पासवानांच्या ‘चिराग’ची फडफड!   
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • चिराग पासवान आणि रामविलास पासवान; चिराग पासवान आणि नितीशकुमार
  • Sat , 19 June 2021
  • पडघम देशकारण भाजप BJP जद (यू) JDU लोक जनशक्ती पक्ष Lok Janshakti Party चिराग पासवान Chirag Paswan रामविलास पासवान Ram Vilas Paswan नितीशकुमार Nitish Kumar

शह-काटशह, डाव-प्रतिडाव, कोपरखळ्या, खुन्नस-वचपा, अशा अनेक कृती राजकारणात सतत घडत असतात. या कधी दृश्यमान असतात, तर कधी नसतात. दृश्यमान नसणाऱ्या अशा कृतींचे परिणाम काही काळानंतर दिसू लागतात. राजकारणाचा हा खेळ कधी कुणाला वर चढवतो, तर कधी कुणी राजकारणाच्या साप-शिडीवरून थेट तळाला येऊन पोहोचतो. या सगळ्या कृतींकडे कसं बघायचं, हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन असतो. त्यामुळे त्या कुणाला मनोहर वाटतात, तर कुणाला राजकारणाचा तो एक अपरिहार्य भाग वाटतो. बिहारच्या लोक जनशक्ती पक्षामध्ये सध्या जे चालू आहे, त्याचं वर्णन नितीशकुमार यांनी इंधन काढून घेतल्यानं पासवान यांचा ‘चिराग’ आता फडफड करू लागला आहे, अशा शब्दांत करता येईल. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी चिराग पासवान यांच्यावर राजकीय सूड उगवला असा त्याचा अर्थ आहे.

आपल्या देशात समाजवादी विचाराची जी काही छकलं झाली, त्यापैकी एक रामविलास पासवान यांनी २००० साली स्थापन केलेला त्यांचा सवतासुभा म्हणजे लोक जनशक्ती पक्ष आहे. या पक्षाला म्हणजे रामविलास पासवान यांना बिहारमध्ये मागासवर्गीय समाजाचा चांगल्यापैकी पाठिंबा आहे, हे त्यांनी जनता दल (यु)मधून फुटून निघाल्यावर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत सिद्ध केलेलं आहे. २०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा निवडणुकांत या पक्षाला बिहारात सहा जागा मिळाल्या. रामविलास पासवान यांचा लोकसंग्रह आणि सत्ताधाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा गुण वाखाण्यासारखा आहे.

रामविलास पासवान आणि नितीशकुमार या बिहारमधील दोन नेत्यांचं अत्यंत खास वैशिष्ट्य म्हणजे दोघांचाही लढा धर्मांध शक्ती म्हणजे भाजप विरुद्ध आहे, तरीही त्यातला संधिसाधूपणा म्हणजे या दोघांनीही त्याच भाजपच्या चमच्यातून सत्तेचं दूध प्राशन केलेलं आहे! अर्थात ते दोघेही याला संधिसाधूपणा समजत नाहीत, हा त्यांचा राजकीय कोडगेपणा म्हणायला हवा. शुगर कोटेड आणि जरा वेगळ्या शब्दांत हेच म्हणणं सांगायचं झालं, तर राजकारणात चालून आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करून घेण्याची नजर असलेले मुत्सद्दी म्हणजे रामविलास पासवान आणि नितीशकुमार आहेत! अर्थात या बाबतीत रामविलास पासवान टेकाड असतील, तर नितीशकुमार पर्वत आहेत, हे काही वेगळं सांगायला नको!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

