निवृत्तीचे हाकारे अन् राष्ट्रीय आपत्तीचा सोस
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • शरद पवार
  • Thu , 15 November 2018
  • पडघम देशकारण शरद पवार Sharad Pawar

मोह आणि काळानुरूप महत्त्वाकांक्षा यांचा मेळ बसवणे हा खरे तर अंगभूत व्यवस्थापन कौशल्याचा भाग मानावा लागेल. असे व्यवस्थापन कौशल्य प्रत्येकाच्या अंगी असेलच असे नाही. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांच्या ठायी अशी प्रज्ञा असणे हा दुग्धशर्करा योगच. पण असे योग व स्वप्नातल्या आकांक्षासिद्धीचे क्षण येण्यासाठीचे योगायोगही सत्ताप्राप्तीसाठी अपुरे पडतात. यापेक्षाही अधिक असे काही तिला हवे असते. याच्या शोधात मग अध्यात्माच्या कुंडल्या मांडल्या जातात. या कसरतीतून विणत गेलेले मिथकांचे जाळे एवढे गुंतागुंतीचे बनत जाते की, त्या ओझ्याखाली सत्याचा ऊर धपापून जावा. कारण मोह होण्याला मर्यादा नसतात, मात्र तो किती काळ व्हावा याचीही एक सीमारेषा निश्चित असते. मोह अमर्यादित मानला तरी महत्त्वाकांक्षा सिद्धीस येण्याची स्थिती थोडी संकुचित असते. तसा मोह हासुद्धा कालसापेक्षच असतो; पण मानवाला तो अगदी स्मशानात जाईपर्यंत सुटत नाही त्याला कोण काय करणार?

आपण नेमके काय करू शकतो याचा अंदाज असणारे लोक सार्वजनिक जीवनातील प्रत्येक घडामोडीवर केवळ लक्ष ठेवत बसत नाहीत, या घडामोडींमागे आणखी काही घडामोडी घडत जातील, याची काळजी घेतात अथवा या घडामोडींना आपल्याला अनुकूल असे वळण देण्याचा प्रयत्न करतात. या दोन्हींतून आपले इप्सित साध्य होत नसेल तर किमान या घडामोडींचे प्रेरक आपणच असल्याचा आभास तरी निर्माण करतात.

मोहाला भरपूर स्वातंत्र्य असते, पण राजकारणातल्या महत्त्वाकांक्षेला संख्याबळाच्या मर्यादा असतात. त्यामुळे मनीषा कितीही प्रबळ असली तरी प्रत्यक्षातले गणित हवे तसे साकारले जातेच असे नव्हे. अशा वेळी त्या अंगभूत व्यवस्थापन कौशल्याचा कस लागतो. असलेल्या आणि बहुतांशी नसलेल्याच मिथकांचे जाळे विस्तारण्याचाही कसोशीने प्रयत्न केला जातो. पण तरीही सत्तेची आभा कवेत घेता येत नाही. यामागील कारणांचा शोध घेणे हा खरा अशा कुशल व्यवस्थापकांसाठी आजवर उपेक्षित ठेवलेला आणि आता अपेक्षित असणारा टप्पा असतो.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा - https://tinyurl.com/y86lc3fq

.............................................................................................................................................

प्रदीर्घ काळ राजकीय व्यासपीठावर वावरताना शाश्वततेला दिलेली बगल ही कदाचित यातली सर्वांत मोठी भळभळती जखम असू शकते. राजकीय प्रक्रियेत सहभागी होताना त्यातले सगळेच भिडू आपापल्या कुवतीनुसार आपापला पट मांडत असतात. असा पट मांडताना आपल्या मूळच्या क्षमतेपेक्षा तो मोठा भासेल याची काळजी घेतली जाते. त्या खेळाचा प्रवाह, त्याची दिशा आणि गतिमानता पाहून आपला डाव, खेळी बिनचूक ठरेल असा प्रयत्न करत असतात; पण त्याच वेळी खेळाचा नूर पाहून तो खेळ आपल्याला हवा तसा रंगावा यासाठीही त्यांची धडपड चाललेली असते.

