं. देशात हजारो किलोमीटर्सची पदयात्रा राहुल गांधी यांनी काढली. पक्षाची सूत्रे गांधी कुटुंबाबाहेर सोपवत ‘इंडिया’ ही आघाडी बांधली. एकेक काडी जोडत ही मोळी बळकट केली. परिणामी या लोकसभेत काँग्रेसचा आकडा शंभराच्या उंबरठ्यावर पोहोचलाय.

महाराष्ट्रात तर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष ज्या पद्धतीने फोडले गेले, त्यातून भाजप ( पक्षी : अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस) विरोधात नाराजी आणि उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार काही विशिष्ट उद्योगपतीचे हित जोपासते, हे सरकार ‘शेतकरीविरोधी’ आहे, असे जे विरोधी पक्षांनी वारंवार सांगितलं, त्याबद्दल विशेषत: ग्रामीण भागातील लोकांची खात्री पटत गेली. शहरी माणूस भाजप म्हणजे मोदींच्या बाजूने, तर ग्रामीण जनता विरोधात, अशी विभागणी होत गेली.

आताही जिंकलेल्या जागा बघा, भाजपनं जिंकलेल्या ८० टक्के जागा शहरी भागातील आहेत. ग्रामीण भागात भाजपविरोधात सुप्त लाट आहे, हे माझ्या लक्षात आणून दिलं, ते वाशीमच्या हरिष सारडा यानं. जसजशी माहिती मिळवत गेलो, तसतसं लक्षात आलं की, भाजपला ग्रामीण महाराष्ट्रात मार पडणार आहे. कारण आता लोकांनी निवडणूक हाती घेतली आहे आणि घडलंही तसंच. विदर्भ आणि मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाला जोरदार पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

आता लोकसभा निवडणुकीचा निकाल आलाय, नरेंद्र मोदी आणि भाजपला सभागृहात बहुमत मिळालेलं नाही. या पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएचा कसाबसा का असेना विजय झाला आहे आणि तो मिळवताना मतदारांनी भाजपचा नक्षा पार उतरवला आहे. भाजप सभागृहातील सर्वांत मोठा पक्ष ठरला असला, तरी आता इतर पक्षांच्या कुबड्या घेत या पक्षाला देशाचा कारभार हाकावा लागणार आहे. खरं तर भाजपला न मिळालेल्या बहुमताची ‘ईश्वराचा अंश’ असण्याला साजेशी नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदी यांनी नेतृत्वाचा त्याग करायला हवा, पण तशी कोणतीही ‘गॅरंटी ’नरेंद्र मोदी घेणार नाहीत!

शेवटी, राज्याच्या राजकारणावरचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा प्रभाव कायम राखणारा आणि काँग्रेसला नवसंजीवनी देणाराही लोकसभा निवडणुकीचा हा मतदारांचा कौल आहे. येणारी विधानसभा निवडणूक त्यामुळे भाजपसाठी फार मोठे आव्हान ठरणार आहे. कदाचित भाजपच्या नेतृत्वाखालील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीला विरोधी पक्षात बसवणारी ही निवडणूक ठरेल!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 04 June 2024

नमस्कार प्रवीण बर्दापूरकर!

मुस्लीम मतांची मदत घेऊन उद्धव ठाकरेंनी आपला पाया शाबूत ठेवलाय. हा धोका कुणालाच कसा दिसंत नाही ?आज मुंबईचं जनमान ( डेमोग्राफिक्स ) बदलतंय. मुस्लीम लोकसंख्या झपाट्याने वाढतेय. दोन दिवसांपूर्वी रवीना टंडनला कसं घेरलं होतं त्या बुरखेवाल्या बायकांनी आणि दाढीधारी माणसांनी, ते दिसतं ना सगळ्यांना ! २०२४ चा लोकसभा निकाल ही कसली नांदी समजायची ? समस्त हिंदूंचा रवीना टंडन होणार का ?

आपला नम्र,
गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......