रामविलास पासवान यांनी अशा राजकीय सुर्वणसंधी अनेकदा साध्य केलेल्या आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत रामविलास पासवान भाजपच्या आश्रयाला गेले आणि सुमारे अर्धतपाच्या काळानंतर त्यांनी पुन्हा केंद्रातला सत्तेचा सोपान चढण्यात यश मिळवलं. नरेंद्र मोदी-अमित शहा आणि रामविलास पासवान यांच्या राजकारणाच्या बाजाचा अंदाज भल्याभल्यांना आलेला नाही. तसा तो लोक जनशक्ती पक्ष आणि भाजप यांच्यात युती झाली, तेव्हाही आलेला नव्हता. तेव्हा मी दिल्लीतच पत्रकारिता करत होतो आणि अमित शहा यांनी पाटण्याहून लोक जनशक्ती पक्षासोबत भाजपसोबत युती करत आहे, अशी घोषणा केली, तेव्हा दस्तुरखुद्द भाजप मुख्यालयातही भल्याभल्यांना कसा धक्का बसला होता, हे अजूनही आठवतं.

रामविलास पासवान हयात होते, तोपर्यंत लोक जनशक्ती पक्षातील कुरबुरींना तोंड फुटलेलं नव्हतं, कारण रामविलास यांचा करिष्मा आणि वचकही तसाच होता. बिहारवर वर्चस्व निर्माण करण्याच्या नितीशकुमार आणि रामविलास यांच्यात सुरू असलेल्या सुप्त संघर्षालाही जाहीर स्वरूप प्राप्त झालेलं नव्हतं. त्या संदर्भात जे काही शह-काटशहाचं राजकारण सुरू होतं, त्याला तोंड फुटलेलं नव्हतं. मात्र रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पक्षाची सुत्र चिराग पासवान यांच्याकडे आली आणि नितीशकुमार यांचा जनता दल (यु) आणि लोक जनशक्ती पक्षात वर्चस्वाचा संघर्ष उघडपणे सुरू झाला, तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्याची फार काही झळ नितीशकुमार आणि त्यांच्या जनता दल (यु) पक्षाला बसलेली नव्हती.

चिराग पासवान यांच्याकडे लोक जनशक्ती पक्षाची सूत्रं आली, ती केवळ ते रामविलास यांचे पुत्र आहेत म्हणून, हे काही वेगळं सांगायला नको. चिराग पासवान तरुण आहेत, अभियांत्रिकीतलं उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. दिसायला रुबाबदार असल्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीचेही दरवाजे ठोठावून बघितले आहे. मात्र वडिलांच्या आग्रहामुळे तेही राजकारणाच्या वाटेवरून चालू लागले आणि पुरेशी राजकीय पक्वता येण्याच्या आतच त्यांनी नितीशकुमार यांच्यासारख्या ‘हेवी वेट’शी पंगा घेऊन स्वत:चं राजकीय भविष्य धूसर करून टाकलं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

भाजपची बिहारमधील युती जनता दल (यु)पेक्षा नितीशकुमार यांच्याशी जास्त पक्की आहे आणि ती तशी पक्की असणं नैसर्गिक नसून अगतिकता आहे. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा जनता दल (यु) आणि नितीशकुमार यांच्यापेक्षा बिहारात मोठं होण्याच्या संधीची भाजपला प्रतीक्षा होतीच. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ती संधी रामविलास पासवान यांच्या अनुपस्थितीत चिराग पासवान यांनी भाजपला मिळवून दिली.

चिराग पासवान म्हणजे लोक जनशक्ती पक्ष आणि नितीशकुमार म्हणजे जनता दल (यु) हे दोन्ही पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे घटक पक्ष असले तरी बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल (यु)च्या म्हणजे नितीशकुमारच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा निर्णय चिराग पासवान यांनी घेतला. लोक जनशक्ती पक्ष किती जागा जिंकू शकतो, यापेक्षा जनता दल (यु)चा किती जागी पराभव करण्यास कारणीभूत ठरू शकतो, याचा अंदाज आल्यावर भाजपने मौन धारण करून चिराग पासवान यांना पुरेशी ‘कुमक’ पुरवली हे काही लपून राहिलेलं नाही. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याआधीपासूनच बिहारमध्ये नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, पण भारतीय जनता पक्ष सभागृहातला सर्वांत मोठा पक्ष ठरेल अशी भाकीतं व्यक्त केली जात होती आणि ती खरीही ठरली.