पण हा सत्तेचा सारिपाट मोठा विलक्षण असतो. अंतिम डावापर्यंत ज्याच्या मनी विजयाची माळ आपल्याच गळ्यात पडावी अशी धारणा असते, असे खेळगडी बाजूला पडतात आणि मानाची गदा स्वप्नातही कल्पिली नव्हती, अशा चर्चेत नसलेल्या गौडांच्या हातात सोपवली जाते. हे असले चमत्कार जनता जनार्दन सहजपणे घडवून आणते खरी पण मग मैदानात घट्टपणे पाय रोवून बसलेल्या मल्लांच्या झोपी उडून जातात त्याचे काय?

सारिपाटाच्या या लहरीपणामुळे कसलेले खेळाडू मग आणखीच व्यथित होतात अन् नव्याने मोह व महत्त्वाकांक्षांना खतपाणी घालायला लागतात. पण ही वाटचाल अख्खा पट अस्थिर करण्याकडेच जात असते. आजवर टाकलेले प्रत्येक पाऊल ज्या अस्थिर परिस्थितीचा अचूक लाभ घेत दमदार झालेले असते. त्यामुळे या खतपाणी घातलेल्या प्रवासाचीही दिशा अशाच अस्थिरतेच्या शोधात प्रवाही झालेली असते आणि हा सारा इतिहास भविष्याच्या आड यायला लागतो.

२०१९ च्या महायुद्धासाठी सज्ज व सिद्ध राजकीय पक्ष आपापल्या आघाड्या मजबूत करण्यात गुंतलेले असताना आयुष्यातील अर्धशतक सक्रिय राजकारणात योगदान देणाऱ्यांना या घडामोडीतील अस्थिरतेचेच आकर्षण असावे यातच सगळे काही आले. सार्वजनिक वाटचालीतल्या तारुण्य व वार्धक्याच्या व्याख्या जरा निराळ्या असतात. भारतात सर्वोच्च सत्ताधीशपदी विराजमान होण्याचे वय जरी ‘अवघे पाऊणशे’ असले तरी मनातल्या सुप्त इच्छा पूर्ण होण्यासाठीच्या प्रयत्नांना काळाची मर्यादा असते. गत सत्ताधारी संभाव्य सत्ताधारी बनण्याप्रत पोहोचू शकणार नसले आणि तसा अचूक अंदाज आलेला असला तरीही हे स्वप्न वाटते तेवढे सुरस नव्हे. विरोधकांच्या ऐक्याचे शिलेदार होण्याचा दावा करणे व सर्व विरोधकांनी एकमताने प्रत्यक्ष सहमती देणे यात मोठी तफावत असते. 

आकाशाला गवसणी घालताना आधारासाठी वापरलेल्या टेकड्यांची रचना बदलली की, कालौघात त्या टेकड्याही कोणाचे वजन पेलायचे? याबाबत विशेष सजग बनतात. अस्थैर्यावर स्वार होत व्यक्तिगत स्थैर्याचा आविष्कार साधणाऱ्यांची आजवरील वाटचालच येत्या काळात अडसर बनू पहात आहे.

मोह, महत्त्वाकांक्षा, क्षमता असूनही विश्वासार्हतेची उणीव कायम असेल तर पुन्हा कात्रजच्या घाटाचीच चर्चा अधिक रंगत जाणार. त्यामुळे अधूनमधून जाणीवपूर्वक केले जाणारे निवृत्तीचे हाकारे अन् राष्ट्रीय आपत्तीचा सोस यातली विसंगती काही काळ केवळ सर्वसामान्यांची करमणूक करेल. पण या मिथकांमुळे व आभासामुळे ना मती गुंगेल ना सत्तेचा बार उडेल!  

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......