बिहारमधल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजप संख्याबळाने सर्वात मोठा पक्ष ठरला आणि जनता दल (यु) चक्क तिसऱ्या नंबरवर फेकला गेला. कारण लालूप्रसाद यादव सर्वेसर्वा असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनी अनपेक्षितपणे मुसंडी मारून दुसऱ्या क्रमांकाचं संख्याबळ पटकावलं. अर्थात भाजप आणि जनता दल (यु) युती असल्यानं ठरल्याप्रमाणे नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले, तरी झालेल्या पिछेहाटीचं शल्य त्यांच्या मनात होतं आणि त्याचा राजकीय वचपा काढल्याशिवाय ते राहणार नाहीत, हे उघड होतं. त्याप्रमाणे घडलं आता घडलं आहे.

सर्व राजकीय पक्षात असतात तसेच सत्तेसाठीचे संघर्ष लोकसभेत जेमतेम सहा सदस्य असलेल्या लोक जनशक्ती पक्षातही आहेत, हे नितीशकुमार यांनी हेरलं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं बिगूल वाजायला सुरुवात होताच फासे फेकले. कुठल्या तरी हिंदी चित्रपटात ‘ये खेल तुमने शुरू किया है, इसे मैं खतम करूंगा’ असा डॉयलॉग आहे. नितीशकुमारांना शह देण्याचा खेळ चिराग पासवान यांनी सुरू केला आणि त्या खेळाचा शेवट आता नितीशकुमार करत आहेत. लोक जनशक्ती पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी बंडाचं निशाण फडकावलं. पक्षाच्या गटाचं लोकसभेतील नेतेपद चिराग पासवान यांच्याकडून काढून घेऊन पशुपती पारस यांच्याकडे सूपूर्द केलं. पक्षाच्या संसदीय गटात फूट पडली. चिराग पासवान अल्पमतात गेले. त्यांच्या गटात आता तेच एकमेव खासदार उरले आहेत. पुढच्या सगळ्या हालचाली नितीशकुमार यांच्या नियोजनाप्रमाणे घडत गेल्या आणि चिराग पासवान एकटे पडले.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पक्षात फूट पडली हे मान्य करून स्वत:च्या नेतृत्वाखालील पक्ष मूळ असल्याचं सिद्ध करण्याऐवजी चिराग पासवान यांनी त्या पाच खासदारांना पक्षातून काढून टाकलं. आता ते पाच खासदार  विरुद्ध एकटे चिराग पासवान अशी अस्तित्वाची खडाखडी सुरू झालेली आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीतच बिहारातील मतदार पशुपती पारस यांच्यामागे आहेत की, चिराग पासवान यांच्यामागे हे सिद्ध होईल.

एक बऱ्यापैकी प्रभावी असलेला प्रादेशिक पक्ष अंतर्गत लाथाळीमुळे अस्तित्वहीन होत असल्याचा आनंद निश्चितच भाजपला असेल, पण दुसरीकडे त्यामुळे नितीशकुमार यांचे पाय बिहारमध्ये आणखी घट्ट होतील, याची भीतीही असेल. त्यामुळे यापुढचा बिहारातला भाजप विरुद्ध नितीशकुमार हा सुप्त राजकीय संघर्ष आणखी तीव्र होत जाईल. लोक जनशक्ती या चिटुकल्यापिटुकल्या पक्षातील अंतर्गत संघर्षाला असे भाजप विरुद्ध नितीशकुमार या सुप्त संघर्षाचे कंगोरे आहेत.

या लाथाळीत भारतीय जनता पक्ष चिराग पासवान यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना मंत्रीपद देतो की, नितीशकुमार यांच्या सांगण्यानुसार पशुपती पारस यांना, की दोघांच्याही हातात वाजवण्यासाठी गाजराची पुंगी मिळते, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......